Home Blog Page 178

किनगांव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

0

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल – किनगांव तालुका यावल येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन दि.25/08/2023 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा अंतर्गत शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

सर्वप्रथम गावातील
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन सदर शाखेचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी युवा प्रदेश सदस्या शमिभा पाटिल, जिल्हा महासचिव दिनेश इखारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे,माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे,जिल्हा संघटक राजेंद्र बारी,यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे,कामगार आघाडी यावल तालुकाध्यक्ष सुरेश बोदडे,संतोष तायडे,रोहन निकम,दिलीप भालेराव,मेजर देवदत्त मकासरे यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले, वंचित बहुजन समाजाला आपला विकास करून घ्यायचा असेल तर येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे. तसेच इतर मान्यवरांची भाषणे झाली.

बहुजन समाजातील वंचित घटकांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मूळ प्रवाहात आणून त्यांच्या अडीअडचणी सोडवून सन्मान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. पक्षाची ध्येय धोरणे व प्रचार आणि प्रचार किनगाव गावातील घराघरापर्यंत पोहोचविला जाईल असे इतर मान्यवर पदाधिकारी यांनी सांगितले.आभार प्रदर्शन यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांनी केले.व सुत्रसंचालन संतोष तायडे यानी केले कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर अध्यक्ष रोहन निकम,सचिव बुध्दभुषन तायडे, शाखा अध्यक्ष भुषण भालेराव,अमोल भालेराव,रोहित वानखेडे,अशोक साळुंके,मनोज सोनवणे,सल्लागार : योगेश दत्तात्रय भालेराव, गणेश दिलीप साळुंखे, अजय तडवी, प्रथम कोळी, महेंद्र अडकमोल, राजेश पाटील, शरीफ तडवी, सुखदेव साळखे, सुरेश भोई, भूषण कोळी, विवेक तायडे, विनोद मोरे, गणेश दामु साळुंखे,

अशोक साळुंखे, शरीफ हबीब तडवी, पंकज साळुंखे, प्रेम सोनवणे, विशाल तायडे, सुपडू साळुंखे, विकास कुंभार, चेतन भालेराव, वैभव सोनवणे, महेंद्र सोनवणे, अमोल, सोनवणे, शिलवाल अडकमोल, राजेश सोनवणे, प्रशिक अडकमोल, सम्यक मेढे, राज वानखेडे, संदेश तायडे, संजय अडकमोल, अक्षय साळुंखे, संजय भालेराव, किरण सुरेश सोनवणे, नाना साळुंखे, अभिजीत साळुंखे, सागर भालेराव, गौतम सपकाळे, तुषार भालेराव, ललित कोळी, शशिकांत भालेराव, दिपक सोनवणे, बाळु झाल्टे, गोविंदा साळुंखे, देवा बाविस्कर, दिपक भालेराव, अजय भोई, मनोज तायडे, रुषिकेश निकम, योगेश भोई, विनोद अडकमोल, देवानंद सपकाळे, प्रसन्नजीत सोनवणे, विजय भोई, करीम तडवी, यासीन तडवी, शाहरुख तडवी, विशाल साळुंखे, मुकुंदा साळुंखे, भानुदास महाजन, पप्पु बाविस्कर, शामराव तायडे सह गावातिल व तालुक्यातिल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

किनगाव प्रथमिक आरोग्य केंन्द्रा अंतर्गत अतिसंवेदनशील गावातील भागात आरोग्य तपासणी पथकाकडुन डेंगू विरोधी मोहीम सुरू

0

 

यावल ( प्रतिनीधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन व तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत उपकेंद्र किनगाव बुद्रुक,किनगाव खुर्द व डांभुर्णी येथे अति संवेदनशील भागात डेंगू विरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. किनगाव तालुका यावल या

प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या मोहीमेव्दारे गावात डेंगू ताप रुग्ण सर्वेक्षण,कंटेनर सर्वेक्षण ,हस्त पत्रिका वाटणेसह गाव पातळीवर डेंगू तापाची लक्षणे, उपचार,डेंगूताप प्रतिरोधक उपाययोजनाबद्दल माहिती ग्रामीण पातळीवरील नागरिकांना देण्यात येत आहे

तर नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे, घरासमोरील नाल्या वाहत्या करणे,खिडक्यांना जाड्या बसवणे,शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बसवणे घरासमोर पाणी साचू न देणे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे तसेच रात्री झोपताना मच्छरदाणी लावून झोपणे याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे

या मोहीमेतआरोग्य सहाय्यक आर. आर. सुरवाडे,आरोग्य सेवक जे. के. सोनवणे,डी.एम.बरडे,पी.जी. काळे, एम.बी.बारेला किनगाव बुद्रुक येथील आशा वर्कर निराशा जाधव, रेखा पाटील,आशा भालेराव, दिपीका पाटील,धनश्री वाघुळदे सुनिता पाटील,मीना साळुंखे किनगाव खुर्द येथीलआशावर्कर जयमाला अडकमोल, दुर्गा तायडे,सायरा तडवी डांभुर्णी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सोनल भंगाळे आशा वर्कर छाया कोळी,रेखा कोळी,सायरा तडवी,पुनम सनेर व ममता कोळी यांचे सहकार्य लाभत आहे.

मुंबईतील होमगार्ड सैनिकांचे राज्यव्यापी साखळी उपोषणात तालुक्यातील होमगार्ड सहभागी

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

होमगार्ड सैनिक आपल्या मागण्यांसाठी डॉक्टर प्रतापराव मोहीते पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक 21 ऑगस्ट पासून मुंबई आझाद मैदानावर साखळी उपोषण करीत आहेत त्यात आपला सहभाग नोंदवा म्हणून तालुक्यातील होमगार्डानी मुंबईतील आंदोलनाला भेट दिली व आंदोलनात सहभागी झाले.

21 ऑगस्ट पासून मुंबईत सुरू असलेल्या होमगार्ड सैनिकांच्या राज्यव्यापी साखळी उपोषण व धरणे आक्रोश आंदोलना द्वारे राज्य शासनाला मागण्या मागित असून एकूण वीस मागण्या त्यांच्या आहेत त्यातील प्रामुख्याने काही मागण्या तरी पूर्ण कराव्यात असा त्यांचा आग्रह आहे त्यातील प्रमुख मागणी केंद्र सरकारच्या उपसचिवांनी काढलेल्या 17 जानेवारी 1984 च्या आदेशाचे अंमलबजावणी करून होमगार्डांना 365 दिवस नियमित काम देण्यात यावे

, मुंबई होमगार्ड अॅक्ट 1947 मधील दर तीन वर्षांनी होणाऱ्या पुनर्न नोंदणी पुनर्नियुक्ती प्रणाली अथवा पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, पोलीस विभाग प्रमाणेच राज्याने दर आर्थिक वर्षी त्यांच्या बजेट क्षेत्रात होमगार्ड विभाग करिता स्वतंत्र बजेटचे व्यवस्था निर्माण करावे तसेच प्रतिवर्ष महागाई दरानुसार होमगार्ड विभागाला महागाई भत्ता उपलब्ध करण्याचे विधान तयार करण्यात यावे,

होमगार्ड यांना साप्ताहिक परेडचा भत्ता उजळणी प्रशिक्षण भत्ता व तसेच आगामी काळा मध्ये येणारे सर्व प्रशिक्षण भत्ता व त्याचप्रमाणे शासनाचे प्यारा मिलिटरी फोर्स ला लावून दिलेले सहा महिन्याचे अतिदक्ष प्रशिक्षण शिवार कर्तव्य भत्ता चे दर मानधनाच्या समप्रमाणानुसार देयक असावा,

होमगार्ड संघटना ही केंद्र सरकार अथवा राज्य सरकार कोणीही एकाच्या नियंत्रणाखाली असावी,
होमगार्ड सैनिकांना वेतन्य रजा तसेच मेडिकल लिव्ह इत्यादी मंडळाला मिळणाऱ्या सर्व सुट्ट्यांचे

प्यारामिलिटरी फोर्स अॅक्ट नुसार तरतूद करावी,
होमगार्ड सैनिकांच्या गणवेश सुसज्जतेबाबत पी कॅप स्टील चामडी बेल्ट जुने अर्म बॅच MHG किंवा गृहरक्षक दल असे शोल्डर बॅच होमगार्डची अतिदक्ष फोर्स निर्माण करून त्यांना खाकी वर्दी व्यतिरिक्त कमांडो ड्रेस कोड देण्यात यावे

,अशा महत्वपूर्ण मागण्यांसाठी होमगार्ड सैनिक यांचे 10 दिवसांचे साखळी उपोषण व भरणे आक्रोश आंदोलन मुंबई आझाद मैदानावर सुरू असुन सदर आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व स्तरातून होमगार्ड पोहचत आहेत,

चौकट
जिल्ह्यातील होमगार्ड सैनिकांचे म्हणणे आहे की आज पर्यंत जिल्ह्यातील नेत्यांनी होमगार्ड यांच्या समस्या कोणत्याही अधिवेशनात मांडल्या नाहीत ही खेदाची बाब आहे तरी येत्या हिवाळी अधिवेशनात तरी होमगार्ड यांच्या समस्या जिल्ह्यातील नेते मांडतील अशी उमेद जिल्ह्यातील होमगार्ड सैनिकांना आहे

केंद्र सरकारचा कांद्यावर 40% निर्यात शुल्क निर्णया विरोधात स्वाभिमानी निवेदन.

0

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

. शेगावकेंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क आकारल्याने कांद्याच्या भावा मध्ये मोठी घसरण होऊन. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

आता कुठं शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळायला सुरवात झाली होती कांदा २५ ते ३० रूपये किलो ने बाजारात विक्री होत होता.परंतु केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांदाचे भाव १२ ते १६ रूपये किलो पर्यत घसरले आहे.

केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या विरोधात सातत्याने अश्या प्रकारचे अन्याय कारक निर्णय घेण्यात येत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40% वाढवल्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्या हा कवडी मोल भावाने विकावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून.
केंद्र सरकारने कांद्यावरील 40% निर्यात शुल्क आकारून शेतकऱ्यांचे कांबर्डे मोडले आहे. हा अन्याय कारक निर्णय केंद्र सरकारने त्वरित माघे घेण्यात यावा करीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री साहेब यांना तहसीलदार साहेब मार्फत निवेदन देण्यात आले आहे.

कांद्यावरील निर्यात शुल्ल हा निर्णय त्वरित माघे घेण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्क रस्त्यावर उतरणार असल्याच ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून देण्यात आला आहे. या वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्तित होते.

19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी महिलेसह दोगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव :19 वर्षीय तरुणीला तू माझ्यासोबत लग्न कर असे म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव पोलीस

स्टेशनमध्ये 19 वर्षीय पिडीतेने तक्रार दिली की तिला आरोपी अकमल हैदर अक्रम हैदर व त्याची आत्या शब्बू राहणार खंमू जमदार नगर शेगाव यांनी 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट रात्री अकरा वाजेपर्यंत दरम्यान कमल हैदर याने माझ्या घरासमोर येऊन मला म्हणाला की तू माझ्यासोबत लग्न कर जर तू माझ्यासोबत लग्न करणार नाही

तर तुझी बदनामी करणार व मी जीव देईन माझ्या मरणास्तव जबाबदार राहशील अशी धमकी दिली तर शेपू येणे तू आक्रमण सोबत लग्न कर नाहीतर तुला जळून मारीन अशी गमती देऊन वाईट उद्देशाने पाठलाग केला

अशा तक्रारीवरून आरोपी अकमल हैदर अक्रम हैदर व शब्बू या दोघाविरुद्ध अपवाद नंबर 4066 ऑब्लिक 2023 कलम 354, 354(ड), 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उपनिरीक्षक कुणाल जाधव करीत आहेत

आठवडी बाजार परिसरात समता टेलर दुकानासमोर वरली मटका नावाचा जुगारावर शहर पोलिसांनी छापा मारून एकाला घेतले ताब्यात

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त व खात्रीशीर माहितीवरून शहर पोलिसांनी ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडी बाजार परिसरात

समता टेलरच्या दुकानासमोर पैशाच्या हारजीत वर वरली चे आकडे घेताना रजनीकांत बांगर वय 37 वर्ष याला शेअर पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस कॉन्स्टेबल शांताराम घुगे बक्कल नंबर 2036 यांनी दिलेल्या

फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम 12 मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गवई बकल नंबर 715 करीत आहेत

सिंदी रेल्वेतील रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी….

0

 

पाच वर्षांपासून पुलनिर्माणाचे काम अपूर्णच… पुला शेजारी पडलेल्या खड्ड्याने होत आहे नीत्याचे अपघात..

नगर परिषद सिंदी रेल्वे येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या…

राकाँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन…

सिंदी रेल्वे नगरपारिषदेला कायम स्वरुपी मुख्यधिकारी देण्यात यावे व पाच वर्षापासून रखडलेल्या रेल्वे पुलाचे काम त्वरित चालू करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत व प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार रामदासजी तडस, विधानपरिषद आमदार रामदासजी आंबटकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व सिंदी रेल्वे शिष्टमंडळानी भेट घेतली होती… व या भेटीमध्ये सिंदी रेल्वे नगर परिषदेत कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याचे आश्वासन खासदार तडस साहेबाना देण्यात आले होते. दीड महिन्याच्या कालावधी लोटून गेला असून अजूनही कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही.

याकडे जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष देवून तात्काळ कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली.
तसेच सिंदी रेल्वे येथील रेल्वे गेट वरील पुलाचे बांधकाम गेल्या पाच वर्षा पूर्वीपासून सुरु आहे. परंतु ते त्या पूलाचे काम अजूनपर्यंत पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रखडलेल्या पूलाच्या कामामुळे जागोजागी खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

पुलाचे काम स्थगित असल्याकारणाने हे खड्डे बुजविण्यात आले नाही. या खड्ड्यामुळे नागरिकांना जिवीत हानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सदर रखडेलेल्या पुलाचे काम त्वरित सुरु करुन खड्डे ही तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, युवक जिल्हाध्यक्ष संदीप किटे, पंकज बावणे, राजू मुडे आधी उपस्थित होते.

चिखली येथे महीला पोलिस कर्मचारी आणि मुलीची चाकुने हत्या करून पतीची गांगलगाव परिसरात विहीरीत गळफास घेऊन आत्महत्या

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

चिखली पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस कर्मचारी वर्षा किशोर कुटे यांच्यासह त्यांच्या चिमुकलीची पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या करून पतीनेही कवठळ शिवारात विहिरीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना आज (दि.२१) सकाळी उघडकीस आली आहे.

चिखली येथील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात हे हत्याकांड घडले असून, पती किशोर जर्नाधन कुटे (रा. खैरव) यांनी कवठळ येथील गांगलगाव रोडलगत असलेल्या विहिरीत गळफास घेतल्याचे आढळून आले. चिखली व अंढेरा पोलिस या घटनेचा तपास करत असून, या हत्याकांडाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते.

वर्षा दंदाले-कुटे या चिखली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना एक दीड वर्षाची चिमुकलीदेखील आहे. पती किशोर कुटे यांनी या मायलेकींचा पोटात चाकूने खुपसून खून करून घटनास्थळावरून पोबारा केला, व नंतर गांगलगाव रोडनजीकच्या विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. कवठळ येथे गांगलगाव रोड लगत असलेल्या विहिरीत दोरीच्या साह्याने अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याचे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास दिसून आले होते.

त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. विहिरीचे शेतमालक विष्णू हिम्मतराव वाघमारे हे नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता शेतात गेले असता, डांबर रोडवर एमएच २८ डब्ल्यू ९९७२ काळ्या रंगाची स्कुटी उभी असलेली त्यांना दिसून आली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, विहिरीत गळफास घेतलेला इसम दोरीला लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला.

अंढेरा पोलीस स्टेशनला माहिती देतात क्षणाचा विलंब न लावता अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार हरिहर गोरे, बीट जमालदार उगले हे घटनास्थळी धावून आले.

पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, दोरी कमकुवत असल्याने मृतदेह विहिरीत पडला. नंतर खाटाच्या साहाय्याने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, चिखली येथील पंचमुखी महादेव मंदीर परिसरात पोलिस कर्मचारी महिलेसह तिच्या दीड वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते.

तर कवठळ परिसरातील मृतदेह हा संबंधित पोलिस कर्मचारी वर्षा दंदाले-कुटे यांच्या पतीचा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पत्नी व मुलीची हत्या करून पतीनेही आत्महत्या केली असावी, असा कयास बांधला जात होता. अधिक तपास चिखली व अंढेरा पोलिस करत आहेत.

ए आय एम आय एम युवक आघाडीच्या शहराध्यक्षपदी मोहम्मद जावेद मोहम्मद खालील यांची निवड

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: ऑल इंडिया मजलीस ऐ इत्तेहादूल मुस्लिमीन म्हणजेच ए आय एम आय एम युवक आघाडीच्या शेगाव शहर अध्यक्षपदी मोहम्मद जावेद मोहम्मद खलिक यांची एम आय एम चे जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांच्या उपस्थितीमध्ये शेगाव येथे पार पडलेल्या बैठकीत निवड करण्यात आली आहे

ऑल इंडिया मजली से इत्यादी मुस्लिम या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय नेते खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी व ए आय एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर कादरी विदर्भ अध्यक्ष शाहिद भाई रंगून वाले यांच्या आदेशाने एआयएमआयएमच्या शेगाव युवा आघाडी शहर अध्यक्षपदी मोहम्मद जावेद मोहम्मद खलील यांची एकमताने निवड करण्यात आली

साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रास वैद्यकीय अधिकारी अभावी रुग्णांचे हाल तपासणी न करता रुग्णांना होत आहे औषधांचे वाटप

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोघं पदे रिकामे असल्याने रूग्णांचे उपचाराअभावी हाल होत असुन , आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षीत कारभाराने कळस गाठलेला असून या संदर्भात वरिष्ठांकडे तोंडी तक्रारी करून ही सदरचा कारभार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशासनाच्या दुर्लक्षित व अनागोंदी कारभारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची गंभीर बाब दिसून येत आहे.

या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांची कोणती ही आरोग्य तपासणी न करता कर्मचाऱ्या कडून रुग्णांना औषधी वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आलेला आहे. एकूणच केंद्राच्या गलथान कारभारामुळे रुग्णांची फरपट सुरू असून अशा या कारभारामुळे एखादया आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णाचा निश्चित जिव गेल्याशिवाय राहणार नाही.

अशी गंभीर परिस्थिती या केंद्रात निर्माण झालेली आहे. तरी सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुधारण्यासाठी वरिष्ठ प्रशासन केव्हा लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
साकळी तालुका पावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोघं वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या तब्बल १२ जागा रिक्त आहे.

येणाऱ्या काळात केंद्रातील अजून काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याने अजून काही जागा रिक्त होणार आहे त्यामुळे सदर केंद्राचा कारभार आता पुर्णतः कुणाच्या भरोसे राहणार आहे असा मोठा प्रश्न निर्माण झाले आहे.

एकदंरीत या सर्व गोंधलेल्या परिस्थितीमुळे केंद्रातील कोणताही कर्मचारी आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्या साठी केंद्रातील अति महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळत आहे. त्यात औषध निर्माता पद रिक्त असल्याने चक्क कोणताही कर्मचारी औषध वाटप करीत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे.तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्यामुळे परिसरातील उपकेंद्रातील सीएचओ सदर साकळी प्रा.आ.केंद्रातील दररोज रूग्णांची तपासणी(ओपीडी) करून आपली जबाबदारी कशीबशी पार पाडीत आहे. एकूण या आरोग्य केंद्राच्या अश्या गलथान वेळकाढू कारभारामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला आहे.नियमानुसार उपकेंद्रातील सीओचो अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करणे बंधनकारक नाही.

दरम्यान साकळी येथील समाजसेवक मनु निळे यांनी केंद्रात गेले असता या ठिकाणी वीस ते पंचवीस महिला आपल्या लहान चिमकुल्यासह रुग्ण तपासणी ताटकळत उभे असल्याचे दिसुन आले, तसेच येथुन जवळ असलेल्या मनवेल येथील आश्रमशाळा चे शालेय विद्यार्थी सुद्धा आरोग्य तपासणीसाठी आलेले होते.मात्र या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून तपासणीसाठी असलेले सीएचओ अधिकारी सुद्धा हजर नसल्याने सर्वच रुग्णांना दुपारपर्यंत ताटकळत राहावे लागले

, तसेच केंद्रातील काही कर्मचारी कुठलीही तपासणी न करता चक्क औषधांचे वाटप करीत असतांना दिसून येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने साकळीच्या ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे . दरम्यान आरोग्य केंद्राच्या उदासिन कारभाराकडे जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन तसेच सर्वच लोकप्रतिनिधींनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे व केंद्राचे सर्वच प्रश्न तात्काळ मार्गी लागण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे अशी मागणी मनु निळे यांच्यासह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे .