Home Blog Page 565

अंत्योदय योजनेचा अपंगांनाही लाभ देण्यात यावा करिता निवेदन सादर

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

केंद्र व राज्य शासनाने अपंगांसाठी कायद्यानुसार अंत्योदय ही योजना चालू करण्यात आली होती त्यानुसार जळगाव जामोद पुरवठा विभागाने एकही अपंगाचे नाव अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नाही तसेच जिल्हा पुरवठा विभाग बुलढाणा यांनी दर नवीन वर्षाला नावे समाविष्ट करण्यात येतील असे सांगितले होते तरीसुद्धा या कालावधीमध्ये नवीन नावे समाविष्ट केली नाहीत अंतर योजनेमध्ये नवीन टार्गेट मध्ये श्रीमंत व जवळचे अधिकारी व त्यांचे नातेवाईक यांची नावे समाविष्ट केली आहेत त्यामुळे अपंगावर व विधवा महिला भूमिहीन अशा नागरिकांवर अन्याय झाल्यामुळे तहसील कार्यालय येथे आज दिनांक 15 डिसेंबर ला 3 डिसेंबर च्या पत्रानुसार महाले यांच्या नेतृत्वात तहसीलदार जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले माझं का नाही या निवेदनावर नारायण विठोबा महाले तेजरावभाऊराव पाटील अनिल नामदेव गवई गौरव हिरामण सुरडकर नारायण तुकाराम खंडारे शंकर आत्माराम आदी अपंग बांधवांच्या सह्या आहेत

कृषी कायद्याविरोधात जळगाव जामोद येथे किसान सभेचे एक दिवसीय धरणे आंदोलन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जामोद प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर गेल्या १८ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकार आंदोलनाची दखल न घेता आंदोलन दडपण्याकरीता अमानुषपणे शेतकऱ्यांशी वागत आहे. या आंदोलनामध्ये केलेल्या मागण्या मान्य करण्यास हुकूमशाही सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेच्या वतीने जळगांव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक १४ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करून एसडीओ यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.दिल्ली येथे 18 दिवसांपासून संपूर्ण देशातील शेतकरी केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत या आंदोलनामध्ये आतापर्यंत 15 ते 20 शेतकरी मरण पावलेले तरीसुद्धा या झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग येत नाही त्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशामध्ये जो शेतकरी दिल्ली येथे जाऊ शकत नाही त्यांनी स्थानिक तहसील कार्यालय एक दिवशीय धरणे आंदोलन करून या सरकारला जागे करावे त्यासाठी जळगाव जामोद किसान सभेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला संघटनेचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी पाठिंबा दिला त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना समाजवादी पार्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच इतर संघटनांनी आपला पाठिंबा दिला या आंदोलनामध्ये किसान सभेचे विजय पोहनकर, रामेश्वर काळे तर वंचित बहुजन आघाडीचे, सुनील बोदडे,भास्कर भगत, इज्जतबेग साहेब,समाजवादीचे, मुस्ताक भाई , शहराध्यक्ष नफिसभाई , काँग्रेसचे अविनाश उमरकर, राष्ट्रवादीचे एडवोकेट संदीप उगले,शिवसेनेचे दत्ताभाऊ पाटील,गजानन वाघ, एल्गार संघटनेचे अजहर भाई देशमुख, आशिष पाटील,मौलाना, इरफान शेट्टी इम्रान भाई,यांच्यासह विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या धरणे आंदोलना ठिकाणी उपस्थित होते.

सेंद्रिय खत चोरीप्रकरणी नगरसेवकाची   मुख्याधिकार्‍यांकडे  तक्रार…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

जळगाव जामोद नगर परिषदेमध्ये आज दिनांक 14 डिसेंबर रोजी महा विकास आघाडीचे नगरसेवक यांनी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नगरपरिषद जळगाव जामोद वायाळ येथील सेंद्रिय खत गैरअर्जदार यांनी चोरून नेल्याबाबत फौजदारी कारवाई होण्यासाठी मुख्याधिकारी आशिष बोबडे यांना लेखी तक्रार दिली सविस्तर असे की येथील नगर परिषदेमध्ये महा विकास आघाडीचे सदस्य त्यांनी अशी तक्रार दिली की नगरपरिषद जळगाव जामोद मार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन कामांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळ्या करून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करण्याचे कंत्राट हे विरबा गिअर्स अकोला यांना देण्यात आले आहे. सदर घनकचरा व्यवस्थापनावर नगर परिषद यांचे नियंत्रणाखाली सर्व कारभार चालू असतो नगरपरिषद जळगाव जामोद हे सदर घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत निर्माण केलेले सेंद्रिय खत विक्री करीत असते परंतु दिनांक 14 डिसेंबर रोजी पहाटे गैरअर्जदार यांनी ठेकेदाराचे ट्रॅक्टरने वायाळ येथून तारापूर शिवारातील रसलपुर रोडवरील परिक्षित ठाकरे यांच्या शेतामध्ये सेंद्रिय खताची वाहतूक होत असल्याचे अर्जुन घोलप गजानन वाघ श्रीकृष्ण केदार, रमेश ताडे, संतोष बोरसे, संजय भुजबळ,युवराज देशमुख, अमर पाचपोर, व पत्रकार तसेच जळगाव जामोद येथील नागरिकांना या विषयी माहिती पडले असता आरोग्य पर्यवेक्षक, घनकचरा व्यवस्थापन पर्यवेक्षक कुमारी पल्लवी इंगळे मुख्याधिकारी डॉक्टर आशिष बोबडे आरोग्य निरीक्षक रामचंद्र चंडाले यांना याबाबत कल्पना दिली असता त्यांना सोबत घेऊन त्यांनी अकरा वाजता घटनास्थळावर जाऊन सदर खताची पाहणी केली असता सदर खत हे घनकचरा व्यवस्थापना वरुन तीन ट्रॉली सेंद्रिय खत बॅग ची किंमत रुपये 100 प्रमाणे अंदाजे एक लाख वीस हजार रुपयाचे खत चोरून आणल्याचे घटनास्थळाचा पंचनामा करून सिद्ध झाले त्या संदर्भात सदर गैरअर्जदार जवळ पावती नसल्याचे वरील अधिकाऱ्यांनी सांगितले व सदर बाबीचा पंचनामा केला व त्याठिकाणी उपस्थित असलेले अनिल ढगे यांनी पत्रकार यांना मुलाखत देताना सांगितले की सेंद्रिय खत मी स्वतः ट्रॅक्टरने आणले आहे. व मला खत आणायला परिक्षित ठाकरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या शेतामध्ये खत आणून टाकले आहे.तरीसुद्धा उद्यापर्यंत नगरपरिषद कार्यालयाकडून आरोपी परिक्षित ठाकरे व इतर लोकांविरुद्ध अद्यापर्यत कोणतीही कारवाई केली नाही तसेच मुख्याधिकारी यांनी गैरअर्जदार विरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदवून गैरअर्जदार विरुद्ध कडक कारवाई करावी. तसेच कारवाई तीन दिवसाचे आत कारवाई न केल्यास नगर परिषद कार्यालयात घेराव टाकून आंदोलन करु असा इशारा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे दिला आहे तर मुख्याधिकारी या विषयी कोणती भूमिका घेतात यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. या लेखी तक्रारीवर अर्जुन गोविंद घोलप गटनेते काँग्रेस,गजानन नामदेव वाघ गटनेते शिवसेना, यांच्या सह्या आहेत तसेच लेखी तक्रार देताना महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

विवेकानंद आश्रमात स्वामी शुकदास महाराज जयंती उत्सव संपन्न : !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील विवेकानंद आश्रमात कार्तिक वैद्य त्रयोदशीला कर्म योगि संत .प .पू . शुकदास महाराज श्रीच्या जयंती उत्सव सोशल डिस्टिंग चे पालन करून संपन्न झाला .या वर्षी 12 डिसेंबरला शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून अत्यंत मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत परंतु भक्तिभावाने व तेवढ्याच उत्साहाने परमपुज्य महाराजश्री चा जयंती उत्सव साजरा केला गेला ‘विवेकानंद आश्रमाच्या कार्यकारी मंडळाने भाविकांना अगोदरच घरीच राहून प्रतिमेचे पूजन व दर्शन करण्याची विनंती केली होती .त्यानुसार लोकांनी आश्रमात गर्दी केली नाही .सकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात मंत्रघोष व काकड आरती ने सुरुवात झाली ।सहा वाजता हरिहर तीर्थावर महाआरती आठ ते नऊ वाजता ग्रामसफाई व परिसर स्वच्छता करण्यात आली .नऊ वाजता हभप येवले शास्त्री महाराजांचे अनुभूती ग्रंथावर प्रवचन तसेच विवेकानंद आश्रमाच्या गायन वृंदा चा भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम झाला ‘सकाळी दहा वाजता परमपूज्य संत शुकदास महाराज श्री च्या समाधीस्थळाचे पूजन करण्यात आले .दुपारी एक वाजता विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे कार्यकारी मंडळातील सदस्याच्या हस्ते भूमिपूजन झाले ‘दुपारी दोन वाजता उत्सव समितीची सभा संपन्न झाली या सभेत लोक डाऊन काळात संस्थेने सार्वजनिक हितार्थ केलेली व शासनाच्या आरोग्य विभागाला सहकार्य झालेली कामे तसेच शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेने केलेली तयारी तसेच कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारकासाठी भविष्यात करावयाच्या कामासंबंधी चर्चा करण्यात आली ।परम पूज्य महाराज श्रीच्या समाधीस्थळाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी ।व हरिहर तीर्थ वरील गार्डन व गोशाळेत गुरांचा चारा साठविण्यासाठी नवीन गोडाऊन ची निर्मिती करणे विषयी चर्चा झाली . ।विवेकानंद जयंती उत्सव यावर्षी ‘ 2 ‘ 3 ‘ व ४फेब्रुवारी 20 21 पौष वैदय पंचमी ‘ती सप्तमीला संपन्न होणार आहे .तसेच शासनाने परवानगी दिल्यास शासनाच्या आदेशाचे पालन करून संपूर्ण शासनाला सहकार्य करण्याचे या सभेत ठरवण्यात आले ।सायंकाळी भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला ।

शिंदी येथे नवनियुक्त समुदाय आरोग्य अधिकारी पदी प्रशांत वायाळ यांची नियुक्ती !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

गेल्या अनेक वर्षापासून शिंदे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत रिक्त असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारीपदी अखेर प्रशांत वायाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी दिनांक 14 डिसेंबर रोजी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला !
यावेळी नवनियुक्त समुदाय आरोग्य अधिकारी ‘प्रशांत वायाळ यांचे शिंदी गावचे सरपंच विनोद खरात यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले ‘यावेळी आरोग्य सेविका स्वाती डोंगरदिवे ‘ आरोग्य सेविका ज्योती चांगडे ‘मदतनीस गीता बुरकुल ‘आशा स्वयंसेविका उर्मिला बुरकुल व लता बंगाळे ‘यांच्या शिवाय .सचिन खंडारे कडुबा खंडारे अजय खंडागळे आदी उपस्थित होते .आपण आपल्या आरोग्य विभागा अंतर्गत निष्ठेने आणि काळजीपूर्वक काम करू तसेच आरोग्य जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करू लोकांची सेवा करू असे प्रतिपादन यावेळी नवनियुक्त समुदाय आरोग्य अधिकारी वायाळ यांनी व्यक्त केले ।

सोलापुरच्या आनंद गोसकी यांना दिल्ली येथील प्रबुध्दरत्न पुरस्कारांनी सन्मानित……

0

 

 

संपुर्ण देश पातळीवरील अनेक सामाजिक,व ईतर क्षेञातील उल्लेखनिय कार्य करणार्या दिग्गजांनसोबत सोलापुरातील युवक सामाजिक कार्यकर्ते आनंद मधुकर गोसकी यांना सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम कोरोना या महामारीमुळे आॅनलाईन युट्युब व फेसबुक द्वारे लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात आले, पुर्व भागातील आनंद मधुकर गोसकी यांनी गोरगरीब रंजले गांजले त्यासी म्हणु आपले म्हणी प्रमाणे समाजातील दुखी पिढीत वंचित घटकांना शासकीय व अन्य संस्थांनकडुन निधी मिळवुन पैश्याअभावी अथवा उपचारा अभावी म्रुत्युमुखी पडता कामा नये म्हणुन आनंद गोसकी या युवकाचे प्रामाणिक व उल्लेखनिय कार्याचे दखल घेउन येरशियश फाउंडेशनचे संस्थापक प्रविण दामले यांनी प्रबुध्दरत्न पुरस्कार सन्मान 2020 आनंद मधुकर गोसकी यांना सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीमुळे युट्युब,फेसबुक लाईव्ह द्ववारे हा कार्यक्रम संप्पन्न झाला असुन , या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन आर जे रेखा,हैद्राबादवरून तिरूपती मनिष,डाॅ भारतीय सक्सेना,विकास स्नेही व अन्य तिग्गज मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते,

शेतकरी संघटना ने लावले शेतात दानवे च्या पुतळ्याचे चे बुजगावणे

0

 

रावसाहेब दानवे हे भाजप चे बुजगावणेच – कैलास फाटे

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पहुरजीरा या गावात सत्याग्रह शेतकरी संघटनेने चक्क शेतात बुजगावने लावले आहे तेही केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे दिल्ली येथे गेल्या काही दिवासापासून केंद्राने आणलेल्या काळा कायदा रद्द करावा यासाठी आंदोलने सुरू आहेत. कडक थंडी मध्ये देखील लाखो शेतकरी रस्त्यावर आपल्या मतावर ठाम दिसून आले आहेत. त्यावर दानवे यांनी वादग्रस्त वक्तव्य करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली होती पण दानवे जे काही बोलले ते त्यांचे शब्द नसून त्यांचा बोलता धनी वेगळाच आहे. दानवे हे तर एक भाजप चे बुजगावणे आहे असं परखड मत सत्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांनी मांडले आहे.
केंद्र सरकारचं पितळ उघडे पडतांना दिसत आहे म्हणून केंद्र सरकार शेतकऱ्यांना घातक ठरणारे बिल पटवून देण्यासाठी मोहीम राबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे व दानवे सारख्या बुजगावण्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष आंदोलनाकडून वळवून आपल्याकडे वळवण्याची एकप्रकारे सुपारी देण्याचे काम करत आहे. असेही फाटे प्रसिध्दी माध्यमांसोबत बोलतांना म्हणाले.
यावेळी शेतात केंद्रित मंत्री दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे बुजगावणे तैयार करून फक्त पाखरांना हकल्याचे काम करतांना भासविले आहे यावेळी सत्याग्रह शेतकरी संघटनेचे जिल्हा संयोजक राजू भाऊ नाकाडे युवा आघाडी अध्येक्ष आयाज भाऊ शेक युवा आघाडी आकाश देशमुख युवा आघडी गणेश सडत कार अनिल गावंडे शब्बीर शेक निलेश घोपे नंदू सडत कार राजेश ठोके सोपान सोळंके असंख्य कर्यक्रकते उपस्थित होते

संग्रामपूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्षपदी शिवकुमार चांडक तिसऱ्यांदा अविरोध

0

 

संग्रामपुर  तालुक्यातील पातुर्डा येथील सरस्वती वाचनालय शनिवारी दुपारी १ वा.तालुक्यातील ग्रंथालय कार्यकर्त्यांची सभा संपन्न झाली यावेळी तालुका ग्रंथालय संघच्या तालुकाध्यक्ष पदी शिवकुमार चांडक यांची सलग तिसऱ्यांदा सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवकुमार चांडक तर प्रमुख पाहुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक हिम्मतराव भाकरे , माजी अध्यक्ष उत्तमराव तायडे , विनायक चोपडे संचालक, व जिल्हा ग्रंथालय कर्मचारी संघ अध्यक्ष अनंता सातव उपस्थित होते.सभेमधे २०२१ ते २०२३ करीता तालुका ग्रंथालय संघाची नुतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. ग्रंथालय पदाधिकारी च्या सभेत सर्वाच्या समन्वयातु सर्वानुमते अध्यक्षपदी शिवकुमार चांडक यांची निवड करण्यात आली,तर उर्वरित कार्यकारिणी मधे शरद बनकर-उपाध्यक्ष,श्याम इंगळे-सचिव,दिनेश देशमुख-कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उर्वरित सदस्य म्हणुन विजय गाळकर, महादेव जाधव, विनायक राऊत,भाऊराव वानखडे,उध्दव व्यव्हारे,श्रीकांत चावरे,माधव उन्हाळे,पंकज गोमासे, धर्मेंद्र इंगळे, प्रकाश अरबट व भारत बाजोड यांची निवड करण्यात आली संचालन अनंत सातव तर आभार श्याम इंगळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन राजनकर, निखिल देशमुख यांनी परिश्रम घेतले. शिवकुमार चांडक यांची सलग तिसऱ्यांदा संग्रामपुर तालुका ग्रंथालय संघच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे

स्कॉलरशिप व निर्वाहभत्ता वाढीसाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करणार :आठवले

0

 

नागपूर दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रमात सहभाग

नागपूर दि.१३ : केंद्र शासनाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांवर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांची कार्यवाही सुरळीत करणे व निर्वाहभत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यास आपले प्राधान्य असल्याची ग्वाही सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले आज नागपूर दौऱ्यावर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे त्यांनी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग कार्यालयांमध्ये आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले.
आढावा बैठकीला प्रामुख्याने प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख व विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते होते.
गेल्या मार्चपासून देशात कोरोना महामारीच्या काळात शाळा,महाविद्यालये बंद होती.त्यामुळे आवश्यक असणाऱ्या नोंदी, विद्यार्थ्यांची उपस्थिती व अनुषंगिक दस्तऐवज तयार करण्यामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग आपल्या स्तरावर प्रयत्न करीत आहे. तथापि, भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेतील निर्वाह भत्ता वाढी संदर्भातील मुद्दा महत्वपूर्ण आहे. गेल्या दहा वर्षापासून यामध्ये वाढ झाली नसल्याच्या अनेक स्तरावरून तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात आपण केंद्र शासनाकडे वाढीचा प्रस्ताव सादर केला असल्याचे श्री.आठवले यांनी चर्चेदरम्यान सांगितले.
सामाजिक न्यायासंदर्भात नागपूर शहर अत्यंत जागृत पार्श्वभूमी असल्याचे सांगून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येक योजनांची प्रभावी अंमलबजावणी नागपूर विभागात व्‍हावी, अशी सूचना त्यांनी केली. केंद्राच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू आहे. त्याबाबतचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला. तसेच आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना, सफाई व्यवसायात काम करणाऱ्या मुलांसाठी शालांत पूर्व परीक्षा शिष्यवृत्तीसाठी सहाय्यक अनुदान आदी योजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
नागपूर विभागात दहावी उत्तीर्ण ( मॅट्रिकोत्तर ) भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सहा जिल्ह्यांमध्ये सन 19-20 वर्षाकरिता 90 हजार 345 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 66 हजार 112 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता देण्याची तयारी करण्यात आली आहे. आंतरजातीय विवाह करता प्रोत्साहन योजनेअंतर्गत जवळपास 7 कोटी 76 लक्ष रुपयांची मागणी प्रलंबित आहे. तर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती या योजनांसाठी 2019-20 वर्षांमध्ये एक कोटी 65 लक्ष रुपये तरतूद अपेक्षित आहे.
बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यानंतर त्यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले.

कासारी येथे स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

0

 

प्रतिनिधी- सचिन पगारे
नांदगाव (नाशिक)

कासारी येथे स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त येथील सामाजिक कार्यकर्ते नंदलाल इप्पर यांच्या वतीने व मालेगाव ब्लड बँकच्या सौजन्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले .
नांदगांव तालुक्यातील कासारी येथे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त स्व. गोपीनाथराव मुंडे सोशल फाउंडेशन कासारी व सामाजिक कार्यकर्ते नंदलाल इप्पर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर तसेच गरजूंना ब्लँकेट वाटप आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडखे ,नांदगांव तालूका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष डॉ. जनार्दन पगार, उपाध्यक्ष नंदलाल इप्पर, प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मालेगाव ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले.यावेळी मच्छिंद्र घूगे, ईश्वर जाधव, शेषराव गायकवाड, आशितोष हटकर, भिका गवळी, संतोष इप्पर, जनार्दन भागवत, चंद्रभान झोडगे, रविकांत भागवत,गणेश बागूल,समाधान शेरेकर, अशोक शिंदे, राजू इप्पर आदी उपस्थित होते.