आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले
मिळालेल्या माहितीनुसार दि.४/५/२०२१ पासून बेनोडा गावातील पोलीस पाटील गावामध्ये गैरवर्तणुक ,गावामध्ये झगडे लावणे , गावातील शांतता बिघडविणे, व गावामध्ये दहशत करणे,गावामध्ये अवैध धंदयांना प्रोत्साहन देणे व इतर काही भ्रष्टाचाराचे प्रकार घडवीत असल्याबाबत आजपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने व अर्ज देत आलो. परंतु या आमच्या प्रकरणामध्ये कोणतीही दखल घेण्यात आली नाही, तसेच बेनोडा या गावचे पोलीस पाटील हे पद रिक्त करण्यात आले नाही. आनंद वंजारी (माजी सरपंच) तसेच गावातील अनेक ३० ते ४० नागरिकांनी पोलीस पाटील यांच्या होत असलेली गैरवर्तणुक,दबाव तंत्राचा वापर करणे, गावातील शांतता भंग करणे. इत्यादी सर्व बाबतीत तक्रारी केल्या आहेत.
यावर सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा योग्य न्याय मिळत नसल्यामुळे आणि सामान्य सामान्य माणसाचे जगणे मिश्किल झाले असून या पोलीस पाटील पासून गावातील लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.
करिता या प्रकरणाबाबत वाचा फोडावी, व बोनोडा गावातील जनतेला न्याय मिळवून द्यावा.
न्याय न मिळाल्यास आनंद वंजारी (माजी सरपंच) यांनी संबंधित प्रशासनाकडे मागितली आत्मदहनाची परवानगी.