cbse-curriculum-in-maharashtra-schools:राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
या निर्णयानुसार, 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी CBSE पॅटर्न लागू केला जाणार आहे. पुढील दोन वर्षांत, दोन टप्प्यांमध्ये दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गांसाठीही हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे
प्रेमाच्या विरहातून आत्महत्या; बुलढाण्यातील धक्कादायक घटना (instagram video Live)
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही घोषणा केली आहे. या निर्णयामागे राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर दर्जेदार शिक्षण मिळवून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रातील अनेक पालक आणि विद्यार्थी सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दर्जामुळे त्याकडे आकर्षित होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शिक्षक आणि पालकांमध्ये या निर्णयाबद्दल संभ्रम आहे.
काही प्रश्नांमध्ये स्पष्टता येणे बाकी आहे, जसे की राज्य मंडळाचा अभ्यासक्रम कायम राहणार का? सीबीएसई परीक्षा पद्धती आणि वेळापत्रकाचा अवलंब केला जाणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे महत्त्वपूर्ण आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? असा सवाल विचारला आहे