0
317

नांदुरा:-(प्रफुल्ल बिचारे पाटिल)

सध्या शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कोरोना संसर्ग, लसीकरण आणि सामाजिक मूल्यांबाबत कृतिशील जनजागृती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका दौऱ्यावर खासदार रक्षाताई खडसे असतांना शेंबा, टाकारखेडा, बेलुरा, तरवाडी, खैरा, फुली आणि कंडारी आदी गावांना सदिच्छा भेट दिली. यावेळी गावातील गावकऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव संसर्ग व कोविड चाचणीबाबत जागृत करण्यात आले. तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेचा आढावा घेऊन विविध सरकारी योजनांबाबत पूर्ण मार्गदर्शन खासदारांनी गावकऱ्यांना केले. आज नांदुरा तालुका रेस्ट हाऊस येथे खासदार रक्षाताई खडसे व भाजपा नेते मा. चैनसुखजी संचेती माजी आमदार मलकापूर यांच्या उपस्थितीत अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
खारे पाणी पट्टीतील जमीन सिंचनाकृत करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पोकरा योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी खासदारांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. त्याचबरोबर शिधा पत्रिका धारक नागरिकांना रेशन मिळण्याबाबत आणि पिण्याच्या पाण्याची वीज कापणी थांबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यात कोरोनाच्या लढ्यासाठी औषधींचा व इंजेक्शनचा तुटवडा भासल्यास तत्परतेने त्या उपलबध करून दिल्या जातील; रुग्णांसाठी अवश्यक असलेली सर्व मदत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त वेगाने कोरोना संसर्ग आणि लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम गावा-गावात राबविण्यात येण्याबाबत खासदारांनी ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करून जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळा सुरु झाला असून त्यानुसार गावा-गावातील पाणी टंचाईवर प्राधान्याने उपाय योजना राबविल्या जाव्यात. यासोबतच पुढील वर्षासाठी सोयाबीन बियाणे तुटवड्याबाबत आढावा घेण्यात आला असून १४ हजार क्विंटल सोयाबीन बियानाची मागणी पुढील वर्षासाठी करण्यात आलेली आहे. पोकरा योजनेअंतर्गत ट्रॅक्टर वितरण सुरु झाले असून खरेदी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. पोकरा योजनेसाठी ६९ गावांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयात पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी आधार क्रमांक व खाते क्रमांकांसाठी केवायसी केली जात असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच गावकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी गावांना समक्ष भेटी द्या असे आवाहन खासदार रक्षाताई खडसे व चैनसुखजी संचेती यांनी अधिकाऱ्यांना केले. यावेळी पोलीस निरीक्षक, बी.डी.ओ. नगरपंचायत सदस्य, कृषी अधिकारी,शहर अध्यक्ष श्याम राखोंडे, नांदुरा तालुका अध्यक्ष संतोष मुंढे, सुधीरभाऊ मुर्हेकर, महिला शहर अध्यक्ष सारिका डागा, बेटी पढाओ, बेटी बचाओ अध्यक्ष ज्योती तांदळे, शंकरसा ताकवाले, दत्ताभाऊ सुपे, प्रमोद हिवाळे, संजयभाऊ फणसे, ब्रम्हानंद चौधरी, उमेश शंकरसा ताकवाले, लक्ष्मण झांबरे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस विजय पाटील, प्रविणभाऊ मानकर, तालुका व शहर भाजपा अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here