गजानन सोनटक्के जळगाव जा
स्वाभिमानीच्या रणरागिणी पुजाताई मोरे यांचा जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झंझावात दौऱ्याला सुरूवात. श्री संत सखाराम महाराज संस्थान ईरोला येथुन आशिर्वाद घेऊन २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संताप मोर्चात शेतकऱ्यांनी आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी एकत्रित सहभागी व्हा असे आवाहन गावा गावात शेतकऱ्यांना करीत आहे. पुजाताई मोरे यांच्या जळगाव जामोद मतदारसंघात झालेल्या एंन्ट्रीने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणजे पुजाताई मोरे, राज्याच्या पटलावर गाजलेले अनेक आक्रमक भाषणे चर्चेला आहेत. उद्या जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांचा प्रश्नावर २९ ऑक्टोबरचा प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात संताप मोर्चा हा ऐतिहासिक होणार असुन मोर्चात शेतकऱ्यांनी संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पुजाताई मोरे यांनी केले आहे.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


