Home Blog Page 536

भव्य श्रामणेर शिबिर व धम्मपरिषदे चे तांदुळवाडी येथे आयोजन !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील तांदुळवाडी येथे दहा दिवशीय भव्य बौद्ध धम्म श्रामणेर शिबिराला दिनांक /11 फेब्रुवारी पासून सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे तांदुळवाडी रूमणा गावाजवळ सुरुवात झाली पुज्यंनिय भन्ते ज्ञानरक्षितजी (थेरो) यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आणि पंचक्रोशीतील तब्बल 30/ते32उपासकानी चिवरप्रदान केले
पुज्यंनिय भंन्ते यांनी आपल्या मंगलमय वाणिने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि धम्म समजावून सांगितले व यातच मानवाचे कल्याण आहे आज देशाला गरज बौद्ध विचारांचीच आहे असे ते म्हणाले व संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणाने प्रेरीत झाला यावेळी धम्मपिठावर उपस्थित भिक्कु संघाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांना धुपदिपाने प्रज्वलित करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराला सुरुवात केली या वेळी उपस्थित महिलांनी पुज्य भिक्कु संघाचे फुल गुच्छ देऊन स्वागत केले
यावेळी उपस्थित तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे मा.संस्कार प्रमुख नारायण शिंदे जयद्रंत खरात मेजर अनिल खरात छत्रपती शिवाजी महाराज अकॅडमी मधुकर शिंदे सोनोषी वंचित बहुजन आघाडी सिंदखेडराजा.विठ्ठल सोनकांबळे भा.बौ.महासभा . सामाजिक कार्यकर्ते.कडुबाजी वाघमारे साहेब युवा नेते नितीन साळवे भिकाजी जाधव साहेब हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संयोजक सन्माननीय प्रकाश दादा खरात मा.पोलीस अधिकारी व गजानन काळे खरात साहेब व अन्य मान्यवर तांदुळवाडी येथील उपासक उपासिका हे उपस्थित होते

शिंदी येथे बचत गटांना उद्योगाबाबत मार्गदर्शन !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथेदिनांक 12 फेब्रुवारी रोजी सविस्तर माहिती मिळावी यासाठी महिलासाठी पुरुषासाठी उद्योग चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते ,महिलांनी केवळ बचत गट न स्थापन करता बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे !शिवाय छोटे छोटे उद्योगातून मोठी क्रांती घडेल -याबाबत सविस्तर मार्गदर्शन अविनाश खिल्लारे यांनी केले !उद्योगाच्या अनेक संधी आहेत परंतु पाहिजेत अशी मार्गदर्शन ग्रामीण भागातील महिलांना होत नाही अनेक रुपयाचा निधी हा शासन दरबारी पडून असतो !परंतु कोणी ते करत नाही ‘म्हणून महिलांनी उद्योगाबाबत सजग राहून उद्योग उभारावा व आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन उद्योग मार्गदर्शक अविनाश खिल्लारे यांनी केले ‘यावेळी त्यांचे सहकारी उमेश खारडे यांनी सुद्धा उद्योगाबाबत माहिती सांगितली ‘यावेळी महिला बचत गटाचे अध्यक्ष स्वातीताई मार्के ‘संगीताबाई खंडारे राजकोरबाई खंडारे मनिषा गिरी ‘बंगळे ताई खरातताई इतर महिला उपस्थित होते !कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय खंडागळे यांनी मानले ‘कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंढरी आटोळे अनील बंगाळे प्रल्हाद मोरे यांनी परिश्रम घेतले !

साखरखेर्डा येथे कायमस्वरूपी तलाठी कार्यालयाची स्वतःची इमारत हवी ! !अनेक ठिकाणी होते स्थलांतर !लोकांची गैरसोय !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा तालुक्याची मागणी ही गेल्या बारा वर्षापासून जुनी आहे साखरखेर्डा तालुका जेव्हा होईल तेव्हा ! ची गोष्ट आहे ।साखरखेर्डा या गावाशी ५२ खेडे जोडलेली आहे ‘शाळा ,महाविद्यालये ,दवाखाने, तलाठी कार्यालय, असे अनेक कार्यालय महत्त्वाचे ठिकाणी साखरखेर्डा आहे,परंतु ज्या शेती संबंधित कार्यालय आहे ते म्हणजेच तलाठी कार्यालय होय !गेल्या अनेक वर्षापासून साखरखेर्डा येथे तलाठी कार्यालयाची स्वताची इमारतच नाही !ही वस्तुस्थिती आहे ‘तलाठी कार्यालय हे अनेकदा या इमारतीतून त्या इमारतीमध्ये पाच -पाच – चार – चार वर्षासाठी स्थलांतरित झाली आहे ।त्यामुळे अचानक स्थलांतरित झाल्यामुळे अनेक लोकांना नेमके तलाठी कार्यालय गेले कुठे हा प्रश्न पडतो लोक तलाठी कार्यालयाची शोधा-शोध करतात !अगोदर तलाठी कार्यालय हे खाजगी इमारतीमध्ये होते त्यानंतर तलाठी कार्यालय हे नवीन ग्रामपंचायत इमारतीमध्ये गेले ‘तेथून ते परत आता मानकर यांच्या कॉम्प्लेक्समध्ये आले !परंतु असतात तलाठी कार्यालय बदलल्यामुळे अनेक लोकांची गैरसोय होत आहे :त्यामुळे साखरखेर्डा हे मोठे गाव असूनही तिथे तलाठी कार्यालयाची स्वतःची इमारत नाही ‘म्हणून साखरखेर्डा येथे लवकरात लवकर तलाठी कार्यालयाची स्वतःची इमारत बांधून द्यावी अशी मागणी तलाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रशांत पौधे यांनी केली आहे ! – ( – -साखरखेर्डा हे गाव भौगोलिक दृष्ट्या खूप मोठी आहे तलाठी कार्यालयाची स्वतःची जागा इमारत शासनाने बांधून द्यावी अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही करत आहोत !लवकरात लवकर तलाठी कार्यालय इमारत बांधून मिळावी ही अपेक्षा -श्री प्रशांत पौंधे जिल्हा उपाध्यक्ष तलाठी संघटना बुलढाणा )

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा-आमदार राजेश एकडे

0

 

सुनील पवार, नांदुरा, प्रतिनिधि

महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम पंचायत हद्दीत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने मलकापूर मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. राजेश एकडे यांनी संबधीत सर्व विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती.सदर योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सिंचन विहिरी,शेत रस्ते पांदण रस्ते,खडीकरण,पक्के रस्ते करणे, गाई-म्हशीचे पक्के गोठे बांधणे,
कुकुटपालन शेड बांधणे,फलबाग लागवड,वृक्षरोपण,
रोपीकरण, शेततळे,ढाळीचे बांध,वनतळे,
अंगणवाडी बांधकाम, शौचालय बांधकाम या सह करावयाचे इतर कामाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना आमदार राजेश एकडे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना केल्या. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या या आढावा बैठकीस नांदुरा येथील तहसीलदार श्री.राहुल तायडे,नांदुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. समाधान वाघ, तालुका कृषी अधिकारी श्री. पुरुषोत्तम अंगाईत, वनविभागाच्या जळगाव जामोद च्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिताताई राजहंस,मलकापुर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.सोळंके यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सेलू तालुका भा. ज. यु. मोर्चाच्या वतीने आघाडी सरकारचा निषेध करीत शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे निवेदन

0

अजहर पठाण
सेलू/परभणी

राज्यातील आघाडी सरकारने शिव जयंती उत्साहात साजरी करण्याचे नाकारलेले असल्याने भाj. ज. यू. मोर्चाच्या वतीने आघाडी सरकारचा निषेध करीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्याचे ठरविले आसून याबाबत चे निवेदन येथील भा. ज. यू. मोर्चाचे तालुका अध्यक्ष श्री. शिवहरी शेवाळे, भागवत दळवे , महादेव गायके , नागेश ठाकूर, जीवन ढवळे, प्रदीप झिंबरे, अभिजित रोडगे आदींनी सेलू पोलिस स्टेशन सेलू येथील पो. निरिक्षक यांना देऊन छ्त्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे ठरविले असून शिव प्रेमींनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे

शिवजयंतीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा दूजाभाव – अमर पाटील यांचा आरोप

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी संभाजी ब्रिगेड नांदुरा च्या वतीने तहसील मार्फत मुख्यमंत्री यांना पत्र पाठविण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडून लग्न कार्यास परवानगी आहे,शाळा महाविद्यालय सुरू आहेत,सर्व धार्मिक स्थळे सुरू आहे,बाजारपेठ खुल्या आहेत,आता कोरोनाची भीती सुद्धा राहिली नाही.जर कोरोनाला आळाच घालायचा होता तर तुम्ही स्वतः स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला २३ जानेवारीला लाखोंच्या संख्येने जमा होऊन पुतळ्याचे अनावरण कसे केले? ,जयंत पाटील यांचे हजारोंच्या संख्येनं दौरे कसे सुरू आहेत? ,वडेट्टीवार च्या सभेला परवानगी कशी? मग एवढं सर्व सुरू असताना आपण नेमकी शिवजयंतीला च परवानगी का नाकारली?,यामागे आपण केलेला दूजाभाव व पर्यायाने तिथीचा अट्टाहास तर नाही ना?.संपूर्ण जग तारखेनुसार चालते.आपण स्वतः मुख्यमंत्री महोदय सर्व कामकाज तारखेनुसार पार पाडता.तसेच दैनंदिन जीवन जगताना सुद्धा तारखेचाच वापर करता.तुम्ही स्व.प्रबोधनकारजी ठाकरे साहेब यांचे नातू आहात हे विसरू नका ही जात जोडून विनंती. हे सर्व काही सुरू असताना फक्त शिवजयंतीलाच बंधन का? आणि हा माझ्या एक्याचाच प्रश्न नसून तमाम शिवप्रेमींचा प्रश्न आहे.जर आपण हा निर्णय रद्द केला नाही तर शिवप्रेमींच्या भावनेचा उद्रेक होईल. आणि आपल्याला महाराष्ट्राच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यामुळे आम्ही तुम्हाला नांदुरा मधे पाय टाकुु देणार नाही. तसेच शिवप्रेमी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. म्हणून मी आपणास विनंती करतो की आपण काढलेला शासकीय जी.आर.तात्काळ मागे घेऊन शिवजयंतीला खुली सुट द्यावी ही विनंती या आशयाचे पत्र तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष अमोल भगवान पाटील,तालुका प्रसिद्धी प्रमुख हरिभाऊ जुमळे,उपाध्यक्ष सचिन बाठे,ऋषिकेश कोळस्कर,विठ्ठल भगत,शहरउपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,रघुनाथ गावंडे, माटोळा शाखाध्यक्ष सहदेव खराटे,सागर पाटील,तेजस पाटील,गजानन मुंढे,संतोष देवकर,गणेश बकाल,सुपेश सोळंके,अजय खराटे,पवन चरखे,पत्रकार प्रफुल्ल बिचारे,संतोष तायडे,राहुल खंडेराव,अरुण सुरवाडे, व इतर बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते.

पैशांवर निवडणुका जिंकता आल्या असत्यातर टाटा बिर्ला हे देशाचे पंतप्रधान झाले असते : ना . जयंत पाटील

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे “पैशांवर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर टाटा-बिर्ला पंतप्रधान झाले असते. अंबानी असो की गरीब माणूस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला एकाच मताचा अधिकार मिळाला. पैशांपेक्षाही जनतेशी असलेल्या थेट संपर्कामुळेच निवडणुकीत विजय होत असतो, हे सत्य आहे. त्यामुळे बुथ कमिट्या पुर्ण कराव्यात. नेते आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय असावा.”, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त पाचोरा विधानसभा मतदारसंघात संपन्न झालेल्या आढावा बैठकी दरम्यान केले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “भाजपने शेतकरी आणि कामगार वर्गाला नाराज केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मतदान मिळणे अवघड होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. पक्ष वाढवावा.” यावेळी त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाचे उदाहरण देताना सांगितले की, मी माझ्या मतदारसंघात फार प्रचार करत नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे निवडणूक सोपी होते.

यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मागच्या काळातील सरकारने सत्तेचा माज आणि मस्ती दाखवली. त्यामुळेच जनतेने त्यांचा अहंकार बुडवला. देवेंद्र फडणवीस कितीही पुन्हा येईन म्हणाले तरी ते पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सतत कार्यरत राहावे. संघटना वाढवावी, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार मनिष जैन, रविंद्र भैय्या पाटील, माजी खासदार मोरे काका, उमेश पाटील, अर्जुन टिळे, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पीता पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, वंदना चौधरी, रिता बाविस्कर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वैजापूर येथे आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर यांच्या प्रमुख उपस्थीतीत पाणी फाऊंडेशन गाव समृद्ध स्पर्धा 2020-21आढावा बैठक संपन्न झाली.

0

 

ऋषी जुंधारे,वैजापूर

आज वैजापुर पंचायत समिती येथे आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर यांच्या प्रमुख उपस्थीतीत पाणी फाऊंडेशन गाव समृद्ध स्पर्धा 2020-21आढावा बैठक संपन्न झाली.
.पाणी फाऊंडेशन आयोजीत समृद्ध गाव स्पर्धा 2020- 21 या आढावा बैठकीचा शुभारंभ आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर यांनी दीपप्रज्वलनाने केले. या बैठकीस मार्गदर्शन करतांना विधानसभा मतदार संघातील मंजुर करून आणलेल्या जलसंधारण अंतर्गत केटीवेअर, कोल्हापुरी, सिमेंट बंधारे, माती बंधारे असे विविध मंजुर केलेली काम व प्रस्तावित कामाची माहिती दिली. या स्पर्धेत तालुक्यातील 16 गावानी सहभाग घेतलेला असुन सर्व शेतकर्यांनी गावागावातील गटतट सोडत एकत्र येऊन गाव चांगल्या प्रकारे पाणी फाऊंडेशन स्पर्धे अंतर्गत सुजलाम सुफलाम करा असे शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पाणी फाऊंडेशन अंतर्गत पहिल्या टप्प्यांत काही झालेल्या गावाना भेटी दिल्या होत्या त्यावेळचे सुत्र व आताचे पाणी फाऊंडेशनचे सुत्र यात खुप मोठा बदल झाला असुन त्याचे नियोजन वेगवगळ्या पध्दतीने करण्यात येत असुन पाऊस गावात किती पडला, रेनगेज बसविणे, पाऊस नोंदी ठेवणे, विहीरीचे पाणी मोजणे, पाण्याची पातळी वर्षातून 4 वेळा मोजणे अशा विविध मुद्द्यांचा समावेश केला आहे. व सर्व शेतकर्यांनी एकत्र येऊन सहकार्य करावे अशा सुचना दिल्या.
.
यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो वैद्य साहेब, डॉ पोळ साहेब, उपविभागीय अधिकारी आहेर साहेब, तहसीलदार गायकवाड साहेब, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, गटविकास अधिकारी मोकाटे साहेब, उपसभापती राजेंद्र पा मगर, तालुका कृषी अधिकारी कुलकर्णी साहेब, नायब तहसीलदार निखिल धुळधर साहेब, सुरेश राऊत, दिपक तंगे,प्रल्हाद अडसूळ सर्व कृषी सहायक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा सेविका,मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच शेतकरी उपस्थित होते.

खेर्डा बु ग्रामपंचायत वर महाविकास आघाडीचा झेंडा

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

ग्रामपंचायत खेर्डा बु मध्ये आज दिनांक 11/02/2021 पार पडलेल्या सरपंच व उपसरपंच निवडणूक मध्ये प्रवीण भाऊ भोपळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे श्री नरेश वानखडे यांची सरपंच पदी व दुर्गाबाई म्हसाळ यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.यावेळी संजय म्हसाळ, संतोष बंड,योगिता भोपळे, पिंपळकर बाई सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रविण भाऊ भोपळे, पुर्णाजी वानखडे, उमेश राठी, प्रभूदास बंबटकार,दत्तू जाधव,पांडुरंग भोपळे,वासुदेव गिन्हे,कैलास गायकी,प्रकाश वानखडे . ज्ञानदेव राजनकार ,निशिकांत देशमुख, राजू तायडे,भुषण जाधव,विवेक भोपळे,भारत घाटे, मंगेश बंबटकार ,दीपक बंबटकारकैलास पिंपळ कार , गजानन इंगळे,शिवा टाकसाळ,सुभाष वासनकर,सदाशिव तायडे, बाबन अंजणकर,वसंता आसलकार, विश्वनाथ जाधव तसेच निवडणूक अधिकारी संदीप मोरे साहेब, सावंग साहेब, तीवाले साहेब, पोलीस अधिकारी वानखडे साहेब ग्रामपंचायत कर्मचारी अनंता वानखडे, श्याम बंबटकार, गणेश वानखडे उपस्थित होते.तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी गावात मिरवणूक काढून ,फटाके फोडून आणि गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला.

गोंदियात घराबाहेर असलेल्या चारचाकी वाहनांना अज्ञातांनी लावली आग

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया,- राज्यातील इतर मोठ्या महानगरामध्ये रात्रीच्या सुमारास वाहनांना आग लावून जाळण्याच्या घटना एैकावयासय नव्हे तर बघावयास मिळाल्या असताना आज गुरुवारच्या मध्यरात्रीला अज्ञातांनी गोंदियातील श्रीनगर भागात वाहनांनी आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील श्रीनगर परिसरात काही अज्ञातांनी दोन ते तीन चारचाकी गाड्या पेटवल्या आहेत. यामुळे वाहनमालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
श्रीनगर परिसरात असलेल्या नागरी वस्तीत काही अज्ञात समाजकंटकांनी घराबाहेर पार्क केलेली चारचाकी वाहनं जाळल्या.गुरुवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.चंद्रशेखर वार्ड निवासी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत पोलीस कर्मचारी विजय खोब्रागडे यांची हुडंई कंपनीची सुमारे 10 लाख रुपये किमतीची कार पुर्णत जळून खाक झाली.त्याचप्रमाणे भीमनगर निवासी सुधीर कोल्हटकर यांची मिनी मेटाडोर ही सुध्दा जाळली.तर चंद्रशेखर वार्डातीलच माता मंदीरात रात्री 1 वाजेच्या सुमारास मंदिराचा ताला तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करणारा एक युवक शेजारील एक व्यक्ती बाहेर आल्याने पसार झाला.त्यातच या जाळपोळीमुळे विजेचे तार खाली पडल्याने मोठी हानी होण्याची शक्यता होती मात्र अग्निशमनदल वेळेवर पोचल्याने मोठी घटना घडली.याप्रकरणा खोब्रागडे यांनी गोंदिया शहर पोलीसात तक्रार नोंदवली असून शहर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.