Home Blog Page 611

सकल धनगर समाजाचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

0

 

अडगांव बु प्रतिनिधी: दिपक रेळे

तेल्हारा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती / जमाती सुधारणा अध्यादेश 1956 व 1976 नुसार अनुसूचित जमातीच्या अनुसूची प्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन देण्यात आले धनगर समाज आर्थिक सामाजिक राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे अतिशय हलाखीचे जीवन जगत आहे जगातील अत्यंत भव्य व विशाल समजल्या जाणाऱ्या लोकशाही देशात त्याचा कुणीही वाली नाही यावेळी धनगर समाजाच्या वतीने जोरदार जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्य शासनाने धनगर समाजाचा अंत पाहू नये आज जरी शांततेच्या मार्गाने निवेदन दिले असले तरी याबाबत जर शासनाने निर्णय घेतला नाही तर आमदार-खासदार मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला सदर निवेदन हे तेल्हारा तहसीलदार साहेबांना गोपाल मधुकर राव कोल्हे ,श्रीकृष्ण पुंजाजी वैतकार, जिल्हा परिषद सदस्या सौ मीराताई प्रल्‍हाद पाचपोर, सौ सरिता ताई प्रकाश काईंगे, प्रकाश दादाराव काईंगे, युवा कार्यकर्ते सागर एकनाथ खराटे, अरुण भारत ,वैतकार, विजय प्रल्हादराव पाचपोर, महादेवराव लक्ष्मणराव नागे, सुनिल काशिराम घाटोळ, खंडोजी श्रीराम घाटोळ, देविदास रामभाऊ गावंडे, राजेश रवींद्र रत्नपारखी,ज्ञानेश्वर भिकाजी बाजोड, संदीप दौलतराव गावंडे, अतुल सारंगधर नवल कार, गणेश बाळकृष्ण गावंडे, प्रणव गजानन चिंचोलकार, आकाश तांबळे, जितेंद्र गणेश जाधव, विशाल वसंतराव कातखेडे,अतुल सारंगधर नवल कार, शिवहरी प्रल्‍हाद बाहे, अनिल रत्नपारखी, भिकाजी नागे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

आडगाव खुर्द रोड वडोद बाजार पुल वाहुन गेला

0

 

सागर जैवाळ फुलंब्री तालुका प्रतिनिधी

26सप्टेंबर रोजी झालेल्या पावसा मूळे आडगाव खुर्द रोड वडोड बाजार पूल वाहून गेला आहे हा पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे
आकाश भुजंग,रितेश गाडेकर, पंढरिनाथ तुपे,शुभम गाडेकर.आदी उपस्थित होते.

लोकनेते विजय राज शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा:-आज लोकनेते विजयराज शिंदे यांनी नविनच रुजू झालेले जिल्हा पोलिस अधिक्षक मा.अरविंद चावरीया यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी त्यांच्या सोबत मा.अर्जुन दांडगे,नगरसेवक अरविंद होंडे,वैभव इंगळे,गौरव राठोड,अनंता शिंदे,शनिराज ई ची उपस्थिती होती.

पान पिंपरी व विड्याची पाणे पिक विम्याच्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ द्या या मागणीसाठी दिले निवेदन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

पानपिंपरी व विड्याची पाणे ही पिके पिक विमा कक्षात आणून पिंपरी व पानमळा उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा योजना तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी दिनांक 28 सप्टेंबर रोजी बुलढाणा अकोला व अमरावती विभागातील सर्व पानमळा व पिंपरी उत्पादक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, वानखेड, शेगाव,जलंब तसेच जळगाव जामोद तालुक्यातील जामोद सुनगाव जळगाव पिंपळगाव काळे ,चारठाणा, शेंदुर्णी, शिरसोली, मोताळा, तसेच इतर भाग अकोला जिल्ह्यातील दानापूर, वारखेड, सोनवाडी, हिवरखेड, खंडाळा, चंद्रपुरी, आडगाव, उमरा, बोर्डि, अकोट, अकोली जहागीर, शिवपुर, देवठाणा ,अकोलखेड, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, पांढरी, अचलपूर, शिरसगाव, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड ह्या भागातील शिवरात पान मळ्याची व पान पिंपरी यांची शेती करण्यात येते परंतु पानमळा विशिष्ठ रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानमळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत यानंतर आजमितीला या भागात मोठ्या प्रमाणावर पानपिंपरी हे औषधी वनस्पती पिके घेण्यात येते ह्या सर्व भागात मिळुन अंदाजे 500 हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर पानपिंपरी चे पीक घेण्यात येते आयुर्वेदिक औषधी गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे औषधी वनस्पती म्हणून पानपिंपरी या पिकाला संपूर्ण देशात मोठी मागणी आहे या भागात मोठ्या संख्येने वस्ती करून राहत असलेल्या बारी समाजाचे हे परंपरागत पिक असून या भागातील मोठ्या संख्येने मजूर वर्गाची उपजीविका देखील त्या पिकावर अवलंबून आहे व काही शेतकरी स्वमालकीच्या आणि भाडे पट्ट्याच्या क्षेत्रावर लागवड करतात परंतु मागील काही वर्षापासून या पिकाच्या उत्पादनाकरिता येणारा मोठा खर्च गारपीट वादळी वारे अति जास्त व कमी तापमान निसर्गाचा असमतोल किडींचा प्रादुर्भाव यासारख्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती तसेच कृषी विभाग कृषी विद्यापीठ यांची या पिकांची संशोधन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन या बाबत असलेली अनास्था आणि शासन दरबारी याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे शासनाने ह्या शेतकऱ्यांच्या पान पिंपरी व विड्याची पाने या पिकाना पिक विम्याच्या कक्षेत घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन सर्व शेतकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना देण्यात आले निवेदनावर श्रीकृष्ण केदार, गोपाल कोथळकर, तुकाराम काळपांडे, रमेश ताडे,सुनील भगत,मधुकर वंडाळे,पांडुरंग म्हस्के,शालीग्राम धुर्डे,शंकर धुर्डे, संतोष धुर्डे,गोपाल धुळे,हिरामण कोथळकार,नामदेव दातीर,अर्जुन घोलप, सखाराम ताडे,माणिकराव राऊत इत्यादींच्या सह्या आहेत

वैजापुर गंगापुर विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिंकाचे पंचनामे करा – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे थैमान घातले असुन त्यांची झळ आपल्या वैजापुर गंगापुर विधानसभा मतदार संघात देखील मोठ्या प्रमाणात जाणवत असून शेतकर्याची पेरणी झालेली कापुस, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तुर, मुग, ऊस, कांदा, फळबागा आदी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या मुळे शेतकर्या चे प्रचंड अर्थीक नुकसान झाले असुन हाताशी आलेले पिक निघून जाण्याची वेळ शेतकर्या वर आलेली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे कुठलेही निकष न लावता सरसकट पंचनामे करण्यासाठी संबंधित विमा प्रतिनिधी, महसूल यत्रंना, कृषी विभाग यांना आदेश द्यावे..
शेतकर्याना त्वरीत हेकट्ररी रुपये 50000/_ हजार रुपये चे नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी तसेच शेतकर्या नी भरलेल्या पिकविम्याची रक्कम मिळण्यासाठी संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधी नी नुकसानीची तीव्रता लक्षात घेता पिक विमा मंजूर करण्यास आदेश द्यावे जेणेकरून शेतकर्या ना आर्थीक अडचणीतून सावरण्यास मदत होईल असे निवेदन वैजापूर तहसीलदार श्री निखिल धुळधर यांना देण्यात आले या वेळी माजी आमदार भाऊसाहेब( तात्या) पाटील चिकटगावकर ,जिल्हा कार्यअध्यक्ष अभय दादा पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अॅड. प्रतापराव निबांळकर साहेब, पंचायत समिती उपसभापती राजेंद्र नाना मगर, तालुका कार्यअध्यक्ष उत्तम काका निकम,शहर अध्यक्ष प्रेमभाऊ राजपुत, खरेदी विक्री संघ चे संचालक मंजाहारी पाटील गाढे, माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब भोसले, रवींद्र पाटणे,संदिप पवार, बाळुपाटील शेळके ,सागर भाऊ गायकवाड, बापु भाऊ साळुंके , अॅड. प्रदीप चंदने, विश्वात्मक कुहिले, शरद बोरणारे, प्रशांत शिंदे,राहुल साळुंखे ,दादाभाऊ गायकवाड, अविनाश रोकडे, शैलेश निखाडे ,सम्राट राजपुत, यांची उपस्थिती होती…

अकोल्यातील गांजा तस्करी कनेक्शन टूनकीत?

0

 

अकोला गुन्हे शाखेने मोठ्या पहाटे एकाला घेतले ताब्यात

सोनाळा पोलिस स्टेशनच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

अकोला जिल्ह्यातील अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील आडगाव खुर्द व हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील बोरवा या दोन ठिकाणी नूकतीच गांजा तस्करी वर कारवाई करण्यात आली होती. हि कारवाई अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेने केली असून यात तब्बल १ क्विंटल ४६ किलो गांजा जप्त करून दोन आरोपींना अटक केली होती. आता अकोला पोलिसांनी संग्रामपूर तालुक्याकडे मोर्चा वळवला आहे. रविवारच्या पहाटे ४ वाजता दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथील एका व्यक्तीला गांजा तस्करीच्या संशयात अकोला गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली. अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून प्राप्त माहितीनुसार टुनकी येथील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यात उलटसुलट चर्चांना वेग आला आहे. टूनकी हे गाव सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीत येत असून याबाबत सोनाळा पोलिस अजूनही गाफील आहे. अकोल्यातील गांजा तस्करी कनेक्शन ग्राम टूनकी तर नाही ना असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. अकोला गुन्हेशाखेने सोनाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येऊन स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून एकाला ताब्यात घेतले. याची भनक सोनाळा पोलीसांना नसून पोलीस स्टेशनला नोंदही करण्यात आली नाही. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे सोनाळा पोलीस स्टेशनच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अकोला गुन्हे शाखेच्या पथकाने अकोट पोलिस स्टेशन हद्दीतील अडगाव खुर्द येथे राजू सोळंके याच्या घरातून ४० किलो गांजा कैलास पवार व राजू सोळंके या दोघांच्या मालकीचा जप्त केला होता. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील बोरवा येथील शत्रुघन चव्हाण त्याच्या घरातून तब्बल १ क्विंटल ६ किलो गांजा जप्त केला. या दोन कारवाई मध्ये अकोला स्थानिक गुन्हे शाखेने २३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा १ क्विंटल ४६ किलो गांजा जप्त केला होता. याप्रकरणी अडगाव खुर्द येथील राजू सोळंके व वारी हनुमान येथील कैलास पवार या दोघांना अटक करण्यात आली तर बोरवा येथील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला होता. मात्र रविवारी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील एकाला ताब्यात घेतल्याने स्थानिक पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संग्रामपूर तालुक्यात गांजा तस्करीचा मोठा रॅकेट सक्रिय तर नाही ना असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलिस स्टेशन हद्दीत अवैद्य धंद्यांचा बोलबोला

सोनाळा पोलिस स्टेशन नेहमीच अंतर्गत वादातून सुप्रसिद्ध आहे. येथील प्रभारी ठाणेदार अमर चोरे याची पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांसह अवैद्य धंदे करणाऱ्यांवर वचक नसल्याने हद्दीत अवैद्य दारू, वरली मटका, अवैध वाळू वाहतूकीला उद आला आहे. काही दिवस अगोदर पोलिस स्टेशन मधील एका कर्मचाऱ्याने टूनकी येथे गांज्याच्या पूड्या पकडल्या होत्या. मात्र पुड्या विकणाऱ्या सोबत आर्थिक व्यवहार करून प्रकरण रफादफा केले होते. गांजा पकडल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरल्याने त्या कर्मचाऱ्याने अवैद्य दारू वर धाड टाकण्यासाठी आलो असता काहीच सापडले नसल्याचा बनाव करीत वेळ मारून नेली होती. आंधळं दळते कूत्रं पिठ खाते असा कारभार सोनाळा पोलिस स्टेशनचा सुरू आहे. याकडे नव्याने कर्तव्यावर रुजू झालेले कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे

जळगाव जामोद येथे समाज कल्याण विभागा मार्फत 100 % अनुदानावर गटई स्टॉल वाटप

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय जळगाव जामोद येथे आज दि .28/9/2020 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्या. विध्यमानाने आज चर्मकार समाजातील गटई कामगारांना. समाज कल्याण विभागा मार्फत 100 % अनुदानावर गटई स्टोल देण्यात आले. आज जळगाव जामोद येथे. बुलडाणा येथील लीपिक एम .बि .वाघ यांच्या हस्ते
1 प्रमोद गव्हाळे 2 विनोद निबोळकर
3 देविदास पिंजरकर 4 प्रकाश पिंजरकर इत्यादी गटई कामगारांना स्टोल देण्यात आले.

सोनु चौक अकोट येथील मरीमाता मंदिर परिसरातील प्रस्तावित मुत्री घर बाधंकाम रद्द करण्याबाबत निवेदन..

0

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

आजअकोट शहरातशिवसेना,विश्व हिंदु परिषद,बजरंग दल शाखा अकोटयांच्या वतिने अकोट शहर स्थित सोनू चौक येथील मरिमाता मंदिर परिसरात प्रस्तावित मुत्रीघर बांधकाम रद्द करण्याबाबत अकोट तहसीलदार,अकोट शहर पोलीस निरीक्षक तसेच नगरपालिका कार्यालय अकोट यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील सोनु चौक भागात अकोट नगर परिषद द्वारा मरीमाता मंदिर परिसरातील प्रस्तावित मुत्री बाधंकाम करण्यात येत आहे.सदर मुत्रीघर बाधंकाम हे मंदिरापासुन काही फुटावर प्रस्तावित आहे तसेच सोनुचौक हे अत्यंत गजबजलेली बाजारपेठ असुन प्रस्तावित मुत्री घराला लागुन पोस्ट ऑफीस काॅलनी आहे.या मुत्रीघराचे आऊटलेट नाली त्यामुळं हे नाली मंदिरासमोरून जाते.ज्यामुळे या सार्वजनिक मुत्री घरामुळे याभागात मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरू शकते व भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
सदर मुख्य रस्ता हा गजानन महाराज मंदीराकडे जातो या रस्त्यावर अतिक्रमण पुन्हा होवु देऊ नये,हातगाडी फेरीवाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथडा निर्माण होत आहे त्यांना या ठिकाणी बसु देवु नये.सदर परिसरात मुत्रीघर हे आवश्यक आहेच पण दुसऱ्या जागी वळते करावे.या मंदिर परिसरात जर मुत्री घर होत असेल तर आमच्या धार्मिक भावना आहत होत असुन आमच्या भावनाचा आदर करून या परीसरातील प्रस्तावित मुत्री घर हे १५ दिवसात इतर ठिकाणी वळते करावे अशा प्रकारे विंनती या निवेदनातुन करण्यात आली आहे.असे न झाल्यास आम्ही शिवसेना,विश्व हिंदु परिषद व बजरंग दल शाखा अकोटच्या वतीने लोकशाही पद्धतीने अकोट नगर परिषद विरूद्ध आंदोलन छेडु व त्यावरून उद्भवणाऱ्या परिस्थितीस अकोट नगर परिषद मुख्याधिकारी नगराध्यक्ष तथा बांधकाम विभाग जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी शिवसेना गटनेते नगरसेवक मनीष रामाभाऊ कराळे,विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्यकारणी सदस्य गजानन माकोडे,प्रकाश मंगवानी,पप्पू कैसर,परमानंद डोडवाणी,नरेश पारवाणी,सुनील गुप्ता,गोपाल काळे,जगदीश दातीर,विजय पळघाण,प्रवीण बोर्डे,सागर कराळे,बंडू चव्हाण,शिवा टेमझरे इत्यादी सह शिवसैनिक,विश्व हिंदू परिषद,बजरंग दल चे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर*यांच्या विशेष प्रयत्नाने गावातील मंदीर परिसरात “2515 अंतर्गत 5 लक्ष रुपये मंजूर” केलेल्या पेव्हर ब्लॉक कामांचे भूमिपूजन

0

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर.

आज दि२८ रोजी वैजापूर ग्रामीण १ येथे गावातील मंदीर परिसरात “2515 अंतर्गत 5 लक्ष रुपये मंजूर” केलेल्या पेव्हर ब्लॉक कामांचे भूमिपूजन आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच ग्रामपंचायतच्या वतीने #आमदार_साहेबांच्या हस्ते टेबल फैन वाटप करण्यात आले.
.
यावेळी मुख्यमंत्री_श्री_उद्धवजी_ठाकरे_साहेबयांची संकल्पना “माझे कुटुंब.. माझी जबाबदारी..” ही मोहीम आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सरयांनी तालुक्यात सुरू केली आहे.
मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्रत्येक शिवसैनिकांनी गावातील प्रत्येक कूटुंब हे माझे कूटुंब आहे व ती माझी जबाबदारी आहे असे समजावे. यासाठी सर्वांनी नेहमी “मास्क वापरणे, सनिटायझरचा वापर करणे, साबणाने हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वयोवृद्धानी घराबाहेर पडू नये” या नियमांचे नेहमी पालन करावे. तसेच प्रत्येक गावातील सरपंचानी देखील आपल गाव आपल कुटुंब समजावे व गावांची कळजी घ्या आणि स्वतःचीही काळजी घ्या. असे आमदार साहेबांनी या मोहीमेतुन सांगितले.
होय ही लढाई आपण लढणार आणि जिंकणारच!
.
.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, तालुका प्रमुख सचिन वाणी, सजनराव गायकवाड, दौलतभाऊ गायकवाड, प्रविण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकरी उपस्थीत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहापूर येथे शेत रस्त्या साठी जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न तोरणा व मन नदी पात्रामध्ये आंदोलन सुरू..

0

 

 

बुलढाणा जिल्ह्यातील शहापूर,खेटरी, शिरपूर, पिंपळखुटा, चांगेफळ,चतारी, चांदणी या बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील शेता साठी व गावासाठी गेल्या 2006 पासून रास्ता नसल्या कारणामुळे हजारो एकर शेती चे नुकसान होत आहे मजुराला व गावकरी लोकांना जाण्या साठी रास्ता नाही..
वारंवार गावाच्या वतीने निवेदन व ग्रामपंचायत च्या वतीने ठराव देऊन सुद्धा अद्याप पर्यंत मागणी पूर्ण झाली नाही