(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : घुग्घुस नगरपरिषदेच्या वतीने महिला सफाईकर्मी हे तीन चाकी रिक्षाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे कार्य करीत असतात
मात्र त्यांना देण्यात आलेले रिक्षे हे आता खराब झाले असून शहरात प्रचंड प्रमाणात उन्हाचा तडाखा वाढला असून या भीषण उन्हात तीन चाकी रिक्षा ओढणे हे अत्यंत त्रासदायक असून हे महिला शक्तीचे छळ करण्यासारखे असून मानवीय दृष्टी कोनातून बॅटरीवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष राजूरेड्डी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौ.अर्शिया जुही यांना दिले आहे.