Home Blog Page 570

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्याचे सुपुत्र प्रदीप मांदळे जवान शहीद.

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील सुपुत्र प्रदीप मांदळे दि . १४डिसेंबर रोजी जम्मू काश्मीर खोऱ्यातील द्रास टायगर हिल येथे शहिद झालेअंगावरती बर्फाचा मोठा गोळा पडल्यामुळे ते ड्युटीवर असताना शहीद झाले ! बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र वीर जवान शहीद प्रदीप साहेबराव मांदळे पळसखेड चक्का या गावातील गरीब कुटुंबामधील हा तरुण व्यक्ती दोन हजार आठ ते नऊ यास साली फौजी सैन्यदलामध्ये औरंगाबाद या ठिकाणी भरती झाला होता.

शहीद झाल्याचे ठिकाण द्रास टायगर हिल जम्मू काश्मीर या ठिकाणी कार्यरत ड्युटीवर होता त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती पत्नीच नाव कांचन प्रदीप मांदळे, प्रदीप च लग्न २०१४ साली झालेलं होतं.
तीन मुलं असून त्यांचे समोर नाव. सुरज ,सार्थक ,जयदीप असे मुलांचे नाव असून आईचे नाव श्रीमती. शिवनंदा साहेबराव मांदळे .भावांचे नाव संदीप साहेबराव मांदळे कृषी सहाय्यक विशाल साहेबराव मान्दळे फौजी सैन्यदलामध्ये सध्या कार्यरत आहे.

बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र प्रदीप मांदळे जवान शहीद.
पश्चिम बंगाल या मधील पन्हागड या ठिकाणी कार्यरत आहे २००८ च्या अगोदर ची परिस्थिती फार गरीब कुटुंबातील ही व्यक्ती असून आई वडील मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण करून तिन्ही मुलं चांगल्या

ठिकाणी नोकरी लावणारे शेवटी स्वर्गीय साहेबराव मांदळे यांना सर्व कुटुंबाला सोडून जावे लागले काही आजारामुळे त्यांची मृत्यु दिनांक २०१७ साली झालेला आहे त्यामुळे मोठा मुलगा म्हणून प्रदीप यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी होती.
त्यामुळे घरात घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे मांदळे परिवार खूप दुःखाचा डोंगर सावट याठिकाणी आहे आणि पळसखेड चक्का या गावांमध्ये अशी घटना पहिल्यांदा घडल्यामुळे या गावांमध्ये खूप दुःख होत आहे.
संदीप साहेबराव मांदळे यांना रात्री नऊच्या दरम्यान मध्ये माहिती मिळाली सैन्य दला कडून फोनवरून माहिती मिळाली तुझा भाऊ शहीद झालेला असल्याची माहिती फोनवर देण्यात आली.

त्यांचा पार्थिव अंत्यविधीसाठी दिनांक १८तारखेला येईल अशी प्राथमिक माहिती आहे !

BIG BREKING 1 कोटीच्या विमा साठी बायकोने नवऱ्याला संपवले

0

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

ही घटना धक्कादायक आहे आता पर्यंत आपण आयकलेच असेल की नवरा बायको ही जोडी सात जन्माचे एकामेकाच्या दुःख सुखात साथ देणारे आहे पण या ठिकाणी जे घटना घडली ते विचार करणारीच आहे बायको न पैसा साठी केला चक्क मर्डर
एखाद्या गुन्ह्याबद्दलची किरकोळ शंकासुद्धा गुन्हा उघडकीस आणण्यास मदतीची ठरू शकते. असाच काहीसा प्रकार निलंगा येथे घडला आहे. नवऱ्याची १ कोटीची विमा पॉलिसी होती, ही विम्याची रक्कम मिळवण्यासाठी बायकोनेच नवऱ्याचा काटा काढल्याचा प्रकार तब्बल ८ वर्षांनी निलंगा येथे उघडकीस येऊ शकला आहे.या गुन्ह्याच्या तपासात विमा कंपनीला आलेला संशय आणि त्यानंतर पोलिसांनी शिताफीने केलेला तपास या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.

निलंगा तालुक्यातील निटूर या गावातील रहिवाशी आण्णाराव बनसोडे यांचा अपघाती मृत्यू २०१२ला झाला होता.

तशी पोलिसांत नोंदही होती. आण्णाराव यांनी १ कोटी रुपयांचा अपघाती विमा २०१०मध्ये उतरवला होता. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची बायको आणि कायदेशीर वारसदार ज्योती यांनी विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला होता.

या क्लेममधील काही माहिती विपर्यस्त होती, शिवाय व्यवसायाने फर्निचर बनवणारे आण्णाराव १ कोटीचा अपघात विमा का उतरवतील अशी शंका विमा कंपनीला आली. त्यांनी या प्रकाराची चौकशी औसा इथल्या पोलिस स्टेशनमध्ये केली आणि कंपनीला आलेली शंका पोलिस निरीक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली. पोलिसांनाही यात तथ्य वाटल्याने त्यांनीही बंद झालेली फाईल उघडून चौकशीला सुरुवात केली.

अन् काळेबेरे असल्याचा आला संशय…

दरम्यान, आण्णाराव यांच्या कुटुंबियांनाही या प्रकारात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय आला होता. त्यांनीही या प्रकरणात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी ज्योती हिला चौकशीला बोलावून घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण १ कोटी इतक्या रकमेची पॉलिसी कशी उतरवली, याचं उत्तर काही तिला देता येत नव्हतं. अखेर तिने पॉलिसीची रक्कम मिळवण्यासाठी नवऱ्याचा खून केल्याचे कबुल केले. ही पॉलिसी तिचा आतेभाऊ रमेश विवेकी हा विमा एजंट असून त्याने ही विमा पॉलिसी उतरल्याचं तिने सांगितलं.

गळा दाबून खून, मृतदेह महामार्गावर नेऊन टाकला

विमा पॉलिसी उतरवतानाचा विम्याची रक्कम हडपण्यासाठी आण्णाराव याचा खून करण्याचा कट ज्योती आणि रमेश यांनी रचला होता, असं पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले.

२०१२ त्यांनी आण्णाराव यांचा गळा दाबून खून केला, मृतदेह महामार्गावर नेऊन टाकल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिस आणि विमा कंपनीच्या सतर्कतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस येऊ शकला आहे.

हे आहेत आरोपी….

याप्रकरणी आरोपी 1) लहू विश्वनाथ कांबळे (वय 54, रा. लातूर), 2) गोविंद माधव सुबोधी (वय 36, रा. वायगाव सातळा, ता. उदगीर, 3) विमा एजंट रमेश भागवतराव विवेकी (वय 44), 4) वैजीनाथ तुळशीराम सुडे (वय 51) यांना अटक केली आणि काही दिवसांपूर्वी मयताची पत्नी ज्योती अण्णाराव बनसोडे (वय 35, रा. सुमठाणा) यांना लातूर स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी औसा पोलिसात आरोपी विरुद्ध पोलिस डायरीत 73/2014 अन्वये भादंवि 302, 201,120 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ऋषिकेश म्हस्के” यांनी मांडल्या आक्रमतेने शेतकऱ्यांच्या व्यथा…

0

 

गेल्या 17 ऑगस्ट 2020 रोजी मा.अधीक्षक अभियंता बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा यांच्या दालनात खडकपूर्णा प्रकल्प विभाग,देऊळगाव राजा अंतर्गत गांगलगाव वितरीकेवरील संबंधित कास्तकार यांच्या मागण्या विभागीय स्तरावरुन पूर्ण न झाल्यामुळे मा.अधीक्षक अभियंता यांच्या दालनात ऋषिकेश म्हस्के व संबंधित कास्तकार यांच्यासोबत दुपारी 1:00 वाजेपासून तर रात्रीच्या 11:00 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले.
संबंधित कास्तकार यांच्या मागण्या आम्ही विविध कालावधीत पूर्ण करून असे आश्वासन/करावयाची कार्यवाही पत्र मा.अधीक्षक अभियंता यांनी दिले व आंदोलन माघे घेऊन सांगता करण्यात आली
त्यानंतर 4 महिने होऊन सुद्धा हे काम पूर्ण झाले नाही .
त्या कामाचा पाठपुरावा करण्यास गेल्या नंतर मा.अधीक्षक अभियंता उडवा उडवी चे उत्तर देतात…
हे माझं काम नव्हे ते कार्यकारी अभियंता यांचे कार्य आहे मला काय एवढं काम आहे का आमच्याकडे मनुष्यबळ नाही
त्यानंतर सहायक अभियंता यांना विचारल्या नंतर तेही उडवा उडवीचे उत्तर देतात ते प्रकरण पाठवले तुमचे काम झाले मी प्रत्यक्षस्थळी येऊन बघितले परिस्थिती अशी आहे की हे संबधीत अधिकारी कदापिही प्रत्यक्षस्थळी आलेले नाही.
नुसता खोटेपणा करून शेतकऱ्यांनाचा आवाज दाबतात आणि कमी आवाजात बोला आवाज वाढू नका असा अश्या धमक्या शेतकऱ्यांना देतात.

दिलेल्या पत्राची व काय कामे केली यांचा जाब विचारण्यासाठी काल संबंधित कास्तकार गेले असता दुपारी 3 वाजेपासून तर 7 :33 वाजेपर्यंत सहायक अभियंता खडकपूर्णा प्रकल्प चिखली यांच्या कार्यलयात ठिय्या देऊन होते.
त्यानंतर संबंधित अधिकारी कोणत्याही मुद्याला थारा लागू देत नव्हेत.
सौजन्याने बोला माझे काम नाही ते मी वरिष्ठांना कस बोलू असे म्हणून तेही शेतकऱ्यांची दिशाभूल करत होते.
त्यांनतर ऋषिकेश म्हस्के आक्रमक होऊन मुद्यांवर संपूर्ण चर्चा करून सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे नाहीतर आम्ही येथून उठत नाही अशी भूमिका घेतली.
त्यानंतर सर्व मुद्यांवर लेखी आश्वासन दिले व आंदोलन माघे घेण्यात आले.
दिलेल्या आश्वासनाची पूर्तता विहित कालावधीत झाली नसल्यास त्रिव आक्रमक भूमिका घेऊन पुढील आंदोलन करण्यात येईल.

यावेळी यावेळी ऋषीकेश बबनराव म्हस्के,गणेश मदनराव म्हस्के व नितीन मधुकर म्हस्के,आव्हाड साहेब,चांदवडकर साहेब,देशमुख साहेब व इतर अधिकारी यांच्यासह राजेंद्र गंगाराम म्हस्के,ज्ञानेश्वर अशोक म्हस्के,महादू कुंडलिक म्हस्के,गणेश दिनकर सावळे,अमोल रामकृष्ण म्हस्के,विलास पुंडलिक म्हस्के,शिवाजी पुंडलिक म्हस्के,प्रदीप शंकर खरात,एकनाथ दत्तू सोळंकी हे प्रामुख्याने हजर होते

बुलडाणा जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण कायम

0

 

गजानन सोनटक्के जळगांव जा

सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्याच्या वृत्ताने आज, १५ डिसेंबरला दिवसभर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वारे वाहत राहिले! मात्र अखेर हे वारे चुकीच्या दिशेने वाहत असल्याचे अन् बुलडाण्यातील आरक्षण फेविकोल का पक्का जोड असल्याचे स्पष्ट झाले. दिवसभर उगाच घामाघूम झालेल्या हजारो राजकारणी व प्रशासन वर्तुळाने सुटकेचा श्वास सोडला.
आज जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली. नेमके याच मुहूर्तावर राज्यासह बुलडाणा जिल्ह्याचे सरपंच आरक्षण रद्द झाल्याची बातमी एका चॅनेलवर ब्रेकिंग म्हणून प्रसारित झाली. त्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा हवाला देण्यात आला. यामुळे ही बातमी वादळाच्या वेगाने व्हायरल झाली. ग्रामीण भागात फैलावली. मोबाईलमध्ये क्लिपच्या रुपात फिरत राहिली. यामुळे १३ तहसील, ६ एसडीओ व जिल्हाधिकारी कार्यालयामधील फोन, अधिकाऱ्यांचे मोबाईल संध्याकाळपर्यंत खणखणत राहिले. अनेक जण कार्यलयात येऊन विचारते झाले. यामुळे कामकाज व आज निवडणूक आढावा सभेत व्यस्त अधिकारी व कर्मचारी देखील हैराण परेशान झाले. मात्र अखेर ग्रामविकास मंत्रालयाचे उप सचिव एल. एस. माळी यांच्या स्वाक्षरीच्या खलीत्याने हा जिल्ह्याला वेढून टाकणारा संभ्रम दूर झाला. ज्या जिल्ह्यात सरपंच आरक्षण काढले ते कायम राहील व ज्या जिल्ह्यात आरक्षण निघाले नाही केवळ आणि केवळ त्याच जिल्ह्यात निवडणुकीनंतर सोडत काढण्यात येईल, असे या खलीत्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

१५२ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क आतापर्यंत २३९४३ व्यक्तिं विरुध्द कारवाई

0

 

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

नागपूर, ता.१५  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (१५ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १५२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २३९४३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,०३,३०,५००/- चा दंड वसूल केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असले तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.
मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २३, धरमपेठ झोन अंतर्गत ३०, हनुमाननगर झोन अंतर्गत ८ धंतोली झोन अंतर्गत ११, नेहरुनगर झोन अंतर्गत १७, गांधीबाग झोन अंतर्गत ८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १२, लकडगंज झोन अंतर्गत १०, आशीनगर झोन अंतर्गत १५, मंगळवारी झोन अंतर्गत १३ आणि मनपा मुख्यालयातील ५ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १८४७३ बेजबाबदार नागरिकांकडून रु ९२ लक्ष ३६ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.

भ्रष्टाचारमुक्ती, पारदर्शकतेचा आव आणत चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सत्तेत आलेल्या भाजप पदाधिका-यांनी आता आपले खरे रूप दाखविणे सुरू केले आहे.

0

 

 

चंद्रपूर आर्थिक देवाणघेवाणीतून मर्जीतल्या कंत्राटदारांना काम देण्याचा त्यांनी जणू सपाटा लावला आहे. असाच प्रकार कचरा संकलनाच्या कामात झालेला आहे. कचरा संकलनाच्या कामासाठी आधी निविदा मागितल्या. त्यातील मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदाराला कमी रकमेचे दर असल्याने काम दिले. नंतर काहीतरी कारण सांगून संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली. पुन्हा त्याच कामासाठी ई.निविदा मागितल्या. आधी कंत्राट मंजूर केलेल्या स्वयंभू याच कंत्राटदाराला पुन्हा काम दिले. आधी हेच काम १७०० रुपये प्रति टन होते. तर, दुस.या निविदेत आता २५५२ रुपये झाले आहे. यातून या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी. अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरातील घर ते धर कचरा गोळा करणे, कंपोस्ट डेपोपर्यंत कचरा वाहतूक करणे, नाली सफाईचा कचरा वाहतूक करणे या कामासाठी निविदा मागितल्या होत्या. या कामासाठी मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदारासह अन्य पाच कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील दोन निविदा या तांत्रिक मूल्यांकनात पात्रता गुणांची पूर्तता न केल्याने रद्द करण्यात आल्या. उर्वरित चार निविदांत मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदाराचा १७०० रुपये प्रति मेट्रीक टन हा सर्वात कमी दर होता. त्यामुळे या कंत्राटदाराला दहा वर्षासाठी काम देण्याच्या संपूर्ण खर्चास प्रशासकीय मंजूरी देण्याकरिता स्थायी समितीत निर्णय घेण्याकरिता आयुक्तांनी विषय सादर केला होता. त्यानुसार या संस्थेला काम मंजूर करण्यात आले.
मात्र, नंतर ही सर्व प्रक्रियाच रद्द करण्यात आली. मनपा प्रशासनाने या कामासाठी पन्हा ई.निविदा मागितल्या. यावेळी हे काम ७ वर्षे आणि वाढीव ३ वर्षे असे एकूण दहा वर्षांकरिता देण्यात येणार असल्याचा बदल केला. आधी काम मजूर झालेल्या मे.स्वयंभ ट्रान्सपोर्ट, पुणे या कंत्राटदारासह अन्य तीन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील एका कंत्राटदाराची निविदा ही तांत्रिक मूल्यांकनात पात्रता गुणांची पूर्तता न केल्याने रद्द करण्यात आली. उर्वरित तीन निविदा उघडण्यात आल्या. त्यात में. स्वयंभू ट्रान्सपोर्ट, पुणे या संस्थेचा सर्वात कमी दर होता. मात्र, आधी मंजूर झालेल्या कंत्राटातील दरात तब्बल आठशे रुपयांनी वाढ करीत कंत्राटदाराने २५५२ एवढी रक्कम नमूद केली आहे. मनपा प्रशासनाने मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या संस्थेला सादर केलेल्या दरात वाटाघाटी करण्यासाठी ७ डिसेंबरला दुपारी १ वाजता मनपात उपस्थित राहण्यास कळविले. मात्र, या संस्थेने मनपात उपस्थित न राहता निविदेत सादर केलेला दर हा बाजारभावाशी सुसंगत आहे. त्यानुसार काम करण्यास तयार असून, काम करण्याची संधी देण्याची विनंती केली.

संबंधित कंत्राटदाराची विनंती मनपातील भाजप पदाधिकाऱ्यांनी तातडीने मंजूर करीत ७ वर्षे कालावधी व ३ वर्षे वाढीव अशा एकूण दहा वर्षांकरिता येणाऱ्या संपूर्ण खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत ११ डिसेंबरला प्रशासकीय मान्यता देण्यात दिली आहे. यासर्व प्रकरणात मोठे अर्थकारण दडल्याचे यातून स्पष्ट होत आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात मनपात सत्तेत आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी कचरा संकलनात मोठा घोटाळा केला आहे. यातून भाजपचा पारदर्शकतेचा फुगा पूर्णपणे फुटला आहे. यासर्व घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विभागीय आयुक्त नागपूर, नगरविकास मंत्रालय यांच्याकडे केली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास शहर जिल्हा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल.पत्रकार परिषदेत शहर महिला कांग्रेस अध्यक्ष सुनीता अग्रवाल, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेश अडूर, नगरसेवक प्रशांत दानव,ओबीसी सेलचे नरेंद्र बोबडे,स्थायी समिती सदस्य नगरसेवक नीलेश खोब्रागडे,माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार,अख्तर सिद्दीकी आदि उपस्थित होते.

अंत्योदय योजनेचा अपंगांनाही लाभ देण्यात यावा करिता निवेदन सादर

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

केंद्र व राज्य शासनाने अपंगांसाठी कायद्यानुसार अंत्योदय ही योजना चालू करण्यात आली होती त्यानुसार जळगाव जामोद पुरवठा विभागाने एकही अपंगाचे नाव अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नाही तसेच जिल्हा पुरवठा विभाग बुलढाणा यांनी दर नवीन वर्षाला नावे समाविष्ट करण्यात येतील असे सांगितले होते तरीसुद्धा या कालावधीमध्ये नवीन नावे समाविष्ट केली नाहीत अंतर योजनेमध्ये नवीन टार्गेट मध्ये श्रीमंत व जवळचे अधिकारी व त्यांचे नातेवाईक यांची नावे समाविष्ट केली आहेत त्यामुळे अपंगावर व विधवा महिला भूमिहीन अशा नागरिकांवर अन्याय झाल्यामुळे तहसील कार्यालय येथे आज दिनांक 15 डिसेंबर ला 3 डिसेंबर च्या पत्रानुसार महाले यांच्या नेतृत्वात तहसीलदार जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले माझं का नाही या निवेदनावर नारायण विठोबा महाले तेजरावभाऊराव पाटील अनिल नामदेव गवई गौरव हिरामण सुरडकर नारायण तुकाराम खंडारे शंकर आत्माराम आदी अपंग बांधवांच्या सह्या आहेत

कृषी कायद्याविरोधात जळगाव जामोद येथे किसान सभेचे एक दिवसीय धरणे आंदोलन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जामोद प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर गेल्या १८ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकार आंदोलनाची दखल न घेता आंदोलन दडपण्याकरीता अमानुषपणे शेतकऱ्यांशी वागत आहे. या आंदोलनामध्ये केलेल्या मागण्या मान्य करण्यास हुकूमशाही सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेच्या वतीने जळगांव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक १४ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करून एसडीओ यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.दिल्ली येथे 18 दिवसांपासून संपूर्ण देशातील शेतकरी केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत या आंदोलनामध्ये आतापर्यंत 15 ते 20 शेतकरी मरण पावलेले तरीसुद्धा या झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग येत नाही त्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशामध्ये जो शेतकरी दिल्ली येथे जाऊ शकत नाही त्यांनी स्थानिक तहसील कार्यालय एक दिवशीय धरणे आंदोलन करून या सरकारला जागे करावे त्यासाठी जळगाव जामोद किसान सभेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला संघटनेचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी पाठिंबा दिला त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना समाजवादी पार्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच इतर संघटनांनी आपला पाठिंबा दिला या आंदोलनामध्ये किसान सभेचे विजय पोहनकर, रामेश्वर काळे तर वंचित बहुजन आघाडीचे, सुनील बोदडे,भास्कर भगत, इज्जतबेग साहेब,समाजवादीचे, मुस्ताक भाई , शहराध्यक्ष नफिसभाई , काँग्रेसचे अविनाश उमरकर, राष्ट्रवादीचे एडवोकेट संदीप उगले,शिवसेनेचे दत्ताभाऊ पाटील,गजानन वाघ, एल्गार संघटनेचे अजहर भाई देशमुख, आशिष पाटील,मौलाना, इरफान शेट्टी इम्रान भाई,यांच्यासह विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या धरणे आंदोलना ठिकाणी उपस्थित होते.

सेंद्रिय खत चोरीप्रकरणी नगरसेवकाची   मुख्याधिकार्‍यांकडे  तक्रार…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

जळगाव जामोद नगर परिषदेमध्ये आज दिनांक 14 डिसेंबर रोजी महा विकास आघाडीचे नगरसेवक यांनी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नगरपरिषद जळगाव जामोद वायाळ येथील सेंद्रिय खत गैरअर्जदार यांनी चोरून नेल्याबाबत फौजदारी कारवाई होण्यासाठी मुख्याधिकारी आशिष बोबडे यांना लेखी तक्रार दिली सविस्तर असे की येथील नगर परिषदेमध्ये महा विकास आघाडीचे सदस्य त्यांनी अशी तक्रार दिली की नगरपरिषद जळगाव जामोद मार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन कामांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळ्या करून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करण्याचे कंत्राट हे विरबा गिअर्स अकोला यांना देण्यात आले आहे. सदर घनकचरा व्यवस्थापनावर नगर परिषद यांचे नियंत्रणाखाली सर्व कारभार चालू असतो नगरपरिषद जळगाव जामोद हे सदर घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत निर्माण केलेले सेंद्रिय खत विक्री करीत असते परंतु दिनांक 14 डिसेंबर रोजी पहाटे गैरअर्जदार यांनी ठेकेदाराचे ट्रॅक्टरने वायाळ येथून तारापूर शिवारातील रसलपुर रोडवरील परिक्षित ठाकरे यांच्या शेतामध्ये सेंद्रिय खताची वाहतूक होत असल्याचे अर्जुन घोलप गजानन वाघ श्रीकृष्ण केदार, रमेश ताडे, संतोष बोरसे, संजय भुजबळ,युवराज देशमुख, अमर पाचपोर, व पत्रकार तसेच जळगाव जामोद येथील नागरिकांना या विषयी माहिती पडले असता आरोग्य पर्यवेक्षक, घनकचरा व्यवस्थापन पर्यवेक्षक कुमारी पल्लवी इंगळे मुख्याधिकारी डॉक्टर आशिष बोबडे आरोग्य निरीक्षक रामचंद्र चंडाले यांना याबाबत कल्पना दिली असता त्यांना सोबत घेऊन त्यांनी अकरा वाजता घटनास्थळावर जाऊन सदर खताची पाहणी केली असता सदर खत हे घनकचरा व्यवस्थापना वरुन तीन ट्रॉली सेंद्रिय खत बॅग ची किंमत रुपये 100 प्रमाणे अंदाजे एक लाख वीस हजार रुपयाचे खत चोरून आणल्याचे घटनास्थळाचा पंचनामा करून सिद्ध झाले त्या संदर्भात सदर गैरअर्जदार जवळ पावती नसल्याचे वरील अधिकाऱ्यांनी सांगितले व सदर बाबीचा पंचनामा केला व त्याठिकाणी उपस्थित असलेले अनिल ढगे यांनी पत्रकार यांना मुलाखत देताना सांगितले की सेंद्रिय खत मी स्वतः ट्रॅक्टरने आणले आहे. व मला खत आणायला परिक्षित ठाकरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या शेतामध्ये खत आणून टाकले आहे.तरीसुद्धा उद्यापर्यंत नगरपरिषद कार्यालयाकडून आरोपी परिक्षित ठाकरे व इतर लोकांविरुद्ध अद्यापर्यत कोणतीही कारवाई केली नाही तसेच मुख्याधिकारी यांनी गैरअर्जदार विरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदवून गैरअर्जदार विरुद्ध कडक कारवाई करावी. तसेच कारवाई तीन दिवसाचे आत कारवाई न केल्यास नगर परिषद कार्यालयात घेराव टाकून आंदोलन करु असा इशारा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे दिला आहे तर मुख्याधिकारी या विषयी कोणती भूमिका घेतात यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. या लेखी तक्रारीवर अर्जुन गोविंद घोलप गटनेते काँग्रेस,गजानन नामदेव वाघ गटनेते शिवसेना, यांच्या सह्या आहेत तसेच लेखी तक्रार देताना महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

विवेकानंद आश्रमात स्वामी शुकदास महाराज जयंती उत्सव संपन्न : !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील विवेकानंद आश्रमात कार्तिक वैद्य त्रयोदशीला कर्म योगि संत .प .पू . शुकदास महाराज श्रीच्या जयंती उत्सव सोशल डिस्टिंग चे पालन करून संपन्न झाला .या वर्षी 12 डिसेंबरला शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून अत्यंत मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत परंतु भक्तिभावाने व तेवढ्याच उत्साहाने परमपुज्य महाराजश्री चा जयंती उत्सव साजरा केला गेला ‘विवेकानंद आश्रमाच्या कार्यकारी मंडळाने भाविकांना अगोदरच घरीच राहून प्रतिमेचे पूजन व दर्शन करण्याची विनंती केली होती .त्यानुसार लोकांनी आश्रमात गर्दी केली नाही .सकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात मंत्रघोष व काकड आरती ने सुरुवात झाली ।सहा वाजता हरिहर तीर्थावर महाआरती आठ ते नऊ वाजता ग्रामसफाई व परिसर स्वच्छता करण्यात आली .नऊ वाजता हभप येवले शास्त्री महाराजांचे अनुभूती ग्रंथावर प्रवचन तसेच विवेकानंद आश्रमाच्या गायन वृंदा चा भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम झाला ‘सकाळी दहा वाजता परमपूज्य संत शुकदास महाराज श्री च्या समाधीस्थळाचे पूजन करण्यात आले .दुपारी एक वाजता विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे कार्यकारी मंडळातील सदस्याच्या हस्ते भूमिपूजन झाले ‘दुपारी दोन वाजता उत्सव समितीची सभा संपन्न झाली या सभेत लोक डाऊन काळात संस्थेने सार्वजनिक हितार्थ केलेली व शासनाच्या आरोग्य विभागाला सहकार्य झालेली कामे तसेच शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेने केलेली तयारी तसेच कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारकासाठी भविष्यात करावयाच्या कामासंबंधी चर्चा करण्यात आली ।परम पूज्य महाराज श्रीच्या समाधीस्थळाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी ।व हरिहर तीर्थ वरील गार्डन व गोशाळेत गुरांचा चारा साठविण्यासाठी नवीन गोडाऊन ची निर्मिती करणे विषयी चर्चा झाली . ।विवेकानंद जयंती उत्सव यावर्षी ‘ 2 ‘ 3 ‘ व ४फेब्रुवारी 20 21 पौष वैदय पंचमी ‘ती सप्तमीला संपन्न होणार आहे .तसेच शासनाने परवानगी दिल्यास शासनाच्या आदेशाचे पालन करून संपूर्ण शासनाला सहकार्य करण्याचे या सभेत ठरवण्यात आले ।सायंकाळी भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला ।