Home Blog Page 564

यावल बुरूज चौक ते शासकीय गोदाम पर्यंतच्या रस्त्याचे काम सात महीन्यांपासुन प्रलंबीत

0

 

 

सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावेयावल येथील बुरूज चौक ते सातोद मार्गावरील शासकीय गोदाम पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मागील सात महीन्यांपासुन प्रलंबीत असल्याने वाहनधारका व पादचाऱ्यांना मोठा त्रास सोसावा लागत आहे . यावल शहरातील बुरूज चौक ते सातोद कोळवद या मार्गावरील रस्त्यावरील पोलीस स्टेशन , ग्रामीण रुग्णालय , स्टेट बॅकेचे मुख्य कार्यालय , तहसील कार्यालय , विविध शाळा आदी मुख्य कार्यालय असुन या मार्गावर कार्यालयाशी निगडीत कामा करीता येणाऱ्या नागरीकांची नियमीत मोठी वर्दळ असते हा विषय लक्षात घेत शासनाच्या वतीने सुमारे ५०० मिटर पर्यंतचा रस्त्यासाठी निधी मंजुर झाला असुन या कामास सर्वमान्यता मिळाली असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग यावल च्या अक्षमय: दुर्लक्षामुळे मागील सात महीन्यांपासुन सुरू न झाल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारका पासुन तर पादचाऱ्यांना रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने व त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजुस कामाची खड्डीअनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या प्रलंबीत कामास सुरूवात करून त्वरीत पुर्णत्वास घेवुन जावे अशी मागणी नागरिक करीत आहे .

चंद्रपुर भाजपचे डिजिटल सदस्य नोंदणी पर्व सुरू !!

0

 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीचे औचित्य !!!

आ सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते शुभारंभ !!!!

भारतरत्न पंतप्रधान स्व अटलबिहारी बाजपेयी यांच्या ९५, व्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपुर भारतीय जनता पार्टीच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी पर्वाला शुक्रवार (२५डिसेंम्बर) ला सुरवात करण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ आ सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बाबूपेठस्थित श्रद्धेय माजी पंतप्रधान अटलबिहारी स्टेडियम येथील अटलजींच्या पुतळ्याला आदरांजली स्वरूप माल्यार्पण करून करण्यात आला.

या प्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, महापौर राखी कांचर्लावार, महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, मंडल अध्यक्ष संदीप आगलावे, नगरसेवक संजय कांचर्लावार, रवी आसवानी, प्रदीप किरमे, कल्पना बगुलकर, प्रज्ञा बोरगमवार, मंजुश्री कासंगोट्टूवार, शिला चव्हाण, प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार अकापेल्लीवार, गणेश गेडाम आदींची उपस्थिती होती.

यावेळी आ मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रात पहिल्यांदाच डिजिटल सदस्य नोंदणीपर्वाला सुरवात होत आहे. या डिजिटल माध्यमातून संघटना व जनतेचे प्रश्न सहजपणे मांडता येईल व सोडविता येईल. संघटनेला योग्य व्यासपीठ मिळेल. जनतेची सेवा करण्यासाठी हा ऍप काम करेल. श्रद्धेय अटलजी म्हणायचे, कदम मिलाकर चालना होगा….आपल्यालाही एकमेकाला सहकार्याच्या भावनेतून जनसेवा करायची आहे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. अटलजींनी संपूर्ण आयुष्य देशसेवेत अर्पण केले. त्यांच्या जनसेवेचा मूलमंत्र सर्वांनी अंगिकारावा असे आवाहन त्यांनी केले. २५ डिसेंम्बर ते २५ जानेवारी अटल डिजिटल भाजप सदस्य नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. अशी माहिती कासंगोट्टूवार यांनी दिली.

यावेळी जेष्ठ  भाजप नेते रामेशजी बागला, दिवाकर पुद्दटवार, चंद्रशेखर गन्नूरवार, प्रिया पेंदाम व भगिनी यांचा आ मुनगंटीवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तविक सुभाष कासंगोट्टूवार यांनी केले, तर संदीप आगलावे यांनी आभार मानले.

 

शेतकरी प्रबोधिनीच्या उपाध्यक्षपदी रामदास पाटील !!

0

 

उरण – रायगड जिल्हा: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई परिसरातील मूळ भूमीपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी समाजाचे अस्तित्व सध्या विविध कारणांनी धोक्यात आले आहे. त्यामुळे कोळी बांधव, कामगार, शेतकरी वर्गांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी प्रबोधिनी ही संस्था शेतकऱ्यांना, कोळी बांधवांना, कामगारांना विविध माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. अश्या या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच रामदास हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मु – नितळस तालुका पनवेल येथील रहिवाशी असलेले रामदास हरिश्चंद्र पाटील यांचे आजपर्यंतचे कार्य व गोरगरिबांविषयी, कामगार, कोळी, शेतकरी बांधवांविषयी असलेली तळमळ पाहता कामगार, कोळी बांधव, शेतकऱ्यांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी प्रबोधन या संस्थेच्या उपाध्यक्षपदी रामदास हरिश्चंद्र पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिली. रामदास पाटील यांची निवड संस्थेच्या उपाध्यक्ष पदी झाल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

गोवठणे गावात दिवसा ढवळ्या झाली चोरी. चोर अद्यापही फरार !!

0

 

घरात कोणीही नसल्याचे पाहून चोरांनी केले घर साफ !!!

उरण – रायगड जिल्हा: उरण तालुक्यातील गोवठणे गावातील रहिवाशी मनपसंत चंद्रकांत पाटील वय 32 वर्षे, धंदा -नोकरी, गोवठणे यांच्या घरी दिवसा ढवळ्या घरात कोणीही नसल्याचे पाहून चोरांनी घर साफ केले आहे. घरात असलेले सोने व रक्कम असे एकूण 6, 30, 500 रुपयाची मालमत्ता चोरीस गेल्याने गोवठणे गाव परिसरात एकच खळबळ माजली आहे. चोरी करणाऱ्या अनोळखी व्यक्ति विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 454, 380 अंतर्गत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि मनपसंत चंद्रकांत पाटील राहणार गोवठणे, तालुका उरण हे CHA ची नोकरी करत असून त्यांची पत्नी संगीता ही गर्भवती असल्याने तिच्या उपचाराकरिता पत्नी उरण येथे गेले होते. मनपसंत यांचे वडील वडील कामानिमित्त आवरे येथे गेले होते. मनपसंत यांची आई राधा चंद्रकांत पाटील मनपसंत यांचा मुलगा स्मित पाटील हे घरात होते. मुलगा रडत असल्याने राधा यांनी मुलाला दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास बाहेर फिरण्यास घेऊन गेले. मात्र दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास घरी परत आल्यावर कपाटातील सर्व सामान, कपडे व इतर सामान जवळच असलेल्या बेडवर पडलेले दिसले. किचनचा दरवाजा सुद्धा उघडा होता सदरचे घर दुमजली असून चोरांनी जिन्याद्वारे तळमजल्यात प्रवेश करून चोरी केल्याचा संशय आहे. 3, 20,000/- रुपयाचे 8 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 1, 40, 000/- रूपयाचे जेन्टस चैन, 60, 000/- रुपयाचे सोन्याचे मंगळसूत्र, 48,000/- रुपयाचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके, 12,000/- रुपयाचे कानातील टॉप्स, 12,000/- रुपयाचे गळ्यातील चैन, 12,000/- रुपयाचे सोन्याचे 5 अंगठ्या, 4,000/- रुपयाची लेडीज अंगठी, 4,000/- रुपयाची कानाची बाळी, 18,500/- रुपयाचे रोख रक्कम त्यात 500 रुपयाचे 37 चलनी नोटा असे एकूण 6,30,500/- रुपयाची मालमत्ता चोरीस गेली आहे.

चोराने घरात वरच्या मजल्यावरून घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉकर व ड्रॉवर कशाने तरी तोडून त्यातील वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली आहे. चोरी करणाऱ्या या अनोळखी व्यक्ति विरोधात मनपसंत पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. चोरांचा त्वरित शोध लावून सदर घटनेस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मनपसंत पाटील यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

 

वैजापुर गंगापूर मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणूकाच्या अनुषंगाने ( महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री ) मा ना अब्दुलजी सत्तार साहेब, यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक..

0

 

ऋषी जुंधारे
प्रतिनिधी

वैजापूर- वैजापुर-गंगापूर मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणूकाच्या अनुषंगाने वैजापूर आमदार जनसंपर्क कार्यालय येथे ( महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री ) मा ना अब्दुलजी सत्तार साहेब, आमदार अंबादास दादा दानवे व आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी आमदार साहेबांनी मार्गदर्शन करत सर्कल निहाय ग्रामपंचायत आढावा घेऊन उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, पं. स. सदस्य, कृ.ऊ.बा.स.संचालक यांच्या वर जबाबदार्या विभागून दिल्याचे सांगितले.

या आढावा बैठकी प्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पा गलांडे, मा जि.प.सदस्य मनाजी पा मिसाळ, मा.सभापती रामहरी बापू जाधव, शहर प्रमुख राजेंद्र पा साळुंके, कृ ऊ.बा.स.उपसभापती विष्णू भाऊ जेजुरकर, गटनेते प्रकाश चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपतालुका प्रमुख कल्याण पा जगताप, गोरख पा आहेर, डॉ प्रकाश शेळके, पी एस कदम, गोरखनाथ शिंदे, महेश पा बुनगे, मोहन पा साळुंके, नगरसेवक, पारस घाटे, ज्ञानेश्वर टेके, स्वप्नील जेजुरकर, इम्रान कुरैशी, रियास शेख़, सखाहरी बर्डे, वसंत त्रिभुवन, प स सदस्य भाऊसाहेब पा गलांडे, भानुदास पा पवार, बद्रीभाऊ चव्हाण, विभाग प्रमुख नानासाहेब थोरात, उपविभाग प्रमुख हरिदास साळुंके, बंडूभाऊ जगताप, विठ्ठल पगार, मल्हारी पठाड़े, राजुभाऊ राजपूत,अरूण शेलार, दिपक भोसले, अमोल पा मलिक, राजू गलांडे, शिवसैनिक व शाखा प्रमुख उपस्थित होते.

नवीन वषाॅची सुरवात ऊपाेषणाने – जीवन वाचवा ! ! सर्वसामान्यांचे प्राण वाचवा ….. ! ! !

0

 

जैन बहुबल असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीत मराठी माणसावर अन्याय !!

संपुणॅ महाराष्टात मिडीया मध्ये आलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीची दखल (अंधेरी – पश्चिम, मुंबई) घेऊन मुंबई महानगर पालिकेच्या काही अधिकार्यानी महिनाभरापुरवी साेसायटीला भेट देऊन काही साेसायटीच्या सभासदाना भेटुन माहीती घेतली व त्यांना साेसायटीच्या बांधकामाचा नकाशा सादर करावयास सांगितले पंरतु अजुनपयॅत काेणत्याही जबाबदार कमीटी सदस्यांनी किंवा सभांसदाकडुन काेणताही पुढाकार न घेतल्यामुळे मुंबई महानगर पालिकेकडुन अजुनपयॅत काेणत्याही सभासदावर ज्यानी या अगाेदर परवानगीशिवाय आपल्या घरातील बांधकामात किंवा घरदुरूस्ती करताना संरचनेत काही बदल केला असेल तर त्यांचावर काहीही कारवाई अजुनपयॅत केली नाही आहे त्यामुळे गैरकुत्ये करणार्या नवीन सभांसदावर अंकुश काेण ठेवणार व रहीवाशी साेसायटी साेसायटी कमीटीशिवाय किंवा अन्य पयाॅयाशिवाय काेणाच्या नियंत्रणात कशी राहणार हा फार माेठा पश्नचिन्ह आहे व ही समस्या कशी सुटणार ?

नवीन साेसायटी कमीटी बनवन्याचा पयत्न फसलेला आहे किंवा आता गैरकारभार ऊघड झाल्यामुळे काेणताही सभासद पुढाकार व जबाबदारी घ्यायला तयार नाही जी जवळपास अडीच महीन्यापुवी साेसायटीच्या कमीटी सदस्यांनी राजीनामा स्वखुषीने दील्यामुळे नव्हती पंरतु आजपयॅत नाराज असलेल्या सभासदाना किंवा ज्यांनी लिगल नाेटीसी द्वारे पश्नाची ऊत्तरे मागीतली आहेत त्यांना ऊत्तरे देण्याचा काेणीही पयत्न करताना काेणताही जबाबदार अाजी/माजी कमीटी सभासद करताना दिसत नाही (काही कमीटी सदस्य किंवा सभासदाच्यांमते ५-६ वषाॅपुरवी साेसायटी दुरीस्तीच्या वेळी गैरव्यवहार घडण्याची शक्यता वतॅवण्यात येत आहे त्यामुळे दुसरयान्दा साेसायटी दुरूस्तीचा पयत्न १ वषाॅपुरवी काही कमीटी सदस्यानी केला हाेता ताे पयत्न सुध्दा साेसायटीच्या सभासदानी सहकायॅ न दील्यामुळे अयशस्वी झाला) व अश्या परीस्थीतीत काही सभासदानी जागा विकली किंवा विकत घेतली असे महत्वाचे व्यवहार कसे हाेणार हा पश्नचिन्ह आहे व ही समस्या साेसायटी कमीटी न बनविता काेण साेडवणार व पुरवी काही गैरव्यवहार घडला असेल तर ताे काेण ऊजेडात आणनार किंवा काेणत्या सभासदाने काही अफवा पसरवली असल्यास हा गैरसमज दुर काेण करणार हा माेठा पश्नचिन्ह आहे सर्वा सभासदांपुढे.

जवळपास ३०-३५ वषॅ जुन्या काेमल रहीवाशी साेसायटीची बिकट परीस्थीती हाेण्यामागे बरीच कारणे आहेत तरी त्यातील मुख्य कारण साेसायटीतील सभासद व माजी चेअरमन श्री शांतीलाल जैन व त्यांना साथ देणारे ईतर कमिटी सदस्य अथवा सभासद असावेत असे मला वाटते तरी अधिक माहीतीसाथी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
हा फेसबुक गुप मी बनविला आहे ताे आपण कुपया आपण सवाॅनी बघावा व त्या गुपमध्ये सामील व्हावे ही सवॅा जातीतील व धमाॅतील जनतेला मनापासुन विनंती व श्री जगदीश काशीकर हे काेणत्याही जाती व धमाॅविरूध्द नसुन चुकीच्या पध्दतीने वागुन कायद्याचा अनादर करून गुंड पवृतीने वागणारांच्या विराेधात आहेत हे सवाॅनी लक्षात घ्यावे व त्यामुळे या पकरणात श्री जगदीश काशीकर यांना सवॅा जातीतील व धमाॅतील लाेकांनी मनापासुन अन्याया विरूध्द लढण्यास साथ व पाठींबा दयावा ही अपेक्षा व विनंती तसेच येत्या काही दिवसांनी बरीच कारणे आपल्या निदशॅनात येतील अशी आशा वाटते.

श्राी शांतीलाल जैन यांनी त्यांच्या घरात पावसाळ्याच्या दिवसात त्यांच्या घरात पाणी गळतीचा त्रास हाेत असल्यामुळे जवळ पास अंदाजे १५ ते २० वषॉ मेन्टेनन्स भरला नाही व साेसायटीने त्यांच्या परीने त्यांना त्रास हाेऊ नये म्हणुन गच्चीवर दर पावसाळयात डांबरीकरण करून किंवा ठरावीक रक्कम दरवरषी डांबरीकरण्याच्या खचाॅसाठी दीली असताना व त्याचे घर दुरूस्त करून दीले असताना तीन वषाॅपुवी त्यांचे साेसायटी मेन्टेनन्स अकाऊन्ट साेसायटी कमीटीने १५ ते २० वषाॅचे व्याज न घेता सेटल करण्यात आले ही बाब काही सभांसदाकडुन आता ऊजेडात आली आहे व आता हाच न्याय श्री जगदीश काशिकर यांना तसेच ईतर गरजु व्यक्तीना सुध्दा मिळावा कींवा श्री शांतीलाल जैन यांना माफ केलेले व्याज (पाऊस वषाॅतुन फकत २५ ते ३० दिवस साधारणपणे पडत असेल ही बाब विचारात न घेता) सेासायटी कमीटीने पुन्हा घ्यावे ही नवीन साेसायटी कमीटीकडुन व सभासदांकडुन अपेक्षा असुन त्यांच्या भावनेचा / मानसिकतेचा व आर्थीक/काैटुम्बीक परीस्थीतीचा विचार न करता त्यांना विरेाध केला जाताे व समजुन घेतले जात नाही जे या साेसायटीत सवाॅत जुने रहीवाशी (ईमारत नीमाॅण झाल्यापासुन) असुन व याच साेसायटीत त्यांच्या मामानी काही वषाॅपुवी आत्महत्या केलेली साेसायटीच्या काही सभासदाना माहीत असुन सुध्दा साेसायटीतील काेणताही सदस्य काहीही तदजाेड व सहकायॅ करण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळे आज ते फार तनावात जगत आहेत.

काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुलक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुणॅ विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत आहे याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.

मुंबई येथील काेमल रहीवाशी साेसायटीतील रहीवाशी, अंधेरी – पश्चिम खाली नमुद केलेल्या गाेष्टीनी फार त्रस्त व चींतेत आहेत व ही परिस्थीती साेसायटी कमीटीच्या गैरकाभारामुळे व आता त्यांचे अस्तित्व नसल्यामुळे झाली आहे व अश्या परिस्थीतीत व कराेना आजारामुळे सभासदांची मेंटेनन्स न भरण्याची ईच्छा हाेते व याची कल्पना श्री जगदीश काशिकर यांनी या अगाेदर आपणास तसेच महाराष्ट राज्याचे माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री, माननीय मुंबई पाेलीस आयुक्त, माननीय मुंबई पाेलीस ऊप अायुक्त तसेच ईतर शासकीय वरीस्ठ अधिकारी यांना दीलेली आहे व आता बरेच सभासद पुढच्या कारवाईच्या पतिक्षेत आहेत.

थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुरवी घडलेल्या आहेत) पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, संरचनेत फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मध्ये घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवॅा सदस्याना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, बागकाम, उत्सव, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा आणि इतर बरेच काही निवासी सहकारी गृहनिर्माण सोसायटी प्रदान करतात जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चाींतेत व समस्येत अाहेत.

अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील पमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सवॅ जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.

या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.

सरवॉना सगळया कायदेशीर प्लकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत आहे याची नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती गरजवंताना दयावी ही विनंती.

407 वाहन पलटी एकाचा मृत्यू, तर चार जण जखमी , गुन्हा दाखल

0

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

कापसाने भरलेले टाटा 407 वाहन उलटून एक ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास संग्रामपूर ते जळगाव जामोद रस्त्यावर घडली .

संग्रामपूर जवळील शिवनेरी ढाब्याजवळ हे वाहन पलटी झाले यात एक मजूर वाहनाखाली दबला गेल्याने गंभीर जखमी झाला . त्याला काही युवकांनी बाहेर काढून मोटरसायकलीवर उपचाराकरिता नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे . मृतकाचे नाव अक्षय नवलसिंग रघुवंशी वय 22 , रा . जळगाव जामोद असे आहे . त्याच्यासोबतचे चार मजूर जखमी झाले आहेत . घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तामगावचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत विखे , बिट जमादार माळी , बोंबटकार , कायंदे हे होमगार्डसह दाखल झाले . घटनास्थळावरच वाहनचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले . याबाबतची तक्रार मृतकाचे वडील नवलसिंग रघुवंशी यांनी तामगाव पोलिसांना दिल्यावरून चालक धम्मपाल जानराव वानखडे रा . सावरगाव ता . जळगाव जामोद याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला .

कोरोनामुळे व्यापारी हतबल, सरकारच्या बुस्टरची गरज!; विशेष मुलाखतीत शेखर नागपाल यांची आग्रही मागणी, शेगावातील व्यापार्‍यांच्या मांडल्या समस्या; तरुणांना म्हणाले आत्मनिर्भरतेशिवाय पर्याय नाही!

0

 

शेगाव (आयुषी दुबे)

 

देशाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या व्यापार्‍यांच्या मागण्यांकडे प्रशासकीय, शासकीय स्तरावरून सातत्याने दूर्लक्ष केले जाते. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक अडचणी जशा आहेत तशाच राहतात. त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा लाइव्हने पुढाकार घेत थेट भेट या उपक्रमात आज, 3 डिसेंबरला अखिल भारतीय व्यापारी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शेखर नागपाल यांची मुलाखत घेतली. शेगाव शहरातील व्यापार्‍यांच्या समस्या, त्यावर परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी काढण्यात आलेला तोडगा, सरकार दरबारी केलेला पाठपुरावा आणि संघटना म्हणून झालेल्या एकूण कामगिरीचा आलेख श्री. नागपाल यांनी बुलडाणा लाइव्हकडे मांडला. कोरोनामुळे व्यापारी हतबल झाले आहेत. ते पुन्हा आर्थिक प्रवाहात येतील, यादृष्टीने सोयीसवलतींचे बुस्टर व्यापार्‍यांना सरकारने देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
श्री. नागपाल हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शेगाव येथील अध्यक्ष असून, शेगाव प्रवासी संघटना आणि गणेश नवदुर्गा उत्सव मंडळाचेही अध्यक्ष आहेत. शिवाय शांतता समिती सदस्य आहेत. त्यांचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय आहे. 2019 मध्ये त्यांनी अखिल भारतीय व्यापारी परिषदेची स्थापना केली. कोरोना काळात व्यापार्‍यांना ज्या ज्या अडचणी आल्या त्या त्यांनी अध्यक्ष या नात्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील व्यापार्‍यांच्या हितासाठी जे काही चांगले निर्णय घेता येतील ते निर्णय घेतले. कोरोना काळात सरकारने लावलेले काही प्रतिबंध व्यापार्‍यांना नुकसानकारक होते. त्यावर परिषदेने आवाज उठवला. नगरपरिषद हद्दीतील गाळ भाडे माफ करण्यासाठी हायकोर्टात पीटिशन दाखल केले. कोरोना काळातील व्यापार्‍यांचे वीजबिल माफ करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. परिषदेने केवळ व्यापारीच नाही तर सामान्यांनाही मदतीचा हात दिला. कोरोनाविषयी सतत जनजागृती करण्यात आली. अनेक गोरगरिबांना मदत करण्यात आली. परिषदेच्या माध्यमातून विविध असोसिएशन स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये किराणा असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शेठ अग्रवाल असून, सलून असोसिएशनचे अध्यक्ष अशोकभाऊ राठोड, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शेखर नागपाल, मोबाईल व कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष अमित जाधव, बिछायत असोसिएशनचे अध्यक्ष विजय लांजुळकर, त्याचप्रमाणे विविध विभागांचे असोसिएशन अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. परिषदेला कायदेविषयक मार्गदर्शन अ‍ॅड. पी. आर. डागरा, अ‍ॅड. वासुदेव मिरगे, अ‍ॅड. कैलास गुप्ते, अ‍ॅड. श्री. मल, अ‍ॅड. जैन त्याचप्रमाणे गावातील वरिष्ठ व्यापारी जगदीश नारोलिया, निळू पाटील, मोहनशेठ अग्रवाल आदी वरिष्ठ व्यापार्‍यांचे मार्गदर्शन सतत मिळत असल्याचेही श्री. नागपाल यांनी सांगितले.

व्यावसायिक पार्श्‍वभूमी…

श्री. नागपाल यांचा हॉटेल व्यवसाय वडिलोपार्जित असून, वडिलांनंतर तो त्यांच्याकडे वडिलांप्रमाणेच त्यांनी या व्यवसायाचा लौकिक वाढवला आहे. त्यांना तीन भाऊ आहेत. पत्नी, मुलगा, मुलगी, दोन पुतणे असा आप्त परिवार आहे.

पार्किंग व्यवस्था नसल्याने…

शेगाव शहरात अनेक समस्या व्यापार्‍यांना भेडसावत असतात. त्यात प्रामुख्याने पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे बिनकामाच्या गाड्या सुद्धा दुकानांसमोर लागत असतात. त्यामुळे दुकानात यायला रस्ता राहत नाही. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था किंवा नियोजन करण्यात यावे, अशी व्यापार्‍यांची मागणी आहे. नगरपरिषदेने कर वाढविला आहे त्या तुलनेत सुविधा नाही. करात सवलत देण्याची गरज आहे. सध्या बँकांनी सक्तीची वसुली सुरू केली आहे. कोरोना काळात व्यापार बंद होता. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या सर्व समस्यांचे निराकरण सरकारकडे करण्याची मागणी व्यापार्‍यांच्या वतीने करण्यात आल्याचे श्री. नागपाल यांनी सांगितले.

नव्या पिढीला आत्मनिर्भरतेचा सल्ला

शेखर नागपाल यांनी नव्या पिढीला आत्मनिर्भरतेचा सल्ला दिला आहे. नवतरुणांनी व्यवसायात येऊन आत्मनिर्भर व्हावे. व्यवसायात आल्यानंतर त्यांना येणार्‍या समस्यांचे निराकरण अखिल भारतीय व्यापारी परिषदेच्या माध्यमातून आम्ही निश्‍चित करू, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.

जीएसटी कायद्यात बदल अपेक्षित…

जीएसटीमुळे खरोखरच व्यापार्‍यांची कंबर मोडली आहे. सरकारने या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. परंतु प्रामुख्याने सर्वात पहिले ऑनलाइन व्यवसाय बंद झाला पाहिजे. या व्यवसायामुळे अनेक व्यापार्‍यांना समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि जीएसटीचा विचार केला असता जीएसटी हा खूप मोठा अभ्यासाचा विषय झाला असून खरोखरच जीएसटीमुळे व्यापार्‍यांना खूप त्रास होत आहे, अशी भावना श्री. नागपाल यांनी मांडली.

व्यापार्‍यांवरील बंधने कमी करा…

खरं तर सरकारने दिलेले नियम हे व्यापार्‍यांसह नागरिकांनी सुद्धा पाळावे. परंतु काही नियमांमुळे व्यापार्‍यांना अडचणी येतात त्या नियमांमध्ये निश्‍चितच बदल करणे गरजेचे आहे. व्यापार्‍यांमुळे सरकारी तिजोरीत कराच्या रूपाने महसूल जमा होतो. त्यामुळे जास्तीची बंधने व्यापार्‍यांवर न लावता नियमांमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

सरकारकडून काही अपेक्षा?

अध्यक्ष या नात्याने संत नगरीतील नागरिक म्हणून मी सरकारकडे एकच विनंती करेन की संतनगरी शेगावमध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून विविध प्रकारच्या औद्योगिक कंपन्या शेगावमध्ये आणून शेगावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून तालुक्यातील व शहरातील तरुणांना गावाबाहेर रोजगार शोधण्याकरिता जाण्याची गरज पडणार नाही. त्याचप्रमाणे रेल्वेचे माल गोडाऊन खामगाववरून शेगावला स्थलांतरित करण्यात यावे किंवा नवीन गोडाऊनची स्थापना करण्यात यावी. जेणेकरून शेगाव शहरातील व्यापाराला चालना मिळेल. हमालांच्या हाताला काम मिळेल. तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल, असे श्री. नागपाल म्हणाले.

बसने चिरडलेली दुचाकी: युवक जागीच ठार, बसला भीषण आग

0

 

 

ब्रेकिंग

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया जिल्ह्यातील दुग्गीपार पोलिस स्टेशन अंतर्गत रोड अर्जुनी येथे बुधवारी, 23 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता एसटी महामंडळाच्या लाल कोच बसला समोरुन येणार्‍या ट्रिपल सीट दुचाकीस्वार धडक दिली.

दोन्ही वाहनांची टक्कर इतकी भयंकर होती की दुचाकीस्वाराने कित्येक फूट अंतरावर उडी मारली आणि बसचा त्याच भाग खराब झाला आणि इंजिनची अंतर्गत वायर जळून खाक झाली व काळ्या धूरातून घबराट पसरली आणि बस चुकली प्रवासी खाली उतरले.
या रस्ते अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिसर्‍याला प्रकृती चिंताजनक म्हणून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
हमने घटित हादसे के संदर्भ में डुग्गीपार थाने के सहायक पुलिस निरीक्षक वांगड़े से बात की उन्होंने जानकारी देते बताया-यह हादसा सड़क अर्जुनी के R.K पेट्रोल पंप के सामने आज शाम घटित हुआ है ट्रिपल सीट बाइक सवार युवक गढ़चिरौली जिले के कुरखेड़ा के निवासी हैं जो गोंदिया की ओर जा रहे थे तथा S.T बस गोंदिया से कोहमारा दिशा की ओर जा रही थी।

प.हं.तेजस्वी महाराज जन्मोत्सव भाविक भक्तांच्या विनाच साजरा. घरपोच प्रसाद वाटणारे वरोडी हे महाराष्ट्रातील पहिलेच देवस्थान

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

वरोडी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे दरवर्षी मार्गशीष दुर्गाष्टमी ला परमहंस श्री तेजस्वी महाराज जन्मोत्सव सोहळा अगदी थाटामाटात व दिमाखात लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत असतो, परंतु यावर्षी कोरोना महामारी च्या संकटामुळे हा जन्मोत्सव सोहळा शासन नियमानुसार विधिवत पूजन करून पार पाडण्यात आला. भागवत सप्ताह मध्ये भागवत कथा हरिभक्त परायण प्रकाश महाराज मगर यांच्या अमृततुल्य वाणीतुन श्रोत्यांनी श्रवण केली. तसेच हा जन्मोत्सव सोहळ्यासाठी संस्थांनी भाविकांना नम्र आवाहन केले होते की, आपण जिथे आहात तेथूनच तेजस्वी महाराज यांच्या फोटो मांडून पूजन करावे. त्याप्रमाणे भाविकांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची गर्दी न करता मोठ्या श्रद्धेने घरूनच जन्मोत्सव साजरा केला. दरवर्षी लाखो भाविकांच्या मांदियाळीत तब्बल १०१ क्विंटल पुरी भाजी चा महाप्रसाद भाविकांना वितरित केल्या जात असतो. जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भावी भक्त वरोडी येथे येऊन साक्षात परब्रम्ह गजानन महाराज रुपी श्री तेजस्वी अवलिया चे दर्शन घेऊन तृप्त होत असतात. परंतु यावर्षी कोरोना चे सावट सर्वत्र पसरलेले असताना सावधगिरी म्हणून भाविकांच्या श्रद्धेपोटी तब्बल साडेचारशे हून अधिक गावांमध्ये घरोघरी प्रसाद रुपी लाडू वाटप करण्यात आले. घरपोच प्रसाद देणारे महाराष्ट्रातील पहिलीच देवस्थान म्हणजे श्री तेजस्वी महाराज संस्थान होय.प्रसाद वाटपाचे काम हे जवळपास १०० हून अधिक स्वयंसेवकांनी अविरतपणे पाच ते सहा दिवस मेहनत घेऊन भाविकांत पर्यंत पोहोचला. या सर्व कार्यासाठी संस्थानचे अध्यक्ष, व पदाधिकारी मंडळी, स्वयंसेवक, पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी मेहनत घेतली आहे ‘