Home Blog Page 552

कटंगीची आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल;सरपंचसह गावकऱ्यांनी घेतला पुढाकार

0

 

गोंदिया शैलेश राजनकर

गोरेगाव : तालुक्यातील कटंगी बुजरूकचे सरपंच तेजेंद्र हरिणखेडे हे उच्च शिक्षित असल्याने गावकऱ्यांनी गावाचा विकास करण्यासाठी निवडून दिले. त्यांनी आदर्श ग्राम गावांची पदाधिकाऱ्यांसह पाहणी करून सर्वप्रथम गावाला हागणदारीमुक्त गाव केले. विविध विकास योजनेंतर्गत विकास कामे केल्याने तालुका स्मार्ट गाव पुरस्कार, जिल्हा स्मार्ट गाव पुरस्कार मिळविले. गावकऱ्यांच्या सहकार्याने आदर्श ग्राम पुरस्काराकडे हे गाव वाटचाल करीत आहे.
कटंगी बुजरूक येथे 597 कुटुंब संख्या असून 2 हजार 643 लोकसंख्या आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 232 व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 295, इतर जातीची लोकसंख्या 2 हजार 116 आहे. गावातील लोकसंख्या शिक्षित असल्याने ग्रामसभेमार्फत हागणदारीमुक्त गाव, स्वच्छता अभियान, विविध योजनांची माहिती दिली व सर्वप्रथम पुरस्कार प्राप्त गावांना भेटी देऊन तेथील विकास कामांची माहिती घेतली. गावाला विकास मार्गावर आणण्यासाठी सर्व कुटुंबांना शौचालय इमारत बांधकामाचा लाभ मिळवून घेतल्याने उघड्यावर शौचास जाणे बंद झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले शेणखताचे खड्डे माटी भरून सपाटीकरण केले व गावात स्वच्छता अभियान राबविण्यात यश आले. त्यामुळे या गावाला शासनाच्या योजनेतून पुरस्कार मिळाले. या पुरस्कार रक्कमेतून बंदीस्त नाली बांधकाम, प्रवासी निवारा दुरुस्ती, सभामंडप दुरुस्ती, अंगणवाडी शौचालय बांधकाम, डिजीटल शाळा, विद्यार्थ्यांना गणवेश, शुद्ध पिण्याचे पाणी, पथदिवे या सारखे काम केल्याने तालुका स्मार्ट गाव पुरस्कार प्राप्त केले. गावाच्या विकास कामांची पाहणी जिल्हा स्मार्ट गाव समितीने केली असता जिल्हा स्मार्ट गाव म्हणून 40 लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले. कटंगी बुजरूकला स्मार्ट गाव पुरस्कार मिळाले असले तरी हे गाव आदर्श गाव करण्याचे स्वप्न सरपंच तेजेंद्र हरिणखेडे यांनी पाहुन 40 लाख रुपये पुरस्कार रक्कमेतून विकास कामांना गती दिली आहे. आदर्श गाव करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेसमोर फलोत्पादन प्रकल्प, व्यायाम करता यावे यासाठी खुले जीम साहित्य बसविले. ग्रामपंचायत कार्यालय सुशोभित केले. आंगणवाडी केंद्राजवळ ऑक्सीजन पार्क, दोन सार्वजनिक शौचालय बांधकाम, 4 सौर ऊर्जेवर चालणारे दुहेरी हातपंप, शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आरओ बसविले. वृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या सर्व वार्डात लावले. झाडांना पाणी देण्यासाठी ट्रिप सिंचन योजना सुरू केली. घनकचरा व्यवस्थापन केंद्र तयार करून महिला बचत गटांना जबाबदारी दिली आहे. दहन भूमीचे सपाटीकरण, धार्मिक स्थळ परिसराचे सपाटीकरण करून गावकऱ्यांना आदर्श कल्पना देण्याचे काम सरपंच तेजेंद्र हरिणखेडे करत आहेत. गावाला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी सरपंच यांनी 3 वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून गावकरी जोमाने कामाला लागले. उमेद अंतर्गत असलेले सर्व महिला बजतगट, माहीम महिला बचत गटाच्या महिलांना गाव विकास कामांसाठी सिहांचा वाटा असून आदर्श गाव करण्याचे संकल्प महीला बचतगट, जेष्ठ नागरिक, युवा मंडळी, सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी घेतला आहे.

मनरेगाचा भ्रष्टाचार १२ कोटीच्या घरात

0

 

गोंदिया: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विकास कामे करता-करता लोकांच्या हाताला रोजगारही दिला जातो. परंतु मनरेगाच्या कामातून मोठी मिळकत मिळविण्यासाठी अधिकारीही मागे राहत नाही. कोट्यावधीचा गंडा घलणाèया अधिकाèयांना लगाम लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला.गोंदिया जिल्ह्यात सन २०१७-१८ या वर्षातील २१२ कामांत अनागोंदी कारभार असून त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाèयांनी दिले आहेत. यापैकी २०३ कामांची चौकशी पूर्ण झाली असून त्यात १२ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत दिसून आल्याचे समजते.
मनरेगांतर्गत वनविभागात वनतलाव, वनतळी व वनबंधाèयाचे बांधकाम केले जाते. गोंदिया जिल्ह्यात सन २०१७-१८ या वर्षात देवरी, अर्जुनी-मोरगाव, सालेकसा, आमगाव व गोरेगाव या ५ तालुक्यात मनरेगांतर्गत करण्यात आलेल्या २१२ कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाèयांनी दिले आहेत. या तालुक्यातील मनरेगाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाèयांनी त्रिस्तरीय समिती गठित केली आहे.त्यात एक उपविभागीय अभियंता, एक सहाय्यक लेखाधिकारी व एक विस्तार अधिकारी यांनी चौकशी केली.
यात १३३ कामात १० कोटी तीन लाख ७७ हजार ५६९ रुपये तर उपवनसंरक्षकांनी ८ कामांची चौकशी केली असता एक कोटी ८८ लाख ८१ हजार ५६९ रुपयांची तफावत झाल्याचे पुढे आले. एकुण २०३ कामांची चौकशी पूर्ण झाली असून चौकशी अहवालानुसार ११ कोटी ९२ लाख ५९ हजार १३८ रुपयांचा अपहार झाल्याचे पुढे आले आहे.
तहसीलदारांवर गुन्हे दाखल होणर का?
गोंदिया-शैलेश राजनकर
गोंदिया जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील मनरेगाची बोगस कामे झाली. त्यात देवरी तालुका अघाडीवर आहे. देवरी तालुक्यातील ११२ कामे, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६१ कामे, सालेकसा तालुक्यातील ३६ कामे आमगाव तालुक्यातील २ कामे तर गोरेगाव तालुक्यातील १ कामावर चौकशी समिती बसविण्यात आली आहेत. वनविभागात जरी काम झाले असले तरी या कामाचे पैसे तहसीलदार देतात. वनक्षेत्राधिकारी यांच्याबरोबर तहसीलदारही या कामात अग्रेसर आहेत. त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

शिंदी – ते साखरखेर्डा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाभळीच्या तुटलेल्या फांद्या ठरताय ! अपघातास निमंत्रण ‘ ‘ ‘ ‘ ‘बांधकाम विभागाने वाकलेली दुतर्फा झाडे तोडावी – – – वाहन धारकांची मागणी –

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

साखरखेर्डा ते शिंदी रोड च्या दुतर्फा असलेली बाभळीची झाडे हे अपघातास निमंत्रण ठरू शकतात ‘
शिंदी ते साखरखेर्डा रस्त्यावरती रताळी फाट्यानजीक भलेमोठे बाबळीचे झाड हे वाकलेल्या स्थितीत असून त्याच्या फांद्या तुटलेल्या खाली लोंबकळत आहेत ‘अनेक चार चाकी तसेच दुचाकीस्वारांचा डोक्याला ह्या तुटलेल्या झाडांच्या फांद्या लागल्या असून आहे वाकलेले बाबळीचे झाड लवकरात लवकर तोडण्याची मागणी वाहन धारक करत आहे ।
अगोदरच सिंदी ते साखरखेर्डा हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर काही ठिकाणी पूर्ण डांबर निघालेले आहे ‘
ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या ठिकाणी हे बाभळी चे झाड वाकलेले असून झाडाच्या फांद्या तुटून लोंबकळत आहेत .जर लवकरात लवकर तुटलेल्या फांद्या बाबळीचे झाड तोडले नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही !

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी हॉटेल व धाबा ‘ वाईनबार ‘हाऊसफुल -अनेकांनी आयोजित केली बोकड्यांचे मटन पार्टी – – -बोकडांना चांगला भाव !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे । )

सिंदखेडराजा तालुक्यातील43 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा बिगुल वाजला तसेच उमेदवार सुद्धा घरोघरी प्रचाराचा धडाका करत आहेत ‘
काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य हे बिनविरोध निवडून आले तर जे सदस्य निवडून आलेले नाहीत ते अजूनही प्रचाराच्या निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत ‘सध्या साखरखेर्डा व परिसरातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तारीख जसजशा जवळ येत आहे तसे उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना राबवताना दिसत आहेत ।अनेक उमेदवार हॉटेल ।वाईन बार व धाबा याठिकाणी मतदारांना जेवण देत आहेत तर अनेक ठिकाणी उमेदवार आपल्या शेतामध्ये बोकडाच्या मटणाची पार्टी देताना दिसत आहे ‘त्यामुळे सध्या बोकडाची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे !
अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाद्वारे आपला प्रचार सुरू केला असून प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाची खात्री बाळगून आहे ‘अनेक ठिकाणी आपले पॅनल हे विजयाची दावे-प्रतिदावे करत असून निवडणुकीच्या निकालानंतर चित्र पष्ट होईल ।

तेलवर्गीय करडी व सुर्यफुल पिक होत आहेत नामषेश.पारंपरिक पिके घेतली पाहिजे कृषी सहाय्यक – पवार

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

जुन्या काळी महत्त्वाचे कडधान्य असणारे व आहारामध्ये प्रमुख्याने समावेश असणारी करडी पिक व सुर्यफुल नामशेष होत असून ज्वारीमध्ये दिसणारी करडीचे पिक सिंदखेड राजा तालुक्यामधून नामशेष होण्याच्या मार्गावर असून या करडी व सूर्यफूल पिकाचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कडधान्य मध्ये महत्त्वाची कडधान्य असलेल्या करडी व सूर्यफुलाच्या उत्पादनावर मोठा फटका बसला असून हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एरवी सिनखेडराजा तालुक्यातील बहुतांश साखरखेर्डा शिंदी रताळी गोरेगाव भागात दिसणारे करडी व सूर्यफूल पीक पीक घेणे कष्टकरी शेतकऱ्यांनी बंद केलेआहे त्याचे कारणही लवकरात लवकर उत्पन्न घेऊन पैसे मिळवता आले पाहिजे हेच आहे त्यामुळे करडी व सुर्यफुल पिकांवर नामशेष होण्याची वेळ आली आहे.
जुन्या काळी प्रत्येक शेतकरी व प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये खाण्याचे पिकांचे उत्पादन घेतले जात असे तसेच हे पीक झालेले उत्पान्न गावातच व गावातीलच तेल्या कडे देण्यात येईल व तोच घरच्या घाण्यामध्ये तेल व जनावरांसाठी करडीची ढेप निर्माण करीत परंतु आधुनिकीकरणाच्या
नादामध्ये सोयाबीन व कपाशीचे
तेल वापरण्याचे प्रमाण वाढली असल्याचे तसेच करडीचे तेल महागात पडत असल्याने लोकांनी करडीचे घेण्याकडे पाठ फिरवली त्यामुळे या पिकाचा पेरा कमी झाला याचा परिणाम हे पीक घेणे शेतकऱ्यांनी कमी केले तसेच हे पीक घेतल्यावर शेतात काटे असल्याने पिकाचे निंदणी करणे मोठी अवघड होत असल्याने शेतकरी हे पीक घेण्याचे टाळत आहे.याबाबत कृषी सहाय्यक शरद पवार यांच्याशी चर्चा केली असताना त्यांनी करडी व सूर्यफूल हे पीके पारंपरिक पिके घेणे गरजेचे आहे ।नगदी पिके घेण्याच्या नांदत शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे त्यांनी सांगितले आहे !
पूर्वी शेतामध्ये सूर्यफूल दिसायचे तर ते तोडून खाण्याची मजा बच्चे कंपनीमध्ये औरत होती करून ती आता दिसत नाही

स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा ची कार्यवाही अवैध शस्त्र विक्री करीता बागडणाऱ्या इसमास केले जेरबंद 3 पिस्टल 12 जिवंत काडतुसे जप्त..

0

 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी अवैध शस्त्रांवर कारवाई करणे कामी बळीराम गीते पोलीस निरीक्षक यांना आदेशित केले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक तयार करण्यात आले होते दिनांक सहा जानेवारी रोजी सदरच्या पथकास गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की पचोरी बुऱ्हानपूर मध्य प्रदेश राज्यातील एक इसम जळगाव जामोद येथे येणार आहे अशी गुप्त माहिती दिली अशा प्राप्त माहितीवरून सदर पथकाने जळगाव जामोद परिसरातील बस स्थानक परिसरात सापळा लावला असता नमूद वर्णनाचा इसम बसस्थानक परिसरात मिळून आल्याने त्या इसमाला शिताफीने ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात तीन देशी बनावटीचे पिस्टल सहा मॅग्झीन बारा जिवंत काडतुसे व एक मोबाईल विवो कंपनीचा फोन असा एकूण एक लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला सदर इसम हा स्वतःच्या राहत्या घरी गावठी पिस्टल बनवून विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पुढील अधिकच्या तपासकामी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय सचिन वाकडे यांच्या ताब्यात दिले आहे विशेष बाब म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील दोन महिन्यात शस्त्र अधिनियमाखाली सात कारवाया करून आठ तलवारी अकरा पिस्टल जप्त करून आठ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे सदरची कारवाई ही अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री हेमराज सिंग राजपूत अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव व बजरंग बनसोडे अप्पर पोलिस अधीक्षक बुलढाणा बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निलेश शेळके पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार गजानन आहेर संजय नागवे युवराज शिंदे सतीश जाधव संजय मिसाळ यांनी ही कारवाई पार पाडली आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध !साखरखेर्डा येथे काट्याची लढत !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र 4 जानेवारीला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट झाले असून ।शिनखेड राज्या तालुक्यातील ४ ग्रामपंचायती ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत ।यामध्ये कोनाटी ग्रामपंचायत ‘ हिवरा गलडिंग ‘ आंबेवाडी ‘कंडारी ‘ या ग्रामपंचायतीचा समावेश असून ‘एकूण 43 ग्रामपंचायत पैकी 85 सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत ‘शेवटच्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्बल276 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतली आहे ।आता एकूण 357 ग्रामपंचायत सदस्य साठी603 उमेदवार हे आमने – सामने उभे ठाकणार आहेत ‘यामध्ये सिनखेडराजा तालुक्यातील अति संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा ग्रामपंचायत साठी एकूण 35 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहेत ।दोन्ही बाजूने तगडे उमेदवार असल्यामुळे ही लढत अतिशय रोमांचकारी होण्याची शक्यता आहे ‘यामध्ये एकमेव ट्रॅक्टर मेकॅनिकल ने अपक्ष अर्ज दाखल केला असून ‘त्यांची निशाणीनट बोल्ट खोलण्याचा । पान्हा ‘आहे ।त्यामुळे अपक्ष उमेदवार आता वार्ड क्रमांक 6 मध्ये कोणाचा नट काढणार हे पाहणे औचित्याचे ठरेल ।

पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळा बदलल्या ।शासनाची मान्यतेला मंजुरी

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

अतिशय महत्त्वाच्या अशा पशू जनावरावर वर उपचार करणारे महाराष्ट्रातील तमाम डॉक्टर ने महाराष्ट्र शासनाने दिलासा दिला आहे ।
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळा बदलण्यात आले असून नवीन वेळापत्रक शासनाने जारी केली आहे ।महाराष्ट्र पशुसंवर्धन कार्यासन अधिकारी यांचे पत्र क्रमांक 1 क्र पसंप्र-२०१० / प्र.क २५५ / पदूम १ ।यानुसार मान्यता चे पत्र सिंदखेड राजा तालुका पशुधन विस्तार अधिकारी श्री उदार व सर्व पशुधन विस्तार अधिकारी यांना आले आहे ‘या प्रमाणे खालील कामकाजाच्या वेळा बदलण्यात आले असून ।सोमवार ते शुक्रवार -सकाळी ९ ते ४.30 वाजेपर्यंत जेवणाची सुट्टी 1 ते 1.30 वाजेपर्यंत .लागू असलेले कार्यालय पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 व 2 ‘शनिवार सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत ‘ जिपसची सर्व ) ४फिरता पशुवैद्यकिय दवाखाने ‘पशुपालकांना आकस्मिक 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे असेही या पत्रात नमूद केले आहे !

पत्रकार दिनानिमित्त साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकाराचा सन्मान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून संपूर्ण भारत देशांमध्ये साजरा होत असतो !सत्याची बाजू निर्भीड आणि नि:पक्षपाती पणाने मांडण्याचे काम हा पत्रकार करत असतो तसेच घडणाऱ्या घडामोडी ह्या पोलीस च्या मदतीने पोलीस मित्र म्हणून काम करत असतो ।म्हणून आज ६ जानेवारी रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय जितेंद्र आडोळे साहेब तसेच दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांच्या वतीने आज पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला ‘यावेळी ठाणेदार जितेंद्र आडोळे तसेच दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांनी सर्व उपस्थित पत्रकारांना नोटबुक पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला ‘येळी पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी भगवानराव साळवे ।लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक इंगळे दिव्य मराठीचे संतोष गाडेकर ‘ज्येष्ठ पत्रकार लोकमत समाचार चे अमिन शहा .दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी मनोज पऱ्हाड ‘ ‘दैनिक पुण्यनगरी ‘ दैनिक लोकमंथन ‘ तसेच भारत संग्रामचे तालुका प्रतिनिधी सचिन खंडारे ‘बुलढाणा लाईव्ह चे अमोल साळवे ।दैनिक मातृभूमी दैनिक सामना चे प्रतिनिधी दर्शन गवई ‘दिव्य मराठीचे वसीम शेख ‘साखरखेडा पुण्यनगरीचे गजानन इंगळे ।आदी पत्रकाराचा यावेळी सन्मान करण्यात आला ‘यावेळी पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी भगवान साळवे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकाराला मदत मिळणे गरजेचे असून पत्रकार हा अडीअडचणी मध्ये बातमीचे वार्तांकन करत असतो ।यावेळी ठाणेदार जीतेंद्र आडोळे यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की पत्रकार हा पोलीस मित्र म्हणून काम करत असतो ‘अनेक एक दुर्लक्षित घटना ह्या पत्रकार मुळे उजेडात येत असतात ‘यावेळी अनेक गावचे पोलीस पाटील सुद्धा उपस्थित होते !शेवटी चहा व नाष्टा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ‘यावेळी दुय्यम ठाणेदार दीपक राणे पोलिस स्टेशनचे पोलिस अरविंद चव्हाण श्री मापारी सर्व पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते ।

अखेर हर्षल फदाट(बापू) यांच्या प्रयत्नाला यश.. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव..!!

0

 

कोरोना संसर्गामुळे सगळीकडे लॉकडाऊन प्रक्रिया संपून आता अनलॉक प्रक्रिया सुरू आहे,अश्यात आता टप्याटप्याने शाळा कॉलेज सुरू झालेत पण अश्यात ग्रामीण भागामध्ये बस फेऱ्या कमी आहे आणि अश्याने विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करत शाळा महाविद्यालयांमध्ये जावे लागत होते परंतु विद्यार्थ्यांची ही स्थिती भयंकर आहे हे लक्षात घेऊन बोरगाव बु!! येथील विद्यार्थी प्रतिनिधी हर्षल फदाट यांनी बस आगार प्रमुख जाफराबाद यांना निवेदन देऊन बस फेऱ्या वाढवण्याची विनंती केली मात्र ती विनंती अपयशी ठरली परंतु हर्षल फदाट व सहकारी विद्यार्थ्यांनी याचा सतत पाठलाग करून बस फेऱ्या वाढून घेतल्या. आता बोरगाव बू!! येथे बस फेऱ्या वाढल्याने विद्यार्थी नियमित शाळा व महाविद्यालयांमध्ये जात आहे आणि याच समाधान विद्यार्थी व्यक्त करत आहेत.