Home Blog Page 538

वडाळी येथील युवक बेपत्ता; जुहीकडे शोधाशोध करूनही लागला नाही थांगपत्ता!

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी येथील युवक बेपत्ता झाला आहे. 28 जानेवारीपासून तो गायब असून, त्याचा सगळीकडे शोध घेऊन अखेर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
भगवान हरिचंद काकड (31, रा. वडळी ता. सिंदखेड राजा) 28 जानेवारीच्या सकाळी ट्रॅक्टरमध्ये कापूस घेऊन तो देऊळगाव राजा येथे आला होता. कापूस विक्री करून तो सिंदखेड राजा येथे आला. तिथे प्रताप उत्तम जाधव यांच्या ट्रॅक्टरमध्ये सिमेंट भरून दुचाकीने घरी निघाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र त्याचा पत्ता लगला नाही. त्यामुळे नंदकिशोर प्रल्हाद घोंगे (36, रा. बामखेड ता. सिंदखेड राजा) यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली आहे. रंग गोरा, उंची 5.5 फूट, नाक सरळ, अंगात लाल- काळे पट्टे असलेले टी शर्ट, काळी पँट, पायात काळी चप्पल असे युवकाचे वर्णन आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ. श्री. नागरे करत आहेत. हा युवक कोठे आढळल्यास पो. काँ. नागरे यांच्याशी मो. नं. 7020370018 वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिंदी येथील अपंग समाधान ने मिळवला बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक !महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईवर अपंग समाधानने फडकवला तिरंगा ।

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील एका पायाने अपंग असलेला समाधान रमेश बंगाळे या 24 वर्षीय तरुणाने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई हे शिखर सहजरित्या पार करीत 26 जानेवारीला शिखरावर तिरंगा फडकवला !यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून अपंग समाधान चे भरभरून कौतुक होत आहे !शिवूर्जा प्रतिष्ठान औरंगाबाद संस्थेच्यावतीने व संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी अपंगासाठी ही मोहीम आयोजित केली होती आणि त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव समाधान बंगाळे हा अपंग तरून सहभागी होता !26 जानेवारी ला संपूर्ण भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण सुरू असताना इकडे अपंग समाधान सकाळी ५३० वाजता शिखर चढण्यास सुरुवात केली आणि सकाळी 10.30 वाजता तो शिखराच्या माथ्यावर पोहोचला ! ६ तासाचा खडतर प्रवास करत समाधान व त्यांच्या अपंग सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर त्यांची उंची १६४६ मीटर आहेहे सर करुन माथ्यावरती भारत देशाचा तिरंगा डौलाने फडकला !यामुळे समाधान बंगाळे यांना प्रशस्तीपत्र व गोल्ड मेडल देऊन संस्थेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला ‘शिंदी सारख्या खेडेगावातून येऊन बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक मिळाल्यामुळे समाधान वर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे ‘

शिंदी ते साखरखेर्डा खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे !अवघ्या दोन तासात निघाली गिट्टी !डांबराचे प्रमाण अतिशय कमी !पुढे पाठ मागे सपाट !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

शिंदी ते साखरखेर्डा हा रोड पूर्णपणे खराब झालेला आहे अनेक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे सुद्धा पडलेली आहे परंतु खड्डे बुजवण्याचे काम गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे परंतु हे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढे पाठ मागे सपाट या म्हणीप्रमाणे काम सुरू केली आहे कारण हे काम करत असताना खड्डे बुजवताना डांबराचे प्रमाण अतिशय कमी असून घाईगडबडीने हे खड्डे बुजवण्याचे काम उरकले आहे !
त्यामुळे साखरखेर्डा ते शिंदी गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील रस्त्यावरील बुजवलेल्या खड्ड्यातून गिट्टी बाहेर आली आहे ‘डांबर चे प्रमाण कमी असल्यामुळे संपूर्ण रस्ता परत जसाच्या तसा होत आहे ‘त्यामुळे पुढे पाठ मागे सपाट अशीच अवस्था खड्डे बुजवताना झालेली दिसते .खड्डे बुजवताना निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे !

साखरखेर्डा येथे नाफेड तुर खरेदीचा पालकमंत्री ना . डॉ . राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते शुभारंभ !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

येथे नाफेड तुर खरेदीचा शुभारंभ पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते १ फेब्रुवारी रोजी करण्यात आला . मोहाडी येथील शेतकरी श्रीधर काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .
शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने तुर , हरबरा , मका या भरड धान्याची खरेदी करुन शेतकऱ्यांना भाव दिला . महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन असो , की नाफेडची खरेदी असो , खरेदीदारांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांना मालाचे चुकारे व्यवस्थीत देणे महत्वाचे आहे . मागील काळात तालुका खरेदी-विक्री संघाने तुर खरेदी केली होती. आजही काही शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मिळाले नाही . या गैरकारभारामुळे शेतकरीच नागावल्या गेला . तो प्रकार होवू नये यासाठी सोन पाऊल अॅग्रो कंपणीने नाफेड मार्फत भरड धान्य खरेदी करतांना विश्वास संपादन केला आहे . चुकारे व्यवस्थीत दीले आहेत . त्यामुळे आज तुर खरेदीचा शुभारंभ करण्यासाठी आलो . येथेही काही गैर प्रकार झाले तर माफी नाही . असे उद्गारही त्यांनी साखरखेर्डा येथील तुर खरेदीचा शुभारंभ करतांना काढले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव हे होते . तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख ,सय्यद रफिक ‘दाऊद सेट कुरेशी ‘ पंचायत समितीचे माजी सभापती राजू ठोके , नाथाभाऊ दराडे , बाळासाहेब बेंदाडे , कांता पाटील वायाळ , मोहाडीचे सरपंच अशोक रिंढे , भानुदास लव्हाळे , श्रीधर काळे सुधीर बेंदाडे , पिंपळगाव सोनारा सरपंच तोताराम ठोसरे , रामदाससींग राजपूत यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन डी एन पंचाळ यांनी केले.

बकरी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया जिल्ह्यातील पशु मालकांकडून रात्री बरीच बकरे चोरी केली जात होती, त्याची तपासणी करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर सोपविण्यात आली होती.

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथून या बकरी चोर टोळीचे सदस्य चारचाकी गाडीवर येत असत व 8-10 बक of्यांचा एक कळप वाटेजवळच्या खांबाला बांधलेला दिसला आणि त्याने तो उचलला व ठेवले. ती चार चाकी गाडीत होती. आणि बकरी ओरडत नव्हती, म्हणून त्याने आपला घसा खेचून हे दाबून घेत असे,

खरं तर बकरी चोरांची ही टोळी मटण विकण्याचा आणि शेतकर्‍यांच्या मांसाची चोरी करून चोरी केलेल्या जनावरांचे पैसे विकून नफा कमावण्याचा व्यवसाय करते आणि पशुधन कापल्यानंतर सर्व पुरावे नष्ट करण्यात आले.
जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पानसरे यांनी आयोजित पत्रपरिषदेत माहिती दिली- ज्या शेतकर्‍यांच्या शेळ्या डेली जंगलात चरतात व त्यांची बकरी ओळखत असत अशा 8 बक identif्यांची ओळख पटवून देताना त्यांचे पशुधन त्यांच्याकडे देण्यात आले. उर्वरित 40 बक्या नुकत्याच चारा-पाणी प्रणालीसह अर्जुनी मोरगावच्या कांजी हाऊसमध्ये ठेवल्या आहेत.

या टोळीतील काही सदस्य अद्याप फरार आहेत आणि कोठडीतील आरोपींनी 8 वेळा कबूल केले आहे, पोलिसांनी घटनेत वापरलेली दोन चार चाकी वाहनेही ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

महाविकास आघाडी सरकार हे गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचे सरकार-आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर खरेदीचा शुभारंभ शेतकऱ्यांचा सन्मान करून आज संपन्न झाला.यावेळी
महाविकास आघाडी सरकार हे गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे मत आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केले. या तूर खरेदी शुभारंभ कार्यक्रमास मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बंडूभाऊ चौधरी, श्री. गजानन सोनवणे,श्री.बाळू भिसे,मलकापूर खरेदी-विक्री संघाचे श्री.कृष्णाभाऊ खोपोटे,श्री,सूर्यभान कवळे, दुय्यम निबंधक श्री.महेश कृपलानी,श्री.
म्हैसागर, सचिव श्री.जगताप व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकसान भरपाई मिळाण्यासाठी शेतकऱ्यांचे धरणावर उपोषण सुरूच…

0

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

आज उपोषणाचा सहावा दिवस…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पाणी बंद करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी रोखले

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणाच्या भिंतीवर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस असून काल पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी या उपोषणास पाठिंबा देत आज रविवारी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी यावेळी त्यांना रोखले.मात्र या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे…

खामगाव तालुक्यातील निमकवळा,काळेगाव आणि दिवठाना शिवारातील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 बाधित शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या अधिकृत करण्यात आले आहे परंतु नुकसानभरपाईची त्यांना मिळाली नाही यासंदर्भात संबंधित विभागाकडे दाद मागितली असता अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप करत या शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे प्रशासनाच्या आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी थेट धरणाच्या काठावर 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे. या बुलडाण्यातील निमकवळा,काळेगाव आणि दिवठाना शिवरातील काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा देताच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज कालव्याचे पाणी बंद करू असा इशारा दिला होता. मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे आंदोलनास स्थगित करण्यात आले आहे. यावेळी संपादित केलेल्या जमिनीच्या फळझाडांचा मोबदला मिळावा, डुबित शेत जमिनीचा मोबदला मिळावा तसेच प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष श्याम अवथाळे यांनी दिला आहे.. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण धरणाच्या काठावर सुरू आहे त्याठिकाणी ज्ञानगंगा अभयारण्य आतील पाण्याचा धोकाही या उपोषणकर्त्यांची शेतकऱ्यांना आहे अद्याप पर्यंत सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या उपोषण मंडपाला भेट दिली नाही या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे जोपर्यंत सरकार याची दखल घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे

 

तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिम अंतर्गत १३६ बुधवर १२८९८ बालकांना पोलीओ डोस दो बुंद जिंन्दगीके ९२ % उदिष्ट पुर्ण

0

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिम अंतर्गत आरोग्य विभागा करवी १३६ बुध वर ३६९ आरोग्य कर्मचारीची नियुक्ती करण्यात आली होती तालुक्यात पातुर्डा , सोनाळा, वानखेड , संग्रामपुर या गावात ग्रा प , अंगणवाड्या , शाळा , विद्यालयात पोलीओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती यात तालुक्यात १३७६३ बालकांना पोलीओ डोस अपेक्षीत होते त्यात पाच वर्षा वरिल १३९ बालकांना तर पाच वर्षा खालील १२७५९ असे एकुण १२८९८ बालकांना पोलीओ डोस देण्यात आले पातुर्डा येथे ग्रा प कार्यालयात बुथ वर लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगळ , प्रा आरोग्य केंन्द्रात बुथ वैधकिय अधिकारी अंभोरे यांचे हस्ते बालकांना पोलीओ डोस देऊन शुभारंभ करण्यात आला सकाळी ८ वाजे पासुन ५ वाजे पर्यत पोलीओ डोस बालकांना देण्यात आले
संग्रामपुरात तालुका आरोग्य अधिकारी रोजतकार नगर पंचायतचे सहाय्यक अधिकारी कोल्हे यांनी बालकाना पोलीओ डोस दिले तर गाव निहाय लोकप्रतिनिधी, समाज सेवक , ग्रा प सदस्य यांच्या बालकांना पोलीओ डोस देऊन शुभारंभ करण्यात आला यावेळी ता वै अधिकारी रोजतकार , वैधकिय अधिकारी डॉ उजवणे , वैधकिय अधिकारी डॉ अंभोरे गाव निहाय आरोग्य कर्मचारी , अंगणवाडी सेविका , ग्रा प सदस्य , सामाजीक कार्यकर्ते , ग्रामस्थ उपस्थीत होते

सोमवारी भरणाऱ्या नांदुरा येथील आठवड़ी बाजारा संमंधी महत्वाची सूचना

0

 

नांदुरा येथील आठवड़ी बाजारात व्यापारी प्रतिष्ठाने लावणाऱ्या व्यापारी बंधुनो आणि समस्त सन्माननीय नागरिक बंधुना विनंती की गेल्या मार्च महिन्यापासुन कोरोना मुळे आठवड़ी बाजार हा वेगवेगळ्या जागेवर आणि रोडवर भरत आहे.कोरोनाच्या काळात रोडवर असणारी वाहतूक बंद होती त्यामुळे बाजारास कोणतीही अड़चन नव्हती.पण आता पुर्ण वाहतूक सुरु झालेली आहे.त्यामुळे रोडवर लावलेली दुकानें आणि असणारी वाहतूक यामुळे अनेक अडचणी येत आहे.छोटे मोठे अपघात होण्याची भीती आहे.म्हणून उदया सोमवार च्यां बाजारात आपण आपली दुकाने आठवड़ी बाजाराच्या ठरलेल्या ठीकानावरच लावावे ही विनंती. *या करीता आज आठवड़ी बाजार नांदुरा ची पुर्ण साफ सफाई करण्यात आली आहे.

बंधुनो कोरोनाच्या संकट काळात आपण सर्वानी जे सहकार्य केले त्याबद्दल आपले खुप खुप आभार यापुढे देखील आपण आपली व्यापारी प्रतिष्ठाने आठवड़ी बाजारात लावून सहकार्य करावे ही विनंती

दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय मिळावा वेळोवेळी

0

 

नांदुर:-(प्रफुल्ल बिचारे पाटिल )

आज रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी आरोग्य विभाग तर्फे ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम राबविण्यात आली.प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा यांच्या सौजन्याने ओमसाई फाउंडेशन नांदुरा यांच्या पोलिओ डोस बुथवर मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांनी चि.रनविरसिंग निलेश वतपाळ याला पोलिपो डोस देऊन या अभियानाचा शुभारंभ केला.या कार्यक्रमात नांदुरा नगर परिषद चे पाणीपुरवठा सभापती श्री.अजय घनोकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिलाष खंडारे, डॉ.लक्ष्मीनारायण जैस्वाल,
ओमसाई फाउंडेशन चे श्री.विलास निंबोळकर,पत्रकार श्री.प्रवीण डवंगे , श्री.यशवंत पिंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.