गजानन सोनटक्के जळगाव जा
महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना अव्वाच्या सव्वा दिलेल्या वाढीव विजबिलाच्या विरोधात वीजबिला ची होळी करून आंदोलन करण्यात आले. स्थानिक तहसील कार्यालयासमोर तालुका व शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज दिनांक 23 नोव्हेंबर ला वीजबिल होळी करण्याचे आंदोलन पुकारण्यात आले होते त्यानुसार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक याठिकाणी गोळा होऊन राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आणि वीज बिल पेटविण्यात आले. या प्रसंगी आ डॉ संजय कुटे यांनी नागरिकांना संबोधित करताना राज्य सरकार याविषयात पूर्णपणे अयशस्वी झाले असून जनतेचा छळ करण्याचा सपाटा च त्यांनी लावला असून हे सरकार प्रत्येक विषयात अपयशी ठरले आहे . याप्रसंगी महाविकास आघाडी सरकार चा निषेध असो, वीजबिल माफी झालीच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना अव्वाच्या सव्वा दिलेल्या वाढीव विजबिलाच्या
यावेळी माजी मंत्री आ डॉ संजय कुटे, नगराध्यक्ष सीमाताई कैलास डोबे, पंचायत समिती सभापती रंजनाताई ठाकरे, उपसभापती महादेवराव धुर्डे गुणवंतराव कपले जिल्हापरिषद सदस्य बंडू पाटील, राजेंद्र उमाळे,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, जिल्हा महामंत्री नंदकिशोर अग्रवाल, गुणवंत कपले, राजेंद्र गांधी, तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, आरती पलन, नगरसेवक शैलेश बोराडे, निलेश शर्मा,रामदास बोंबटकार,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, संतोष ठाकरे, शाकिर खान,संतोष वसतकर, गजानन सरोदे, देवा भैय्या,कैलास पाटील,पांडुरंग मिसाळ, अजय वंडाळे, गोटु खत्ती, परीक्षित ठाकरे, लक्ष्मण पाटील, महादेव वानखडे,गणेश दांडगे, निलेश धुर्डे आदी कार्यकर्त्यां सह शेकडो नागरिक उपस्थित होते.



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



