Home Blog Page 598

नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष मा.बाळासाहेब भोसले यांचा जाहीर सत्कार…

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

प्रहार जनशक्ती पक्ष
वैजापूर च्या वतीने…
ता.प्रमुख ज्ञानेश्वर घोडके व उपतालुकाप्रमुख गणेश पा.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली
शहर प्रमुख विशाल शिंदे यांनी…
मा.बाळासाहेब भोसले यांनी
वैजापूर येथील प्रहार प्रमुख पदाधिकारी यांच्या सह संवाद साधला त्या वेळी …

केलेल्या उत्क्रृष्ट कामाचे कौतुक करत सर्व पदाधिकारी यांचा सत्कार केला…

व यापुढेही पक्षवाढीसाठी जिल्हा अध्यक्ष म्हणून मी खंबीर पणाने आपल्या पाठीशी आहे असे आश्र्वासन दिले…
व दादासाहेब होले यांची ता.चिटणीस तर चांगदेव पवार यांची ता.सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली..

या प्रसंगी अमोल रोठे, नितीन तांबे, आकाश गाडेकर, ज्ञानेश्वर तुरकणे,यांनीही अमोल मार्गदर्शन केले..

त्या वेळी उमेश डुबे, शांताराम वाळुंज, सागर घोडके, माउली घोडके,जितेंद्र फाळके,दिपक गाडेकर, रामेश्वर गाडेकर,दिपक आधुडे,सलीम पठाण, सह इ.पदाधिकारी उपस्थित होते..

आमदार प्रा.रमेश पा.बोरनारे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर.

आज चांडगाव, पानव, लाख पानव येथे आमदार प्रा रमेश पा .बोरनारे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर करून आणलेल्या “2515 योजने अंतर्गत” चांडगाव येथील मारुती मंदीर परिसर पेव्हर ब्लॉक 5 लक्ष रुपये, पानवी खंडाळा येथे जि.प.शाळा परिसर पेव्हर ब्लॉक 5 लक्ष रुपये व पानव खु. येथे जि.प. शाळा परिसर पेव्हर ब्लॉक 5 लक्ष रुपये असे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सरयांच्या शुभहस्ते करण्यात आले.
.
तसेच चांडगाव येथील बंधारा पूर्णत:हा भरल्याने आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर*यांच्या शुभहस्ते जलपुजन केले.
.
.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश पा गलांडे, तालुका प्रमुख सचिन वाणी, जि प सदस्य मनाजी पा मिसाळ, यांची प्रमुख उपस्थिती होती.
.
यावेळी उपतालुका प्रमुख मोहन पा साळुंके,विभागप्रमुख प्रकाश मतसागर,अशोक हाडोळे, सुनिल काका कदम, सिताराम पा वैद्य, शंकर कदम, संदीप बोर्डे, तुकाराम आहेर, कैलास शेळके, सतिश खंडांगळे, राजू गायकवाड, कमलेश आंबेकर, रावसाहेब मोटे, राजुभाऊ बावचे, प्रदिप गायकवाड, राजु गलांडे, अशोक पा राहाणे,रमेश गायकवाड, पोंदे साहेब, त्रिंबक पा गायकवाड, गोरख राहणे,माधव बावचे, संदिप पा गायकवाड, वाल्मिक बावचे,अमोल बावचे, प्रकाश बावचे, आहेर सर,डॉ बावचे, नारायण बावचे व सर्व गावकरी उपस्थित होते.

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन ( मेस्टा) तर्फे भव्य कार्यक्रम आयोजित

0

 

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी

दि 10 /10/ 2020 शनिवार रोजी
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन ( मेस्टा) तर्फे औरंगाबाद येथील हॉटेल सिल्व्हर इंटरनॅशनल येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते… ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
मेस्टा चे संस्थापक अध्यक्ष
श्री संजयजी तायडे पाटिल साहेब हे होते व प्रमुख पाहुणे जि प औरंगाबाद चे शिक्षण विस्तार अधिकारी
श्री रमेश ठाकुर साहेब व मेस्टा चे प्रदेश उपाध्यक्ष श्री यादव साहेब हे होते…उत्कृष्ट कार्या बद्दल सर्व मान्यवरांच्या हस्ते वाळुज येथील हॅपी चाईल्ड इंग्लिश स्कूल चा गौरव करण्यात आले.. त्या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
हॅपी चाईल्ड इंग्लिश स्कूल वाळुज चे संचालक
श्री प्रविणकुमार अग्रवाल सर ,
श्री रविंद्र चौधरी सर व संचालिका
सौ सविता चौधरी मॅडम व
सौ सारिका अग्रवाल मॅडम
यांचे गौरव करण्यात आले..

मेस्टा मराठवाडा पदवीधर निवडणूक लढवणार- संजय तायडे पाटील

0

 

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी

औरंंगाबाद : राज्यात गेल्या सहा महिन्यापासून कोरोना विषाणूच्या महामारीमुळे राज्यातील सर्व शिक्षण संस्था व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांवर उपासमारी व बेरोजगारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत पदवीधर व शिक्षक आमदार यांनी शिक्षण संस्था व शिक्षक वर्गाला कोणतीच मदत व साधी विचारपूस सुधा केली नाही. यासाठी आमच्या हक्कासाठी व अन्याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना (मेस्टा) आगामी येऊ घातलेल्या मराठवाडा पदवीधर निवडणूक लढविण्याची घोषणा शनिवारी पत्रकार परिषदेत मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी केली.
पूढे ते म्हणाले कि, कोरोना महामारीच्या काळात सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्याच प्रमाणे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे संसार उघड्यावार आले. दरम्यान सरकारने कोणतीही शैक्षणिक सुविधा न पुरवता ऑनलाईन शिक्षणाच्या पोकळ गप्पा मारल्या,त्यात एकही अनुदानित किंवा सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना शिकविलेच नाही. परंतू सर्व इंग्रजी माध्यमातील शाळांनी ऑनलाईन शिकवणी शिकवीली असुन ती सुरू आहे. दरम्यान इंग्रजी शाळाच्या विविध समस्या,अडचणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या सोडविण्यासाठी पदवीधर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे तायडे यांनी सांगितले. या निवडणूकीसाठी शैक्षणिक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर अशा जवळपास १८ संघटनानी पांठिबा दिला आहे. तर मराठवाड्यातील विद्यार्थी पालक, इंग्रजी, मराठी, उर्दू शाळाच्या माध्यमातून विनाअनुदानित शिक्षक व बी.एड संघटनी वर्षभरात ७० हजार पदवीधर मतदारांची नोंदणी झाली असून राज्यातील चारही विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका मेस्टा लढविणार असल्याचे तायडे म्हणाले.

जळगाव जामोद शहर या परिसरात सर्रास अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उत.आला आहे हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी

0

 

 

जळगाव येथील सावन साहेबराव वानखडे भीम आर्मी शहराध्यक्ष व कार्यकर्ते जळगाव जामोद पोलिसांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे जळगाव जामोद शहर परिसरात सट्टा पत्ता दारू मटका गुटका पोलीस दूरक्षेत्राचे हाकेच्या अंतरावर हे अवैध धंदे चालतात याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे भीम आर्मी शहराध्यक्ष यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कुटुंब उद्ध्वस्त करत आहे.
या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे भीम आर्मी शहराध्यक्ष सावन वानखडे व कार्यकर्ते जळगाव जामोद पोलिसाला निवेदन देऊन केली आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे तसेच निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, पोलीस महानिरीक्षक अमरावती,पोलीस विभाग अधिकारी यांना पाठवली आहे.

शेतकऱ्याने फिरविला दहा एकरांतील उभ्या पिकामध्ये … ट्रॅक्टर -नरेश धूत

0

 

सोयाबीनच्या अर्ध्याधिक शेंगा पोकळ असल्याने खारपाण पट्ट्यातील सोयाबीन उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे .

यंदा सोयाबीन सोंगणी आणि काढणीचा खर्च जड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत . संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथील शेतकऱ्याने दहा एकरातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला .

शेतकऱ्याने फिरविला दहा एकरांतील उभ्या पिकामध्ये … निरोड बाजार गावातील नरेश धूत यांनी आपल्या 333 गट नंबर मधील दहा एकरातील सोयाबीन ट्रॅक्टरने मोडले . यंदा सोयाबीन पेरणीपासूनच या पिकाला निसर्गाची नजर लागली . पावसाने नको त्यावेळी केलेला कहर खारपाण पट्ट्यातील सर्वच पिकांना मारक ठरला आहे . सोयाबीनचे पीक चांगले येईल या आशेने जिवापाड मेहनत करून उसनवारी , उधारी करून सोयाबीनची मशागत केली . शेंगा भरणीच्या वेळी निसर्गाने दगा दिला व एकदम वातावरणात बदल झाला . यामुळे सोयाबीनची उभी झाडे करपली . सोयाबीनच्या शेंगामध्ये भरलेले दाणे ज्वारीच्या आकाराचे भरले आहेत . सद्यस्थितीत सोयाबीन सोंगणीला आले आहे . एकरी अडीच ते तीन क्विंटलचा उतारा लागत आहे . मशागतीचा एकंदरीत खर्च जवळपास एकरी १५ हजार रुपये लागलेला आहे . उतारा लागत नसल्याने मळणी यंत्रधारकांनी एकरी हजार रुपयांचे दर काढले आहेत . सोंगणी , काढणी आणि आतापर्यंत झालेला खर्च पाहता उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीन सोंगणी करावी की नाही , या मनस्थितीत या भागातील शेतकरी अडकला आहे .

सिल्लोड तहसील येथे तहसीलदार रामेश्वर गोरे यांची बदली.

0

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी
श्री. रामेश्वर गोरे साहेब यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नविन आलेले तहसीलदार श्री.विक्रांत राजपूत साहेब यांचे औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्ष चे सरचिटणीस कैसर आझाद शेख, सिल्लोड शहर यूवक काँग्रेस शहर अध्यक्ष शेख आवेस आझाद ,सेवादल काँग्रेस चे अँड. निंगायत आदीनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .

सुशिक्षित बेरोजगारीने बळी घेतलेल्या नर्सिंगची विद्यार्थिनी कु.जोत्स्ना कैलास तायडे च्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्या व संग्रामपूर तालुक्यात ANM नर्सिंग च्या विद्यार्थिनीचा त्वरित भरणा करावा या मागणीसाठी ,भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ट च्या वतीने दिले जी.प.अधक्ष्यांना दिले निवेदन.

0

 

अतिबहुल आदिवासी संग्रामपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारीमुळे आत्महत्या केलेल्या कु.जोत्स्ना कैलास तायडे हिच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत मिळण्याबाबत व कोविड १९ काळात आरोग्य सेविका म्हणून स्वयंसेवा देणाऱ्या ANM नर्सिंग विद्यार्थिनींचा स्थानिक स्तरावर भरणा करण्याबाबत.

आम्ही सर्व ANM नर्सिंग झालेल्या विद्यार्थिनी सध्या कोविडं १९ च्या काळात जीव मुठीत ठेऊन गेली 2 महीने आरोग्य सेविका म्हणून काम करत आहोत.परंतु त्याचा मोबदला तर काही नाहीच परंतु बेरोजगरी परिस्थितीमुळे आमची उपासमार होऊन अंत्यत हलाखीच्या परिस्थतीत आम्ही जीवन जगत आहोत.या बेरोजगारी अभावीच आमच्याच एक कु जोत्स्ना कैलास तायडे या ANM सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थिनीने दि.19/09/2020 रोजी संग्रामपूर तालुक्यात आत्महत्या सुद्धा केली आहे.आणि अतिबहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यात आरोग्य सेवकांचा अभाव असल्यामुळे आरोग्य यंत्रणा मृत्यूशय्येवर आहे.आशा परिस्थतीत वारंवार निवेदन देऊन सुद्धा शासन/सरकार दरबारी आम्हा ANM नर्सिंग पूर्ण झालेल्या व कोविड योद्धा म्हणून आरोग्य सेविका म्हणून स्वयंसेवा देणाऱ्यांचा कोणताही विचार केला जात नाही ही शोकांतिका आहे.तरी सर्व परिस्थतीचा विचार करून आपण माय बाप सरकारने व शासनाने त्वरीत कोविड योद्धा आरोग्य सेविका म्हणून सेवा देणाऱ्या ANM नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा स्थानिक स्तरावर भरणा करावा ही विनंती. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सदर भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ट संघटनेच्या मागणीला व आंदोलनाला भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा,राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ,भारतीय युवा मोर्चा,भारतीय बेरोजगार मोर्चा या देशव्यापी संघटनांनी समर्थन दर्शविले आहे.यावेळी भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ च्या तालुका संयोजिका .कुआम्रपाली वाकोडे ,दीपाली बोदडे,सुषमा भीलंगे,मनीषा वानखडे,काजल भोटकर, रोशनी गव्हांदे,प्रियंका सोनोने,सपना दांडगे,दीपाली वानखडे,अस्विनी नृपणारायन, यासह बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थीत होत्या.

टिप्पर व ट्रकच्या भिषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी

0

 

-पोलिसांच्या दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर चालकाला वाचविण्यात यश

– जखमींवर हिंगणघाट येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नागपूर मार्गावर आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आंजती शिवारात दोन टिप्पर व ट्रकच्या झालेल्या भिषण अपघातात ट्रक चालक निखिल हरीचंदर वडगावकर वय २४ वर्ष हा ट्रकच्या कॅबिन मध्ये फसून गंभीर जखमी झाला.यावेळी जाम महामार्ग पोलिसांनी दोन तासाच्या अथक परिश्रमाने चालकास ट्रकच्या बाहेर काढून महामार्ग रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी हिंगणघाट येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.या अपघात ट्रकची कॅबिन संपूर्ण चकनाचुर झाली आहे.जाम महामार्ग पोलिसांनी दोन वाहनांना रस्त्याच्या कडेला करीत वाहतूक सुरळीत केली

 

टिप्पर व ट्रक अपघात

नाशिक येथे मेडिकल टुरिझम हब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री छगन भुजबळ पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘ट्रु केअर’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

0

 

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी

पर्यटन, कृषी, चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधासाठी नाशिक जिल्हा संपूर्ण राज्यात ओळखला जातो. त्या बरोबरच नाशिक आता चांगल्या आरोग्य सुविधेसाठीही ओळखला जातो. भविष्यात उत्तम व वाजवी आरोग्य सुविधांसाठी जगातून लोकांनी नाशिकला येणे पसंत करावे यासाठी ‘मेडिकल टुरिझम हब’ निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

देवळाली गांव येथील ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खाटांच्या कोविड केअर सेंटर लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी आमदान सरोज आहिरे, महानगर पालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश गिते, रंजन ठाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी, डॉ. स्वप्निल इंगळे, डॉ.विजय पवार उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कोरोनाच्या उपचारांबरोबरचं इतरही आजरांवर उपचार केले जाणार असल्याने स्थानिक नागरिकांना या लाभ होणार आहे. या रुग्णालयात कोरोनासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांची उभारण्यात करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटर मध्ये 50 आयसीयू बेड्सची व्यवस्था आहे, त्याबरोबरच पुरूषांसाठी 30 व महिलांसाठी 20 बेड्स जनरल वॉर्डची व्यवस्था करण्यात आली असून अद्यावत लॅब, सिटी स्कॅनसह 24 तास मेडिकलची सुविधा देण्यात आली आहे. ट्रु केअर रुग्णालयानेही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वाजवी दरात रुग्णांवर उपचार करावे अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.

ठक्कर डोम आणि पोलीसांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमुळे इतर रुग्णालयांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. कोरोनासारख्या कठीण काळातही खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सुद्धा कुठलाही विचार न करता सेवा दिली आहे. कोरानाकाळात डॉक्टरांनी एखाद्या देवदूतांप्रमाणे काम केले असून ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिकचा मृत्युदर कमी
जास्तीत जास्त तपासणी मोहिम राबवून कारोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण शोधण्यात आरोग्य विभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचा परिपाक म्हणून पॉझिटीव्ह रुग्णांवर तात्काळ उपचार झाले आणि राज्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर कमी ठेवण्यात आपल्याला यश मिळालं असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ यशस्वी करुया!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सातत्याने आढावा घेऊन आपण कोमॉर्बिड रुग्णांच शोध घेऊन कोरोनाला अटकाव करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहोत. परंतु कोरोनाशी लढण्याची सर्वांची सामुहीक जबाबदारी असल्याने शासनाने हाती घेतलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडली तरच कोरोनाला हद्दपार करण्यात आपल्याला यश मिळणार आहे.त्यामुळे शासनाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडावी, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.