देवेंद्र फडणवीसांच्या मार्फत मोदींना पाठीविले पत्र
(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्गूस : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रामूळे देशभरात कोरोना पसरला असा बिनबुडाचा व महाराष्ट्रद्रोही वक्तव्य केले.
सदर आरोप हे महाराष्ट्राचे बदनामी करणारे असल्याने प्रांताध्यक्ष नाना पटोले,पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु धानोरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या सूचनेनुसार घुग्गूस काँग्रेस तर्फे पंतप्रधानांचा जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हजारो पत्र पाठवून मोदींनी महाराष्ट्राची जाहीर माफी मांगावी अशी मागणी केली.
फडणवीस हे महाराष्ट्राचे भाजप पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हेतुपूर्वक महाराष्ट्राची बदनामी केली.
कुठल्याही प्रकारे विचार न करता
देशभरात लॉकडाऊन लावला यामुळे नागरिकांची कोंडी झाली
नागरिक रस्त्यावर उघडे पडले संकटाच्या या काळात काँग्रेस ही जनतेच्या मदती करिता रस्त्यावर उतरली आणि हेच कार्य काँग्रेस नेहमीच करीत राहील आपण आपल्या नेत्याला महाराष्ट्राची माफी मागून आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यास बाध्य करावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीचा
अपमान मोदींनी केला आहे
आपण या पापाचे प्रायश्चित्त करावे असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले.
याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष पवन आगदारी,कामगार नेते सैय्यद अनवर,किशोर बोबडे,अलीम शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर, इर्शाद कुरेशी,स्टीवन गुंडेटी, श्रीहरी शेंगारप,सुकुमार गुंडेटी,सौ.पुष्पा नक्षिणे,सौ.सरिता गौरकार,सरस्वती कोवे,सौ.दीपा बोकडे,लखन हिकरे,विजय माटला,देव भंडारी,रमेश रुद्रारप,कुमार रुद्रारप,विशाल लोणगाडगे,सुमेश रंगारी,सचिन कोंडावार,संजय कोवे,सुनील पाटील,सचिन नागपुरे,सुमेश रंगारी,अय्यूब कुरेशी,साहिल सैय्यद, शेरी कुम्मरवार,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.