जळगाव जामोद/पल्लवी कोकाटे
देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून गोरगरिबांचा तोंडातला घास हिरावून घेतला आहे.केंद्रसरकारला मात्र महागाई दिसत नाही बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून कोरोनाचा जखमेवर केंद्र शासनाने मीठ चोळले आहे महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध विषयांवरील जनतेचा या प्रश्नावर जाब विचारण्यासाठी आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचा नेतृत्वात जिल्हाभर निषेध आंदोलन व जेल भरो आंदोलन करण्यात आले.
त्याच पार्श्वभूमीचा माध्यमातून जळगाव जामोद कॉंग्रेसचा वतीने तहसील चौकात केंद्रशासनाचा निषेध करण्यात आला व जेल भरो आंदोलन करण्यात आले.



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



