राष्ट्रीय महामार्गाचे काम उंद्री गावातून चौपदरी करणे बाबत स्वाभिमानीचे आकाश राऊत यांनी वारंवार निवेदने देऊनही ‘प्रशासनाची कारवाई नाही ‘

0
299

 

…आकाश राऊत यांनी मागितली तहसीलदाराकडे आत्महत्येची परवानगी !

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

चिखली तालुक्यातील उंद्री गावातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ‘ ५४८ सी सी .रोडचे काम सुरू आहे सदर गाव आहे चिखली – खामगाव – बुलढाणा – बाळापुर -महामार्गावर असल्यामुळे सदर गावात मोठी बाजारपेठ आहे ‘शैक्षणिक संस्था हिंदू . मुस्लिम स्मशानभूमी त्यामुळे गावातून चौपदरीकरणाचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे ‘परंतु गावातून जाणार्‍या मुख्य रस्त्याचे काम हे खूपच अरुंद झाले आहे .त्यामुळे अनेकदा अपघात सुद्धा झालेले आहे ‘रस्ता होऊनही रस्त्याच्या दुतर्फा बाजूला नाल्याचे ही काम नसल्यामुळे पावसाळ्यात कमरे पर्यंत पाणी व्यवसायिक दुकानदाराच्या दुकानासमोर समोर साचत आहे .त्यामुळे हा परिसर अतिशय गलिच्छ होत असतो ‘त्यामुळे गावातून रस्त्याचे काम चौपदरीकरण करावे व पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जुन्या नाल्या पुनर्जीवित कराव्या .यासाठी 3 -9 -2020 ला सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना निवेदन दिले होते .तसेच 3 -9 – 2020 ला उंदरी चौफुलीवर धरणे आंदोलन सुद्धा केले होते .तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वासन दिले होते की सदर मागण्याचा विचार करून कारवाई होईल ‘सदर सार्वजनिक बांधकाम विभाग हे गोल-गोल उत्तर देत असून ‘कुठल्याही प्रकारची कारवाई ते करत नाहीत ‘यामुळे अनेक अपघात या रस्त्याने झालेली आहेत ‘त्यामुळे निराश होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आकाश राऊत यांनी तहसीलदार यांना दिनांक16 मार्च ला निवेदन दिले आहे व एखादा अपघात होणे अगोदर आम्हाला आत्महत्येची परवानगी द्यावी असा मागणीही यावेळी स्वाभिमानी चे आकाश राऊत यांनी निवेदनात केली आहे ‘त्यामुळे प्रशासन याकडे कसे बघते हे पाहणे औचित्याचे ठरेल ‘

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here