Home Blog Page 585

साखरखेर्डा ते शिंदी रोडची चाळणी ! रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी –

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

शिंदी ते साखरखेडा या डांबर रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे !या मुख्य रस्त्याची चाळणी झाली आहे ‘हा रस्ता करण्याची मागणी सातत्याने होत आहे परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असून हा रस्ता त्वरित करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत !या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे ! शिंदी ते साखरखेर्डा हा मुख्य रस्ता असून हा रस्ता मेहकर खामगाव तसेच जालना चिखली बुलढाणा या रोडला जोडणारा मुख्य रस्ता आहे ‘हा रस्ता करावा यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे शिंदी चे सरपंच विनोद खरात यांनी सांगितले आहे !

विष प्राशन करून शेतकऱ्यांची कर्जापायी आत्महत्या . ।सावखेड तेजन येथील हृदयद्रावक घटना –

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्भवली यामध्ये हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी झाली त्यांचे नुसकान झाले !अनेकांनी सोयाबीन कपाशी यांच्या पिकावर खाजगी सावकारांची असतील किंवा बँकेकडून कर्ज घेतले होते !व झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुसकान पाहून हे कर्ज कसे फेडायचे हाच विचार अनेक शेतकऱ्यांच्या मनात येत असतो !परंतु काही शेतकरी हे मनात भलताच विचार करून आत्महत्येचा मार्ग निवडतात अशीच एक घटना ‘सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन या गावात घडली !सावखेड तेजन येथील श्रीराम मांटे यांच्याकडे आठ एकर शेती आहे त्यांना दोन मुले व एक मुलगी असून तिघेही विवाहित आहे ‘त्यांचा मुलगा संजय मांडे याच्या नावावर अडीच एकर शेती असून त्याला 9 वर्षांचा लहान मुलगा आहे अडीच एकर शेतामध्ये संजय आपल्या परिवाराचा गाडा काबाडकष्ट करून ओढत होता !संजयने ग्रामीण बँकेत सिंदखेडराजा शाखेतून तीन लाख रुपये तर ‘बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे 70 हजार रुपये व महिंद्रा फायनान्स चे दीड लाख रुपये असे एकूण सुमारे पाच लाख 70 हजार रुपये कर्ज संजय वर झाले होते !कर्जाची परतफेड करायची म्हणून संजयने सोयाबीन व कपाशीची लागवड केली होती सुरवातीला पिकाची परिस्थिती चांगली होती मात्र अतिवृष्टीमुळे संजय च्या स्वप्नांचा चुराडा झाला मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी झाली त्यामुळे त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर संजयला दिसू लागला .कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत तो बेचैन राहायचा अशातच त्यांनी शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी विषारी कीटकनाशक औषध प्राशन केले संजय ला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परिस्थिती हाताबाहेर जात असतांना पाहून संजयला तेथून जालना येथे दवाखान्यात नेण्यात आले परंतु उपचार सुरू असताना 21 नोव्हेंबर ला संजय चे निधन झालेशेव विच्छेदन केल्यानंतर संजय वर सावखेड तेजन येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले ।संजय च्या पाठीमागे पत्नी मुलगा भाऊ आई-वडील असा बराच मोठा आप्तपरिवार आहे संजयच्या जाण्यामुळे परिसरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे !

जिजाऊंच्या माहेरात मावळ्यांनी उभारलाय शिक्षणाचा गड!लोकसहभागातून साकारल्या बोलक्या भिंती.

0

 

एकीकडॆ कोविड19 मुळे जग थांबलं असतांना सर्वसामान्य माणूस हा पोटाची खळगी कशी भरल्या जाईल याच विवंचनेत होता. लॉकडाऊनच्या काळात काय करावं हे सुद्धा कुणालाच काही कळत न्हवत, मात्र दुसरीकडे याच लॉकडाऊनच्या काळात शहर आणि गावच्या गावं ओसाड होऊन थांबली होती. एका गावात मात्र शिक्षणाचं महत्त्व आणि गोडी वाढावी यासाठी गावकरी आणि गावातील तरुण अहोरात्र झटत होते. सोशल डिस्टन्ससिंगचा वापर करत लोकवर्गणीतून बोलक्या भिंतीचे काम यागावातील तरुणांनी हाती घेतलं आणि बघता बघता शिक्षणासाठी उभारलेली ही लोकचळवळ उदयास आली. तर चला मग पाहुयात शिक्षणाचा झरा घरा-घरात पोहचवणार्या या आदर्श गावाची कहाणी.
(Plz see the visuals – गावचे व जिल्हापरिषद शाळेचे शॉट्स )

महाराष्ट्रातील राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यात ताडशिवणी नावाचं हे छोटसं गाव. आता या छोट्याश्या गावातील ही शाळा बघून तुम्हाला सुध्दा प्रश्न पडला असेल खरंच का ही जिल्हापरिषदची शाळा? पण ही दिसणारी दृश्य वास्तव दर्शवणारी आहेत. याच जिल्हापरिषदेच्या शाळेचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांन सोबत याचं छोट्या शाळेत शिक्षण घेऊन आज मुंबई येथे मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून पोहचलेल्या एका व्यक्तिमत्वाचा सुद्धा तेवढाच मोठा सिंहाचा वाटा आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून राज्यातील शिक्षणाचा कार्यभाळ सांभाळणारे सिद्धार्थ खरात या वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन राज्यसमोर शिक्षण क्षेत्रातील हा शैक्षणिक गड राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरात या स्थानिक मावळ्यांनी रचलाय.

सिद्धार्थ खरात, सहसचिव,उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय मुंबई.

प्रायव्हेट शाळांमध्ये आकर्षक इमारत, विविध रंगाने रंगलेल्या भिंती आणि अत्याधुनिक सुख सुविधा दिसून येतात. मात्र ग्रामीण भागात छोट्याशा खेड्यात कोण अशी शाळा उभारणार? आणि उभारली जरी, तरी सुद्धा एवढी फी सामान्य शेतकरी व मजुरांची मुलं भरू शकतील का? त्यामुळे आजही ग्रामीण भागात पडझड झालेल्या, जीर्ण इमारत असलेल्या, जिल्हापरिषदच्या शाळा दिसून येतात. पण आता ताडशिवणी गाव याला अपवाद ठरलंय. गावातील जिल्हापरिषदच्या शाळेचा कायापालट करून त्याचबरोबर गावातील विविध घरे,शौचालय, व इतर भिंतीवर देखील शिक्षणाशी संबंधित आकर्षक पेंटिंग व स्लोगन सुविचार विविध चित्र काढून नव्या पिढी समोर शिक्षणात रुची निर्माण व्हावी यासाठी या बोलक्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत.

जितेंद्र भांबर्डे,- स्थानिक गावकरी
विठ्ठल चव्हाण – स्थानिक गावकरी

जिल्हापरिषदची शाळा म्हंटली म्हणजे निधी कोण देणार? कधी मंजूर होणार? यासर्व गोष्टी मध्ये न पडता गावकऱ्यांनी 50,100,500 रुपये आप आपल्या परीने जमा करून लोकवर्गणीच्या माध्यमातून शिक्षणाचं हे नंदनवन उभं केलंय. येणाऱ्या काळात राज्यातील प्रत्तेक गावांनी जर हा आदर्श घेतला तर नक्कीच ताडशिवणी पॅटर्न राज्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे शेतकरी मजूर व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांन मध्ये गावा गावात शिक्षणाची गोडी निर्माण होण्याचं काम होईल. ओसाड आणि मृत पडलेल्या जिल्हापरिषदच्या शाळा मधून पुन्हा एकदा नवीन राष्ट्र निर्माण करणारे, मंत्रालयातील सिद्धार्थ खरात यांच्या सारखे वरिष्ठ अधिकाऱ्यांन सारखी उच्चशिक्षित अशी युवा साक्षर पिढी या बोलक्या भिंती बघून उदयास येत राहतील.

आज रात्री मुख्यमंत्री जनतेशी सवांद साधणार , करु शकतात मोठी घोषणा

0

 

मुंबई : विविध मांगणी साठी विरोधी पक्ष आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे तर आज देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवाळीनंतर वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे लॉकडाउन किंवा वीज बिल सवलतीबद्दल उद्धव ठाकरे यावेळी काय घोषणा करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आज रात्री 8 वाजता जनतेशी फेसबुक, युट्यूबवर लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधणार आहे. ते राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राज्यभरात सोमवारपासून आंदोलनाचा इशारा मनसेनेही दिला आहे. विशेष म्हणजे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलाच्या दरात सवलत देण्यास नकार दिल्यामुळे राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीज बिल सवलतीबद्दल काही घोषणा करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे राज्यातील शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहे. पण, स्थानिक पातळीवर महापालिकांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. नागपूर, पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतात का, की काय हेही पाहणे पण खूप महत्वाचे ठरू शकते

माजरंम गावात साकारणार गाव जल सुरक्षा व शाश्वत आराखडा

0

 

नायगाव प्रतिनिधी: सेवावर्धिनी व संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून साकारत आहे जलदुत प्रकल्प
सेवावर्धिनी व अॕटलास काॕपको संस्थेचा संयुक्त उपक्रम
मांजरम ता.नायगाव येथे संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी व सेवावर्धिनी संस्था पुणे यांच्या माध्यमातून महत्वकांक्षी जलदुत प्रकल्पाची अंमलबजावणी लोकसहभागाच्या माध्यमातून होत आहे.ग्रामस्तरावर पाणी वापर,पाण्याचे महत्व व व्यवस्थापन तसेच मृद व जलसंधारण कामाची शाश्वतता निर्माण करणे व गावात जलव्यवस्थापन समितीद्वारे पाणलोट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा उद्देश जलदुत प्रकल्पाचा आहे.सदरील प्रकल्पाच्या अनुषंगाने दि.20 नोव्हेंबर रोजी जल सुरक्षा व शाश्वत आराखडा संदर्भात प्रबोधनपर कार्यक्रम जेष्ठ नागरिक श्री गोपाळ पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.या प्रसंगी सेवावर्धिनी संस्था पुणे येथील अधिकारी श्री हर्षण पाटील यांनी गावक-यांना जल सुरक्षा व शाश्वतता आराखडा तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. शिवारातील जमिन,जंगल ,पाणी तसेच खडकाचा अभ्यास यातुन पाण्याचा ताळेबंद मांडणे व मृद ,जलसंधारण उपक्रम प्रस्तावित करणे तसेच प्रकल्प अंमलबजावणीसाठी खाजगी कंपनी,संस्था व शासनस्तरावर जलव्यवस्थापन समितीद्वारे पाठपुरावा करणे व एकंदरीत गाव पाणीदार बनवून गावाचा सर्वांगिण विकास साधणे आदी बाबत गावक-यांना प्रेरित करुन गावात पाणलोट चळवुन तयार करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था जलदुत श्री गंगाधर कानगुलवार यांनी केले व आभार प्रदर्शन श्री शिवाजी गायकवाड यांनी केले. सदरील कार्यक्रमासाठी श्री भास्करराव गायकवाड,संभाजी पा. शिंदे,सुर्यकांत पा.शिंदे,बालाजी शिंदे,विश्वनाथ पा. शिंदे,व्यंकट शिंदे ,विद्याधर जांभळे,गंगामणी श्रीगिरे व ग्रामस्त उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विश्वनाथ पाटील शिंदे,व्यंकटराव शिंदे व शिवाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
कोरोणाचे सर्व नियमांचे​ पालन करून सोशल डिसटंस राखुन हा क्रार्यक्रम पार पाडण्यात आला आहे.

ए टी एस आणि पोलीसांची सयुक्त कारवाई , दोन पितूलसह तीन काडतुस हस्तगत – -आरोपीस अटक

0

 

(सूर्य्या् मराठी न्युज )

साखरखैर्डा बसस्थानकावर साखरखेर्डा पोलीसांनी ए टी एस च्या मदतीने स्थानिक आरोपीस मुद्दैमालासह अटक केली आहे . उपरोक्त घटणेमुळे गावात खळबळ उडाली आहे .
साखरखेर्डा बसस्थानकावर एका कुरीयर वाल्याकडून एक पार्सल घेऊन जात असतांना साखरखेर्डा येथील गोपाल रामसिंग शिराळे या युवकाला ए टी एस पथकाने साखरखेर्डा पोलीसांच्या मदतीने पकडले . आज दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यात आली . पोलीसांना गुंगारा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला असता , अगोदरच पोलीसांनी सापळा रचला असल्याने त्याला पकडले . साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये आणले असता शासकीय कर्मचारी पंचासमक्ष कुरियरने आलेला बाॅक्स उघडला असता , त्यामध्ये दोन पिस्तूल सह मॅगझीन आढळून आले . गोपाल शिराळे यांच्यावर या अगोदर अनेक गुन्हे दाखल आहेत . आजच्या या मोठ्या कारवाई मुळे साखरखेर्ड्यासह संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . या कुरिअर संबंधीत गावातील काही व्यक्तींचा संबंध असू शकतो का ? या दिशेने पोलीस आणि ए टी एस पथक तपास करणार असल्याचे समजते .दरम्यान अकोला येथील ए.टी .एस .च्यापथकाने केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण साखरखेडा व परिसरामध्ये खळबळ माजली आहे !आता आणखी कोणकोण या प्रकरणाशी संबंधित आहे याची चौकशी आता पोलिस करत आहेत !ची माहिती साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिली आहे ।

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ . सी . पी . जायभाये यांची शिंदी येथील डाळिंब बागची पाहणी !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

शिंदी येथील बागायतदार तथा सरपंच विनोद खरात यांच्या डाळिंबाची चर्चा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये असते कोरडवाहू जमिनीवर त्यांनी 50डाळींबाचे लाखापर्यंत उत्पन्न घेतलेले आहे !त्यांचे डाळिंब बांगलादेश मध्ये निर्यात होत असतात !अनेक लोक त्यांच्या डाळिंबाच्या बागेची पाहणी करून जातात !असेच आज 21 नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर .सी .पी .जायभाये .तसेच त्यांच्या सोबत असलेले कृषी विभागाचे डॉक्टर बिपिन राठोड हवामान निरीक्षक कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांचे अनिल जाधव !यांनी संपूर्ण डाळिंब बागेची तसेच पेरू लागवडीची पाहणी केली व आणखी उपाययोजना सुचवल्या यावेळी कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे ‘शरद खरात . बागायतदार तथा सरपंच विनोद खरात ‘गजानन भांड अजय खंडागळे बद्री वायाळ मधुकर खरात ।सचिन खंडारे ‘आधी शेतकरी या वेळी उपस्थित होते ‘यावेळी डॉक्टर जायभाये व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतातील डाळिंब बागेची असलेली देखभाल तसेच पेरूच्या बागाची पाहणी केली !

रविकांत तुपकरांच्या प्रयत्नांना यश..अखेर बुलडाणा जिल्हा महावितरणला 10,500 KL ऑईल मिळाले.. जळालेली विद्युत रोहित्रे बदलून मिळण्याचा मार्ग होणार सुकर..

0

 

बुलडाणा जिल्ह्यात जळालेली विद्युत रोहित्रे बदलून मिळण्यासाठी लागणारे ऑईल नसल्याने विद्युत रोहित्र बदलुन मिळत नव्हते. यासंदर्भात ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांनी काल (दि.20 नोव्हें) मुंबई येथे राज्याचे ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष / एम.डी. असीम गुप्ता व राज्याचे साहित्य व्यवस्थापनाचे मुख्य अभियंता पराग जांभुळकर यांची भेट घेतली होती. बुलडाणा जिल्ह्यासाठी जळालेले विद्युत रोहित्रे बदलून देण्यासाठी लागणाऱ्या ऑईल चा पुरवठा करण्याची आग्रही मागणी रविकांत तुपकरांनी केली होती. ऑईल नसल्या कारणाने जळालेले विद्युत रोहित्र बदलून मिळत नव्हते. शेतात पाणी आहे पण विद्युत रोहित्र जळाल्याने शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नव्हते. त्यामुळे शेतकरी परेशान आहेत. रविकांत तुपकरांच्या प्रयत्नाने बुलडाणा जिल्ह्यासाठी 10,500 KL ऑईल मिळाले आहे. त्यामुळे आता जळालेली विद्युत रोहित्रे बदलुन मिळणे अपेक्षित आहे. याउपरही महावितरणने विद्युत रोहित्रे बदलून देण्यासाठी टाळाटाळ केली तर ‘स्वाभिमानी’च्या स्टाईलने धडा शिकवला जाईल..! असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.

देशातील गरीब रुग्णांना स्वस्तात औषधं उपलब्ध करून देणार अर्जुन देशपांडेंची युनीक आयडिया“

0

 

 

माननीय श्री रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीने जेनेरिक आधार मध्ये आर्थिक तसेच नैतिक समर्थन केले. देशात सध्या करोना व्हायरस विरुद्धची लढाई सुरू आहे. जेनरिक कंपनीच्या माध्यमातून अर्जुनने एक मिशन हाती घेतले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि पेशनवर जगणाऱ्या लोकांना औषधे कमीत कमी किमतीत मिळावी. भारतातील ६०% लोकांना आज औषधं परवडत नसल्यामुळे विकत घेता येत नाही पण ८५ ते ९०% औषधें ही भारतातच बनतात ज्यांना जेनरिक म्ह्टले जाते. त्यामुळे जेनरिक औषधे किमत कमी दरात उपलब्ध करण्याचा अर्जुन देशपांडेंचा प्रयत्न आहे.
येत्या काही महिन्यात जेनरिक आधार चे केंद्र फक्त मुंबई – पुणे नाही तर सांगली, सातारा, मिरज आणि कोल्हापूर, महाराष्ट्राच्या व देशाच्या ग्रामीण शहरात ही सुरू करण्याचा ध्यास अर्जुन ने आपल्या हाती घेतला आहे….

प्रल्हाद भाऊ सोरमारे यांचे सामाजिक काम !बुलढाणा जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णासाठी औरंगाबाद मध्ये राहण्याची व जेवण्याची केली व्यवस्था !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील बहुजन समाजाचे नेते तथा शेतकरी चळवळीतील खंदे कार्यकर्ते ‘प्रल्हाद भाऊ सोरमारेयांनी आपल्या मातृत्वाची नाळ अजूनही जोडलेली असल्याचे दाखवून दिली आहे !कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता प्रल्हाद सोरमारे यांनी !बुलढाणा जिल्ह्यातून उपचारासाठी औरंगाबाद मध्ये कोणत्याही हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या गरजू रुग्णांसाठी समजिक दायित्व म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रल्हाद भाऊ सोरमारे युवा मंच यांच्या वतीने रुग्णांच्या परिवारांची त्यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था बीड बायपास वर असलेल्या न्यू शुभम लॉन वर केली आहे !त्यामुळे गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना हा मोठा आधार झाला आहे !कोरोना च्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी हेळसांड गैरसोय औरंगाबाद शहरामध्ये होत असते परंतु प्रल्हाद भाऊ सोरमारे यांनी मनाचा उदारपणा दाखवल्यामुळे अनेक रुग्णांच्या परिवाराची आता सोय झाली आहे