गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती तसेच भारताचे माजी पंतप्रधान ज्यांनी जय जवान जय किसान चा नारा दिला असे लालबहादूर शास्त्री यांचीही जयंती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संपन्न झाली. सर्वप्रथम महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामपंचायत सुनगाव तर्फे गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गावामधून किराणा दुकान जनरल स्टोअर मेडिकल कृषी केंद्र या ठिकाणी जमा झालेला प्लास्टिकचा कचरा गोळा करीत तसेच गावातील मेन रस्ता झाडून व त्यावरील कचरा गोळा करून गाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले हे अभियान राबविताना गावातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. अभियान राबविताना जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई काळपांडे, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, मंडळ अधिकारी चोपडे, तलाठी केदार,तलाठी वाघ, ग्रामसेवक देवरे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई, बळीराम धुळे, संतोष वंडाळे,सौ.कुरवाडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत कपले, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ,परिक्षित ठाकरे,काटोले,अशोक काळपांडे,समाधान काळपांडे,मोहनसिंह राजपुत, प्रविण धर्मे,विजय भड,उमेश कुरवाडे, पत्रकार गजानन सोनटक्के, अनिल भगत, यांच्यासह जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्यासह ग्रामपंचायतचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.