Home Blog Page 576

माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणीतल्या शाळेला उजाळा…दहा वर्षांनी पुन्हा भरली शाळा…

0

 

 

मुंबई प्रतिनिधी : महेश कदम

 

आडगांव बु: सर्वांना चे हवी हवीशी वाटणारी शाळा आयुष्याच्या वाटेवर आठवणीत हरवून जाते पण सर्वांच्याच मनात आठवणी कायम असतात. भुतकाळातील शाळेतील जुन्या अनुभवांना उजाळा देणारा उपक्रम स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यी व शिक्षकांनी राबविला…

जिल्हा परिषद विद्यालय आडगांव बु: च्या तब्बल दहा वर्षांनंतर सन २००९-२०१० च्या दहाविचा वर्ग पुन्हा भरला. सन २००९-२०१० चे माजी विद्यार्थ्यी दिपक रेळे, दिपक घाईट व शेख साबिर यांच्या संकल्पनेतून काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेतील आठवणींना उजाळा देण्याकरिता पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला.

यावेळी त्या वर्गातले बहुसंख्य माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती. प्राचार्य आर जी जाधव यांचे प्रमुख उपस्थितीतीत वर्ग शिक्षक इंगळे, पी आर अढाऊ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास वानखडे यांची उपस्थिती होती.

शिक्षकवृंदानी जुन्या आठवणी व अनुभव कथन करुण विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी भविष्यात येणाऱ्या अडचणीत एकमेकांना मदत करण्याची शपथ घेतली. दहा वर्षांनी एकत्रित येत असलेल्या बरेच विद्यार्थ्यांनी आप आपल्या आठवणी कथन केल्या त्यावेळी सर्व वातावरण भाऊक झाले होते.

आयोजित कार्यक्रमाचे संचालन रोशनी गाडगे व मनिषा धमके यांनी केले तर आभार प्रदर्शन नागेश तायडे यांनी केले. अशी माहिती दिपक रेळे यांनी दिली.

सराईत गुन्हे असलेला मुख्य आरोपी गजाआड

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

गेल्या वर्षी जळगाव जामोद तालुक्यात घडलेल्या वाटमारीतील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात जळगाव जामोद पोलिसांना यश आले आहे. अजय मन्साराम चव्हाण (26 रा. उमरा, ता. अकोट, जि. अकोला) याला त्याच्या घरातून आज, 4 डिसेंबरला अटक करण्यात आली.
अजय चव्हाणविरुद्ध दर्यापूर, खल्लार, सोयगाव, मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातही जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. तो अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता. बर्‍याच दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र तोव। मिळून येत नव्हता. अखेर त्याला पकडण्यात जळगाव जामोद पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुनील जाधव यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने केली. पथकात सहायक पोलीस निरिक्षक सतीश आडे, पोलीस उपनिरिक्षक भारत बर्डे, पो.काँ.गणेश पाटील, विकास गव्हाण, सुनील वावगे यांनी केली.

अशी केली होती वाटमारी…

बोराळा येथील आदिनाथ पुंडलिक वाघ हे रात्री आठच्या सुमारास मोटसायकलने घरी जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवून खिशातील नगदी 20 हजार 370 रुपये, सॅमसंग कंपनीचा मोबाइल 1500 रुपयांचा चोरून नेला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले. अखेर संयमाने तपास करत लुटारूंनी हिसकावून नेलेल्या मोबाइलच्या साह्याने पोलीस मुख्य आरोपी चव्हाणपर्यंत पोहोचले

श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव संबंधी प्रशासनाला चुकीची माहिती देऊन गावाची प्रतिमा मलिन करणा-या अधिकार्‍यावर कारवाई म्हणून स्वयंस्फूर्तीने 5 डिसेंबर रोजी गाव बंद

0

 

सोनाळा , संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा येथे कार्तिक पोर्णिमेला श्री संत सोनाजी महाराजांची यात्रा महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. पण यंदा कोरोणा महामारी च्या प्रभावामुळे यात्रा, रथउत्सव, काला व महाप्रसादाचे कार्यक्रम स्वयंस्फूर्तीने गावकऱ्यांनी व संस्थांनी बंद करण्याचे लेखी पत्र पोलीस स्टेशन यांना दिल्यावर एकदम साध्या पद्धतीने दिनांक एक डिसेंबरच्या रात्री बारा वाजता पोलिसांच्या परवानगी व उपस्थित गावातील मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार रथाची पूजाअर्चा केली तर पोलिसांच्या समोर रथाची प्रतिकृती म्हणजे लहान पितळी रथ डोक्यावर ठेवून गाव प्रदक्षिणेला नेण्यात आले त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तसेच दंगा काबू पथक ५ ते ७ पोलिस उपनिरीक्षक 140 ते पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना मिरवणूक निघाली तर कशी .. पोलिसांच्या कार्यकुशल तेवर समस्त गावकरी व व भक्त प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे….
गावातील मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार रथाची पूजाअर्चा केली तर पोलिसांच्या समोर रथाची प्रतिकृती म्हणजे लहान पितळी डोक्यावर घेऊन गाव परदेशी नेला नेण्यात आले यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही रस व्यवस्थित मंदिर स्थळी पोचवण्यात आला या मिरवणुकीदरम्यान कोणीही पोलीस अधिकारी हजर नव्हते पोलिसांनी नियुक्त केलेले व्हिडिओ शूटिंग चालू होते या प्रकारामुळे कोणतेही कायदा-सुव्यवस्था बिघडला नाही उलट प्रशासनाला सहकार्य केले असल्याचे भाविकांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट स्वरूपात सांगितले .
शासनाने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षापासून जिल्हा प्रशासनाला चुकीचे अहवाल पाठवून यात्रा बंद करण्याचे घाट घातला आहे पोलिसांनी दिलेल्या अहवाल खरा ठरवण्यासाठी गावकऱ्यांवर वचपा काढण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे व गावामध्ये दरवर्षीच्या यात्रेमध्ये पोलीस प्रशासन विरुद्ध लोकनाट्य मंडळ कधी तर भक्तगण असे असताना पोलिसांनी यात्रे संबंधित चुकीची माहिती वरिष्ठ पातळीवर देण्यात आली या अनुषंगाने याहीवर्षी पोलिसांनी पूर्वीचा डाव मनात घेऊन यात्रेची व गावकर यांची प्रतिमा मलिन करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरता 5 डिसेंबर 2020 शनिवारला गाव स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात येत असल्याचे एका निवेदनात गृहमंत्री पालकमंत्री खासदार आमदार महानिरीक्षक अधीक्षक मुख्यमंत्री यांना अधिकार्‍यावर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

साखरखेर्डा येथे 25 घाटाचे उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावी याबाबत – – – … : रवींद्र मगर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथे 25 खाटाचे उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करावी अशा मागण्याचे निवेदन साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे !त्यांनी पाठवलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की,साखरखेर्डा हे मोठे शहर असून साखरखेर्डा लागत 50 ते 55 खेडे जोडलेली आहे विविध आजाराच्या उपचारासाठी लोक साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल होत असतातपरंतु साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मुबलक जागा आहे !गंभीर आजार झाला की लोकांना शासकीय अथवा खासगी दवाखान्यांमध्ये जावे लागत आहे ।किंबहुना ‘अकोला औरंगाबाद बुलढाणा अशा मोठ्या शहरांमध्ये लोक गंभीर आजाराच्या उपचारासाठी जातात ‘त्यामुळे लोकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे !तरी गंभीर आजाराच्या स्वरूपातील रुग्णावर तात्काळ उपचार मिळावे वनस्पतीच्या खेडेगावातील गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी 25 घाटाचे उपजिल्हा रुग्णालय त्वरित मंजूर करण्यात यावे अशी मागणीही यावेळी रवींद्र मगर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे !

शिंदी ते मेरा खुर्द रस्त्यावर जीवघेणे खड्डे -पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे – नागरिकांची मागणी

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

अतिशय महत्त्वाच्या अशा महामार्गाला जोडणाऱ्या व दळणवळण क्षेत्रातील महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता म्हणजेच शिंदी – साखरखेर्डा ते मेरा खुर्द हा रस्ता होय !या रस्त्याची मागणी अनेक वेळा वाहनधारकांनी प्रवाशांनी नागरिकांनी केली आहे !परंतु आज अजूनही या रस्त्याची मागणी पूर्ण झाली नाही ! शिंदी ते मेरा खुर्द साखरखेर्डा या रस्त्यावर तीन तीन ते चार फूट खोल खड्डे पडले असून अनेकदा रात्रीच्या वेळेस वाहनधारकांना हे खड्डे न दिसल्यामुळे अपघात झाले आहे !हा रस्ता चिखली – बुलढाणा – औरंगबाद . जालना – पुणे -या मुख्य शहराकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरतो !अनेक खेडेगावातील तरुण कामगार कडे जाण्यासाठी साखरखेर्डा येथून मेरा खुर्द फाट्यावर येत असतात .परंतु हा शिंदी – मेरा खुर्द – साखरखेर्डा -ग्रामीण भागातील रस्तापूर्णपणे उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहे तरी हा रस्ता त्वरित करण्यात यावा व पालकमंत्र्यांनी लक्ष देऊन या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत ।

रेतीच्या साठ्यासह टिप्पर व विना क्रमांकाची जेसीबी जप्त ..महसूल विभागाची कारवाई !

0

 

साखरखेर्डा (प्रतिनिधी )

अवैध रेतीचे केंद्र बनलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील एका शेतामध्ये असलेला रेतीचा साठा व तसेच तेथे असलेली टिप्पर व विना क्रमांकाची जेसीबी महसूल विभागाच्या पथकाने 2 डिसेंबर रोजी जप्त केली !तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील एका शेतामध्ये रेतीचा साठाअसल्याची माहिती तहसीलदार सुनील सावंत यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार प्रवीण लटके तलाठी प्रदीप मोगल तलाठी माघाडे यांच्या पथकाने हिवरखेड पूर्ण गावात भेट दिली असता यावेळी नवीन गावाच्या पूर्वेस गट नंबर 131 मध्ये दहा ते पंधरा ब्रॉस रेतीचा साठा आढळून आला !तसेच विना क्रमांकाच्या जेसीबीने टिप्पर क्रमांक एम एच 28 एबी 72 76 मध्ये रेती साठवत असल्याचे आढळले ‘यावेळी नायब तहसीलदार प्रवीण दटके यांनी परवाना मागितलं असतं त्यांच्या जवळ कुठलाही परवाना आढळून आला नाही ।येळी नायब तहसिलदार लटके यांनी टिप्पर मालक लक्ष्मण माधवराव काटकर यांच्याविरुद्ध किनगावराजा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली .तसेच जेसीबी व टिप्पर पोलीस जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले । यावेळी जेसीबी चालक घटनास्थळावरून पसार झाला होता ‘यावेळी जीसीपी मालकाचा शोध महसूल कर्मचारी व पोलीस घेत आहे !

भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्री वाल्मीक सुरासे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा

0

जिल्हा प्रतिनिधी
ऋषी जुंधारे

विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचालित भागीरथी माध्यमिक विद्यालय नालेगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद येथे श्री वाल्मीक सुरासे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न झाला. सेवेचे 31 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या गौरव सोहळ्यात श्री वाल्मीक सुरासे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यापुढेही शिक्षण चळवळीसाठी जास्त वेळ देण्याचे आश्वासन श्री वाल्मीक सुरासे यांनी दिले.
याप्रसंगी प्रशांत अंधारे, भाऊसाहेब तुपे, प्रा चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब पाटील, गुरुवर्य श्रीराम उगले, राजाभाऊ देशमुख, आर. आर. पाटील, मनोज पाटील, आसाराम शेळके, युनूस पटेल, पी. एम. पवार, महेश पाटील, आनंद खरात, भारत चाटे, राजेंद्र बाविस्कर, अरुण शिंदे, राजेंद्र ठाकरे, विजय द्वारकुंडे, विशाल सुरासे, दत्तात्रय सुरासे, बी. एल. जाधव, विकास जगताप, सुनील व्यवहारे, विजय जाधव, बी. एम. हजारे उपस्थित होते.
मातोश्री भागीरथी माई यांच्या प्रतिमेचे पूजन करून गौरव सोहळ्याला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एन. पठारे यांनी केले.
या प्रसंगी भरत निंबाळकर,सुनील भवर, राजेश्वर विभुते, प्रमोद चव्हाण, जगताप गणेश, जाधव प्रवीण, प्रमोद रिंढे, त्रिंबक गावडे, श्रीमती मनीषा उभेदळ, सागर राजपूत, जाधव पी. एस., भरत भोपळे, रोहिदास त्रिभुवन, गंगाधर कटारे, गोकुळ पवार, श्रीमती बोर्डे मॅडम, श्रीमती सपकाळ मॅडम यासह शिक्षकेतर कर्मचारी सुनील सपकाळ, समाधान सुरासे, सुनील बोडखे, किशोर साळुंखे, ज्ञानदेव तायडे. अमोल त्रिभुवन उपस्थित होते.

मिरवणूक काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0

 

(सूर्या मराठी न्युज)

सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज यात्रा कोरोना या वैश्विक महामारी मुळे रद्द असल्यामुळे मध्यरात्री काढली डोक्यावर छोट्या रथाची मिरवणूक ; अन् सोनाळा पोलिसांनी केला गुन्हा दाखल…!
अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच दंगा काबू पथक 5ते7 पोलीस उपनिरीक्षक अंदाजे 140 ते 150 पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना मिरवणूक निघाली तरी कशी सोळाना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह???? संग्रामपुर ता प्र
– संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज यांची दरवर्षी भव्य यात्रा असते. विदर्भातील नावलौकिक व सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव यंदा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे . तसेच जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार यात्रा रद्द व कोणत्याही प्रकारची जमाव न करता 10 लोकांच्या उपस्थित मंदिरास परवानगी दिली होती तसेच रथाची गावातुन मिरवणूक काढण्यास परवानगी नसतांना सोनाळा गावातील काही भक्तांनी मोठ्या रथाची ओढून मिरवणूक न काढता प्रशासनाची कोणतीही परवानगी नसतांना मोठ्या प्रमाणात जमाव करून डोक्यावर लहान रथ ची प्रतिकृती घेवून रात्री 12 ते 1 वाजताच्या दरम्यान गावातुन मिरवणूक काढली त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याने भक्तावर गुन्हा दाखल केले.सोनाळा पोलीस तर्फे मंगेश आनंद लेकुरवाळे पोलीस शिपाई बक्कल नंबर392 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोळा पोलिसांनी 27 लोकांवर व30ते 35 अनोळखी लोकांवर कलम 143,188,269,270,116,135,51ब11 भादवि नुसार , गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमर चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक

प्रकाश पवार हे करीत आहेत

राजेगांव येथे आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या !

0

 

साखरखेर्डा (प्रतिनिधी )

रमेश ऋदांजी जाधव (मुळ गांव रायपुर) ह.मु . पुणे हबेवाडी कात्रज येथील इसम बुलडाणा जिल्ह्यातील राजेगांव येथील मावसभाऊ नंदकिशोर भालेराव यांच्या घरी दिवाळी सणा निमित्त आले होते
परंतु दिनांक 2 /12/2020रोज बुधवार सकाळी लवकर उठून बाहेरून फेरफटका मारून येतो सांगून बाहेर पडले त्यानंतर गावातील शेकुटीवर शकत बसले त्यानंतर
गावालगतच असलेल्या मावसभावाच्या शेतात जाऊन शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाला आपल्या जवळील पांढऱ्या कलरच्या दाेरीने गळफास घेऊन रमेश ऋंदाजी जाधव यांनी आपली जिवन यात्रा संपवली
सदर प्रकरणाची माहिती मिळताच गावातील कार्यकर्ते व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली सदर प्रकरणाची माहिती मृतक इसमाचे मावसभाऊ नंदकिशोर भालेराव यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला कळवली असता
साखरखेर्डा पोलीस स्टेशन दंबग ठाणेदार श्री आडोळे साहेब
साहाय्यक फौजदार इंगळे साहेब पो.ह काॅ. सानप साहेब यांनी घटनास्थळी पोहचून पुढील वृत्तलिहिपर्यंत मृतक इसमाचे कारण स्पष्ट झाले नसून
रमेश जाधव यांनी आत्महत्या का केली
पुढील तपास साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे दंबग पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र आडोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक फौजदार इंगळे साहेब पो. ह. काॅ. सानप साहेब करत आहे

अखिल विश्व वारकरी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या परभणी महीला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी श्रीमती कमलताई राठोड

0

 

 

अजहर पठाण
पाथरी/परभणी

परभणी जिल्ह्यातील पाथ्री येथील सामाजिक कार्यकरत्या श्रीमती कमलताई राठोड यांची परभणी जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी वारकरी परिषदेचे महाराष्ट्र संघटक श्री.दगडोबा जोगदंड पाटील महाराज, प्रदेश चिटणीस श्री. ह. भ. प. दत्तराव महाराज मगर सोंनेकर, मराठवाडा अध्यक्ष श्री. महादेव महाराज ढवळे, संपर्क प्रमुख श्री. रामकृष्ण महाराज पारवेकर यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले. श्रीमती कमलताई राठोड यांचे अभिनंदन अखिल विश्व वारकरी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष श्री. नितिनदादा सातपुतेयांनी केले आहे