बहुचर्चित बहुप्रतीक्षेत असलेला ‘खामगाव ते जालना रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा …रवींद्र मगर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

0
379

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

अतिशय महत्त्वाचा व बहुप्रतिक्षित असलेला ‘खामगाव ते जालना या रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर केंद्र सरकारने सुरू करावे ‘यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करण्याची विनंती मुख्यमंत्री यांना दिनांक 25 एप्रिल ला पाठवलेल्या निवेदनामध्ये साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मगर यांनी केली आहे ‘राज्यातील विदर्भ व मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा बहुप्रतिक्षित खामगाव-जालना या नवीन रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित आहे हा रेल्वे मार्ग निर्माण व्हावा ही खूप जुनी मागणी आहे 155 किलोमीटर अंतर असणारा हा रेल्वे मार्ग निर्माण होणे या भागासाठी अतिशय आवश्यक आहे व्यापार ,शिक्षा ,रोजगार ,परिवहन, पर्यटन, अधि घटकांना या मार्गामुळे चालना मिळणार आहे .
यासाठी सन 2016 – 17 मध्येकेंद्र सरकारने आर्थिक बजेट मध्ये यासाठी ३ ‘००० हजार कोटी रुपयांची विदर्भ व मराठवाडा या दोन विभागांना तरतूद केली होती
तसेच केंद्र सरकार मधील रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे एक पथक या मार्गाची पाहणी करून गेले होते ‘परंतु त्यानंतर अजूनही याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही ‘तरी मराठवाडा व विदर्भ या विभागांचा विकास होण्यासाठी हा रेल्वेमार्ग आवश्यक असून .माननीय मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे रेल्वेमार्ग लवकरात लवकर सुरू करावा यासाठी सतत पाठपुरावा करावा अशी मागणी शेवटी रवींद्र मगर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे ‘

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here