Home Blog Page 584

पित्याने केली मुलाची हत्या -गुन्हा दाखल

0

 

गजानन सोनटक्के  जलगाव जामोद :- प्रतिनिधी

तालुक्यातील ग्राम भिंगारा येथे घरगुती वादातून पित्याने केली मुलाची हत्या जळगाव ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.
तालुक्यातील ग्राम भिंगारा येथील रहिवाशी रायजाबाई हिरालाल चव्हाण वय २७ वर्ष या महिलेने जळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की दिनांक २२ नोव्हेंबर रोजी ११ वाजेच्या सुमारास तिचा पती हिरालाल मैकालसिंग चव्हाण वय ३०वर्ष व ससुर मैकालसिंग तानसिंग चव्हाण वय ५७ वर्ष राहणार भिंगारा यांच्यामध्ये शाब्दिक वाद होत होता तिचा सूर मृतक हिरालाल ला म्हणत होता की तू इथे माझ्या सोबत राहू नको आणि माझ्या समोर येऊ नको याच्यावर मृतक म्हणाला की तू माझा बाप आहे मी तुला सोडून कुठे जाऊ नाहीतर मला सांग की माझा बाप कोण आहे या कारणावरून आरोपी मैकालसिंग चव्हाण यांनी रस्त्यावरच दगड उचलून हिरालाल च्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले गंभीर अवस्थेत त्याला आम्ही जळगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अकोला येथील विदर्भ हॉस्पिटल मध्ये भरती केले त्या ठिकाणी 23 नोव्हेंबर रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला अशा तक्रारीवरून आरोपी मैकालसींग याच्याविरुद्ध कलम 304 नुसार गुन्हा दाखल करून ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रमेश धामोडे व पीएसआय प्रल्हाद मदन व त्यांचे सहकारी संजय राऊत आणि गणेश पाटील हे करीत आहे पोलिसांनीआरोपीला अटक करून ताब्यात घेतला आहे

वीजबिल सवलती साठी भाजपाच्या वतिने वीजबिल होळी आंदोलन

0

 

 

सुनील पवार नांदुरा

राज्यातील शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आघाडी सरकारने वीजबिलात सवलत देण्यास जाहीर केले होते पण आता याच सरकारच्या ऊर्जामंत्री यांनीच स्वतः वीजबिल बाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकाना ती बिले भरावी लागतील असे स्पष्ट सांगितले दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिल वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी व जनतेला आलेली भरमसाठ विजबिलामध्ये रास्त सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे नांदुरा महावितरण कार्यालया समोर वीजबिल होळी आंदोलन करून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी नांदुरा शहरासह तालुक्यातील भाजपा विजय पाटील, प्रवीण मानकर,शैलेश भाऊ मिरगे,मयुर बघे,अर्चना ताई पाटील,संतोष मुंढे सर्व पदाधिकारी व कार्यकते बहुसंख्यने उपस्थित होते

नांदुरा तालुक्यातील तरूणाचे अमरावती आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

0

 

 

सुनील पवार नांदुरा

शासनाने जप्त केलेली रेती साठा चोरी प्रकरणी रेती तस्कर व पोलीस पाटील यांच्याशी संगनमत करुन महसूल मंडळ अधिकारी चांदुर बिस्वा यांनी कर्तव्यावर कसूर केल्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी नांदुरा तालुक्यातील ग्राम टाकळी वतपाळ येथील प्रमोद दिलीप तायडे यांनी आज दिनांक 23 नोव्हेंबर पासून अमरावती आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चाळीस वर्षीय तरुणाची विहिरीत विषप्राशन करून आत्महत्या…

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चाळीस वर्षीय विजय शंकर केदार हा तरुण इसम दिनांक 23 नोव्हेंबर सकाळी अकरा वाजेपासून घरून बेपत्ता होता त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी या तरुण इसमाचा मृतदेह सुनगाव जवळील शेत शिवार सुनगांव भाग दोन मधील गट नंबर पाचशे वीस दिनेश ढगे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला.सदर इसमाचा मृतदेह सुनगाव येथीलच रामदास केदार यांना दिसून आल्याने त्यांनी गावचे पोलीस पाटील तळवी यांना माहिती दिली. पोलीस पाटील तडवी यांनी सदर घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. सदर घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीआय घुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल तैय्यब अली, पोलीस कॉन्स्टेबल इंगळे, पोलीस शिपाई वावगे यांनी घटनास्थळी धाव घेत, सदर इसमाचा मृतदेह विहिरीतून गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढुन मृतदेहाचा पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तर प्रक्रियेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव जामोद येथे नेण्यात आला. सदर इसम हा विवाहित असून त्याला 9 वर्षीय मुलगा आहे . त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

विज बिलाची सक्तीची वसुली कराल तर स्वाभिमानी स्वस्त बसणार नाही. : गोपाल तायडे

0

 

 

आयुषी दुबे शेगाव

कोविड 19 (कोरोना ) वाढत्या प्रादुर्भागामुळे सरकारने
लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वसामान्य जनता सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत तीन महीने कुठल्या ही कामावर न जाता घरीच राहली. सरकारने आव्हान केल्या मुळे सर्व सामान्यांची जबाबदारी मायबाप म्हणून सरकारची होती. तिथे व्यवस्था करण्यात सरकार कमी पडली. कोनत्याच कामावर न गेल्यामुळे सर्वसामान्य जनता ही आर्थिक संकटात सापडली आहे. अश्यातच विद्युत मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिला मध्ये कोणतीच सूट मिळणार नाही असे वक्तव्य मंगळवारी
प्रसारमाध्यमाशी बोलताना केले. आगोदर वीज बिला मध्ये सूट मिळणार असे आश्वासन विद्युत मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु घुमजावं करीत सरकारने वीज बिल माफ होणार नाही अशी भूमिका घेगली आहे. कोरोना काळात जनतेला घरी बसून. जनतेने वापरलेल्या वीज बिलाची सक्तीची वसुली करण्याचे ठरवले आहे परंतु
राज्य सरकारने वीज बिल माफ करून सर्वसामान्य व शेतककरी जनतेला दिलासा द्यावा. अंन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व शेतकरी, शेतमजुर, कामगार व सर्वसामान्य जनता सह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.

हॉटेलमध्ये गळफास घेऊन तरुण इंजिनिअरची आत्महत्या

0

 

(सूर्या मराठी न्युज) पुणे: ही घटना दुर्दवि असून हा तरुण मोठा स्वप्न घेउन दिल्लीतून पुण्यात आलेल्या एका इंजिनिअर तरुणाने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. असून ही आत्महत्येचे कारण अद्याप ही समजू शकलेले नाही.

जितेंद्रकुमार गुप्ता (वय २९, रा. नवी दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता नोएडातील एका खासगी कंपनीत नोकरीस होते. ते दिल्लीतील राहत्या घरातून बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार तेथे पोलीसाना दिली होती. दिल्लीतून निघालेले गुप्ता मॉडेल कॉलनीत असलेल्या एका हॉटेलमध्ये राहायला आले.
रविवारी (२२ नोव्हेंबर) त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. गुप्ता यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिलेली नव्हती. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांनी नैराश्यातून ही आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी व्यक्त केली. असून पुढील तपास सुरू आहे

भारतीय जनता युवा मोर्चाच्या सेलू तालुका अध्यक्ष श्री.शिवहरी शेवाळे पाटील यांची नियुक्ती

0

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

सेलू तालुक्यातील राजवाडीं येथील युवा सरपंच शिवहरी शेवाळे यांची भा. ज. युवा मोर्चाच्या सेलू तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र भाजपा युवा मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश भूमरे यांनी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे, विरोधी पक्ष नेते श्री. प्रवीण दरेकर, आ. मेघना दिदी बोर्डीकर, माजी मंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. शेवाळे यांच्या निवडीचे उपसभापती श्री. सुंदर गाडेकर, भागवत दळवे , अण्णा रोडगे, बाळासाहेब मते. स्व्हीय सहाय्यक श्री. शंकरअण्णा भोंडवे यांनी अभिनंदन केले आहे

जळगाव जामोद येथे भाजपाने केली विजबिलाची होळी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना अव्वाच्या सव्वा दिलेल्या वाढीव विजबिलाच्या विरोधात वीजबिला ची होळी करून आंदोलन करण्यात आले. स्थानिक तहसील कार्यालयासमोर तालुका व शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज दिनांक 23 नोव्हेंबर ला वीजबिल होळी करण्याचे आंदोलन पुकारण्यात आले होते त्यानुसार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक याठिकाणी गोळा होऊन राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आणि वीज बिल पेटविण्यात आले. या प्रसंगी आ डॉ संजय कुटे यांनी नागरिकांना संबोधित करताना राज्य सरकार याविषयात पूर्णपणे अयशस्वी झाले असून जनतेचा छळ करण्याचा सपाटा च त्यांनी लावला असून हे सरकार प्रत्येक विषयात अपयशी ठरले आहे . याप्रसंगी महाविकास आघाडी सरकार चा निषेध असो, वीजबिल माफी झालीच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना अव्वाच्या सव्वा दिलेल्या वाढीव विजबिलाच्या
यावेळी माजी मंत्री आ डॉ संजय कुटे, नगराध्यक्ष सीमाताई कैलास डोबे, पंचायत समिती सभापती रंजनाताई ठाकरे, उपसभापती महादेवराव धुर्डे गुणवंतराव कपले जिल्हापरिषद सदस्य बंडू पाटील, राजेंद्र उमाळे,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, जिल्हा महामंत्री नंदकिशोर अग्रवाल, गुणवंत कपले, राजेंद्र गांधी, तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, आरती पलन, नगरसेवक शैलेश बोराडे, निलेश शर्मा,रामदास बोंबटकार,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, संतोष ठाकरे, शाकिर खान,संतोष वसतकर, गजानन सरोदे, देवा भैय्या,कैलास पाटील,पांडुरंग मिसाळ, अजय वंडाळे, गोटु खत्ती, परीक्षित ठाकरे, लक्ष्मण पाटील, महादेव वानखडे,गणेश दांडगे, निलेश धुर्डे आदी कार्यकर्त्यां सह शेकडो नागरिक उपस्थित होते.

निर्णय शासनाचा असला तरी शाळा सुरु किंवा बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला

0

शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांची सूर्या मराठी न्युज ला दिली माहिती

शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय हा शासनाने 15 दिवसांपूर्वी घेतलेला आहे. तेव्हा अशी परिस्थिती नव्हती असे असले तरी राज्य शासन शाळा सुरू करण्याबाबत सर्व उपाययोजना करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे शाळांनी पालकांनी संमती पत्र दिलेले आहे. असे असले तरी स्थानिक प्रशासनाला ‘शाळा सुरू ठेवावी की बंद करावी’ याचे अधिकार देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांनी सूर्या मराठी न्युज शी बोलताना दिली. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे ना.कडू कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले असता बोलत होते.

प्रतिकिर्या ना. बच्चू कडू (शालेय शिक्षण राज्यमंत्री)

सोमवार पासून विदर्भातील इयत्ता ९ वी पासूनचा शाळा सुरु होत आहे. आरोग्य प्रशासनाकडून शिक्षक आणि शाळा कर्मचाऱ्यांची कोरोना तपासण्यासुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 6085 शिक्षकांची कोरोना तापासणी करण्यात आली असून त्यापैकी जवळपास 3 हजार रिपोर्ट काल आले आहे. यामध्ये आतापर्यंत 21 शिक्षक कोरोना पोसिटिव्ह आहेत तर उर्वरित 3085 शिक्षकांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.

नवनियुक्त ठाणेदार जितेंद्र आडोळे यांची धडाकेबाज कामगिरी !कुरियर द्वारे गावठी कट्ट्याची तस्करीचा शोध ए टी एस . घेणार –

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

काल दिनांक 21 नोव्हेंबरला साखरखेर्डा बस स्थानकावर दुपारी तीन वाजता स्थानिक साखरखेर्डा पोलीस व अकोला येथील एटीएसच्या पथकाने एका युवकाला गावठी पिस्तूल कुरियर द्वारे द्वारे मागणी केल्याप्रकरणी रंगेहात पकडले !यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती !परंतु या संपूर्ण तपासाच्या केंद्रबिंदू राहिले ते साखर खेर्डा येथील कर्तव्यदक्ष नवनियुक्त ठाणेदार जितेंद्र आडोळे पूर्वीचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या जागी अतिशय संवेदनशील अशा साखरखेर्डा शहरांमध्ये श्री आटोळे यांची नियुक्ती झाली !
व एका महिन्याच्या आतच त्यांनी काल एका युवकाला गावठी पिस्तूल घेताना रंगेहात पकडून दिले !याबाबत ठाणेदार जितेंद्र डोळे यांची बातचीत करताना त्यांनी सांगितले की -गावठी पिस्तूल कुरियर व्दारे येणार हे अगोदर माहीत होते त्यामुळे एटीएम च्या मदतीने गुप्तपणे सापळा रचला व त्यात यशस्वी झालो !आणखीन एक त्यांनी खळबळजनक गोष्ट सांगितली कि -सध्या चा तपास एटीएसच्या ताब्यात असून .कसून चौकशी द्वारे सत्य बाहेर येईल !व व कुरियर द्वारे आणखी किती जण पिस्तूल ची मागणी करत असतील याचाही शोध एटीएसचे पथक घेणार असून कुरियर द्वारे अश्या घटनांना आळा कसा घातल्या जाईल याची सुद्धा चौकशी करण्यात येत आहे !कारण कुरियर द्वारे पिस्तुल ची मागणी असे अनेक जण करत असतील यात शंका नाही त्यामुळे या संपूर्ण चा तपास एटीएस पथक करणार आहे !मी माझे सर्वप्रथम कर्तव्य पार पाडत असतो त्यामुळे यशस्वी असतो !ठाणेदार आडोळे त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ केला तसेच पोलीस स्टेशनचा संपूर्ण चेहरामोहरा आपण बदलणार असून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदैव तप्तर राहू असेही श्री आडोळे यांनी बोलताना सांगितले !ठाणेदार श्री आडोळे यांच्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे