Home Blog Page 580

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ . सी . पी . जायभाये यांची शिंदी येथील डाळिंब बागची पाहणी !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

शिंदी येथील बागायतदार तथा सरपंच विनोद खरात यांच्या डाळिंबाची चर्चा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये असते कोरडवाहू जमिनीवर त्यांनी 50डाळींबाचे लाखापर्यंत उत्पन्न घेतलेले आहे !त्यांचे डाळिंब बांगलादेश मध्ये निर्यात होत असतात !अनेक लोक त्यांच्या डाळिंबाच्या बागेची पाहणी करून जातात !असेच आज 21 नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर .सी .पी .जायभाये .तसेच त्यांच्या सोबत असलेले कृषी विभागाचे डॉक्टर बिपिन राठोड हवामान निरीक्षक कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांचे अनिल जाधव !यांनी संपूर्ण डाळिंब बागेची तसेच पेरू लागवडीची पाहणी केली व आणखी उपाययोजना सुचवल्या यावेळी कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे ‘शरद खरात . बागायतदार तथा सरपंच विनोद खरात ‘गजानन भांड अजय खंडागळे बद्री वायाळ मधुकर खरात ।सचिन खंडारे ‘आधी शेतकरी या वेळी उपस्थित होते ‘यावेळी डॉक्टर जायभाये व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतातील डाळिंब बागेची असलेली देखभाल तसेच पेरूच्या बागाची पाहणी केली !

रविकांत तुपकरांच्या प्रयत्नांना यश..अखेर बुलडाणा जिल्हा महावितरणला 10,500 KL ऑईल मिळाले.. जळालेली विद्युत रोहित्रे बदलून मिळण्याचा मार्ग होणार सुकर..

0

 

बुलडाणा जिल्ह्यात जळालेली विद्युत रोहित्रे बदलून मिळण्यासाठी लागणारे ऑईल नसल्याने विद्युत रोहित्र बदलुन मिळत नव्हते. यासंदर्भात ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांनी काल (दि.20 नोव्हें) मुंबई येथे राज्याचे ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष / एम.डी. असीम गुप्ता व राज्याचे साहित्य व्यवस्थापनाचे मुख्य अभियंता पराग जांभुळकर यांची भेट घेतली होती. बुलडाणा जिल्ह्यासाठी जळालेले विद्युत रोहित्रे बदलून देण्यासाठी लागणाऱ्या ऑईल चा पुरवठा करण्याची आग्रही मागणी रविकांत तुपकरांनी केली होती. ऑईल नसल्या कारणाने जळालेले विद्युत रोहित्र बदलून मिळत नव्हते. शेतात पाणी आहे पण विद्युत रोहित्र जळाल्याने शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नव्हते. त्यामुळे शेतकरी परेशान आहेत. रविकांत तुपकरांच्या प्रयत्नाने बुलडाणा जिल्ह्यासाठी 10,500 KL ऑईल मिळाले आहे. त्यामुळे आता जळालेली विद्युत रोहित्रे बदलुन मिळणे अपेक्षित आहे. याउपरही महावितरणने विद्युत रोहित्रे बदलून देण्यासाठी टाळाटाळ केली तर ‘स्वाभिमानी’च्या स्टाईलने धडा शिकवला जाईल..! असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.

देशातील गरीब रुग्णांना स्वस्तात औषधं उपलब्ध करून देणार अर्जुन देशपांडेंची युनीक आयडिया“

0

 

 

माननीय श्री रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीने जेनेरिक आधार मध्ये आर्थिक तसेच नैतिक समर्थन केले. देशात सध्या करोना व्हायरस विरुद्धची लढाई सुरू आहे. जेनरिक कंपनीच्या माध्यमातून अर्जुनने एक मिशन हाती घेतले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि पेशनवर जगणाऱ्या लोकांना औषधे कमीत कमी किमतीत मिळावी. भारतातील ६०% लोकांना आज औषधं परवडत नसल्यामुळे विकत घेता येत नाही पण ८५ ते ९०% औषधें ही भारतातच बनतात ज्यांना जेनरिक म्ह्टले जाते. त्यामुळे जेनरिक औषधे किमत कमी दरात उपलब्ध करण्याचा अर्जुन देशपांडेंचा प्रयत्न आहे.
येत्या काही महिन्यात जेनरिक आधार चे केंद्र फक्त मुंबई – पुणे नाही तर सांगली, सातारा, मिरज आणि कोल्हापूर, महाराष्ट्राच्या व देशाच्या ग्रामीण शहरात ही सुरू करण्याचा ध्यास अर्जुन ने आपल्या हाती घेतला आहे….

प्रल्हाद भाऊ सोरमारे यांचे सामाजिक काम !बुलढाणा जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णासाठी औरंगाबाद मध्ये राहण्याची व जेवण्याची केली व्यवस्था !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील बहुजन समाजाचे नेते तथा शेतकरी चळवळीतील खंदे कार्यकर्ते ‘प्रल्हाद भाऊ सोरमारेयांनी आपल्या मातृत्वाची नाळ अजूनही जोडलेली असल्याचे दाखवून दिली आहे !कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता प्रल्हाद सोरमारे यांनी !बुलढाणा जिल्ह्यातून उपचारासाठी औरंगाबाद मध्ये कोणत्याही हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या गरजू रुग्णांसाठी समजिक दायित्व म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रल्हाद भाऊ सोरमारे युवा मंच यांच्या वतीने रुग्णांच्या परिवारांची त्यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था बीड बायपास वर असलेल्या न्यू शुभम लॉन वर केली आहे !त्यामुळे गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना हा मोठा आधार झाला आहे !कोरोना च्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी हेळसांड गैरसोय औरंगाबाद शहरामध्ये होत असते परंतु प्रल्हाद भाऊ सोरमारे यांनी मनाचा उदारपणा दाखवल्यामुळे अनेक रुग्णांच्या परिवाराची आता सोय झाली आहे

सिंदखेडराजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या होणार निवडणुका ! ‘साखरखेर्डा येथे आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

 

सिनखेडराजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होऊ घातले असून सध्या ग्रामपंचायत वर प्रशासक नियुक्त केली आहे अगोदर असलेले जनतेतून सरपंच पदाची निवडणूक ही यावर्षी होणार नाही नसून ! निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य च आता सरपंचाची निवडणूक होणार आहे : ।त्यामुळे आपल्या वार्डातील ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यासाठी प्रस्थापित पक्षांना व पॅनल धारकांना कस लावावा लागणार आहे !सिनखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत साखरखेरडा असून यामध्ये सतरा ग्रामपंचायत सदस्य आहेत पाच वार्डात प्रत्येकी तीन तर एका वॉर्डात दोन सदस्य निवडून येतात !या पाठोपाठ दुसरबीड शेंदुर्जन मलकापूर पांगरा किनगाव राजा ह्या सुद्धा मोठ्या ग्रामपंचायत आहेत !त्यामुळे आतापासूनच आपल्या वार्डामध्ये उत्सुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे !साखरखेर्डा येथे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असतील तर !धनगर समाजाचे प्रल्हाद सोरमारे यांनी तिसरी आघाडी स्थापन केल्यामुळे त्यांचे आव्हान कितपत राहील हेही पाहणे औचित्याचे ठरेल !

तथागत फाउंडेशन व तथागत ग्रुपमहाराष्ट्र तर्फे शेर ए टिपू सुलतान यांची जयंती साजरी !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

20 नोव्हेंबर रोजी मेहकर येथील तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने शेर ए टिपू सुलतान यांच्या जयंती निमीत्त त्यांना आभिवादन करण्यात आले आणी मेहकर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदिप भाऊ गवई यांनी शेर ए टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले व त्यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की, शेर ए टिपू सुलतान (२० नोव्हेंबर) इ.स. १७५०-४ मे, इ.स. १७९९) हे तत्कालीन म्हैसूरचे राजे होते. हे म्हैसूरचा सुलतान हैदरअली व त्याची पत्नी फक्र-उन-निसा यांचे पुत्र होते. टिपूनां म्हैसूरचा वाघ म्हणत. इंग्रजांविरुद्ध युद्ध लढणारे ते युद्ध होता इंग्रजांना लढा की पडा करून सोडलं होतं..आज त्यांची जयंती मुस्लीम व हिंदू बांधवानी मिळुन साजरी करण्यात आली….. यावेळी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा,श्री.संदिप भाऊ गवई , मा.सुभाष भाऊ बैलके, मा.अनिल भाऊ देबाजे मा.अख्तर भाई कुरेशी,कुणाल भाऊ माने, कैलास दुगाने,राजकुमार उचित, कपिल इंगळे,प्रमोद अंभोरे विजय सरकटे,समाधान पवार,अस्सलम भाई गवळी,पंकज जाधव,यांची उपस्थित होती..!

गणेश ने अपंगत्वावर मात केली पण त्याचबरोबर त्याने बेरोजगारीवर सुद्धा मात केली !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

माणसाचं जीवन हे क्षणभंगुर असतं नसतो !परंतु जीवन जगण्यासाठी सर्वच हात-पाय व्यवस्थित असावे लागतात असे नाही तर जे अवयव निसर्ग ने दिली तेच अवयवावर काहीजणांनी मात करून आपला व्यवसाय थाटामाटात सुरू केला आहे ।असंच साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये राहणारा श्री गणेश बेहिरे हा तरुण उच्चशिक्षित असून दिव्यांग आहे एक पाय अपंगत्व आल्यामुळे आपण घरी बसून चालणार नाही तर सुशिक्षित असून काही तरी उद्योग उभारावा हे विचार त्यांच्या डोक्यात होते !म्हणून गणेश ने खचून न जाता मित्राच्या मदतीने भाऊबीज सणाच्या दिवशी एक पिठाची गिरणी घरी आणली व बसवली ।व पीठ गिरणी चा व्यवसाय सुरू केला !गणेश ने समाजाला हे दाखवून दिले आहे की अपंगत्वावर मात केलीच केली पण उच्चशिक्षित असूनही त्याने बेरोजगारीवर सुद्धा उद्योग उभारून मात केली ।त्याचा आदर्श इतर दिव्यांग बांधवांना नक्कीच प्रेरणादायी आहे ।

प्रेम हे आंधळे असते असे म्हणतात परंतु येथे इतका काळाकुट्ट आंधळेपणा की स्वतःच्या मुलाबाळांचा विचार न करता . ! प्रेमीयुगुलाने घेतले विष !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

प्रेम या अडीच अक्षरी शब्दामुळे रथी महारथी हे प्रेमात बुडवून आंधळे झाल्याचे अनेक प्रकरण आपण बघितली आहे !असे म्हणतात की प्रेम हे आंधळे असते परंतु त्या पलीकडे जाऊनही प्रेम हे आंधळे असतेच असते परंतु त्याचबरोबर ते बहीरे ‘ मुके ही असते ।प्रेमात बुडाल्यामुळे कुणालाही वयाचा नात्याचा विचार मनात येत नाही हे सर्व नाती व विसरून प्रेमात आकंठ बुडालेले असतात !असाच काहीसा प्रकार सिंदखेडराजा तालुक्यातील पोफळ शिवणी गावाजवळील एका झोपडीत घडला आहे . !पोफळ शिवणी येथील एक प्रियकर शुक्रवारी घरातून निघून गेला होता त्याला दोन मुले व एक मुलगी होती -त्याच बरोबर त्याच गावातील दोन मुलांची आई असलेली महिला ही बेपत्ता झाली होती !ही घटना 19 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली !तीन मुलांचा बाप असलेल्या पुरुष व दोन मुलांची आई असलेली महिला या दोघांचेही प्रेमाचे सुत जुळले व दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेत !जिएंगे तो साथ मे मरेंगे भी साथ मे असे म्हणत -गावच्या जवळ असलेल्या झोपडीत दोघांनीही विषप्राशन केले -ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र जास्त घेतल्यामुळे दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे नेण्यात आले !त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे या वयस्कर माणसाच्या प्रेमप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे !ना प्रेमात नात्यांचा विचार ना प्रेमात स्वतःच्या मुलाबाळांचा विचार यांनी केला !विवाहित प्रेमी युगुलानी स्वतःच्या मुलाबाळांचा हे विचार केला नाही !

तरुण युवतीचा चोरून फोटो काढत होता, नागरिकांना चांगलेच दिला चोप

0

 

आजीला बसस्थानकावर सोडायला आलेल्या युवतीचा फोटो काढणार्‍या युवक रोड रोमिओला नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला. फोटो काढणे पडले महाग नागरिकांना चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले. ही घटना काल घडली.
सादिक खान अमजद खान (रा. लोणार) असे आरोपीचे नाव आहे. दुसरबीड येथील युवती बस स्टॅन्ड वरती आजीला सोडण्यासाठी देऊळगाव राजा बसस्थानकावर आली होती. दुसरबीडला जाण्यासाठी बसमध्ये आजीला बसवून देत असताना सादिक खानने तिचा फोटो काढला. होता ही बाब युवतीच्या लक्षात आल्याने तिने त्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. यावेळी सोबत असलेल्या युवतीच्या मावस बहिणीने त्याला मोबाइल दे आम्ही तपासतो म्हटले तर तो मोबाइलही देईना. मुलीने मोबाइल हिसकावून बघितले असता मुलीचे फोटो काढल्याचे दिसून आले. या सर्व वादात नागरिकही जमा झाले. त्यांनी सादिकला नागरिकांना दिला चोप देेत पोलिसांच्या हवाली केले. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सादिकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कापसाला चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान-आमदार राजेश एकडे

0

 

सुनील पवार नांदुरा

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. राजेश एकडे यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा,बालाजी जिनिंग व राठी जिनिंग नांदुरा येथे काटापूजन करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून सी.सी.आय.च्या कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.असे मत आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केले.सी.सी.आय.
च्या कापूस खरेदी शुभारंभ करिता नांदुरा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री.पदमभाऊ पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य श्री.वसंतरावभाऊ भोजने,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे, राष्ट्रवादी तालुका काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. मोहनभाऊ पाटील,जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निलेशभाऊ पाऊलझगडे, डॉ.प्रदीप हेलगे
तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.अतुल पाटील,श्री. आकाश वतपाळ,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री. पुरूषोत्तम झाल्टे, काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष श्री.सचिन पाटील, श्री.प्रशांत देशमुख, युवासेनेचे श्री.ईश्वर पांडव,सहाय्यक निबंधक श्री.महेश कृपलानी,सी.सी.आय.श्री.नितीन भरणे, श्री.सतीश देशमुख, श्री.विठ्ठलभाऊ कोठारी,अँड.राठी,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री.संजय पाटील व कापूस उत्पादक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.