अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक
बुलढाणा:-आज-काल वाढदिवसाची परंपरा चांगलीच दृढ होत आहे.खाजगी,सामाजिक, राजकीय,धार्मिक,शैक्षणिक व इतरही क्षेत्रात यांची चांगलीच दाटी पाहायला मिळते.परंतु यामध्ये अनेक लोक त्यांचा वाढदिवस साजरा करीत असताना स्वखर्चातून तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात संबंधित सामाजिक कार्यकर्ता व राजकीय क्षेत्रात संबंधित राजकीय नेता यांचे वाढदिवस कार्यकर्ते सादरी करत असतात.
परंतु अशी एक अर्थ संस्था आहे की जे विश्वातील सातही खंडात मान्यता प्राप्त आहे.आणि या अर्थसंस्थेचे अर्बन सह शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य आहे.म्हणून या संस्थेची उलाढाल ही अर्बोखर्बो मध्ये असते.या संस्थेत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा अगणित आहे. विश्वातील सात खंडात असलेला सर्वात मोठा खंड आशिया खंड आहे.
या आशिया खंडातील नामवंत अशा संस्थेत,जेव्हा त्यांच्या आला चे वाढदिवस साजरे करतात तेव्हा कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री लावल्या जाते.अशी संबंधित संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बोल्ड चर्चा दिसून येते. दहा ते पंधरा हजार रुपये प्रतिमाह कमवणाऱ्या कर्मचाऱ्याला महिन्याचा घर खर्च भागवतांना किती धावपळ होत असेल अशातच वर्षाकाठी आला यांचे तीन ते चार वाढदिवस साजरे करावे लागतात. याची चांगलीच चर्चा कर्मचारी वर्गात दिसून येते.
तरी व्यवस्थापन मंडळ कर्मचाऱ्यांच्या या आर्थिक लुटीचा विचार करून त्यांच्या मानगट्टीवर करीत असलेले हे वाढदिवस बंद करेल काय ? कर्मचारी अधिनियमाच्या कलमामध्ये आणि कल्याणकारी योजना आहे काय?अशा प्रकारचे प्रश्न जनमानसात फिरत असताना दिसून येत आहे.
Banknews /स्वतःच्या लोकप्रियतेसाठी अन्य कर्मचाऱ्यांना धारेवर धरणे हि कुठली प्रतिष्ठा आहे.त्यामुळे यावर आळा बसेल काय किंवा बसवणे गरजेचे नाही काय?