Home Blog Page 589

जातेगांव येथील खाटीक समाजाच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदने सादर

0

 

सचीन  पगारे ,नांदगांव नाशिक

नांदगांव तालूक्यातील जातेगाव येथील अनुसूचीत जातीत असणार्‍या खाटीक समाजाच्या दलित वस्ती व रमाई आवास योजनासह विविध मागण्यांसंदर्भात खाटीक समाजातर्फे अखिल भारतीय खाटीक समाज युवा प्रकोष्ट संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमोल खिरडकर यांनी नांदगांव तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली .
जातेगांव येथील खाटीक समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय खाटीक समाज युवा प्रकोष्ट संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल खिरडकर यांनी खाटीक समाजातर्फे तहसीलदार उदय कुलकर्णी व गटविकास अधिकारी जी. पी. चौधरी यांना स्वतंत्र निवेदने सादर केली. सदर निवेदनात म्हटले आहे की, आम्ही जातेगाव येथील कायम रहिवाशी असून अनुसूचित जाती पैकी हिंदू खाटीक या जातीचे आहोत . आमची जातेगाव येथे १५० ते २०० लोकसंख्या असून आम्हाला बऱ्याच वर्षांपासून दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत आमच्या वस्ती परिसरात कुठलीही विकासाची कामे ग्रामपंचायत व पंचायत समितीने केलेली नाही.सदर समाजाच्या प्रत्येक घरासमोर गटारी व्यवस्था नाही. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जातेगाव येथे पन्नास ते साठ लाखांची कामे झाली. परंतु सदर खाटीक समाजाला या योजनेचा एक रुपयाचाही लाभ दिलेला नाही.आम्हाला त्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. संपूर्ण गावात १४व्या वित्त आयोग योजने अंतर्गत नवीन पाईपलाईन बसवण्यात आली,परंतु आमच्या गल्लीत चाळीस वर्षापासून सिमेंटची जुनी पाईपलाईन असल्याने पाणी व्यवस्थित मिळत नाही. रमाई आवास योजनेअंतर्गत जे घरकुले अनुसूचित जातीला दिले जातात ते मात्र ग्रामसभेने सुचवलेल्या यादीप्रमाणे घेतले जात नाही. अनुक्रमांकाने घेण्याऐवजी पुढील नावे घेऊन त्यांची घरकुले मंजूर केली जातात व खाटीक समाजाच्या लाभार्थ्यांना डावलले जाते असे दिसून येते . या सर्व कारणांमुळे आमच्या हक्काचा निधी आम्हाला मिळत नाही. रमाई आवास घरकुल ग्रामसभेने मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना ठरावानुसार यादीतील अनुक्रमांकानुसार आमच्या लाभार्थ्यांना डावलून पुढील लाभार्थी घेतले जातात हा आमच्यावर अन्याय होत आहे. आमच्या लाभार्थ्यांच्या पुढील जे लाभार्थी घेतले गेले आहे. त्यांना पण लाभ द्यावा ही आमची अपेक्षा आहे. परंतु यादीतील डावलले गेलेले आमच्या लाभार्थ्यांची घरकूले दिल्याशिवाय पुढील घरकूलांचे हप्ते टाकू नये. आमच्या खाटीक गल्लीची दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत पाईप लाईन गटार व्यवस्था व रोड काँक्रिटीकरण किंवा गट्टू बसवणे हे तात्काळ झाले पाहिजे .आम्हाला या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले तर संबंधित अधिकाऱ्यांवर आमच्या समाजावर अन्याय केल्यामुळे आम्ही अनुसूचित जाती-जमाती नुसार कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात येईल.सदर निवेदनामार्फत ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांना विनंती केली आहे.निवेदनाचा स्विकार तहसीलदार उदय कुलकर्णी व गटविकास अधिकारी गणेश पी. चौधरी यांनी केला. सदर निवेदनावर अखिल भारतीय खाटीक समाज युवा प्रकोष्टचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अमोल खिरडकर,संजय खिरडकर,ध्रुवबाळ खिरडकर,शिवाजी खिरडकर,संतोष खिरडकर,सुनीता खिरडकर,भावलाल खिरडकर,नाना खिरडकर,आत्माराम खिरडकर आदींच्या सह्या आहेत.

अतिवृष्टीचा लाभ न मिळाल्यास रस्त्यावर उतरूj. जिल्हा परिषद सदस्य श्री..राजेंद्र लहाने

0

 

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

” वालूर महसूल मंडळासह तालुक्यातील इतर गावातील शेतकर्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळालाच पाहिजे,प्रशासनाने कोणत्या निकषांवर महसूल मंडळातील अतिवृष्टीची नोंद केली याचे सर्वांनाच आश्चर्य व्यक्त केले.वालूर महसूल मंडळ व इतर गावांना अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित ठेवले तर शेतकर्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा वालूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य राजेंद्र लहाने (काका)यांनी प्रशासनला दिला आहे.
सेलू तालुक्यात सर्वच पाचही महसूल मंडळात या वर्षी अतिवृष्टीने शेतीसह खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कापूस, तुर, सोयाबीन भाजी पाला,फळबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे.शासनाने प्रत्यक्षात शेत शिवारातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी असताना काही महसूल मंडळ व गावे या अतिवृष्टी अनुदानाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू केला आहे. तालूक्यातील पाचही महसूल मंडळातील गावातील शेतकर्यांना सरसरगट अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळाला पाहिजे.शासनाने अतिवृष्टी लाभ देण्यासाठी दुजाभाव केल्यास शेतकर्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करु असा इशारा वालूर (ता.सेलू) राजेंद्र लहाने यांनी दिला आहे. यावेळी सेलू पंचायत समितीचे उपसभापती श्री. गणेश मुंडे, नव युवक मित्र मंडळाचे श्री लिंबाजी कलाल, सतीश कलाल, अमोल काकडे कान्हेरवाडीकर, हारून सेठ अन्सारी, माणिक काजळे आदी मान्यवर उपस्थित होते

कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या

0

 

अकोला – अकोला शहरातील न्यू तापडिया नगर येथे पुलाच्या जवळ कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.मोनू काकड असे मृतकाचे नाव आहे.
शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू तापडिया नगर येथे निर्माणाधीन पुलाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी मोनू काकड याच्यावर प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.मृतक मोनू काकडे याची अपराधीक पार्श्वभूमी असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.पूर्व वैमानस्याहून ही हत्या झाली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांनी ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.मृतकाच्या चेहऱ्यावर गंभीर घाव असून चेहरा दगडाने ठेचला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. हत्या केल्याचे कारण अद्यापही समोर येऊ शकले नसले तरी सिव्हिल लाईन पोलिस अधिक तपास करीत आहेत.

येत्या 2 नोव्हेंबर ला सत्याग्रह शेतकरी संघटनेचा अकाल मोर्चा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे केले आवाहन= गणेश सडत कार

0

 

 

शेगाव=जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव तालुक्यात बहरत असलेल्या पीक परतीच्या पावसाने मूग उडीद मका सोयाबीन हा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला तिन्ही तालुक्यात मुंग उडीद मक्का सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यात शासन दप्तरी आनेवारी 70 टक्के ची नोंद असल्याने वस्तुनिष्ठ सुधारित आणेवारी जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्‍टरी 30.000 रू करण्यात यावी करिता येत्या 2 नोव्हेंबर सोमवार रोजी युवा नेते शेख आयाज यांच्या नेतृत्वात सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सह अकाल मोर्चाचे आयोजन शेगाव येथील तहसील कार्यालयावर केली आहे प्रमुख मागण्या. ओला दुष्काळ जाहीर करा. वस्तुस्थिती प्रमाणे 30 पैशाच्या आत आणेवारी जाहीर करा. पीक विम्याचा पूर्ण मोबदला द्या. दुष्काळी अनुदान किमान हेक्टरी 30 हजार विनाअट सरसकट द्या. कोरोना काळातील विद्युत बिल रद्द करा. सीसीआयची कापूस खरेदीव नाफेडची मका ज्वारी सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू करा या मागण्यांसह येत्या सोमवारी अकाल मोर्चाचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी गणेश सडत कार यांनी केले

सेलू, जिंतुर तालुक्यात राष्ट्रवादी युवक, युवती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष कु. प्रेक्षा भांबळे यांनी केले आहे

0

 

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

सेलू तालुक्यातील विविध योजनांची माहिती, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सेलू तालुका अध्यक्ष श्री. माऊली ताठे, महीला तालुका अध्यक्ष सौ. निर्मलाताई लीपने, जिंतूर तालुका अध्यक्ष सौ. मनीषा ताई केंद्रे, युवक तालुका अध्यक्ष श्री. अजय डासालकर पाटील, शिवराम कदम, अमोल गाडेकर, बालाजी हारकळ, अन्वर शेख, इरफान लाला, आकाश चव्हाण, आनंद मुळे आदी मान्यवर उपस्थित होते

न भूतो न भविष्यती असा इतिहास घडवला- सिद्धार्थ त्रिभुवन

0

 

ऋषी जुंधारे
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
वैजापूर

वैजापूर तालुक्यातील नगिना पिंपळगाव चे भूमी पूत्र गावाच्या मातीशी ज्यांनी नाळ जोडलेली आहे असे व्यक्तीमत्व श्री सिद्धार्थ भाऊ त्रिभुवन यांनी त्यांच्या गावात नविन आरोग्य उपकेंद्र मंजूर करून घेऊन तसा शासकीय निर्णय हि पारीत करून घेतला..या कामासाठी त्यांनी व्ययक्तिक 2015 पासून पाठपुरावा करत होते..या कामामुळे त्यांचे तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांकडून कौतुक करून अभिनंदन व्यक्त करण्यात आले🙏 नगिना पिंपळगाव चे उपसरपंच शिरीष त्रिभुवन यांचे लहान बंधू आहेत 🙏

चिचारी गावामध्ये रेशन दुकानदाराची मनमानी

0

 

निलेश चिपडे
संपादक

संग्रामपूर तालुक्यातील चिचारी या गावाला उपलब्ध असलेल्या रेशन दुकानातील माल येवून ४ दिवस झाले असून गावातील दुकानात माल आलेला नसल्याने अद्यापही बंद आहे.

रेशन दुकान हे चिचारी गावाच्या नावाने अाहे, त्यामुळे गावातील रेशन दुकानात लोक रेशन घेण्यासाठी गर्दी करत आहे,परंतु दुकान मालक निमखेङी येथील असल्याने माझ्याच गावी रेशन घेण्यासाठी यावे, अशी मनमानी करत असल्याने गावातील रेशन घेण्यासाठी आलेल्या लोकांना रेशन न मिळाल्याने निराश होऊन माघार घ्यावी लागत आहे.

त्यामुळे या माहमारीच्या काळात रोजगार नसतांना स्वस्त धान्यही मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे..

तसेच संपूर्ण वस्ती आदिवासी असल्याने कंत्राटदार आपला दबाव टाकत आहे,कि रेशन पाहिजे असेल तर माझ्याच गावी यावे लागेल,

*गावात वृद्ध,महिला तसेच घरचे आजारी असताना लहान मुलांना रेशन आणण्यासाठी बाहेर गावात जावे लागत असल्याने आकस्मिक घटना घडत असतात याची प्रशासकीय अन्न पुरवठा अधिकारी यांनी जाणीव करून घ्यावी व तातडीने कारवाई करण्यात यावी.

 

वैजापूर तालुक्यातील २२.६८ कि. मी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात २२.६८ कि. मी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली असून,ही कामे लवकरच सुरू होणार आहेत,अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांनी दिली.
प्रशासकीय स्तरावर या रस्त्यांच्या कामकाजाबाबत कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे मागील आठवड्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सन २०२०-२१च्या तिसऱ्या टप्प्यातील वैजापूर तालुक्यातील विविध रस्त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार तालुक्यातील१४गावांतील जवळपास२३कि. मी लांबीच्या रस्त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्यांची कामे करतांना यादी क्रमांकनुसारच प्राधान्य दिले जाणार असल्याचे डॉ दिनेश परदेशी यांनी सांगितले. या रस्त्यांमुळे तालुक्याच्या विकास कामास मोठा हातभार लागणार असल्याने परदेशी यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले.

स्कार्पिओ ची धडक दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार.. स्कार्पियो चालक फरार शेगाव खामगाव रोडवरील माऊली कॉलेज जवळ मध्यरात्रीची घटना

0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव: काल मध्यरात्री खामगाव कडून शेगाव कडे येणाऱ्या दुचाकीला स्कार्पियो ची धडक लागून दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाल्याची घटना 28 ऑक्टोंबर रोजी रात्री घडली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव येथील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या मरी भान हिरामण बावणे लखन मरी भान बावणे व शेख रज्जाक शेख रहमान हे तिघे दुचाकी क्रमांक एम एच 28 AU 72 65 ने 28 ऑक्टोंबर च्या रात्री खामगाव कडून शेगाव कडे येत होते कनारखेड जवळील माऊली कॉलेज जवळ विरुद्ध बाजूने येणाऱ्या स्कार्पिओ क्रमांक mh-15bn 33 49 ची जोरदार धडक लागली या धडकेत मरीभान हिरामण बावणे व लखन मरीभान बावणे राहणार शिवाजी नगर शेगाव हे दोघे ठार झाले तर शेख रज्जाक शेख रहमान वय 55 राहनार बालाजी फैल शेगाव हे गंभीर रित्या जखमी झाले सदर अपघाताची माहिती खामगाव शेगाव रोडवर पेट्रोलिंग करीत असलेल्या ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी ॲम्बुलन्स मध्ये स्थानिक सईबाई मोटे रुग्णालयात आणले असता तेथे ड्युटीवरील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेख रज्जाक याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच खामगाव येथील पोलिस उपविभागीय अधिकारी व शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली अपघातानंतर स्कार्पिओ चालक घटनेवरून घटनास्थळावरून फरार झाला.

स्वस्थ धान्य दुकानामध्ये सडक्या मक्याचे वितरण पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार …

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वितरण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने विचारणा केली असता जळगाव जामोद येथील पुरवठा विभागाने शेगाव तालुक्यातून खरेदी करण्यात आलेल्याचे समजते.तसेच हा सडका मका गरिबांना वितरण करण्यात येत असुन या मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिठ तसेच किटक,अळ्या मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच हा मका जर जनावरांना टाकला असता जनावरे सुध्दा ह्या दर्जाचा मका खात नाहीत परंतु जळगांव जामोद येथील पुरवठा विभाग हे सडके धान्य गोरगरिबांना खाण्यास देत आहे.तसेच राशन कार्ड धारक हा मका घेण्यास नकार देत आहेत. या मंक्यामुळे राशन कार्ड धारकांना विविध आजार होण्याची शक्यता जास्त आहे.या आजारांना कारणीभूत फक्त पुरवठा विभाग तसेच संबंधित तहसीलदार जबाबदार राहतील. हा सडक्या स्वरपाच्या मक्याची शेगाव येथून आयात केला आहे असे जळगांव जा.येथील पुरवठा अधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले. परंतु सदर मका शेगाव येथून जळगाव जामोद ला आला असताना त्याची पुरवठा विभाग कोणत्याच प्रकारची शहानिशा व पाहणी न करताच जळगाव जामोद तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात येतो हे म्हणजे असे झाले की कान धरुन आणणे आणि शेपूट धरून हाकलून देणे अशा प्रकारचे जळगाव जामोद येथील पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चालू आहे यावर जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांनी याकडे लक्ष देवुन संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी समस्त गोरगरीब राशन कार्ड धारक नागरिकांनी केली आहे.