आणि तातडीने *सेलू तालुका ओला दुष्काळ जाहीर करा”शेतकरी मित्र परिवाराची मागणी
तहसील कार्यालयात जाऊन मंडल अधिकाऱ्यांना दिले निवेदन
निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेल्या “संपूर्ण कर्जमाफी” या महत्वाच्या आश्वासनाचा विसर पडलेल्या महायुती सरकारने तत्काळ संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांची पूर्णता सरसकट कर्जमाफी करून आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या या आक्रोशाकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.farmernews
परंतु शेतकऱ्यांना दिलेला शब्द आणि शासनाची कृती यात प्रचंड तफावत दिसून येत असल्यामुळे शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. अतिदृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे सोयाबीन पिकावर येल्लो मोजक नावाचा रोग आलेला आहे या रोगामुळे सोयाबीनचे पीक नष्ट झालेले आहे.
Pikvimanews /पावसामुळे आणि रोगामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे कापसावर बुरशी तुरीचे पीक नष्ट झाले आहे शेतकऱ्यांनी पिक विमा काढला परंतु पिक विम्याची रक्कम शेतकऱ्याला मिळेल की नाही या विचारात शेतकरी भ्रमित आहे शेतकऱ्याची आवाज म्हणून शेतकरी मित्र परिवारातर्फे आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
Farmernews/शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांचा शेतात जाऊन झालेल्या पिकाचा नुकसान पंचनामा करून मदत मिळाली पाहिजे याकरिता शेतकरी मित्र परिवाराचे अध्यक्ष रवी भाऊ वाघमारे उपाध्यक्ष रामभाऊ सोनटक्के सचिव रामेश्वर घंगारे स्नेहल कलोडे दत्ताभाऊ कोपरकर अजय कलोडे आशिष सातपुते अनुप वाघमारे संजय तळस धनराज झिलपे नरेंद्र सुरकार गुड्डू शेख इत्यादी शेतकरी उपस्थित होते