Home Blog Page 575

मतदार संघातील शेत रस्ते प्राधान्याने करणार आमदार-राजेश एकडे

0

 

सुनील पवार, नांदुरा

अलमपूर येथील मोढा शिवार शेत रस्त्याचे रस्त्याचे भूमिपूजन मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.व प्रत्यक्षात कमला सुरवात देखील झाली.मलकापूर विधानसभा मतदारसंघातील शेत रस्ते प्राधान्याने करणार व त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार राजेश एकडे यांनी केले.या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभास नांदुरा पंचायत समितीचे माजी सभापती श्री.महादेवभाऊ राऊत,श्री महादेव ठोबे ,श्री.ओकारभाऊ जवकार,श्री.यशवंतभाऊ बढे,श्री. शिवशंकरभाऊ ढोले जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे,मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.राजू हाडे पाटील,श्री.नारायण झाल्टे,सर्वश्री प्रभाकर सुशीर,कृष्णकांत सुशीर, सुखदेव उगले,प्रकाश मांगटे ज्ञानेश्वर मागटे, गोपाल राऊत,राजू सुलतान,अनंता बढे,विकास फलके,प्रकाश हातळकर, तुकाराम साबे,बबलू मांजरे,अनंत महाले, नायब तहसीलदार संजय मार्कंड व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढावा=गणेश सडत कार

0

 

 

=खामगाव=केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये मागील 26 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे 8 दिवस उलटल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघत नसल्याने दिसत आहे उलट शेतकरी दिल्लीत येत असताना पोलिसान द्वारे अमानवीय दुर्व्यवहार करण्यात आलेला आहे त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणातअसंतोष आहे त्यामुळे शासनाने यावर त्वरित तोडगा काढावा संविधानात द्वारे प्रत्येक भारतीयाला शांततापूर्ण धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर सकाळी थंड पाण्याचे फवारे सोडणे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदर आणण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या विधायक मागण्यांचे सत्याग्रह शेतकरी संघटने द्वारे समर्थन करण्यात येत आहे थंडीमध्ये कुडकुडणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर त्वरित तोडगा काढावा अशी विनंती सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष गणेश सडत कार यानी केली

महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

0

नागपूर दि.6: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबरला उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर विनम्र अभिवादन केले.
मुंबई येथील चैत्यभूमीवर सकाळी मुख्यमंत्र्यासह अभिवादन केल्यानंतर ते नागपूरला आले. तेथून थेट दीक्षाभूमीवर आज दुपारी सव्वाबारा वाजता त्यांचे आगमन झाले. येथील बौध्द स्तूपाच्या आतील तथागत गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पार्पण व अभिवादन केले.
नवनिर्वाचीत आमदार अभिजीत वंजारी, विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे,महानगरपालिका आयुक्त बी.राधाकृष्णन ,पोलीस उपायुक्त नरूल हसन यावेळी उपस्थित होते. यांनतर सामूहिकरित्या बौध्द वंदना घेण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंदत सुरई ससाई,सचिव सुधीर फुलझेले, विश्वस्त विलास गजघाटे, सदस्य एन.आर सुटे,आनंद फुलझेले, आंबेडकर महाविदयालयाच्या प्राचार्या श्रीमती बी.एन.मेहरे व विद्यार्थी उपस्थित होते.
दीक्षाभूमी येथून निघून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यांचे समवेत विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

एप्रिल २०२३ पर्यंत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांचे स्मारकाचे काम पूर्ण करू – धनंजय मुंडे

0

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर केले अभिवादन

मुंबई (दि. ०६, डिसेंबर) —- : इंदूमिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच १४ एप्रिल २०२३ ला याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न करू असे विधान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेत ना. मुंडे बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करून बाबासाहेबांना शासकीय मानवंदना देण्यात आली. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तुपाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.

०६ डिसेंबर १९५६ रोजी ज्ञानाचा अथांग सागर, ज्ञानसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळी जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांचा प्राण तळमळला, एवढेच नव्हे तर दादरच्या त्या सागराचा देखील प्राण तळमळला असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांनी समाजाला दिलेली शिकवण याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू, आमच्या पुढील अनेक पिढ्यांना ही शिकवण प्रेरणा देत राहील; असेही यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाले.

राज्य शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यावतीने यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम विविध माध्यमातून बाबासाहेबांच्या कोट्यावधी अनुयायांसाठी लाईव्ह दाखवत दादर येथील चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. देशभरातील लाखो अनुयायांनी शिस्त पाळत याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व अनुयायांचे आभार यावेळी धनंजय मुंडे यांनी मानले.

खा. शरद पवार यांच्यासोबतही अभिवादनास उपस्थित

दरम्यान शासकीय कार्यक्रमानंतर लगेचच दादर येथील चैत्यभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती स्थळी अभिवादन केले, यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे हे सोबत उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी यावेळी खा. पवार यांना कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री मा.ना उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केली पाहणी

0

 

 

 

औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी

ऋषी जुंधारे

आज गोळवाडी येथे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धवजी_ठाकरे_साहेबयांनी हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी माननीय_मुख्यमंत्री_साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. एकनाथजी_शिंदे_साहेब यांचे स्वागत *आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सरकेले. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा घेत मा मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. यावेळी *मा मुख्यमंत्री साहेब यांना आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर*यांनी शेतकर्यांच्या वतीने सर्वीस रस्त्यांसाठी निवेदन दिले.
.
.
या महामार्गाच्या आढावा वेळी #मा_मुख्यमंत्री_साहेब यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 या बाबत सविस्तर माहिती घेतली. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 कि.मी धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची सविस्तर तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेब,
रोहयो मंत्री संदीपान भूमरे साहेब, महसूल राज्यमंत्री अब्दुलजी सत्तार साहेब, आमदार अंबादास दादा दानवे, आ. उदयसिंह राजपूत, आ. संजयजी सिरसाठ, मुख्यमंत्री सचिव मिलिंदजी नार्वेकर साहेब, जिल्हाधिकारी सुनीलजी चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, उपनगराध्यक्ष साबेरभाई, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पा गलांडे, तालुका प्रमुख सचिन वाणी, मा जि प सदस्य मनाजी पा मिसाळ, शहरप्रमुख राजेंद्र पा साळुंके,उपतालुका प्रमुख महेश पा बुनगे, रणजित पा चव्हाण, हरिभाऊ साळुंके, पारस घाटे, रियाज अकिल शेख, अमीर अली उपस्थित होते.

जागतिक मृदादिनी कृषीविभागाने मृदाआरोग्य विषयक केले मार्गदर्शन

0

 

प्रतिनिधी -सचिन पगारे मो.न८३२९४२९२२१
नांदगाव (नाशिक)

जागतिक मृदादिनाच्या निमित्ताने जातेगांव येथे कृषी विभागा मार्फत शिबीराचे आयोजन करण्यात आले. नांदगांवचे कृषी सहायक श्री. अविनाश पुराणे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.
माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमी दुर्लक्षित राहिलेला घटक . संपूर्ण जीवसृष्टीसाठी माती ही महत्त्वपूर्ण समजली जाते. अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा ह्या मातीमुळेच पूर्ण होतात.जर मातीची धूप झाली तर जमिनीतील लाखो टन अन्नद्रव्य ,जीवाणू व बुरशीचा नाश होतो. माती संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या खाद्य व कृषी संस्थेने ५ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक मृदादिन ‘ साजरी करण्याचे ठरविले. नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे गावातील श्री पिनाकेश्वर महादेव मंदिरात कृषी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जागतिक मृदादिनाचे औचित्य साधून नांदगांव येथील कृषी विभागाचे कृषी सहायक श्री. अविनाश पुराणे यांनी या शिबीराचे आयोजन केले. श्री. पुराणे यांनी शेतकर्‍यांना मातीचे महत्त्व, मातीतील आवश्यक घटक, मातीतील पोषक घटकांसाठी उपाय योजना, गावनिहाय सूक्ष्म मूलद्रव्ये प्रमाण, खत व्यवस्थापन ,गावाचा सूपिकता निर्देशांक आदी विषयांवर मार्गदर्शन करून शेतकर्‍यांशी संवाद साधला व राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत जमिन आरोग्य पत्रिकेचे वितरण केले . या ठिकाणी श्री. विजय पाटील , रावसाहेब खिरडकर, संदिप पवार,आंबादास सोनवणे, तातेराव पगारे, कारभारी खिरडकर, दिलीप सोनवणे, वैभव शिंदे, ईश्वर जाधव,कैलास पवार, कैलास गायकवाड, दादासाहेब सोनवणे, आंबादास रवळे ,छबुजी लाठे, आदी शेतकरी उपस्थित होते .

शिंदी येथे जागतिक मृदा दिन साजरा !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

शिंदी येथे दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनानिमित्त ग्रामपंचायत भवनामध्ये जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आलायावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी सहाय्यक शरद पवार कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे सरपंच विनोद खरात माझी सरपंच अशोक खरात हे उपस्थित होते !यावेळी कृषी सहाय्यक शरद पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की चार ते पाच वर्षांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे परीक्षण हे केले पाहिजे !व प्रत्येकाने सेंद्रिय शेती करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले !त्यानंतर कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे यांनी सांगितले की !प्रत्येक शेतकऱ्यासाठी मातीचे परीक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करून घ्यावे !यावेळी सरपंच विनोद खरात तसेच अशोक खरात यांचेही थोडक्यात भाषणे झाली !यावेळी सुनील खंडारे ‘ पत्रकार सचिन खंडारे .उत्तम बंगाळे ‘ विष्णू बंगाळे ‘ वसंता बंगाळे ‘संतोष बाजीराव बंगाळे ‘गजानन भांड ‘ भगवान बरकूल ‘आधी शेतकरी या वेळी उपस्थित होते !

साखरखेर्डा येथे शिक्षक कॉलनीत एकाच रात्री पाच घरे फोडली !लाखोचा ऐवज लंपास – – !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

साखरखेर्डा येथे एकाच रात्री पाच घरे फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना 4 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली यामुळे शिक्षक कॉलनी व परिसरामध्ये खळबळ उडाली आहे !सिनखेडराजा तालुक्यातील शिक्षक कॉलनीत राहणारे संदीप मुंडकुळे दीपक भावसार वैभव खरात विनोद देशमुख व बागुलकर ।हे काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेऊन तीन डिसेंबरच्या रात्री पाच घरे फोडली या मध्ये दीपक भावसार यांच्या घरातील चार लाख रुपयांचे दागिने सव्वा लाख रोख तर ‘ श्री मुंडकूळे श्री खरात यांच्या घरातील किरकोळ दागिने घेऊन पोबारा केला ।ही घटना सकाळी उघडकीस आल्यामुळे दुय्यम ठाणेदार दिपक राणे प्रकाश मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले दरम्यान बुलढाणा येथून श्नान पथकास पाचारण केल्यानंतर श्वानाने आरोपीचा माग घेतला असता शेंदुर्जन – साखरखेडा रोडपर्यंत चोरटे गेल्याचे दिसून आले ।एकाच रात्री तब्बल पाच घरे फोडल्यामुळे साखरखेर्डा गावासह आसपासच्या खेडेगावांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना जेरबंद करू असे दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांनी सांगितले आहे यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली ।याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या होत असल्यामुळे चोरट्यांचा शोध घेणे पोलीस पुढे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे !

शेतकरी उत्पादक कंपनी साठी संचालक म्हणून संतोष बाजीराव बंगाळे यांची बिनविरोध निवड !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

जैविक शेती व जैविक मिशन अंतर्गत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपनी साठी संचालक पदावर शिंदी येथील शेतकरी संतोष बाजीराव बंगाळे यांची सभेमध्ये सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली । .काळुंका माता जैविक शेतकरी गट अंतर्गत शेतकरी गटातील सर्व सदस्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी साठी संचालक म्हणून संतोष बाजीराव बंगाळे यांची निवड केली ।यावेळी जैविक मिशनचे समन्वयक हितेस मिसाळ श्री इंगळे उपस्थित होते यावेळी सूचक म्हणून अशोक आत्माराम खरात अनुमोदक म्हणून मारुती बंगाळे यांनी काम पाहिले !यावेळी काळुंका माता जैविक शेतकरी गटातील सदस्य गणेश मंगळे दिनकर भगवान बंगाळे विनोद खरात सुनील बंगाळे अशोक बंगाळे गजानन खरात संगीता मा बंगाळे अनिल भगवान बंगाळे शिवशंकर विठ्ठल बंगाळे ऋषिकेश संजय हाडे प्रकाश खोसे रोहन मदन हाडे ‘ ज्ञानेश्वर बंगाळे मधुकर बंगाळे अशोक माधवराव खरात परमेश्वर आटोळे आदी उपस्थित होते !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

0

 

नागपूर दि ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची ते अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत. यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने ते लगेच अमरावतीकडे रवाना झाले.
तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री विशेष विमानाने नागपूर येथे आले होते. या ठिकाणावरून अमरावतीकडे हेलिकॉप्टरने रवाना झालेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील शिवणी रसुलापूर हेलीपॅडवरून ते मौजे देऊळगव्हाण येथे पोहोचणार आहेत. याठिकाणी उतरून ते समृद्धी महामार्गाची पाहणी करतील.
त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवाडी कडे प्रयाण करतील. दोन वाजता गोळवाडी हेलिपॅड येथे आगमन व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद तेथून ते विमानाने मुंबईला प्रयाण करतील.
आज सकाळी साडेदहा वाजता नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासह अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर व अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी देखील नांदगाव खंडेश्वरकडे प्रयाण केले.
विमानतळावरील त्यांच्या स्वागतासाठी यावेळी खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.याशिवाय महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार ,अप्पर पोलीस आयुक्त दिलीप झळके, सुनील फुलारी, उपायुक्त नरुल हसन, बसवराज तेली, जिल्हा पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) राकेश ओला, वरिष्ठ विमानतळ अधिकारी आबीद रूही, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर उपस्थित होते.