Home Blog Page 554

शेळ्याचोरी होण्याच्या घटनेने गोंदिया जिल्ह्यात खळखळ,

0

 

प्रतिनिधी :
भागवत चकोले

गोंदिया 0३: सेळ्यापालन व्यवसाय हा अधिक कमी भांडवळमध्ये केला जाणारा व्यवसाय शेळीपालनातून मोठी आर्घिक कमाई होत असते . कमीत कमी माणसात व जागेत शेळीपालन केली जाऊ शकते . शेळ्यांना आहारही कमी लागत असतो , यामुळे त्यांना गरिबांची गाय म्हटल जाते . कडक थंडीचा फायदा घेत चोरटे रात्री पहाटेच्या सुमारास शेळ्यांची चोरी करण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत . सलेकसा तालुक्यातील विविध शेतकऱ्याच्या शेळ्या चोरीला गेल्यानंतर देवरी शहरालगत चिचेवाडा रविद्र लांजेवार यांचे ८ तर चुन्निलाल मडावी यांचे ५ शेळ्याची चोरी , पिंडकेपार येथील चौरे यांच्या १५ ते २० त्यानंतर नकटी येथील दखने यांच्या सुमारे १५ शेळ्या व विविध ठिकाणावरून शेळया चोरी झाल्याचे वृत्त आहे .

पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे . शेळ्या आणि बकरी चाकोरी होण्याच्या घटनेने शेळीपालकाची झोप उडाली असून पोलीस विभागाने चोरांचे त्वरित बंदोबस्त करावा हि मागणी शेळीपालकांची आहे . एकंदर या घडणांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे .

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस जळगाव जामोद पोलिसांनी केली अटक…

0

 

जळगांव जा.प्रतिनिधी:-

गजानन सोनटक्के

जळगाव जामोद शहराला लागूनच असलेल्या वाडी खुर्द येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी मोहन तायडे या युवकाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिनांक 31 डिसेंबर रोजी स्थानिक जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्यावरून त्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी मोहन तायडे याच्याविरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला होता त्यानंतर जळगाव जामोद पोलीसांनी पीडित मुलीसह आरोपीला पकडून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणले आरोपी मोहन तायडे हा पीडित मुलीच्या घरी नेहमी जाणे-येणे करीत होता त्याचे पीडित मुलीच्या घराची चांगले संबंध होते.
त्यातुनच आरोपी मोहन तायडे याने पिडीत मुलीशी अनैतिक संबंध बनविले व तिला आपल्या गाडीवर बसवुन फुस लावुन पळवुन नेले. ज्या ठिकाणी आरोपीने तिला पळवून नेले त्याठिकाणी आरोपी मोहन तायडे यांनी पीडित मुलीसोबत अतिप्रसंग केला यावरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी मोहन तायडे याच्याविरुद्ध कलम 363,376 (2)(आय)(जे)(एन) भारतीय दंड विधान सहकलम 4व6 पोक्सोनुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला तसेच आरोपीला जिल्हा सत्र न्यायालय खामगाव येथे हजर करण्यात आले सदर प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे एपीआय सतीश आडे पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास गव्हाड हे करीत आहेत.

जा मुख्यमंत्र्याना जाऊन सांग ही बाई मला शिव्या देतेय!” असं म्हणून गरीब विद्यार्थ्याला शिविगाळ

0

 

 

आयुषी दुबे शेगाव

विद्यार्थ्याला “आताच माझ्यासमोर जीव दे, मी तुझे डॉक्यूमेंट देत नाही, हे कॉलेज काही तुझ्या बापाच नाही, जा मुख्यमंत्र्याना जाऊन सांग ही बाई मला शिव्या देतेय!” असं म्हणून गरीब विद्यार्थ्याला शिविगाळ करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महिला प्राचार्यांचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा प्रकार घडला आहे.

याच शिक्षण संस्थेत डिझेल मॅकेनिकला शिकणाऱ्या आम्रपाल भिलंगे या विद्यार्थ्यासोबत ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. आम्रपाल हा शेतकऱ्याचा मुलगा असून त्याला पुढील शिक्षणासाठी त्याची मूळ कागदपत्रे शेगाव येथील आय.टी.आय.मधून हवी होती. यासासाठी त्याने प्राचार्या यांच्याकडे मागणी करत असताना त्या संतापल्या. तू आता यापुढे मला दिसू नको, आताच माझ्यासमोर मर, असं म्हणून अपमानीत करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झालाय.

बुलढाणा जिल्ह्यातिल संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील आम्रपाल भिलंगे हा शेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत डिझेल मॅकेनिकल शाखेत गेल्या दोन वर्षापासून शिकत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने व आई वडील दोघांना हृदयविकार असल्याने ते शेतीचे काम करू शकत नाही. त्यामुळे साहजिकच आम्रपाल याला शेती सांभाळावी लागली. म्हणून त्याने या वर्षी शिक्षण जवळच्या गावात घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत त्याचे जमा असलेले मूळ कागदपत्रे हवी होती. त्यासाठी आम्रपाल हा ते घेण्यासाठी रितसर अर्ज घेऊन प्राचार्यांकडे गेला असता त्यांनी त्याला अपमानित केले.

आम्रपाल याने विनंती करुनही प्राचार्यांनी नकार दिल्यावर आता “माझ्या करिअरबद्दल विचार करावा, माझ्या समोर आता मरण्याशिवाय पर्याय नाही!” अशी भावना व्यक्त केल्यावर ही प्राचार्यांना दया न येता तू माझ्यासमोर आताच मर, आम्ही काही तुझ्या बापाचे नोकर नाही, हे कॉलेज काही तुझ्या बापाच नाही!” यावरचं त्या थांबल्या नाहीत तर आम्रपाल याला शिविगाळ करून” जा मुख्यमंत्र्याना जाऊन सांग की ही बाई मला शिव्या देते म्हणून” सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जर शिक्षकच विद्यार्थ्याला मर म्हणून सांगत असतील तर कस.? म्हणून आता आम्रपाल व त्याच्या आई वडिलांनी अशा उर्मट प्राचार्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आमचा मुलगा पुरता खचला असून त्याने जर जीवाचं बर वाइट केलं तर आम्ही कसं जगायचं असा सवालही आम्रपालच्या वडिलांनी उपस्थित केलाय.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर माध्यम प्रतिनिधी प्राचार्या राजश्री पाटिल यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगाव येथे गेले असता त्यांच्यासोबत ही राजश्री पाटिल यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन हुज्जतबाजी केली. सुरुवातीला असं काही घडलचं नाही अस म्हणून पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर त्यांनी हा व्हिडिओ येथील असून कालचा असल्याचं कबूल केलं. पण सदर घटनेवर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे अशा उर्मट प्राचार्यांवर गरीब शेतकरी विद्यार्थ्याच्या भावितव्याशी खेळण्याबद्दल करवाईची मागणी जोर धरु लागली आहे.

महिला शिक्षक दिनी’ महिला शिक्षकांचा सत्कार करून गौरव करण्यात येणार -ओबीसी मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष दशरथ बनकर यांचे वक्तव्य

0

 

प्रतिनिधी
ऋषी जुंधारे

वैजापुर ता. 2-महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे. देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई यांनी स्वतः शिक्षण घेऊन महिलांना शिकवण्याचे काम केले. स्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम फुले दाम्पत्याने केलंय. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन स्वीकारतानाच ही मागणी मान्य केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतानाच छगन भुजबळ म्हणाले की स्रियांना ‘चूल आणि मूल’ या परंपरेतील चार भिंतीच्या पलीकडे आणण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले आहे. त्या काळात सामाजिक बहिष्कार स्वीकारून प्रसंगी शेण व दगडधोंड्यांचा मार सहन करत त्यांनी मुलींना शिकवण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा देशभरात ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन आता केंद्र शासनाकडे याबाबत मागणी करणार आहे. दरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात उद्या वैजापुर येथील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ या शिक्षकदिनानिमीत्त मा. नगराध्यक्षा शिल्पाताई दिनेशसिंग परदेशी याच्या हस्ते महिला शिक्षिकांचा सत्कार करून गौरव करण्यात येणार असल्याचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष दशरथ बनकर यांनी सांगितले

सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा झटका

0

 

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं. त्याच्यावर आज सांयकाळी angioplasty होणार आहे. गांगुलीनं नुकताच त्याच्या मुलीसोबत जाहीरात केल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या जाहीरातीची चर्चा असताना या बातमीनं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.

भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे भागीरथी माई यांचा ३९ वा स्मृतिदिन उत्साहात साजरा

0

 

प्रतिनिधी
ऋषी जुंधारे

विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे भागीरथी माई यांचा 39 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत जी गायकवाड सर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विकास जगताप सर प्राचार्य संत नारायण गिरी महाराज महाविद्यालय विरगाव व संस्थेचे सचिव श्री.वाल्मीकरावजी सुरासे साहेब यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते भागीरथी माई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री. वाल्मीकरावजी सुरासे साहेब.यांनी केले तदनंतर प्रमुख पाहुणे श्री. विकास जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर *प्रा.चंद्रकांत गायकवाड सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमासाठी श्री. लाखे स्वामी, संस्थेचे संचालक श्री.दत्तात्रय सुरासे
माजी सरपंच राजू मामा सातपुते,मधुकर अण्णा शिंदे,भाऊसाहेब दादा काकडे ,मधुकर त्रिभुवन,बद्रीनाथ साबळे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री बोर्डे यांनी तर आभार श्रीमती. मनीषा उभेदळ यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक गंगाधर कटारे, निर्मला शिरसाठ, योगेश शिंदे, सागर राजपूत, रोहिदास त्रिभुवन, प्रवीण जाधव, भारत भोपळे गोकुळ पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी समाधान सुरासे, सुनील बोडखे, किशोर साळुंके, अमोल त्रिभुवन व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले

 

विजेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकारी अभियंता शेतकर्याच्या बांधावर…

0

 

स्वाभिमानीचे सरनाईक,राजपुत यांनी केली होती उपाययोजना करण्याची मागणी…

चिखली–तालुक्यातील सोमठाणा येथील विद्युत ट्रान्सफार्मर वारंवार जळत असल्याने विजेच्या समस्या सोडवण्यात याव्यात,अशी मागणी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,नितिन राजपुत यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती.याची तातडीने दखल घेत कार्यकारी अभियंता माळोदे यांनी विजेच्या समस्या सोडवण्यासाठी दि०१जानेवारी रोजी शेतकर्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे.उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. विजेच्या समस्या सुटणार असल्याने शेतकर्याना दिलासा मिळाला आहे.
सोमठाणा येथील जुने गावठाण १००के व्हि चा ट्रान्सफार्मर चार वेळा बदलण्यात आला परंतु तो नियमीत जळत असल्याचे समोर आल्याने शेतकर्याना शेतात पिकाला पाणी देण्याची समस्या निर्माण झाली होती.एकाच हातावर संपुर्ण लोड असल्याने आता पुन्हा नविन ट्रान्सफार्मर लावला तर तो जळणार असे दिसत असल्याने शेतकर्याच्या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा,अशी मागणी महावितरण कार्यालयाकडे करण्यात आली होती.या अगोदर उदभवलेल्या समस्या चिखलीचे सहाय्यक अभियंता गायकवाड यांच्या माध्यमातुन सोडवण्यात आल्या होत्या परंतु ट्रान्सफार्मर लावला तर तो पुन्हा जळणार असल्याची भिती शेतकर्याना निर्माण झाल्याने याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना होण्याच्या दृष्टिने शेतकर्यासह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक,नितिन राजपुत,यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री एन डी माळोदे यांच्याकडे याबाबतची मागणी केली होती.शेतकर्याच्या समस्यांची जान असल्याने कार्यकारी अभियंता माळोदे यांनी सोमठाणा गाव गाठुण सदर ट्रान्सफार्मरची पाहणी केली याबाबत नविन पोल टाकुन लोड डीव्हाइड करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी गावातील समस्या मांडल्या असता मंदिरा जवळील जंगलेला मोडकळीस आलेला पोल व शेतातील वाकलेले पोल वायरींग करण्याच्या सुचना संबंधीत ठेकेदार यांना देण्यात आल्या आहेत.शेतकर्यानी कार्यकारी अभियंता मोळोदे व गायकवाड यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले आहे.यावेळी विनायक सरनाईक,नितिन राजपुत,भारत वाघमारे, महावितरण सहाय्यक अभियंता श्री डी जी गायकवाड,अवचितराव वाघमारे,अविनाश झगरे,छोटु झगरे,सुदर्शन वाघमारे,परमेश्वर झगरे, आंबादास झगरे, अरुण वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, भागवत झगरे, विठ्ठल झगरे, गणेश झगरे, प्रभाकर झगरे, विजय परीहार, गोटु वाघमारे यांच्यासह आदिंची उपस्थीती होती.

नागपुरात यशस्वीपणे पार पडली लसीकरणाची ‘ड्राय रन’

0

 

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे मार्गदर्शन : अडचणींची नोंद घेण्याचे निर्देश

नागपूर, ता. २ : कोव्हिड विषाणूंवरील बहुप्रतीक्षित लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागपुरात तीन ठिकाणी ‘ड्राय रन’ यशस्वीपणे पार पडली. नागपूर महानगरपालिकेच्या के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत २५ जणांवर ‘ड्राय रन’च्या माध्यमातून लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

सकाळी ९ ते ११ या वेळात ही ‘ड्राय रन’ पार पडली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप सेलोकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, समन्वयक डॉ. गोवर्धन नवखरे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. साजीद खान, के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ग्रीष्मा अग्रवाल, आर.सी.एच. अधिकारी डॉ. वैशाली मोहकर, धरमपेठ झोनच्या झोनल आरोग्य अधिकारी डॉ. मंगला पुरी, फार्मासिस्ट सौरभ पाचपोर आदी उपस्थित होते.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ‘ड्राय रन’ दरम्यान लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. शासनाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या तयारीत काही त्रुट्या आहेत का, काही अडचणी आहेत का, ओळखपत्रानुसार लसीकरणासाठी नोंदणी करताना काही अडचणी येत आहेत का, याबाबत आरोग्य अधिकारी, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. ज्या काही त्रुट्या आहेत त्या दूर करा आणि अडचणी असतील तर त्याची नोंद करा, असे निर्देश दिले.

*कशी पार पडली ‘ड्राय रन’*

शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाची ट्रायल अर्थात ड्राय रन घेण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आलेल्या २५ आरोग्य कर्मचाऱ्यांची आजच्या ‘ड्राय रन’ साठी निवड करण्यात आली होती. आरोग्य विभागातर्फे त्यांना त्यासंबधीचे संदेश प्राप्त झाले होते. लसीकरण केंद्रात सर्वात पहिल्या बाकावर संबंधितांनी संदेश दाखवून लसीकरणासाठी बोलविण्यात आल्याचे निश्चित केले. या व्यक्तींचे शरीर तापमान तपासण्यात आले. हात सॅनिटाईज करण्यात आले. त्यांना टोकन नंबर देऊन केंद्रातील प्रतीक्षा कक्षात त्यांना पाठविण्यात आले. प्रतीक्षा कक्षात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींना बसविण्यात आले. टोकन क्रमांकानुसार संबंधित व्यक्तीला लसीकरण कक्षात पाठविण्यात येत होते. प्रारंभी त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे संबंधित व्यक्ती तोच असल्याची खातरजमा करण्यात आली. ओटीपीच्या आधारे त्यांना लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात येत होते. यानंतर लसीकरण अधिकाऱ्याकडे त्यांना पाठविण्यात आले. लसीकरण अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला लसीकरणाची माहिती दिली. लस कोणत्या कंपनीची आहे, लसीकरणानंतर काय नियम पाळायचे आहेत, पुढील लस घेण्याकरिता किती दिवसांनी यावे लागेल, लसीकरणानंतर अर्धा तास निगराणीखाली थांबायचे, त्यानंतर घरी गेल्यावर काही अडचण आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना अथवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती देण्यास सांगितले. लसीकरणानंतर सिरींज कट करून ती संबंधित बीन मध्ये टाकण्यात आली. यानंतर लसीकरण झालेल्या व्यक्तीला निगराणी कक्षात अर्धा तासाकरिता बसविण्यात आले.

यासंदर्भात माहिती देताना आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार आज ‘ड्राय रन’ घेण्यात आली. शासनाच्या संपूर्ण दिशानिर्देशांचे येथे पालन करण्यात आले. यासंदर्भात आपण संपूर्ण पाहणी केली आणि आढावा घेतला असताना ही ‘ड्राय रन’ यशस्वीरीत्या पार पडल्याचेही ते म्हणाले. यासंदर्भात शासनाला अहवाल पाठविण्यात येणार असून पुढील दिशानिर्देशानुसार मनपा कार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रो प्रवाश्याची रेकॉर्ड रायडरशीप

0

 

ऍक्वा लाईन मार्गिकेवर तब्ब्ल १५४११ प्रवाश्यानी केला मेट्रो ने प्रवास

नागपूर ०२: काल दिनांक १ जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली तब्बल १५४११ पेक्षा जास्ती नागरिकांनी नागपूर मेट्रोच्या ऍक्वा लाईन मार्गिकेवर मेट्रोने प्रवास केला. हा आता पर्यंतच्या सर्वात मोठा ऊंचाक आहे महत्वपूर्ण म्हणजे १ जानेवारी २०२१ (शुक्रवार) रोजी छत्रपती मेट्रो स्टेशन येथील प्रस्तावित बांधाकामा करीता ऑरेंज मार्गिकेवरील (रिच – १) सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी सेवा बंद होती. काल एक मेट्रो लाईन बंद असून देखील मेट्रोच्या प्रवासी सेवा मध्ये वाढ ही महत्वपूर्ण बाब आहे.

मेट्रोच्या प्रवासी संख्येत गेले काही दिवस सातत्याने वाढ होत असून मागच्या रविवारी प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली होती ज्यामध्ये तब्बल २२१२३ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला होता .एवढच नव्हे तर सुटीचा दिवस वगळता इतर दिवसाला देखील मेट्रोची सरासरी रायडरशिप १० हजाराच्या वर आहे.

नागपूर शहरामध्ये २५ कि.मी. अंतराचे मेट्रोचे जाळे नागरिकांन करिता उपलब्ध असून या मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी मेट्रो ट्रेन प्रवाश्यांच्या सेवेकरता सज्ज आहे. सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी व सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान नियमित मेट्रो सेवेचा लाभ घेत येत आहे.

महा मेट्रो तर्फे प्रवाश्यान करिता विविध सोई सुविधा मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करण्यात येत असून मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा महा मेट्रोने सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे. तसेच शहरातील प्रतिष्टीत व्यक्ती, अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिक मेट्रोने प्रवास करून नागरिकांनी जास्तीत जास्ती मेट्रोचा उपयोग करावा या करिता नागरिकांना प्रेरित करीत आहेत तसेच महा मेट्रोने शहरातील व स्टेशन परिसरातील प्रतिष्टीत व्यक्तीना महा मेट्रोच्या स्टेशनचे अॅेम्बेसेडर म्हणून महा मेट्रोशी जोडले आहे.

या व्यतिरिक्त महा मेट्रोतर्फे नागरिकांन करता सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ अनोखी योजना आखण्यात आली असून फक्त ३००० रुपये मध्ये संपूर्ण ३ कोचच्या मेट्रो ट्रेन मध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट,लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम साजरा करू शकतात तसेच प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा सुरु केली असून नागरिकांची याला देखील पसंती मिळत आहे. महा मेट्रोच्या वतीने नव वर्षाच्या निमित्याने न्यू ईयर कार्निवलचे आयोजन मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले आहे. जेथे विविध प्रकारचे १७ स्टॉल्स उपलब्ध आहे. या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरण पूरक वस्तू देखील विक्रीला असतील. नागपूरकरांनी राईड करून या सर्व सोईंचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 3जानेवारीला प्रा .सचिन खरे यांचे फेसबुक वर व्याख्यान 

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सामाजिक समता अभियानातर्फे आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते व व्याख्याते सचिन खरे यांचे दिनांक 3 जानेवारीला फेसबुक’वर सायंकाळी ७वाजता जाहीर व्याख्यान होणार आहे ‘ स्त्री उद्धारक सावित्री बाई फुले ‘हा व्याख्यानाचा विषय असूनजास्तीत जास्त लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आव्हान सामाजिक समता अभियान बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे ।