Home Blog Page 551

हिवरा आश्रम – चिखली रोडवरील पिंपळगाव उंडा येथे ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघातात एक गंभीर जखमी.

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सविस्तर माहिती अशी की चिखली – मेहकर रोड वर हिवरा आश्रम लगतच पिंपळगाव उंडा या फाट्यावर दि . ९ जानेवारी ला रात्री ७ . 30 वाजताच्या दरम्यान ट्रक क्रमांक एम एच 23 7275 व मोटरसायकल क्रमांक एम एच 28 AQ 1053 क्रमांकाच्या मोटर सायकलचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटर सायकल स्वार रवी अंभोरे राहणार पिंपळगाव उंडा गंभीर जखमी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने मेहकर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहे. अपघात इतका जबरदस्त होता की या अपघातामध्ये मोटर सायकलची सुराळा झाला आहे तसेच मोटरसायकलस्वार सुद्धा मोटरसायकलवरून उडून रस्त्याच्याकडेला फेकला गेला आहे चिखली कडून मेहकर कडे जाणाऱ्या भरधाव वेगाच्या ट्रक ने मोटरसायकल धडक दिल्याने हा अपघात घडला. परंतु घटनास्थळावरून ट्रक ड्रायव्हर अपघात घडला तेव्हा पसार झाला. बातमीचे वृत्त कळेपर्यंत अजून कुठलाही गुन्हा ट्रक चालकावर दाखल करण्यात आला नव्हता. मोटर सायकलस्वार रवी अंभोरे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने मेहकर येथील रुग्णालयात नेले असून उपचार सुरू आहे.

कोंढाळी भागात शेकडो पक्षांचा मृतु

0

 

सूर्या मराठी न्यूज ब्यूरो

कोंढाळी या भागातील रिगणाबोंडी, मिनीवाडा,मसाळा,चाकगेडोह आदी भागात गेल्या काही दिवसां पासुन पोपट,चिमन्या,कावळे,जंगली कबुतर आदी पक्ष्यांचा मोठया संखेत अज्ञात रोगाने मृत्यु होत आहे.रिगणाबोडी बोडी येथे तर झाडा खाली मृत पोपटांचा सळा पळला आहे.
रिगणाबोडी येथील पोलीस पाटील संजय नागपुरे यांनी रिगणाबोडी भागात मोठ्या संखेत पोपटांचा मृत्यु झाल्याची माहिती कोंढाळी चे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांना माहिती दिली.या घटनेची माहिती मिळतच ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी काटोलचे तहसीलदार अजय चरडे यांना माहिती दिली.काटोलचे तालुका पशुधन अधिकारी व कोंढाळी चे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ.तुषार पुंड व सुधिर कापशीकर हे वाजता रिगणाबोंडी भागात गेले व झांडा झांडा खाली जावुन निरिक्षण केले असता मृत पक्षांचा खच पडला होता. डॉ.तुषार पुंड यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मजुषा पुंडलिक व प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.युवराज केने यांना माहिती दिली जिल्हास्तरीय प्रयोग शाळेतील चमु नागपुर येथुन रिगणाबोडी कडे रवाना झाली.पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक व प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.युवराज केने नागपूर जिल्हा सर्व पशु चिकित्सालय चे प्रमुख डॉ.उन्मेश हिरूडकर,काटोल येथील तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय डॉ.निरंजन शेटे मृत पक्ष्यांचे नमुने गोळा केले.या पक्ष्यांचा मृत्यु कश्यांने झाला हे स्पष्ट करण्याकरीता हे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय वायरस प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे कारण राज्यात बर्ड फ्लु वायरस शोधनारी प्रयोगशाळा नसल्याने हे सर्व मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथे पाठवावे लागणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुढलिक यांनी दिली. पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी वन विभागाच्या मदतीने सर्व मृत पक्षांची सुरक्षित पध्द

सकाळी ८ वाजता आमचे मलकापूर शिवसेना तालुका प्रमुख विजूभाऊ साठे यांच्या कडे जात असतांना

0

 

सुनील पवार नांदुरा

जवळील धरणगाव व तादुलवाडी चे मध्यभागी एक पांढऱ्या रंगांची गाडी (दिल्ली पथक) नावावर (पोलीस गाडी नव्हती) ऊभी होती व तेथे दोन पोलीस ड्रेसवर ऊभे होते (प्रत्येकी हजार रु रोज) व दोन्ही साईडला ४/५ ट्रक व गाड्या ऊभ्या होत्या. व जँकीट घातलेली ४/५ माणसे गाड्या थांबवून पावत्या फाडत होते. सर्वच ट्रक ना रिफलेकटर ,रेडीयम , टेल लाईट असल्यावर ही.
मी व माझा वडणेर भोलजी येथील मीत्र अनंता सातव दसरखेड कडे जात असतांना हा प्रकार पाहून त्यांच्या जवळ पुढे गेल्यावर वापस आलो व चौकशी केली पोलीस दादा ने मला ओळखले व विषय मोडायच्या निमित्ताने कुठे चालले , कशाला चालले ,आज किशोर भाऊ च्या घरी लग्न आहे वगैरे वगैरे. नंतर या वसुली बाबद विचारले असता त्यांनी बुलढाणा SP यांच्या सहीचे पत्र दाखवून आम्ही अधिक्रुत वसूली करत असल्याचे सांगितले म्हणून मी माझ्या सवयी प्रमाणे माझ्या मित्राला फोटो घेन्यास सांगितले माझा एक्स्पर्ट मित्र अनंता ने फटाफट ४/५ फोटो घेतले पण नंतर पोलीस दादा नावे माहीत आहेत कोनी वरीष्ठ कारवाई* *करत असतील तर सांगू . ग्रुपमध्ये टाकू नका म्हणून सांगत होते मी म्हटले तुम्ही अधिक्रुत वसूली करत आहात तर तुम्हाला भेन्याच काय काम. व पाहिजे तेवढे ते भेलेले पण दिसत नव्हते कारण बाँस ला ३००० तिन हजार रु दररोज व या दोघांना वर लीहलेलेच आहे (चौकशी केली म्हणून लिहले) अस असल्याने बाँस सांभाळून घेनारच*
हे एवढ लिहायचे कारण कारण असे की नुकतेच ५० रूपया साठी ३ बुलढाणा पोलीस घरी गेले. त्यानंतर ही वडणेर भोलजी जवळ गिते साहेबांचा स्टाफ अवैध वसूली करत होता व त्यानंतर ही खामगाव बायपास वर असच दुसर फिरत पथक महीला चा विचार न करता वसूली करत होत त्या दिवशी VDO व्हायरल केल्यानंतर थोडा फरक पडला
शेतकरी अडचणी त आहे आणि हे स्वतः ला शेतकऱ्यांचे पोर म्हणवतात आणि स्वतः च्या हजार रुपयासाठी( पगार असल्यावरही) त्या रस्त्याने येनार्या सर्वांना त्यामधे तिन सिट शेतकरी ,फायनान्स वर घेतलेला सुशिक्षित बेरोजगार अँटोवाला , मरणा वर जात असलेला टेंपो ,यांना पैसे घेतल्या शिवाय सोडत नाही निमित्त असते कागदपत्रे , पण ज्या काळ्या पि हप्ते देतात त्यांची कागदपत्रे कधीच पाहीले जात नाही असो वरीष्ठांनी कारवाई करावी अस काही नाही पण विध्यमान SP साहेबांनी लक्ष द्यावे व यानंतर असे अवैध प्रकार बंद होवून सामान्य नागरीकांना दिलासा मिळावा ही विनंती

केंद्रीय पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी प्रशांतभैया डोंगरदिवे यांची निवड

0

 

 

चिखली येथील एक आंबेडकरी चळवळीचे वैचारीक आंदोलणकर्ते तथा दैनिक जनतेचा महानायक, महाबोधी न्यूज चॅनल व न्यूज लोकनायक, विदर्भ वार्ता न्युज चे प्रतिनिधी प्रशांतभैया डोंगरदिवे यांचा पत्रकारिता क्षेत्राचा व सामाजिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड, महाराष्ट्र राज्य प्रभारी विनायक कांगणे यांच्या आदेशान्वये व केंद्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत कांबळे, यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महसूल विभाग प्रमुख सचिन बोंबले यांनी नुकतीच *बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख* पदी निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
प्रशांतभैया डोंगरदिवे हे अभ्यासू पत्रकार असून ते केंद्रीय पत्रकार संघाला बुलडाणा जिल्ह्यात वाढण्याचे काम करतील. वृत्त लेखनाचे, वृतवाहिन्याचे अचूक लेखन/वृत्त संकलन करणा-या पत्रकार बांधवांना न्याय देतील. प्रशांतभैया डोंगरदिवे यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी असे सांगितले की माझ्यावर जी केंद्रीय पत्रकार संघाची बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी केंद्रीय पत्रकार संघाने सोपवली ती पार पाडत असतांना बुलडाणा च नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारीतेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दुर्लक्षित वंचित सर्व पत्रकार बांधवांना केद्रीय पत्रकार संघामध्ये सहभागी करून मुख्य प्रवाहात ताट माणेने चालण्यासाठी केद्रीय पत्रकार संघाचे सभासद नोंदणी ला प्राधान्य देऊन पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी मी तत्पर राहून दिलेल्या जबाबदारीचे सोने करेन व आमचे केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड,राज्य प्रभारी विनायक कांगणे,महाराष्ट्र राज्य महसूल विभाग प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष सचिन बोंबले,ज्यांच्या शिफारशीनुसार यांच्या पाठपुराव्यामुळे मला केंद्रीय पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्ह्यात स्थान मिळाले ते राज्य प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत कांबळे यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
प्रशांतभैया डोंगरदिवे यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.

निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्याने उमेदवाराने चक्क ऑटोच ठेवला घरावर, प्रचाराचा अनोखा फंडा..

0

 

(सूर्या मराठी न्यूज ब्यूरो)

ग्रामीण भागात सध्या गुलाबी थंडीत ग्राम पंचायत निवडणुकीने वातावरण चांगलच तापलंय… त्यात सरपंच पद हे सदस्यामधून असल्याने सर्व उमेदवार सरपंच पदावर डोळा ठेऊन सर्व शक्तीनिशी प्रचार मोहिमेत लागलेय… यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवं नवीन फंडे अमलात आणीत असतात… असाच एक अनोखा फंडा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुटाळा बु. येथील वॉर्ड क्र. २ मधील एक उमेदवाराने आजमविला आहे… या उमेदवाराचे मुलाने निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्याने ऑटोच घरावर नेऊन दर्शनी भागात ठेवलाय…
निवडणून आली की उमेदवारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन क्लुत्या लढविल्या जातात… सद्या ग्रामपंचायत निवडणुकिंमुळे वातावरण चांगलेच तापले आहे… राज्यातील प्रमुख पक्षाचे नेते निवडणुकीत लक्ष घालून असल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच व्हावे यासाठी प्रयन्त करीत आहेत… त्यातच उमेदवार सुद्धा आपली ताकदपणाला लावून निवडणूक रिगणात उतरले आहेत… काही उमेदवार नवीन क्लुप्ती लढून मतदारांना एन केन प्रकारे आकर्षित करण्याच्या प्रत्यनात आहेत… बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. येथील वॉर्ड क्र. २ मधील प्रगती प्यांनलच्या उमेदवार . गीताबाई मनोहर रहाटे यांचे निवडणुक चिन्ह ऑटो असून त्यांच्या मुलाने घराच्या छतावर चक्क खराखुरा ऑटोच नेवून ठेवलाय… हा ऑटो छतावर नेण्याकरीता केनची मदत घेण्यात आली… विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी या ऑटोवर आकर्षक लाइटिंग लावल्याने ऑटो नागरीकांचे लक्ष वेधून घेत आहे… निवडणुकीचे चिन्ह ऑटो असल्याने ऑटो छतावर नेवून ठेवल्याने सर्व परिसरात उमेदवाराने ऑटो छतावर ठेवल्याची चर्चा रंगत आहे… आगळ वेगळ काही तरी नाविन्य पूर्ण करुन चर्चेत राहाण्याकरीता अनेक उमेदवार अशा युक्त्या वापरत असतात… खामगाव तालुक्यातील या उमेदवाराने छतावर ठेवलेला ऑटो पाहण्यासाठी गावातील नागरीक गर्दी करीतांना दिसतात. . तर गावाचा विकास करण्यासाठी आपण निवडणुकीला उभे असून मतदारांनी त्याचा विचार करावा असे मत उमेदवार गीताबाई यांनी व्यक्त केलं य.. गीताबाई यपूर्वही निवडून आलेल्या आहेत ..

सिंदखेड राजा कलम 144 लागू !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

11 ते 12 जानेवारी दरम्यान मातृतीर्थ सिंदखेडराजा शहरामध्ये देश-विदेशातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने दरवर्षी लोक येत असतात !व राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांना अभिवादन करत असतात ‘मात्र यावर्षी करोनाची परिस्थिती लक्षात घेता ‘महसूल प्रशासकीय यंत्रणेने उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांना एक आदेश पारित करून 11 ते 12 जानेवारी दरम्यान संपूर्ण सिंदखेड राजा परिसर व शहरात दोन दिवसा करता कलम 144 लागू करण्यात आले आहे ‘या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० व कलम १८८नुसार कारवाई करण्यात येईल असा दिनांक ५ / १ / 202 १ उपविभागीय अधिकारी श्री सुभाष दळवी यांनी आदेश पारित केला आहे !

मलकापूर पांग्रा येथील ख्यातनाम गायिका आशाताई चरवे यांनी स्वीकारला बौद्ध धम्म !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील ख्यातनाम गायिका आशाताई चरवे यांनी ७ जानेवारीला नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार केला !मुळची मलकापूर पांग्रा येथील रहिवासी आशा चरवे शाहू-फुले-आंबेडकर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित गीत गाऊन त्यांनी विचार गावोगावी पोहोचली आहे ‘त्यानंतर आशाताई चरवे यांचा विवाह गोदरी येथील हिरालाल जगन खरे यांच्याशी हिंदू पद्धतीने झाला होता .दोघेही चर्मकार समाजाचे असल्यामुळे तरीही त्यांच्यावर शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता .डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे गीत समाज प्रबोधनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर गाण्याच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवले ‘आपल्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा सांगितली होती की एक दिवस मी जरूर बुद्धधर्माचा स्वीकार करेल .अशातच त्यांनी ७ जानेवारीला दिक्षाभूमी नागपूर येथे भदंतआर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विधिवत पूजा करून धम्मदीक्षा दिली आशाताई म्हटल्या की मला सुरुवातीपासून बौद्ध धर्माची आवड होती अगोदरच बुद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे ठरवले होते परंतु ते शक्य झाले नाही .माझ्या घरच्यांना मी बुद्ध धम्म समजावून सांगितला ।आज माझा पती माझ्या सोबत आहे ! व धम्म स्विकारला आहे ।

महाराष्ट्राच्या भंडारा येथे मनाला चटका लावणारी घटना, आगीत जिल्हा रुग्णालयातील 10 बालकांचा होरपळून मृत्यू

0

 

महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिशु केअर च्या युनिटला आग लागल्याने दहा नवजात बालकांच्या होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनांनी पूर्ण भंडारा जिल्हा हादरला असून सर्वसामान्यांच्या मनाला चटका लावणारी घटना शुक्रवारच्या मध्यरात्री दोन वाजे घडली. शिशु केअर युनिट मधून धूर निघत असल्याचे. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दिसला त्यांनी दार उघडून बघितल्यावर आग लागल्याचे समजले असता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या शिशु केअर युनिटमध्ये एकूण 17 बालके होती त्यामधून 7 नवजात बालकांना वाचवण्यात यश आले असून दहा बालकांच्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी येथील जनतेने केली

पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थित पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिर

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा,दि. 8: समाजाचे वेगवेगळे ऋण प्रत्येकावर असतात. कोविडच्या काळात या ऋणांचे महत्व अधिकतेने पुढे आले. आपण समाजाला काही देणे लागतो. या भावनेतून हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच भावनेतून पत्रकारांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून या माध्यमातून समाज ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे प्रतीपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. बुलडाणा टिव्ही जिल्हा टिव्ही जर्नालीस्ट असोसिएशनच्यावतीने जिल्हा पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
सदर शिबिर उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपसिथत होते. कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, बुलडाणा अर्बन सोसायटीचे राधेश्याम चांडक, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन, टिव्ही जर्नालीस्ट असोसिए शनचे अध्यक्ष वसीम शेख, सचिव युवराज वाघ, संदीप शेळके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, कोविड काळात पत्रकारांनी उत्कृष्ट काम करीत समाजाला जागृत करण्याचे काम केले. त्यामुळे कोरोना विषाणू विरोधात जनजागृती होण्याचे मोलाची मदत झाली. पत्रकारांकडून रक्तदान शिबिरासारखा स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे. मागील काळात रक्ताचा तुटवडा राज्यात होता . त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत चांगल्या प्रकारे रक्त संकलन राज्यात होत आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने प्रयत्न केले. त्यामध्ये यशही मिळत आहे.
आमदार संजय गायकवाड यावेळी म्हणाले, कोविड काळात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या व माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना सातत्याने अनुभवास आल्या. कोविडने मृत्यू झालेला असल्यास त्याचे प्रेतही नातेवाईक घेत नव्हते. आपलेस आपल्या दूर सारत असल्याचा हृदयद्रावक अनुभव आला. मात्र काहींनी या कठीण काळात माणुसकी जागविणारे काम केले. रक्तदान करून कोविड रूग्णांना आवश्यकतेनुसार रक्तही त्याकाळात पुरविल्या गेले.
रविकांत तुपकर यावेळी म्हणाले, अगदी तुटपुंज्या पगारावर किंवा मानधनावर पत्रकार काम करीत असतात. कोविडच्या परिस्थितीत केवळ पगारासाठी काम न करता व आपले आरोग्य धोक्यात घालून पत्रकारांनी वार्तांकन केले. हे खरेच कौतुकास्पद आहे. केवळ चरितार्थासाठी काम न करणारे पत्रकार हे खरोखरच समाजसेवकच आहेत. राधेश्याम चांडक यावेळी म्हणाले, बुलडाणा अर्बन भविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार आहे. या माध्यमातून गरीब रूग्णांची सेवा करण्याची संधी संसथेला मिळेल. रक्तदान हे महत्वाचे दान आहे. या दानामुहे लोकांचे जीव वाचतात. असे पवित्र कार्य पत्रकारांनी हाती घेतले ही स्तुत्य बाब आहे.
यावेळी असोसिएशनच्यावतीने नगर परिषद आदर्श उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रयसोद्दीन काजी, संचेती हृदयालयाचे डॉ. संचेती, पत्रकार गजानन धांडे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिव युवराज वाघ यांनी केले. प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष वसीम शेख यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन संदीप वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, टि व्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**********

महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे संग्रामपुर तालुक्यात अवैध रेतीची तस्करी जोमात सुरू..मात्र कारवाई शून्य असून लाखो रूपयाचा महसूल बुडत आहे

0

 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असून याकडे महसूल विभाग, पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या  बघायला मिळत आहे .जवळपासच्या नद्यांच्या पात्रातून उघडपणे रेतीची तस्करी होत आहे. शेकडो लहानमोठ्या वाहनांमधून ही चांगल्या दर्जाची रेती नेण्यात येतानाचे चित्र सर्रास दिसून येत आहे. महसूल विभागाच्या सहकार्याने हा अवैध कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे नदीच्या पात्रावर मात्र 15 ते 20 फूट चे मोठ-मोठे खड्डे पडलेले दिसत आहेत.
महसुल विभागाकडुन कोणत्याच प्रकारची कारवाई दिसून येत नाही.

संग्रामपुर तालुक्यात बुलढाणा जिल्हा व अकोला जिल्ह्याच्या सिमेवर वाननदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेती वाहतूक होत असुन अकोला जिल्ह्यातील , तेल्हारा , माळेगाव , हिवरखेड , आकोट संग्रामपुर तालुक्यातील गावात मोठ्या प्रमाणात नेण्यात येत आहे.
येथील नागरिकांनी कारवाईची मागणी केली वाण नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास रेती ची अवैधरीत्या वाहतुक करण्यात येत आहे ही होणारी वाहतुक थांबविण्यात यावी व रेती वाहतूक करणाऱ्या विरुध्द तत्काळ गुन्हे दाखल करावे.
वान नदी पात्रातून जे सी बी द्वारे मोठ मोठी खड्डे करुन अवैधरीत्या रेती उत्खनन केल्या जात असुन नदी पात्राचे मोठे नुकसान होत आहे तसेच शासनाचा महसूल पण बुडत आहे सदर रेती माफियांना संग्रामपुर महसूल विभागाचे अभय असुन महसूल शासनाच्या तिजोरीत जमा न होता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे , अधिकार्‍यांच्या संगनमताने अवैध रेती वाहतूक जोमात सुरू आहे.अशी चर्चा जनतेतून केली आहे.