Home Blog Page 567

नाना पाटील यांची रयत क्रांती संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष पदी फेरनिवड…

0

 

बुलडाणा – रयत क्रांती संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराला आदर्श मानुन शेतकरी कष्टकरी कामगार नोकरदार व समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय व हक्कासाठी काम करीत आहे या कार्यामध्ये मोलाची कामगिरी करीत संघटनेचा प्रचार व प्रसार करत असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यास काम करण्यास हिम्मत मिळावी या हेतूने पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येतात व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा तपासून कालांतराने या पदाच्या जबाबदारीमध्ये खांदेपालट केली जाते.

त्याच अनुषंगाने रयत क्रांती संघटनेची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी लवकरच तयार करण्याचे काही दिवसांपूर्वी घोषित करण्यात आले होते त्यानुसार दिनांक ०६ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर रयत क्रांती संघटनेचे एक आंदोलन होते त्याचवेळी काही महत्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या व त्यामध्ये रयत क्रांती संघटनेच्या बुलढाणा(घाटाखालील) जिल्हाध्यक्ष पदी श्री. नाना पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली.

यावेळी श्री .नाना पाटील यांना रयत क्रांती संघटनेच्या बुलढाणा(घाटाखालील) जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र माजी कृषीराज्यमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष रयत क्रांती संघटना मा .आ.श्री. सदाभाऊ खोत, कार्याध्यक्ष दिपकभाऊ भोसले,युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे,राज्य प्रवक्ते जीतूभाऊ अडेलकर, प्रा.सुहास पाटील व रयत क्रांती संघटनेची संपूर्ण कोअर कमिटी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी बोलतांना फेरनिवड झालेले जिल्हाध्यक्ष श्री.नाना पाटील म्हणाले की समाजातील सामान्य जनतेच्या समस्या सोडवतांना कुठलेही पद महत्वाचे नसते महत्वाची असतो तो प्रामाणिकपणा व जबाबदारीची जाणीव.

पुढे बोलतांना पाटील म्हणाले की माझी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली असली तरी जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता जिल्हाध्यक्षच आहे मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात पुढे असेन परंतु माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले कार्यकर्तेच खऱ्या अर्थाने जिल्हाध्यक्ष आहेत असे यावेळी नाना पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांना दिवसाची वीज देण्यात यावी-धिरज फाटे

0

 

 

शेतकऱ्यांना दिवसा कृषीपंपासाठी उच्च दाबाची वीज सकाळी पाच ते दुपारी १ आणि दुसऱ्या टप्प्यात दुपारी १ ते रात्री ९ या वेळेत मिळावी यासाठी सत्याग्रह शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कार्यालय, खामगाव. मौजे पळसखेड पिंपळे तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे आप्पासाहेब जाधव, रमेश जाधव, सुनील जाधव, या तीन सख्ख्या भावंडांचा रात्रीच्यावेळी पिकाला पाणी देत असताना शॉक लागून मृत्यू झाला. तसेच बिबट्याच्या हल्ल्यामुळे मौजे.सुरडी ता. आष्टी जि. बीड येथील नागनाथ गर्जे या शेतकऱ्याला जीव गमवावा लागला.. मौजे किन्ही ता. आष्टी. जि. बीड येथील १० वर्षीय स्वराज भापकर या लहान मुलाला अंगणात खेळत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गमवावा लागला औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील आपेगाव येथे ही माय बापावरही हेच वेळ आली. हीच वेळ बुलढाणा जिल्ह्यात येऊ नये या करिता वीज देण्यात यावी यासाठी सत्याग्रह शेतकरी संघटनेने आदरणीय कैलास भाऊ फाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना दिवसा उच्च दाबाची वीज मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित खामगाव कार्यालय आपणास विनंती शेतकऱ्यांना वीज देण्यात यावी अन्यथा आम्हाला सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन अतिशय तीव्र पद्धतीने आंदोलन करावे लागेल. या वेळी अजून किती शेतकऱ्यांचे जीव घेतल्यानंतर विद्युत वितरण शेतकऱ्यांना दिवसाची वीज देईल…?? असा सवाल सत्याग्रह शेतकरी संघटनेने विचारला व बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सर्व गावच्या फिडरवर दिवसा वीज देण्यात यावी व विदर्भातील शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत गहू हरभरा अशा रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज देण्यात यावी. व आठ दिवसाच्या आत लाईन न मिळाल्यास पुन्हा एकदा अतिशय तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा सत्याग्रह विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष धीरज फाटे यांनी दिला.

सांगोळा नदीपात्रातून एका नजीकच्या शेतामधून अवैध वाळूचा उपसा

0

 

…. तहसील विभागाचे दुर्लक्ष, शासनाला लाखोंचा चुना.,

अतिशकुमार वानखडे अकोला

पातुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले गाव म्हणजे सांगोळा, या गावानजीक नदीचे नदी पात्र जोडलेले असून, अनेक शेतकऱ्यांचे शेती नदी पात्राला लागून असल्यामुळे. तसेच नदीपात्रात व नजीकच्या शेतामध्ये वाळूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नदीपात्राच्या नजीक असलेल्या काही शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे पीक न घेता अवैधरित्या वाळू उपसा करून विक्री चालू असल्याचे या परिसरात चित्र पहावयास मिळत आहे. नदीपात्राचा लिलाव तसेच ज्या शेतामधून अवैधरित्या वाळू उपसल्या जात आहे त्यांनी महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता अवैधरित्या ही वाळू विकल्या जात आहे त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत असून संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनात येत आहे यासंबंधी महसूल विभागाचे संबंधित अधिकारी तसेच अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचे देवाण-घेवाण करून मिलीभगत असल्याचे परिसरात जोरदार बोलल्या जात आहे. त्यामुळे वाळू उपसा करणार्‍या ना कुणाचा डर नसल्यामुळे राजरोसपणे रात्रंदिवस या परिसरात वाळू उपसा होत आहे. हा परिसर सस्ती मंडळ अधिकारी यांच्या अंतर्गत येत असून मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांचा या परिसरात कुठल्याही प्रकारचा वचक नसल्याने आणि संबंधित वाळू माफियांच्या नेहमी संपर्कात असल्याने. वाळू माफियांवर कुठल्याही प्रकारचा वचक नसल्याचे ही पहावयास मिळत आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयाचा चुना लागत आहे. या परिसरात अवैध वाळू माफिया हे रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उपसा करून वाळूचे साठवण करून जास्त भावाने वाळू विकत आहेत.

 

चौकट
संबंधित अधिकारी तसेच अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या माफियांची मिलीभगत असल्याचेही परिसरात बोलल्या जात आहे तसेच या परिसरातील एका लोकप्रतिनिधीचेया अवैध वाळू माफियांच्या डोक्यांवर आशीर्वाद असल्याचेही परिसरात जोरदार चर्चेला उधान लागले आहे.. शासनाचे रक्षकच भक्षक बनल्याची अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे..

मोहणसिंग डाबेराव यांच्या हद्दपारीच्या आदेशास स्थगिती

0

 

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

 

वरवट बकाल येथील रहीवासी मोहनसिंग नथू डाबेराव वय.६३ वर्षे यांना उविभागीय अधिकारी देवकर यांनी 6महीण्यासाठि बुलडाणा जिल्ह्यातुन तडिपार केले होते,तो आदेश त्यांनी २७-११-२०२०रोजी पारीत केला,सदर आदेशाविरुध्द मोहणसिंग डाबेराव यांनी अँड.प्रमोद घाटे,अँड.थेरोकार,अँड.मेश्राम यांच्या मार्फत मा.विभागीय आयुक्त अमरावती यांच्या न्यायालयात प्र.हद्दपार/अपिल क्रमांक 94/2020/बुलडाणा,मोहणसिंग, वि.उपविभागीय अधिकारी *१ही अपिल दाखल केली सदर प्रकरणात केलेल्या युक्तिवाद योग्य माणुन मा.आयुक्त हरिष सिंह यांनी गै.अ.यांचे जबाब येईपावोतो ३०/१२/२०२० पर्यत स्थगिती दिली आहे.सदर तडिपारीचा आदेश हा पुर्णता राजकिय व अधिकारी यांच्या दबावामुळे पारीत झाला आहे असा सुरवातीपासुनच मोहणसिंग यांचे वकिल अँड.घाटे यांनी केला होता.सदर आदेश हा केवळ २३दिवसात पारीत झाला असुन बरेचसे तडिपारीचे प्रकरणे प्रलंबीत असताना उपविभागीय अधिकारी जळगाव जा.यांनी हे प्रकरणच का इतक्या लवकर निर्णयी काढले हा मोठा चर्चेचा संग्रामपुर तालुक्यात विषय होता.आता या प्रकरणी इतक्या तात्काळ स्थगिती मिळाल्याने सदर आदेश हा आकासापोटि तर पारीत झाला नाही ना अशि शंका जनतेत उत्पन्न होत आहे.कारण मोहणसिंग यांचेवर केवळ १च गुन्हा प्रलंबित आहे हे विषेश.

भारतबंदला संग्रामपूर तालुक्यात भारत बंद चा उस्फुर्त प्रतिसाद…

0

 

उदैभान दांडगे
विदर्भ प्रतिनिधि

आज सकाळपासून विविध पक्ष संघटनाचा आंदोलनात्मक पवित्रा ..
संग्रामपूर ; केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसेच विविध पक्षातील संघटना एकवटल्या आहेत.* हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. या पृष्ठभूमीवर संग्रामपूर तालुक्यातील विविध पक्ष संघटनाने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून बंदचा परीणाम जाणवू लागला आहे तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ भोंगळ जिल्हा नेते सत्यव्रत कारांगले नारायन ढगे, शिवसेना शांताराम भाऊ दाणे जिल्हाध्यक्ष,रविभाऊ ता अद्यक्ष तर मार्कवादी कॉमोनिस्ट संघटनेचे अनिल गायकवाड जिल्हा सचिव,वंचित आघाडीचे देविदास दामोदर व राष्ट्रीय काँग्रेसचे राजेंद्र वानखडेअध्यक्ष ता.अभयसिंग मारोडे , शामभाऊ डाबरे,मनोहर बोराखडे,तेजराव मारोडे असे विविध पक्ष , संघटना,शेतकरी व व्यापारी वर्ग यांनी आपले दुकाने बंद ठेऊन या बंध मध्ये मोठया संख्येने उपस्तीत राहून आपला पाठींबा नोंदविला पोलिस स्टेशन तामगाव यांनी विविध पक्षातील पाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे

जळगाव जामोद येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्‍यांचे जळगाव नांदुरा रोडवर शांततामय मार्गाने चक्काजाम आंदोलन सुरू

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद मध्ये आज दिनांक 8 डिसेंबर रोजी महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जळगाव ते नांदुरा रोडवर सकाळी साडे पाच वाजेपासून शांततामय मार्गाने चक्काजाम आंदोलन सुरू झालेले आहे केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी विषयक कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळपासूनच महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जळगाव शहरामध्ये जळगाव ते नांदुरा रोड तसेच जळगाव वरवट जळगाव जामोद या रोडवर सकाळपासूनच शांततामय मार्गाने चक्काजाम आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे तसेच जळगांव जामोद शहर संपुर्ण बंद.मोदी सरकारने केलेल्या शेतकरी कृषी कायद्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शहरात संबड वाजवुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात काँग्रेस पक्ष नेत्या स्वातीताई शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, मीनाताई सातव, अर्जुन घोलप, शिवसेना नेते तुकाराम भाऊ काळपांडे,नगरसेवक रमेश ताडे, अविनाश उमरकर शांताराम दाणे, संजय भुजबळ प्रशांत दाभाडे,राजेश पांधी,विशाल पाटील,जुनेद,युवराज देशमुख,अनिकेत पाटील ल,अफ्रोस भाई,साबिर भाई, यांच्यासह बहुसंख्य महा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे

सुनगाव येथे महा विकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन

0

 

गजानन सोनटक्के

आज दिनांक 8 डिसेंबर रोजी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतकरी बिल विरोधात आंदोलनास प्रतिसाद देत पाठिंबा देत सूनगाव येथील महाविकास आघाडीच्या वतीने सुनगाव ते जामोद रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले व गावातील सर्व व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत प्रतिसाद या आंदोलनाला दिला आहे यावेळी महा विकास आघाडीचे माजी सरपंच पुंडलिक भाऊ पाटील शिवसेना शाखाप्रमुख सुनील खवले डॉ शालिग्राम आपले डॉ प्रल्हाद कपले रामकृष्ण धुळे शेषराव वंडाळे गजानन धुळे प्रल्हाद येउल मोतीराम धुळे रामदास वसुले आला सिंह राजपूत गणेश मिसाळ वैभव काळपांडे धुळे विनोद अंदूरकार निलेश खवले इतर कार्यकर्ते उपस्थित होते

जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा कंटेनर पोलिसां

0

 

सत्तर गोवंशांना जीवनदान ; सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अतिशकुमार वानखडे(अकोला)

बाळापूर :- अवैधरित्या विनापरवाना कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्तर गोवंशांसह सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कंटेनरमध्ये चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. कंटेनर चालक पसार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हि कारवाई आज रविवारी बाळापूर जवळ करण्यात आली.
आज रविवारी पहाटेच्या सुमारास एका कंटेनर मधून अकोला ते खामगावकडे गोवंशांना कोंबून कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असल्याची माहिती बाळापूर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांना खबऱ्या मार्फत मिळाली. ठाणेदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्गावरील पारस फाटा गाठत कंटेनरचा शोध घेणे सुरू केले. मात्र कंटेनरचा शोध लागत नव्हता, त्यानंतर महामार्गावरील पेट्रोल पंप, ढाबे, हॉटेल्स याठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम राबवली. अखेर महामार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालया समोर सदर यु. पी.२१ सी एन ३०४० हा कंटेनर नादुरुस्त अवस्थेत पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली असता सत्तरहून अधिक गोवंश कोंबलेले आढळले. तर यापैकी चार जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या गोवंशाची किंमत सात लाख रुपये एवढी असून कंटेनरसह एकुण सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या गोवंशांना म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत बाळापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, भाष्कर तायडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल अंभोरे, विठ्ठल रायबोले, अमोल ओहेकर यांनी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, भास्कर तायडे करीत आहेत.

स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यानी रोखली नवजीवन एक्स्प्रेस, मलकापूर रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते आणी पोलिसांमध्ये बाचाबाची ..

0

 

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण
887 555 1991

शेतकऱ्यांच्या भारत बंदला जोरदार सुरुवात झाली आहे… ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली आहे… दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सकाळ पासून रस्त्यावर उतरली आहे. सकाळी 6.40 वा. चेन्नई – अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी रविकांत तुपकर सह कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली त्यामुळे ‘स्वाभिमानी’ आणि पोलिसांमध्ये चांगलाच संघर्ष निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे..तर पोलिसानी 20 ते 30 कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं असून येत्या 3 दिवसांत कायदा रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय ..

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोहाडी येथे अभिवादन

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त 6 डिसेंबर रोजी संदिप इंगळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व ग्रामपंचायत सदस्य सौ.जिजाबाई इंगळे कौशल्याबाई इंगळे तसेच माजि मुख्याध्यापक वसंत इंगळे ,प्रकाश इंगळे, विक्रम इंगळे, अनिल इंगळे, समाधान इंगळे, राहुल इंगळे, विलास इंगळे नितिन कंकाळ, प्रभाकर इंगळे, शिक्षक दिपक इंगळे, विजय इंगळे,वाघ्या, सचिन इंगळे, नितिन इंगळे, प्रशांत इंगळे,अमोल इंगळे,शुभम इंगळे, किरण इंगळे, विशाल इंगळे,संजय इंगळे, अविनाश इंगळे व तसेच गावातील सर्व उपासक या यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व राहुल इंगळे यांनी अभिवादन पर एक गीत सादर केले व वसंत इंगळे सर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत दोन शब्द बोलून अभिवादन केले व शेवटी बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले व संदिप इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन अभिवादन कार्यक्रम यशस्वी पार पडला