Home Blog Page 572

जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करीत रावसाहेब दानवे यांचा निषेध…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

शिवसेनेच्यावतीने रावसाहेब दानवे यांचा निषेध दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना मंत्री दानवे यांनी या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनकडून मदत मिळत असल्याचे वक्तव्य केले आहे.शेतकरी स्वत:च्या हितासाठी लढत असताना त्यांना शत्रू राष्ट्रांकडून मदत मिळत असल्याचे म्हणणे म्हणजे आपल्या घाणेरड्या विचारसरणीचे प्रदर्शन आहे. दानवे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांबद्दल निंदनीय वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांचे शेतकऱ्यांबद्दल असलेले विचार लोकांना कळून चुकले होते. दानवे यांचे ते वक्तव्य शेतकरी अद्याप विसरलेले नाहीत. हेच दानवे जेव्हा आता पुन्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी वक्तव्य करतात तेव्हा पुन्हा एकदा त्यांची तीच विचारसरणी पुढे येत आहे. यापुढे दानवे यांना आम्ही राजकीय विरोधक म्हणून काही उत्तर देण्यापेक्षा सर्वसामान्य लोकच त्यांना योग्य ते उत्तर देतील. अशा लोकांचे वक्तव्य जास्त कोणीही फारसे मनाला लावून घेऊ नये, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. मात्र ते असेच पुन्हा पुन्हा बोलत राहिले तर आम्ही सुद्धा शांत राहणार नाही.तसेच पंतप्रधान यांनी रावसाहेब दानवे यांचा राजीनामा मागावा कारण नेहमीच ते शेतकरी विरोधात वक्तव्य करत असतात.असे वक्तव्य करणाऱ्या दानवे यांचा निषेध करुन दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी ही वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे चा निषेध करून रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी केली गेल्या बारा महिन्यापासून पेट्रोल डिझेलची वाढ होत असून सामान्य जनता त्रस्त झालेली असून त्यात होरपळून निघत आहे प्रशासनाचा निषेध करून रावसाहेब दानवे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.यावेळी गजानन वाघ तालुकाप्रमुख, नगरसेवक रमेश ताडे,पुंडलिक पाटील,देविदास घोपे,संजय भुजबळ, समाधान पाटील, संतोष बोरसे,राजेश पांधी, शुभम पाटील, विशाल पाटील, पुंडलिक धुळे, शिवाजी मेहसरे,चांद कुरेशी, पांडुरंग उगले, दिलीप आकोटकर, अक्षय भालतडक, ईश्वर वाघ, दीपक बावस्कार, सुनील खवले,गजानन धुळे, गणेश धुळे, मुन्ना रावनचवरे, प्रशांत ताडे, गजानन देशमुख, रमेश हागे, संकेत रहाटे, मधू धुर्डे, केशव काळपांडे,दिलीप सिंह ठाकुर, युवराज देशमुख, सुभाष माने, अनिल खरे, पंकज भगत, गुड्डू काजी, नवाब देशमुख, शेख रफीक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हे यावेळी उपस्थित होते.

बी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर मिळणार

0

 

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दखल

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारिद्रय रेषेखालील कुटुंब आहेत. यापूर्वी तालुका स्तरावरील पंचायत समिती मधून मिळत होते. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. समाजातील बी. पी. एल मध्ये असणाऱ्या घटकाला होणार त्रास अधिक होत होता. छोट्या कागदपत्रांच्या पूर्ततेकरिता त्यांना तालुक्यातील पंचायत समिती मधील अधिकाऱ्याच्या मागे चकरा माराव्या लागत होत्या. हि पायपीट बंद करून बी. पी. एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरातून देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्यांनी या मागणीची दखल घेत ७ डिसेंबर २०२० रोजी अधिसूचना काढून हि मागणी मान्य केली.
दारिद्र्य रेषेखालील लोकांना उदरनिर्वाह हा त्यांच्या दैनंदिन रोजगारावर अवलंबून असतो. हातावर आणून पानावर खाणारा हा वर्ग आहे.बी. पी. एल चा दाखल मिळविण्याकरिता रोजगार बुडवून ग्रामीण भागातून तालुक्यातील पंचायत समिती येथे जावे लागते. पंचायत समिती येथे अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्यास त्याला बी. पी. एल चा दाखला मिळविण्याकरिता वारंवार चकरा माराव्या लागतात. यामध्ये त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बी. पी. येत चा दाखल हा पंचायत समिती मार्फत न देता ग्रामपंचायत मार्फत दिल्यास बी. पी. एल चा धारकांना होणार त्रास बंद होईल.
त्यामुळे पूर्वी प्रमाणे बी. पी. एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरातून देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत हा निर्णय हा निर्णय घेण्यात आला.
समाजाच्या शेवटच्या घटकाला त्रास होऊ नये. महिलांवर होणारे अत्याचार बंद करण्याकरिता कडक कायदे, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा. याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमी आग्रही राहिल्या आहेत. या त्यांच्या पाठपुराव्यामुळे आता बी. पी. एल धारकांची पायपीट बंद होणार आहे. समोर देखील अविरत समाजाच्या शेवटच्या वर्गासाठी काम करत राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या निर्णयाचे सर्वच स्थरातून स्वागत करण्यात येत आहे.

बालाघाट पोलिसांच्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया (बालाघाट). बालाघाट पोलिसांनी नक्षलवाद्यांविरूद्ध चालवलेली मोहीम मोठं यश होतं. किरणपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोरवण वन कॉम्प्लेक्समध्ये बालाघाट पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. नक्षलवाद्यांमधील शोभे आणि भादो या माजी नक्षलवादी कमांडर राकेशची पत्नी यांच्याकडून माहिती मिळाली आहे. वरील मोहिमेचे नेतृत्व बालाघाटचे पोलिस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी केले. गुप्त माहिती मिळाल्यावर वरच्या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी आले आहेत. त्यानंतर त्यांना सुरक्षा दलांनी शरण जाण्यास सांगितले परंतु त्यांना नक्षलवाद्यांनी गोळ्या घातल्या, त्यानंतर प्रतिक्रियेत एका महिला नक्षलवाद्याला ठार मारण्यात आले, विशेषत: November नोव्हेंबर रोजी बालाघाट पोलिसांनी कान्हा राष्ट्रीय उद्यानाजवळील मलखेडी जंगलातील एक महिला नक्षलवादी ढेर केले होते आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. आणि आता चकमक सुरू होण्याविषयी माहिती प्राप्त झाली आहे.

पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची शिंदी येथे सांत्वनपर भेट !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ . राजेंद्र शिंगणे यांनी सिदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे आज दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता सांत्वनपर भेट दिली ‘यामध्ये शिंदी येथील माजी उपसरपंच सुभाष वायाळ तसेच दशरथ बंगाळे व किशोर गंभीरराव बंगाळे – कमळाबाई बरकूल .या मयत झालेल्या व्यक्तींच्या घरी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले ‘यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी ‘ शिंदी येथील सरपंच विनोद खरात ‘संतोष खरात ‘भगवान पाटील ‘पंजाबराव हाडे ‘ शिवदास खरात ‘निवृत्ती खरात बागायतदार । सुनील खंडारे ‘ सचिन खंडारे ।माझी हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव साखरखेडा चे माजी सरपंच कमलाकर गवई पत्रकार सय्यद रफिक सुनील जगताप दाऊद सेट कुरेशी नितीन डाखोरे आदी यावेळी उपस्थित होते ‘

मांडवा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य

0

 

पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळा मांडवा शाळेसमोरील नाल्यावरील धाबा (रपटा) साप न केल्यामुळे नालीचे पाणी शाळेच्या आवारात जात होते .

ही तक्रार ग्रामसेवकांकडे नागरिकांनी केल्यानंतर ग्रामसेवकांनी नालीवरील धाबा (रपटा) साफ न करताच शाळेच्या गेटसमोर सिमेंट काँग्रेटचा बांध टाकून या नवीन लढविलेल्या शकलीमुळे शाळेच्या गेटसमोरील नालीचे पाणी नालीत न जाता रोडवरून वाहत आहे .

त्यामुळे वार्ड क्रमांक ३ कडे जाणाऱ्या रस्त्यावरून ये – जा करताना नागरिकांना चिखलातून मार्ग शोधावा लागत आहे . तसेच शाळेच्या गेटसमोर पाणी साचल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. व बाजूलाच अंगणवाडी क्रमांक २ आहे. या नालीवरील धाबा (रपटा ) तो फोडून नवीन धाबा नालीपेक्षा उंच करावा जेणेकरून नाली मधील कचरा साफ करता येणे शक्य होईल. असे समस्त नागरिक मागणी करत आहे.

त्याचबरोबर ही बाब शाळा सुधार समिती अध्यक्ष विष्णू ईखार यांनी ग्रामसेवक मंगेश देशमुख यांना अनेक वेळा सांगून सुद्धा ग्रामसेवकांचे
या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीचा सत्कार समारंभ व पक्षप्रवेश कार्यक्रम हा जेतवन बुद्ध विहार वरवट बकाल येथे संपन्न झाला

0

 

उदेभान दांडगे
विदर्भ प्रतिनिधी

या कार्यक्रमात प्रमुख उपस्तीत जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष आयु. गणेश भाई चौकसे उपाध्यक्ष आयु.विजय हागे तर महिला जिल्हाअध्यक्षा आयुष्यमती विशाखा ताई सावंग व आयुष्यमती प्रीतिताई शेंगोकार जिल्हा उपाध्यक्षा तथा शेगाव नगर सेविका,चेतन घिवे, दशरथ सुरळकर,देविदास दामोदर,उत्तम उमाडे व इतर जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकारी या सत्कार समारंभात हजर होते या कार्यक्रमाचे आयोजन आयु.संजीव इंगळे जिल्हा सचिव वरवट बकाल यांनी केले तर सुत्र संचालन आयु.विजय भाऊ पाहुरकर तालुका महासचिव यांनी केले
या कार्यकर्माचे वैशिष्ट्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी नव्याने गावं तेथे शाखा कश्याप्रकारे उभी होऊन व सर्व सोशीत पिळीत वंचित बहुजन समाजातील विविध समाजातील लोकांना कसा न्याय मिळेल असा पक्ष आपणाला या जिल्हात उभा करायचा आहे

शेगावात तिहेरी तलाकची तक्रार, चिखलीच्या शे. मोहसीन विरुद्ध नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून दिली तलाक

0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव (प्रतिनिधी) दि १० तिहेरी तलाक देणे हा कायद्याने आता गुन्हा ठरला असला तरी, अशा पद्धतीने तोंडी तलाक देण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत. चिखली येथील एका महिलेने शेगाव पोलिस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही त्याची दखल घेतली आहे. पतीने तिला माहेरात येऊन शिवीगाळ करीत तीन वेळा तलाक म्हटल्याचे संबंधित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचबरोबर सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याचेहि तक्रारीत नमूद केल्याने पोलिसांनी पती सह 3 जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल केले आहे.
चिखली येथील शे.मोहसीन अ.कादर या युवकाचे शेगाव येथील एका युवतीसोबत दिड वर्षांपूर्वी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडले होते. लग्नानंतर मात्र आपल्यापतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असलयाचे समजल्यावरून अनेकवेळा पतीला समजावण्याचा प्रयत्न केले असता पती सह सासरकडील मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान पत्नी आपल्या अनॆतिक संबंधाला विरोध करीत आहे म्हणून २२ नोव्हेंबर रोजी या मुलीला बेदम मारहाण करून घरातून हाकलून देण्यात आले. यानंतर ७ डिसेंबर रोजी पती शे. मोहसीन, सासरा अ. कादर, सासू मालन या 3 जण यांनी शेगावात येऊन मुलीकडील मंडळींना अश्लील शिवीगाळ केली. आणि पती शेख मोहसीन याने आपल्या पत्नीला सांगितले कि, मी एक महिला नाही दहा महिला सोबत अनैतिक संबंध ठेवेल तुझ्याने जे होत असेल ते कर असे म्हणून “मै तुझे अभि तलाक देता हु तलाक, तलाक , तलाक म्हणून शिवीगाळ करत निघून गेले. या प्रकरणी ८ डिसेंबर रोजी पीडित विवाहितेने शेगाव शहर पो. स्टे. ला तक्रार दाखल केल्यावरून पती शेख मोहसीन सह सासू, सासरा अशा 3 जणांविरुद्ध मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 498, 323, 504, 34 भादवी मुस्लीम महिला विवाह संरक्षण अधिनियम 18 कलम 4 नुसार शे. मोहसीन अ. कादर वय 28 वर्ष, अ. कादर अ. रज्जाक वय 50 वर्ष व मालन बी अ. कादर वय 45 वर्ष या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या सर्व आरोपी फरार आहेत.

नाना पाटील यांची रयत क्रांती संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष पदी फेरनिवड…

0

 

बुलडाणा – रयत क्रांती संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराला आदर्श मानुन शेतकरी कष्टकरी कामगार नोकरदार व समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय व हक्कासाठी काम करीत आहे या कार्यामध्ये मोलाची कामगिरी करीत संघटनेचा प्रचार व प्रसार करत असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यास काम करण्यास हिम्मत मिळावी या हेतूने पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येतात व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा तपासून कालांतराने या पदाच्या जबाबदारीमध्ये खांदेपालट केली जाते.

त्याच अनुषंगाने रयत क्रांती संघटनेची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी लवकरच तयार करण्याचे काही दिवसांपूर्वी घोषित करण्यात आले होते त्यानुसार दिनांक ०६ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर रयत क्रांती संघटनेचे एक आंदोलन होते त्याचवेळी काही महत्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या व त्यामध्ये रयत क्रांती संघटनेच्या बुलढाणा(घाटाखालील) जिल्हाध्यक्ष पदी श्री. नाना पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली.

यावेळी श्री .नाना पाटील यांना रयत क्रांती संघटनेच्या बुलढाणा(घाटाखालील) जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र माजी कृषीराज्यमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष रयत क्रांती संघटना मा .आ.श्री. सदाभाऊ खोत, कार्याध्यक्ष दिपकभाऊ भोसले,युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे,राज्य प्रवक्ते जीतूभाऊ अडेलकर, प्रा.सुहास पाटील व रयत क्रांती संघटनेची संपूर्ण कोअर कमिटी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी बोलतांना फेरनिवड झालेले जिल्हाध्यक्ष श्री.नाना पाटील म्हणाले की समाजातील सामान्य जनतेच्या समस्या सोडवतांना कुठलेही पद महत्वाचे नसते महत्वाची असतो तो प्रामाणिकपणा व जबाबदारीची जाणीव.

पुढे बोलतांना पाटील म्हणाले की माझी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली असली तरी जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता जिल्हाध्यक्षच आहे मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात पुढे असेन परंतु माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले कार्यकर्तेच खऱ्या अर्थाने जिल्हाध्यक्ष आहेत असे यावेळी नाना पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांना दिवसाची वीज देण्यात यावी-धिरज फाटे

0

 

 

शेतकऱ्यांना दिवसा कृषीपंपासाठी उच्च दाबाची वीज सकाळी पाच ते दुपारी १ आणि दुसऱ्या टप्प्यात दुपारी १ ते रात्री ९ या वेळेत मिळावी यासाठी सत्याग्रह शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कार्यालय, खामगाव. मौजे पळसखेड पिंपळे तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे आप्पासाहेब जाधव, रमेश जाधव, सुनील जाधव, या तीन सख्ख्या भावंडांचा रात्रीच्यावेळी पिकाला पाणी देत असताना शॉक लागून मृत्यू झाला. तसेच बिबट्याच्या हल्ल्यामुळे मौजे.सुरडी ता. आष्टी जि. बीड येथील नागनाथ गर्जे या शेतकऱ्याला जीव गमवावा लागला.. मौजे किन्ही ता. आष्टी. जि. बीड येथील १० वर्षीय स्वराज भापकर या लहान मुलाला अंगणात खेळत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गमवावा लागला औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील आपेगाव येथे ही माय बापावरही हेच वेळ आली. हीच वेळ बुलढाणा जिल्ह्यात येऊ नये या करिता वीज देण्यात यावी यासाठी सत्याग्रह शेतकरी संघटनेने आदरणीय कैलास भाऊ फाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना दिवसा उच्च दाबाची वीज मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित खामगाव कार्यालय आपणास विनंती शेतकऱ्यांना वीज देण्यात यावी अन्यथा आम्हाला सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन अतिशय तीव्र पद्धतीने आंदोलन करावे लागेल. या वेळी अजून किती शेतकऱ्यांचे जीव घेतल्यानंतर विद्युत वितरण शेतकऱ्यांना दिवसाची वीज देईल…?? असा सवाल सत्याग्रह शेतकरी संघटनेने विचारला व बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सर्व गावच्या फिडरवर दिवसा वीज देण्यात यावी व विदर्भातील शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत गहू हरभरा अशा रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज देण्यात यावी. व आठ दिवसाच्या आत लाईन न मिळाल्यास पुन्हा एकदा अतिशय तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा सत्याग्रह विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष धीरज फाटे यांनी दिला.

सांगोळा नदीपात्रातून एका नजीकच्या शेतामधून अवैध वाळूचा उपसा

0

 

…. तहसील विभागाचे दुर्लक्ष, शासनाला लाखोंचा चुना.,

अतिशकुमार वानखडे अकोला

पातुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले गाव म्हणजे सांगोळा, या गावानजीक नदीचे नदी पात्र जोडलेले असून, अनेक शेतकऱ्यांचे शेती नदी पात्राला लागून असल्यामुळे. तसेच नदीपात्रात व नजीकच्या शेतामध्ये वाळूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नदीपात्राच्या नजीक असलेल्या काही शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे पीक न घेता अवैधरित्या वाळू उपसा करून विक्री चालू असल्याचे या परिसरात चित्र पहावयास मिळत आहे. नदीपात्राचा लिलाव तसेच ज्या शेतामधून अवैधरित्या वाळू उपसल्या जात आहे त्यांनी महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता अवैधरित्या ही वाळू विकल्या जात आहे त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत असून संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनात येत आहे यासंबंधी महसूल विभागाचे संबंधित अधिकारी तसेच अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचे देवाण-घेवाण करून मिलीभगत असल्याचे परिसरात जोरदार बोलल्या जात आहे. त्यामुळे वाळू उपसा करणार्‍या ना कुणाचा डर नसल्यामुळे राजरोसपणे रात्रंदिवस या परिसरात वाळू उपसा होत आहे. हा परिसर सस्ती मंडळ अधिकारी यांच्या अंतर्गत येत असून मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांचा या परिसरात कुठल्याही प्रकारचा वचक नसल्याने आणि संबंधित वाळू माफियांच्या नेहमी संपर्कात असल्याने. वाळू माफियांवर कुठल्याही प्रकारचा वचक नसल्याचे ही पहावयास मिळत आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयाचा चुना लागत आहे. या परिसरात अवैध वाळू माफिया हे रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उपसा करून वाळूचे साठवण करून जास्त भावाने वाळू विकत आहेत.

 

चौकट
संबंधित अधिकारी तसेच अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या माफियांची मिलीभगत असल्याचेही परिसरात बोलल्या जात आहे तसेच या परिसरातील एका लोकप्रतिनिधीचेया अवैध वाळू माफियांच्या डोक्यांवर आशीर्वाद असल्याचेही परिसरात जोरदार चर्चेला उधान लागले आहे.. शासनाचे रक्षकच भक्षक बनल्याची अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे..