Home वर्धा Farmernews /नापिकीने खचलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या

Farmernews /नापिकीने खचलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

सिंदीरेल्वे— यंदाच्या खरीप हंगामात १४ एकरात दीड क्विंटल सोयाबीन हाती लागलेल्या ज्ञानेश्वर वाघमारे नामक शेतकऱ्याने विष प्राशन करुन शनिवारी आत्महत्या केली. हरदुलालपुरा भागात राहणारे ज्ञानेश्वर वामन वाघमारे(६३) यांना 14 एकरात दीड पोते सोयाबीन झाले. डोक्यावर कर्जाच्या डोंगर असल्यामुळे व्यथित ज्ञानेश्वरने शनिवारी सायंकाळी घरी विष प्राशन केले.

माहिती मिळताच त्यांना सेवाग्रामला हलवण्यात आले पण उपचारा दरम्यान वैद्यकीय मंडळींनी त्यांना मृत घोषित केले.

Farmernews /त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले,एक मुलगी ,सुना, नातवंड आणि मोठा परिवार आहे.