Home Blog Page 534

किनगाव पपई ट्रक पलटी भिषण अपघातातील व्यापारी आणी वाहन चालकास तिन दिवसाची पोलीस कोठडी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या पपई वाहकतुक करणारा आयशर वाहन पलटी होवुन झालेल्या मन हेलावणाऱ्या अशा भिषण अपघातात १३ मजुरांसह दोन बालकांचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली होती , दरम्यान पोलीसांनी या अपघातास कारणीभुत म्हणुन वाहनचालक शेख जहीरोद्दीन शेख बदरूद्दीन राहणार रावेर आणी पपई खरेदी व्यापारी अमीन शाह रज्जाक शाह रा. केऱ्हाळा ता . रावेर यांना आरोपी केले असुन त्यांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , आज या दोघांआरोपींना यावल न्यायलयात हजर केले असता त्यांना दिनांक १८ फेब्रुवारीपर्यंत तिन दिवसाची ची पोलीस कोठडी देण्यात आली आहे . या संदर्भात यावल पोलीसांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी घडलेल्या अपघाता विषयी विविध विभागाकडुन चौकशी अहवाल मागविले असुन , याकामी त्यांना पोलीस कर्मचारी संजय तायडे व त्यांच्या पोलीस सहकारी कर्मचारी कार्य करीत आहे . पोलीसांनी मागविलेल्या तपासकामी अहवाल पुढीलप्रमाणे असुन ,यात वाहनचालक हा वाहनचालवितांना दारूच्या नशेत होता का ? याबाबतचा वैद्यकीय तपासणी अहवाल, वाहनाची कालमर्यादा तपासणी अहवाल , एका मालवाहु वाहनात मजुर बसविण्याची संख्याही किती असावी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन रस्ताच्या संदर्भात अहवाल , जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कोरोनासंदर्भात नियमांचे क्षमतेपेक्षा अधिक मजुर वाहतुक करून नियमांचे उल्लघन करणे, वाहनात क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतुक करणे , अशा विविध कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग यावल , आरोग्य तपासणी विभाग , रस्ते सुरक्षा विभाग जळगाव अशा विभागाकडे अहवाल मागविला आहे . या सर्व पार्श्वभुमीवर वाहनाची कालमर्यादा संपली असुन सदरचा वाहन परमीट आणी वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव संबधीत विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त मिळाले आहे . दरम्यान अशा प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीची तपासणी करण्याचा अधिकारी हे जिल्हा रस्ता सुरक्षा पथकाची जबाबदारी आहे .अशा प्रकारच्या वाहनांवर या पथका कडून आजपर्यंत किती वाहनांवर कारवाई झाली किंवा काय या पथकाची जबाबदारी काय व कशी याची माहीती अद्याप आजपर्यंत कळालेली नाही . या सर्व गोंधळलेल्या कारभारत जिल्हा रस्ता सुरक्षापथकाची भुमिकाही पारदर्शक दिसुन येत नाही अशी संत्पत प्रतिक्रीया व्यक्त होत आहे . यावल रावेर आणी चोपडा या परिसरात शेकडो कालमर्यादा संपलेली विविध वाहनप्रवासी वाहतुक करीत असुनही बाब रस्ता सुरक्षापथकाच्या निदर्शनाश येत नाही म्हणजे हे नवल म्हणावे लागेल .

आर .आर .आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत जळगाव जा तालुक्यातील सुनगाव ने पटकाविला सुंदरगाव होण्याचा पुरस्कार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

आर आर आबा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज 16 फेब्रुवारी रोजी तालुका सुंदर व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण करण्यात आले स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी सभागृह येथे घेण्यात आला यात जिल्ह्यातून पहिला पुरस्कार मोताळा तालुक्यातील माकोडी गावाला मिळाला व जळगाव जामोद तालुक्यातील पहिला पुरस्कार सुनगाव या गावाने पटकाविला या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मनिषा ताई पवार उपाध्यक्ष सौ कमल ताई बुधवत सभापती रियाज खान पठाण जिल्हाधिकारी एस राममूर्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते पंचायत समिती मोताळा सभापती प्रकाश बसी आदी उपस्थित होते जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा ताई पवार म्हणाल्या की या स्पर्धेत सहभाग नोंदवत पारितोषिक मिळालेल्या ग्रामपंचायतीपासून अन्य ग्रामपंचायतीने प्रेरणा घ्यावी व पुढील वर्षी आपल्या ग्रामपंचायतला कसे पारितोषिक मिळेल या दृष्टीने काम करावे सन 2019 20 चे उत्कृष्ट कामगिरी केलेले तालुका सुंदर गाव म्हणून जळगाव जा तालुक्यातून सूनगाव या गावाचे प्रथम विजेते म्हणून घोषित करण्यात आले या पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये असे आहे यावेळी हा पुरस्कार सूनगाव चे सरपंच रामेश्वरभाऊ अंबडकार व गग्रामविकास अधिकारी चौधरीसाहेब यांनी एस राम मूर्ती जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला सन 2019 20 च्या स्पर्धे मध्ये गावाला जो पुरस्कार मिळाला तो तत्कालीन सरपंच यांच्या कार्यकाळातील कामगिरीबद्दल मिळाला आहे याचे श्रेय येथील माजी सरपंच विजयाताई पुंडलीक पाटील व उपसरपंच व सदस्य गावकरी यांचे आहे यावेळी हा पुरस्कार स्वीकारतांना सूनगाव चे सरपंच रामेश्वर भाऊ अंबडकार ग्रामविकास अधिकारी टी जी चौधरी व पंचायत समिती जळगाव जामोद चे गट विकास अधिकारी भारसाकडे साहेब उपस्थित होते

 

ट्रोल, ड‌िझेल दरवाढीविरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0

 

आयुषी दुबे शेगाँव

शेगावच्या चौकात चूल मांडून तयार केले जेवण

राज्यात पेट्रोल आण‌ि डिझेल दरवाढीविरोधात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी व इतर पक्षांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी कडून आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरामध्ये भरचौकात चूल मांडून जेवण तयार करून केंद्र सरकारचा दरवाढीविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

राज्यात पेट्रोल आण‌ि डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फुल मांडून जेवण तयार करून वितरित करण्यात आले. तर यावेळी गॅस सिलेंडर ला हारार्पण करून त्याला श्रद्धांजलीपर निषेध व्यक्त करण्यात आला. महिला आघाडीच्या राज्य सरचिटणीस सौ नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावल ते किनगाव रस्ता बनला मृत्युचा सापळा दोन वर्षात २२ निरपराधांचा झाला अपघातात दुदैवी मृत्यु सा . बा .वि . भोंगळ कारभार

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे ,

तालुक्यातील बु्ऱ्हाणपुर ते अकंलेश्र्वर राज्य मार्गावरील यावल ते किनगाव रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असुन या मार्गावरील रस्ता हा मृत्युचा सापळा बनला आहे .या मार्गावरील मागील दोन वर्षात झालेल्या रस्त्यावरील विविध अपघातामध्ये २२ निरपराध लोकांचा अपघातात बळी गेला असुन , वारंवार या मार्गावर होणाऱ्या अपघाता संदर्भात यावलच्या निष्क्रीय सार्वजनिक बांधकाम विभागास स्थानिक पातळीवर समाजसेवी संघटना व राजकीय पक्षांच्या माध्यमातुन अनेक निवेदन देवुन देखील काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसुन आले नसुन, सार्वजानिक बांधकाम विभागाच्या या अंधेर नगरी चौपट राजा अशा कारभारा विषयी सर्वसामान्य नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान यावल ते किनगाव या मार्गावरील १३ किलोमिटरच्या रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन , यामुळे वाहनचालकांना वाहने चालवितांना वाहनधारका तारेवरची कसरत करावी लागते , प्रसंगी वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अपघातास सामोरे जावे लागते , यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत आणी निष्क्रीय कारभाराच या आजपर्यंत झालेले अपघात आणी त्यात मरण पावलेले लोकांच्या मृत्युस जबाबदार असल्याची संत्पत प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरीकांमध्ये व्यक्त होत आहे . आता तरी लोकप्रतिनिधींनी यावलच्या निंद्र अवस्थेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागास बाहेर आणावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .

कोरपावली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कॉंग्रेसचे विलास अडकमोलतर उपसरपंचपदी हमीदा पटेल यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला असुन ,सरपंचपदाची माळ काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हा मीडिया प्रमुख तरूण पदाधिकारी विलास नारायण अडकमोल यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांच्या काकू हमीदाबी पिरण पटेल यांची मतदानाव्दारे निवड करण्यात आली आहे . यावेळी उपसरपंचपदा साठीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हमीदाबी पिरण पटेल यांना ६तर प्रतिस्पर्धी दीपक चुडामण नेहेते यांना ५मते मिळाल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी पी. आर. कोळी यांनी विजयी घोषीत केले . काँग्रेसच्या हमीदाबी पटेल यांचा १मताने विजयी झाला .यावेळी ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी,ग्राम पंचायत सदस्या हफशान तडवी, हुरमत तडवी, दीपक नेहेते, कविता कोळंबे, भारती नेहेते, सपना जावळे, आफरोज पटेल हे सर्व ११ सदस्य सरपंच उपसरपंच निवडीच्या बैठकीला उपस्थित होते . या निवडणुक निर्णय अधिकारी यांना याकामी ग्रामसेवक प्रवीण सपकाळे यांनी सहकार्य केले ,यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा पॅनल प्रमुख पिरण पटेल, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते बारसु रामदास नेहेते, नारायण अडकमोल, ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, मुक्तार पटेल, इस्माईल तडवी, प्रेमचंद महाले, संदीप नेहेते, शांताराम महाजन,अजित तडवी, अब्दुल तडवी ,उमेश जावळे ,इकबाल मेंबर, गफ्फार मेंबर, सिकंदर तडवी, मुकदर तडवी, मुज्जफर पटेल, कय्युम पटेल, महंमद पटेल, जावेद पटेल,सुनील अडकमोल, भीमराव इंधटे, विनोद अडकमोल, भैय्या अडकमोल, उपस्थित होते पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहित सुशील घुगे, अस्लम खान सह पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला, या निवडीबद्दल सरपंच , उपसरपंच यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीपभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, अजबराव पाटील, हाजी शब्बीर खान , संदीप सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.

सरपंच ग्रामपंचायत मध्ये बसताच जण हितार्थ कामावर एक्शन,

0

 

गोंदिया शैलेश राजनकर

फुलचुर ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच मिलन भाऊ रामटेक्कर आपल्या कार्यालयात येताच एक्शन मूड मध्ये,त्यांनी फुलचुर ग्रामपंचायत मधील काही लोकांच्या समस्या येकूण त्या वर व आलेले गावकरी बंधूंच्या सोबत होत असलेल्या तीन समाश्यांचा निराकरण करण्यात यशस्वी झाले,पहिली समस्या ग्रामवासीयांना पिण्याच्या पाण्याची कोणत्या कारणा मुळे गैर सोय होत आहे,तर त्यांनी पागोली नदीवर लावलेल्या पम्प हाऊस मध्ये जाऊन पाहणी केली,व समनधीत अधिकाऱ्याला बोलावून या या पम्प हाऊस ची रिपेरिंग करून जनतेला स्वच्छ पाणी मिळेल अशी व्यवस्था लवकरात लवकर करावी,दुसरी समस्या ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला राईस मिलचा घाण पाणीचा डपका तयार झाला व तो जमा घाण पाण्याची दुर्गन्ध पसरत असल्या मुळे गाव कऱ्यांना त्रास होतो, व राईस मिलची राखड तेही रस्त्याच्या बाजूलाच टाकण्यात येत असल्यामुळे, त्या रस्त्यावरून बाईक सवार,पायदळ चालणारे याच्या डोळ्यात किंवा वारा आलं कि ती राख लोकांच्या घरात शिरते,म्हणून त्यांनी सरळ त्याच वेळेस राईस मिल मध्ये जाऊन समनधीत मालकाला सूचना दिली कि आपण आपल्या राईस मिल मधील पाणी व राखडी ची स्वतः दोन महिन्याच्या आत व्हिलेवाट लावा, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल, व त्यांनी सुद्धा आम्ही आपल्या शब्दाचा मान ठेवत लवकरात लवकर राखड व पाण्याची व्यवस्ता करू,त्यानंतर अवेध दुरसंचार टॉवर परवानगी न घेता उभं करण्यात आलं त्याला त्वरित टॉवर काढा व पोलीस ठाण्यात सुद्धा समनधीत टॉवर विरोधात तक्रार करण्यात आली कि आपण सात दिवसाच्या आत जर अवैध टॉवर काढणार नाही तर ग्रामपंचायत तर्फे हा टॉवर काढण्यात येईल, असे ताबळतोब निर्णय घेण्यात आले,व त्यांनी सर्वाना सांगितलं कि आज माझा पहिला दिवस आहे जसजसे मला जनतेच्या हिताचे काही नवीन योजना आल्या असतील त्याला आपण सर्वांनी मिळून कार्यवीनंत करू,कारण मला जनतेनी या फुलचुर गावाच कस नवनिर्माण होईल या करीता माझ्यावर विश्वास ठेऊन मला निवडून आणलं, व मी माझी जवाबदारी खुद लक्ष देऊन इथल्या जनतेला न्याय मिळेल अस काम करणार यात दुमत नाही,व मी सर्व फुलचुर ग्रामवासीयांच मनापासून आभारी आहे कि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला सरपंच पदाचा मान दिल्या बद्दल मनापासून आभारी आहे,

किनगाव जवळ पपई ने भरलेला आयशर ट्रक पलटी १५ मजुरांचा जागीच मुत्यु एकाच कुटुंबातील १० जणांचा समावेश

0

 

यावल प्रतिनिधी  विककी वानखड़े

धुळे जिल्ह्यातुन पपई भरून येणारी आयशर
यावल तालुक्यातील किनगावजवळ उलटली असून
यात काम करणारी १५ मजूरांचा गुदमरून जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी याला दुजोरा दिला आहे. याचअपघातातील दोन जण गंभीर असल्याने मृतांचा
आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत वृत्त असे की नेर (धुळे) येथून पपईने भरून
आयशर रावेरला येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास
किनगाव नजिक मोठाअपघात झाला आहे. आयशर पलटी झाल्याने यात असणारे १५ जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मयत सर्व रावेर तालुक्यातील आभोडा, केहाळा व रावेर शहरातील असल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण मजूर असल्याचे समजते. गाडीत एकूण २१ जण होते. यातील १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात नेले आहे.अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी अपघातस्थळ गाठलेअसूनत्यांनीअपघातातीलमृतांच्या आकड्याला दुजोरा दिला आहे. अपघातात मृत
झालेल्यांचे मृतदेह यावल येथील ग्रामीण रूग्णालयात
आणण्यात आलेली आहेत. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यानी भेट दिली असुन अपघाताची सविस्तर माहिती घेण्यासाठी ते यावल येथे दाखल झाले आहे . यावलच्या ग्रामीण रुग्णालयात विभागीय प्रांत अधिकारी कैलास कडलग , विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळेआमदार शिरीष चैधरी अनिल भाऊ चैधरी आनंद भाऊ बाविस्कर यानी भेट दिली

जातेगांव येथे १४ फेब्रुवारी काळा दिवस म्हणून पाळला : पूलवामातील शहिदांना श्रध्दांजली.

0

 

 

प्रतिनिधी -सचिन पगारे
नांदगांव नाशिक

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीर मधील पूलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीसाठी १४ फेब्रुवारी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .येथील शिवाजी चौकात सदर कार्यक्रमाचे आयोजन पिनाकेश्वर माजी सैनिक संघटनेने केले तसेच याठिकाणी तमाम ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे १४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर मधील पूलवामा येथील जवानांवर १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गावातील पिनाकेश्वर माजी सैनिक संघटनेकडून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब चव्हाण यांनी केले. पिनाकेश्वर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संपत पगारे आणि पदाधिकारी यांनी शहिद जवानांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली. मनोज गर्जे, संदीप पवार,नारायण पवार ,विजय पाटील यांनी आपले मत व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण केली. याठिकाणी माजी सैनिक कृष्णा शिंदे,रामदास पवार,मनोज बागूल,विष्णू झोडगे ,विष्णू पवारआदीसह ग्रामस्थ व तरुण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण सुनगाव येथे वाहिली शहिदांना श्रद्धांजली…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

देशाला हादरवून सोडणाऱ्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 साली झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. देशभर या शहिदांचे स्मरण करण्यात येत असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.यानिमित्त जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी श्रध्दांजली पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी शिव स्वराज्य गृप,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जय शिवराय जगदंबा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.सुत्रसंचालन गणेश वसुले यांनी केले. तर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी अशोक काळपांडे, महादेवराव धुर्डे, गुणवंराव कपले,नवनियुक्त सरपंच रामेश्वर अंबडकार,मोहनसिंह राजपुत, पत्रकार गजानन सोनटक्के, अनिल भगत, रवी बानाईत,संदिप धुळे, अतुल गिर्हे, विशाल वसुलकार,रमेश वंडाळे, आनंद धुळे, स्वप्निल वंडाळे,स्वप्निल तेटु,योगेश गवई,पंकज भगत, प्रविण रौदळे,शुभम कापरे,राजु येउल,रवि घोलप,रामदास धुळे, गणपत अंबडकार, विठ्ठल तेटु,शरद वानखडे, ऋषिकेश येउल, गौरव घोपे, रवि दामधर, समाधान धुळे, विनोद ढगे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

साकळी येथे शिवसेना युवा सेना तर्फे कोरोना संसर्गाच्या काळात आपले जिव धोक्यात घालुन वृत्त लेखणातुन व आरोग्य जनजागृती करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार यांचा सन्मान व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला  

0

 

संपुर्ण जगासह आपल्या देशात कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या संकटकाळात नागरीकांना प्रत्येक दिवसाची माहीती देवुन खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीकोणातुन आपले स्वत:चे जिव धोक्यात घालुन वृत्तसंकलनाच्या माध्यमातुन जनजागृतीचे कार्यकरणाऱ्या पत्रकारांचा, आशा सेविका मदतनीस,आरोग्य कर्मचारी,युवा सेना शिवसेना पक्षाचे आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या युवा सेना शिवसेना पक्षातर्फे सत्कार सोहळा आज साकळी येथे संपन्न झाला.
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या या पत्रकारांच्या व आशा सेविका मदतनीस आरोग्य कर्मचारी सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सौ.लताताई सोनवणे, उपजिल्हाप्रमुख मुन्ना भाऊ पाटील ,यांच्या हस्ते हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पूजन करून कोरोणा योद्ध्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे यावेळी ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे,युवा सेना प्रमुख प्रवीण सोनवणे, उपप्रमुख विनायक आप्पा पाटील, स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष भरत चौधरी , प्रदीप वानखेडे ,दीपक कोळी ,सुधाकर धनगर , प्रकाश चौधरी, आशिष झुरकाळे, त्याच बरोबर सूत्रसंचालन डॉक्टर सागर पाटील, व युवा सेना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानण्यात आले.