शास्त्री नगर, शिव नगर पाणी व रस्ता समस्या तात्ळीने सोडवा :राजू रेड्डी
(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : वेकोलीच्या सब एरिया कार्यालयात आज 20 मे रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्री नगर,शिव नगर येथील पिण्याचे पाणी व खराब रस्त्यांच्या समस्येला घेवून संतप्त नागरिकांनी सब एरिया मॅनेजर फूल्लारे यांच्या कार्यालयात तब्बल एक तास ठीय्या आंदोलन केल्याने वेकोली परिसरात फार गोंधळ उडाला.
शेवटी सब एरिया मॅनेजर यांनी पाणी समस्या व रस्ता दुरुस्तीचे कामे आठ दिवसात करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यंसह नागरिकांनी कार्यालय सोडले.
वेंकोली वसाहतीतील शास्त्री नगर तसेच वेकोलिने पुनर्वसित शिवनगर वस्तीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याचा पाण्या करिता वॉटर टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे.
चार दिवसा नंतर एकदा पिण्याचा पाणी मिळतो, रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे
सदर समस्या निवारणासाठी काँग्रेस तर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आला याप्रसंगी काँग्रेस नेत्या सौ. पुष्पा कणकम, अविनाश गोगुर्ल,रोशन दंतलवार, रोहित डाकुर,सुकुमार गुंडेटी,देव भंडारी, नूरुल सिद्दीकी,इर्शाद कुरेशी, कपिल गोगला, बालकीशन कुळसंगे, सुनील पाटील,अंकुश सपाटे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.