sambhaji raje chhatrapati/ शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती आक्रमक महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची राज्यव्यापी आंदोलनाची तयारी

0
580

 

sambhaji raje chhatrapati:पुणे : कर्जमाफी मुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारने निवडणुकीच्या पुर्वी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते परंतु सत्तेत आल्यानंतर सरकारला कर्जमाफी चा विसर पडला आहे. कर्जमाफी च्या प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, याबाबत पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ऑनलाईन बैठक बुधवार, दि.१६ एप्रिल २०२५ रोजी पार पडली.

राज्यातील चारशे पेक्षा अधिक प्रमुख पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मते ऐकुन घेत संपूर्ण राज्यातील परिस्थिती जाणून घेतली.

Zapuk Zupuk trailer/ लवकरच येणार ‘झापुक झुपूक’ सूरज चव्हाणच्या प्रेम, अॅक्शन आणि ड्रामाच्या रंगात रंगवणा

विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आता सत्तेवर असलेल्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन शेतकऱ्यांना मारक ठरले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे, याला पुर्णपणे सरकारच जबाबदार आहे. कर्जमाफीचा प्रश्न सरकारने गांभीर्याने सोडवला नाही तर स्वराज्य पक्ष राज्यात मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.

स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन सरकारच्या आटोक्याच्या बाहेर असल्याचा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी बैठकीत बोलतांना दिला.

कर्जमाफी प्रश्नासोबतच पिक विमा, अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले त्याची भरपाई, रासायनिक खते, किटकनाशके व बी बियाण्याचे वाढलेले भाव या करीता आंदोलनाची दिशा जाहिर करणार असल्याचे सुतोवाच यावेळी देण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित आणुन सरकारला गुडघे टेकवायला भाग पाडु तरी सुद्धा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केल्या शिवाय स्वराज्य पक्ष आता थांबणार नाही. दोन दिवस सरकारच्या निर्णयाची वाट पाहु अन्यथा भुमिका जाहीर करु असे रांजेंनी बैठकीत बोलतांना सांगितले.

sambhaji raje chhatrapati:या बैठकीकरिता स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, स्वराज्य किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर, उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर, माधव देवसरकर, अंकुश कदम, रघुनाथ चित्रे, केशव गोसावी, ज्ञानेश्वर थोरात, रुपेश नाठे, महेश गवळी, निलेश पवार, रोशन खैरे, सचिन पाटील, मेतकर पाटील, सागर पवार, खंडु पवार यांचे सह राज्यभरातील चारशेहून अधिक प्रमुख पदाधिकारी बैठकीत सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here