गजानन सोनटक्के जळगाव जा
सुनगाव येथील शालिग्राम लक्ष्मण भगत यांचे शेतामध्ये सात ते आठ महिन्यापूर्वी वन्यप्राण्यांनी शेती पिकाचे नुकसान केले होते याबाबत त्यांनी वनविभाग जळगाव जामोद यांना तक्रार दिली होते त्या तक्रारीवर वनविभागाकडून पंचाणामा देखील झाला होता तरी सात ते आठ महिने होऊन शेतकऱ्याला अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही सुनगाव येथील शेतकऱ्यांने गोराळा प्र जामोद या शिवारात असलेल्या गट नंबर 184 या शेतात सन 2019 20 या वर्षात कपाशी व भुईमुंग पिकाची लागवड केली होती परंतु ऑगस्ट महिन्यात परिसरात असलेल्या वन्य प्राण्यांनी या पिकाची नासधूस केली होती व त्या बाबतीत वनविभागाला तक्रार करून सात ते आठ महिन्यापासून कोणतीच नुकसान भरपाई मिळाली नाही व वनविभागाने याची कोणती दखल घेतली नाही तरी मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सुनगाव येथील शेतकऱ्यांने केली आहे