काँग्रेस कार्यालयात राष्ट्रसंत तकडोजी महाराज जयंती उत्साहात संपन्न

0
198

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचारांनेच हा देश समृद्ध होईल : काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गुस : राष्ट्रसंत तूकडोजी महाराज यांनी देशाच्या स्वातत्र्यलढ्यात भारत छोडो आंदोलनात सहभागी होवून नागपूर व रायपूर येथे तुरुंगवास भोगला स्वातंत्र्य प्राप्ती नंतर महाराजांनी ग्रामीण भागाच्या विकासावर कडे लक्ष केंद्रित करून अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून जात – पात – धर्म विरहित जीवनाची हाक दिली.
महाराजांनी ग्रामगीतेचे लेखन करून
“सबके लिये खुला है
मंदिर ये हमारा”अशी शिकवण दिली
आज दिनांक 30 एप्रिल रोजी घुग्गुस काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रसंताच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज देशात जाती धर्मात सातत्याने द्वेश वाढविण्याचा प्रयत्न होत असून देशाची एकता अखंडता अबाधित राखण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांची अत्यंत आश्यकता असल्याचे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राजूरेडडी यांनी केले
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,रोशन
दांतलवार,विशाल मादर,रोहित डाकूर,रफिक शेख,सुनील पाटील,कपिल गोगला,अंकुश सपाटे,रंजीत राखुंडे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here