डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या स्वा.वीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी रेणुका डोसे व संजना डाबेराव यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव या उपक्रमाअंतर्गत जस्तगाव येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पीक नियोजन व शेतीविषयक शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. शेतीसंबंधी वेगवेगळ्या मोबाईल अप्लिकेशन चा तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चा वापर कसा करावा व त्यामधून पिकांची पडताळणी व तज्ञांचे मार्गदर्शन कसे मिळू शकते तसेच बदलत्या काळासोबत आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास उत्तम शेतीबरोबरच समाधानकारक आर्थिक उत्पन्न मिळू शकते हे पटवून दिले.कृषी दूतांनी कपाशीच्या पिकावर असलेल्या किडीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या याविषयी चर्चा केली. कृषिदूतांच्या या कार्याला जस्तगाव येथील प्रतिष्ठित शेतकरी तेजराव पाटील, रामदास डोसे, विजय पुंडे, दामोदर डोसे तसेच इतर शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला.या उपक्रमासाठी कृषीदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर, कार्यक्रम अधिकारी व वनस्पतीशास्त्र विषयतज्ञ प्रा. अविनाश आटोले सर, कार्यक्रम समन्वयक वि.टी. कपले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.







