Home Blog Page 539

श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनी करण्यात आला पत्रकारांचा सत्कार…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

सुनगाव येथील श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटर यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पत्रकार गजानन सोनटक्के पत्रकार अनिल भगत पत्रकार गजानन खिरोडकार पत्रकार शिवदास सोनोने या पत्रकार मंडळींचा पुष्पगुच्छ तसेच शाल डायरी व पेन देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य पती अशोक काळपांडे माजी सरपंच पुंडलिक पाटील यांचाही पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर शालिग्राम कपले यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच गावातील नागरिकांना वर्धापन दिनानिमित्त श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटर च्या वतीने मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच आजच्या या दिवशी श्रीराम रेडिमेट अंड क्लॉथ सेंटर ने ग्राहकांसाठी खरेदीवर विशेष धमाका ऑफर ठेवली होती यावेळी श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटरचे संचालक दिनेश मिसाळ यांनी गावातील नागरिकांसाठी चहा व फराळाची व्यवस्था केली होती तसेच या वर्धापन दिनानिमित्त दिनेश मिसाळ, पाडुरंग मिसाळ, राजेश मिसाळ, माजी पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे, गुणवंराव कपले,माजी सरपंच पुंडलिक पाटील, शेषराव वंडाळे, डॉ. शालीग्राम कपले,गजानन धुळे, पवन पालीवाल,वासुदेव गायगोल,वनिता मिसाळ, अमोल धुळे,लक्ष्मण मिसाळ यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

डोणगांव येथे भारत मुक्ती मोर्चा च्या वतिने माता रमाई जंयती साजरी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील डोणगांव येथील त्रिरत्न बुध्दविहारात दि . ७ फेब्रुवारी रोजी भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने माता रमाई यांची जयंतीनिमित्त आभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मा.भागवत जाधव हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बामसेफचे मा. आर.बी.डोंगरदिवे व मा.बि.एस.सदार हे होते तर प्रमुख उपस्थिति मा.मुरलीधर लांभाडे जि.संयोजक राष्ट्रीय किसान मोर्चा, मा.सुखनंदन हांडे सर,मा.शेख शफीसर प्रोटान ; मा.गजानन भगत,मा.परमेश्वर रोटे हे मान्यवर उपस्थीत होते..

यावेळी मा.डोंगरदिवे सर,सदार सर,लांभाडेसाहेब,हांडेसर शेख सर यांचे आभिवादन पर भाषणे झाली .

अध्यक्षीय भाषणात भागवत जाधव यांनी माता रमाईचा जिवन संघर्ष कसा होता याविषयी बोलतांना ते म्हणाले की जर माता रमाई यांनी जर ठरवले असते तर त्या काळात त्या हजार हजार रुपयाच्या साड्या नेसुन चांगले दागीणे घालून जगातल्या नामवंत बॅरिस्टर यांच्या पत्नी म्हणुन राहु शकल्या असत्या पंरतु भारतात जो समाज हजारो वर्षापासुन बहिष्कृत व शोषीत आहे त्या समाजाला माणुस म्हणुन जगण्यासाठी जो संघर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू केला होता तो यशस्वी होण्यासाठी व माणसाला माणुस म्हणुन जगण्यासाठी स्वतच्या व परिवाराच्या व संसाराच्या सर्व हौस नाकारुन संपुर्णपणे आंदोलनला सह्योग करणाऱ्या माता रमाईमुळेच यांच्या त्यागामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिण्या पर्यंतचा प्रवास करू शकले म्हणुन आज आपण मानव म्हणुन जगत आहोत याच्यामागे केवळ माता रमाई यांचा त्याग,समर्पण, व बहुजन समाजाविषयी तळमळ आहे हे आपण विसरता कामा नये..

यावल भुसावळ रोडवर ट्रॅक्टर मोटरसायकलचा भिषण अपघात दुचाकीस्वार जागीच ठार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे ,

यावल तालुक्यातील अंजाळे घाटात सायंकाळी ट्रॅक्टर व दुचाकी मोटरसायकलच्या झालेल्या भिषण अपघातात एक व्यक्ति जागीच मरण पावल्याची घटना घडली असुन या संदर्भात पोलीसात ट्रॅक्टर चालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की भालशिव तालुका यावल येथील राहणारे प्रदीप चावदस तायडे २९ वर्ष हे दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भुसावळकडुन भालशिव या आपल्या गावी दुचाकी वाहन क्रमांक एमएच १९डीएम९४२९या वाहनाने जात असतांना भुसावळ रोडवरील अंजाळे घाटात समोर येणाऱ्या ट्रक्टर क्रमांक एमएच १९पी२९५३वरील चालक ज्ञानेश्वर शिवराम कोळी राहणार चोरवड तालुका रावेर यांने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता समोरून येणाऱ्या प्रदीप चावदस तायडे हा ट्रॅक्टरखाली चेंगरला गंभीर जख्मी होवुन जावुन जागीच मरण पावला आहे . याबाबत शांताराम चावदस तायडे रा भालशिव यांनी फिर्याद दिल्याने वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अजमल पठान हे करीत आहे .दरम्यान मयत प्रदीप तायडे याचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले .

साकळी मनवेल थोरगव्हाण रस्ता काटेरी झुडप्यांच्या विळख्यात लोकप्रतिनीधीचे दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे

0

 

यावल  तालुक्यातील साकळी मनवेल थोरगव्हाण रस्त्यावर काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असुन वाहनधारकांना याचा मोठा त्रास सोसावा लागत आहे .या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनीधीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी परिसरातील वाहनचालक व ग्रामस्थ करीत आहे.
काही दिवसापुर्वी थोरगव्हाण गावापासुन काटेरी झुडपे काढण्यासाठी कामासाठी जे.सी.बी आणले होते मात्र या जेसीबीने अपुर्ण काटेरी झुडपे काढण्यात आले असल्यामुळे पुनश्च वाहनधारकांना या अत्यंत धोकादायक अशा काटेरी झुडप्यांचा त्रस्त सुरू झाले आहे.या संदर्भात अधिक माहीती घेतली असता शासनाच्या वतीने या रस्त्याच्या काटेरी झुडपे काढण्यासाठी प्राप्त झालेल्या संपुर्ण नीधि सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन काढण्यात आला असल्याची आतील माहीती एका जबाबदार लोकप्रतिनीधीनी सांगीतली असुन, या गोंधळलेल्या माहीती मुळे त्या झुडपे काढण्याच्या पैशांचे काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे .
साकळी मनवेल थोरगव्हाण ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजुने काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे कीरकोळ अपघातचे प्रमाण सातत्याने वाढले आहे.
थोरगव्हाण ग्रामपंचायत मार्फत यावल सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या पंधरा दिवसापासुन काटेरी झुडपे तोडण्यात यावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले असुन ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन या वाहनधारकांच्या गंभीर अडचणीकडे दुर्लक्ष होत आहे.
साकळी मनवेल थोरगव्हाण या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असुन लोकप्रतिनीधीचे दररोज ये जा सुरुच असते मात्र काटेरी झुडपे काढण्याचा समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहनचालक व सर्व सामान्य नागरीकां कडुन दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कारभारा बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आहे.

छत्तीसगढ व मध्यप्रदेश_सिमेवर असलेल्या महाराष्ट्रातील देवरी तालुक्यात मनसेत_भव्य_पक्षप्रवेश

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर
हे केवळ दृश्य नव्हे सत्यता आहे,

आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्या मध्ये मनसे प्रदेश सरचिटणीस मा. हेमंत भाऊ गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. देवरी तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मनसे प्रदेश सरचिटणीस मा. हेमंत भाऊ गडकरी यांनी अतिशय मोलाचा मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात नागपुर शहराचे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक संतोष धोटे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश चनापे, शहर अध्यक्ष प्रशांत निकम, कामगार सेना उपचिटणीस गणेश मुदलीयार, गोंदिया जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कुमार मिश्रा, जिल्हा उपाध्यक्ष लेखू रहांगडाले, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवली, कार्यक्रम संचालन तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, देवरी तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष अमोल लांजेवार, गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे,देवरी शहर अध्यक्ष मंगेश चौबे, देवरी मनविसे शहर अध्यक्ष मोहीत तुरकर, शहर उपाध्यक्ष राकेश चव्हाण, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, तसेच सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पाडला.

झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी स्वखर्चाने टँकर पुरवठा.

0

 

बोर‌गाव बु!! येथे खाजगी टँकरने पाणीपुरवठा..

धरण उष्याशी पण कोरड घश्याशी अशी झाली अवस्था…

जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बु येथील गाव पाणीपुरवठ्याची विहीर पाण्याने अगदी भरलेली असून सुद्धा गावाला पाणी मिळत नाही.आणि या प्रश्नाने गावकरी बऱ्याच दिवसापासून हतबल झाले आहेत. गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी केली असून देखील गावाला पाणी मिळत नसल्याची खंत गावकरी व्यक्त करीत आहेत.
गावच्या पाणी पुरवठा विहिरीत मोठा पाणी साठा असून गावाला पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे आणि हे केवळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे होत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.कधी पाणी पुरवठ्याची टाकी भरली जात नाही,तर कधी पाईप लाईन तुटली तर कधी टाकी भरण्यासाठी वीज नव्हती अशी एक ना अनेक कारणे ग्रामपंचायत तयार ठेवत असते आणि या मध्ये सर्वात जास्त धावपळ ती गावकऱ्यांची होत आहे.अश्यात गावकऱ्यांनी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती परंतु त्याचाही काही फायदा गावाला झाला नसल्याचे गावकरी सांगत आहेत.
तसेच गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत वॉटर फिल्टर देखील बसविण्यात आलेले आहे परंतु गेले कित्येक दिवस कित्येक महिने झालेत परंतु त्या फिल्टर ला देखील पाणी येत नाही त्यासाठी गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.आणि विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात या गावाला धामना नदीच्या पाण्याने वेढा देऊन पाणी अक्षरशः गावात घुसले होते गावाला अगदी मे ते जून महिन्यापर्यंत सुद्धा कधीच पाण्याची टंचाई येत नाही. पाणी पुरवठ्याच्या विहिरीला पाणी देखील भरपूर आसून केवळ चुकीच्या नियोजनामुळे किंव्हा हलगर्जी पणामुळे गावाला पाणी मिळत नाही म्हणजे धरण उष्याशी आणि कोरड घाष्याशी अशी आमची अवस्था झाली आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु बोरगाव येथे आताच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली त्यामध्ये पूजा प्रमोद फदाट हे निवडून आले आणि त्यांनी स्वतः हा स्व खर्चाने ट्रॅकर भाड्याने लाऊन स्वतःच्या विहिरीवरून टँकर भरून आणून गावाला पाणी पुरवठा करत आहेत. आणि आता तरी योग्य नियोजन करून गावाला नियमित पाणी पुरवठा करावा अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत.

यावल चोपडा मार्गावरील रस्त्यावर अपघाताची मलिका सुरूच आजच्या दृर्घटनेत दोन मोटरसायकलींचा अपघात चार जख्मी

0

 

( प्रतिनिधी)विकी वानखेडे

. येथील यावल चोपडा मार्गावरील रस्त्यावर फॉरेस्ट कार्यालया जवळ आज दुपारी १ वाजेच्या सुमारास दोन दुचाकी मोटर वाहनांचा अपघात होवुन यात चार जण जखमी झाल्याची घटना घडली असुन , यातील दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असुन दोन जणांना प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे वृत आहे . या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की सावदा तालुका रावेर येथील राहणारे संतोष किसन भोई वय ३० वर्ष आणी भुसावळ येथील राहणाऱ्या आशा विनोद भोई वय २५ वर्ष हे त्यांच्याकडील मोटरसायकल क्रमांक एमएच १९डीडी ५८६२या वाहनाने सावदाहुन तोरखेडा तालुका शहादा येथे बहीणीकडे जाण्यास निघाले असतांना यावल चोपडा मार्गावर शहरापासुन सुमारे १ किलोमिटर लांबी असलेल्या फॉरेस्ट कार्यालयाच्या परिसरा जवळील रस्त्यावर चोपडया हुन यावल कडे येणाऱ्या मोटर सायकलने समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात संतोष भोई आणी आशा भोई व अन्य दोन जंण असे चार जण जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे . यातील दोन गंभीर जख्मींना ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार केल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगाव पाठवण्यात आले असुन , घटनेच्या ठीकाणी पोलीस कर्मचारी पंचनामा करण्यास पहोचल्याचे वत्त आहे. अपघातातील जख्मीना मदतीसाठी रिपाईचे कार्यकर्त विष्णु पारधे, यावल येथिल भोई समाजाचे कार्यकर्त भिका भोई व अन्य सामाजीक कार्यकर्त्यांनी मदत केली .दरम्यान यावल चोपडा मार्गावरील रस्त्याची अवस्थाही अत्यंत दयानिय झाली असुन , या मार्गावर वारंवार अपघात होत असुन देखील यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामचुकार कारभाराऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यावर ही याची साधी दखल घेतली जात नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागा कार्यपद्धती बाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे .

पेनटाकळीच्या पात्रात शेतकऱ्याचे आमरण उपोषण !कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शेतीचे होता हे नुसकान !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेला मेहकर तालुक्यातील पेन टाकळी येथील प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान होत असून जमीन नापीक होत आहे ‘म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिनांक 5 फेब्रुवारीपासून पेन टाकळी च्या पात्रांमध्ये आमरण उपोषणास सुरुवात केली आहे .सदर पाणी कालव्याद्वारे न नेता पाईप लाईन मधून ११ किलोमीटर पर्यंत नेण्यात यावे .नाही कालव्याद्वारे पाणी इतरत्र येते मात्र ‘अनेक ठिकाणी कालवा उंच व शेत जमीन खाली राहत असल्यामुळे वाहणारे पाणी शेतात साचते त्यामुळे मोठे नुसकान होत आहे ‘मेहकर तालुक्यातील ब्रह्मपुरी ‘दुधा ‘रायपुर ‘ पेण टाकळी ‘आधी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी मध्ये बाराही महिने पाणी साचत राहते ‘त्यामुळे शेतातून उत्पन्न काढणे कठीण झाले आहे ‘त्यामुळे कालव्याचे पाणी पाईपलाईन द्वारे देण्यात यावे ‘या मागणीसाठी शेतकर्‍यांनी पेनटाकळी प्रकल्पावरच आमरण उपोषणास सुरुवात केली आहे ‘यामध्ये ‘सतीश मस्के ,गजानन रहाटे, निखिल पवार, नंदकिशोर पागोरे, दत्तात्रय बाहेकर, दीपक पागोरे, संजय बाहेकर, काशिनाथ बाहेकर ,महादू अवचार, नंदकिशोर काळे ,एकनाथ सास्ते,इतर शेतकऱ्यांचा यात समावेश आहे .प्रकल्पाच्या पाण्यामुळे नुसकान भरपाई पोटी दहा हजार रुपये द्यावे अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे ‘आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे प्रशासन कसे लक्ष देते हे पाहणे औचित्याचे ठरेल ‘

शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यास अचानक लागली आग शेतकऱ्यांचे एक लाखाचे नुसकान. 

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

गोरेगाव तालुका सिंदखेड राजा येथेदिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान गावालगतच असलेल्या गोट्याला आग लागून प्रल्हाद बागुलकर राहणार गोरेगाव तालुका सिंदखेड राजा या शेतकऱ्यांची लागलेल्या आगीमध्ये जवळपास एक लाखाहून अधिक रुपयाचे नुसकान झाले आहे. लागलेल्या सात ते आठ सोयाबीन चे पोते अंदाजे किंमत 36 ते 37 हजार रुपये ची सोयाबीन आगीमध्ये जळून खाक झाली तसेच दोन स्पिंकलर सट, शेती उपयोगी अवजारे, इत्यादी साहित्य लागलेल्या आगीमध्ये जळून प्रल्हाद बागुलकर या शेतकऱ्यांची अंदाजे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नुस्कान झाले आहे. नेमकी आग कशामुळे लागली होती याचे कारण कळू शकले नाही. परंतु ग्रामस्थांनी वेळेवर मदत करू आग लवकरच आटोक्यात आणली त्यामुळे फार मोठा अनर्थ टळला. लागलेल्या या आगीमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळावी अशी शेतकरी प्रल्हाद बागुलकर यांची मागणी आहे.

भारतीय जनता पार्टी च्या वतीने महावितरण कार्यालयाला ताला ठोको आंदोलन 

0

 

आज ५ फ्रेबुबारी रोजी भारतीय जनता पार्टी संग्रामपूर तालुक्याच्यावतीने लॉकडाऊन च्या काळात महविकास आघाडी सरकारद्वारे वीज देयके कमी करण्यात येतील व १०० युनिट वापरा पर्यंत शेतकरी बांधवांचे वीज देयके माफ करण्यात येतील अशी घोषणा ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी केली होती परंतु आता वीज देयके तर माफ करण्यात आली नाहीतच उलट दिलेली वीज देयके भरावेच लागतील असे मा.ऊर्जा मंत्री यांनी जाहीर केले व राज्यातील ७८ लाख वीज कनेक्शन कापण्याचे काम सुरू आहे तसेच शेतकऱ्यांना डि पी जळाल्यानंतर थकित वीज बिलांच्या ८० टक्के रक्कम भरल्यानंतरच डिपी देण्यात येईल असे आदेश दिले याविरोधात
आज५ फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयावर महाराष्ट्र भर ताला बंद व हल्ला बोल आंदोलन सब स्टेशन वीज वितरण कार्यालय संग्रामपूर येथे करण्यात आले ह्यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकेश राठी जिल्हा सदस्य डॉ गणेश दातीर मा सभापती पांडुरंग हागे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेवराव भारसाकडे विलास इंगळे यांनी भाषणातुन राज्य सरकारला धारेवर धरलेवर सदर आंदोलन *माजी कॅबिनेट मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.डॉ.संजयजी कुटे* यांच्या नेतृत्वात करण्यात आले ह्यावेळी सभापती सौ नंदा ताई हागे ,अंबादास चव्हान ,उध्वराव व्यवहारे ,सुभाष हागे, प्रमोद गोसावी ,राजेश मुयांडे, सुधाकर शेजोळे ,भगवान राठी, अविनाश धर्माळ ,संजय उमाळे, रविन्द्र झाल्टे ,गुनवंत खोडके ,गजानन मानखैर, नारायण अवचार, विशाल लोणकर ,भास्कर धुळे ,भागवतराव मारोडे ,संजय कौलकार ,संजय ठाकरे सह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.