विदर्भातील नावलौकिक व सर्वांत मोठी यात्रा महोत्सव असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेकडो वर्षापासूनची सोनाळा येथील श्री संत सोनाजी महारांजाची यात्रा रद्द ; भाविक भक्तामध्ये हिरमोड

0
596

 

अनिलसिंग  चव्हाण, (मुख्य संपादक)

संग्रामपूर. विदर्भातील नावलौकिक व सर्वांत मोठी यात्रा महोत्सव असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा परिसरातील आरध्य दैवत समजल्या जाणाऱ्या श्री संत सोनाजी महाराजांचा रथोत्सव,व यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो.परंतु मागील वर्षाप्रमाणे कोरोनामुळे यावर्षीही हा उत्सव रद्द करण्यात आला.त्यामुळे हजारो भक्तांचे हिरमोड झाली आहे.
शासनाने सर्व धार्मिक स्थळे नियमाचे पालन करीत उघडण्याचे आदेश दिले.सर्वत्र मंदिरे खुली करण्यात आल्याने भक्तांमध्ये उत्साह आला.दिवाळी नंतर पोर्णीमेच्या दिवशी पासून सोनाळा येथे रथपूजन ,पालखी सोहळा,रथ मिरवणूक ,काला होवून शेकडो क्विंटल चा महाप्रसाद शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार आयोजित केले जात आहे. यावर्षी सुद्धा भागावत व प्रवचन,किर्तनासह सात दिवस आणि .१९/नोव्हेंबर ते २१नोव्हेंबार पर्यंत साजरा करण्यात येत होता,यासाठी आमदारासह ईतर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व धार्मिक नागरिक भाविक भक्तांनी शासनाकडे परवानगी साठी प्रयत्न केलेत.परंतु असफल झाले. कोरोना महामारीचा वाढता प्रभाव लक्षात घेत या वर्षीचा यात्रामहोत्सव शासनाच्या आदेशानुसार परंपरा खंडीत झाली आहे.व संतनगरीत येणाऱ्या भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन केल्याने परिसरातील व इतर जिल्ह्यातील भाविक भक्तांमध्ये नाराजी होत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सोनाळा गावातील व परिसरातील लग्न झालेल्या वयस्कर महिलांसह नव विवाहित मुली,व इतर नातेवाइक,नोकरीसाठी बाहेर असलेले सर्वच दिवाळीला भाऊबिजेच्या दिवशी माहेरी न येता श्री संत सोनाजी महाराजांचे रथ यात्रा महोत्सवाचे वेळी भाऊबीज ला येवून दिवाळी व यात्रा साजरी करुन सासरी जातात.त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी झाली आहे.
—————————————–
ग्रामीण भागातील सोनाळा व बावनबीर येथील श्री संत सोनाजी महाराज रथोउत्सव,पूजन,पालखी मिरवणूक दहिहांडी काला व महाप्रसादला आमदारासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,धार्मिक व सामाजिक पदाधिकारी ,कार्यकर्ते ,नागरिकांनी विनंती निवेदन देवूनही परवानगी मिळाली नाही.मिळाली ती फक्त मोजक्याच २०ते २५ लोकांसाठी हा सर्व सामान्य जनता व भाविक भक्तांवर अन्याय आहे. श्री संत सोनाजी महाराज यात्रेत विदर्भ सह इतर ठिकानवरून भाविक मोठ्या संख्येने येत असतात .यात्रा रद्द झाल्याने सर्व धर्मीय व भक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here