Home Blog Page 187

शेगाव परिसराला ऑक्सिजन हब बनविण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेकडो वृक्ष लावणार- राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा

0

 

इस्माईल शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व श्री संत शिरोमणी गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र शेगाव शहर व परिसराला ऑक्सिजन हब बनविण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगाव शहर व परिसरात शेकडो वृक्ष लावून त्यांची जोपासना करणार असे प्रतिपादन राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा यांनी येथे केले .

शेगाव येथील रेल्वे स्टेशन परिसरात झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आज 15 जून ला आयोजित करण्यात आला

होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ध्यान योग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रख्यात वकील एडवोकेट संजय पोकळे होते यावेळी प्रमुख म्हणून शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे शेगाव रेल्वे स्टेशनच्या नवनियुक्त हेल्थ इन्चार्ज लाभीनीताई पाटील, ग्रामपंचायतचे माजी सरपंच भाजपा किसान मोर्चा चे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अरविंद भाऊ इंगळे पत्रकार इस्माईल शेख ज्येष्ठ पत्रकार राजकुमार व्यास इत्यादी उपस्थित होते

यावेळी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या लीना पाचबोले मॅडम ,रूपाली वानखडे ज्योती बावस्कर मॅडम फुलाबाई राठोड मंदाकिनी चव्हाण प्रणिती धामंदे शुद्धमती निखाडे शालिनी कडकडे मॅडम युवा ब्रिगेड अध्यक्ष कुमारी कुसुम रितेश चौहाण, कुमारी दिया शेजोळे पाटील शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र फटिंग बक्कल नंबर 568 यांच्या हस्ते शेगाव रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वळ पिंपळ बदाम कडूनिंब इत्यादी विविध जातीची वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी उपस्थित

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या सर्व महिला भगिनी पदाधिकारी यांनी झाडांची जोपासना करण्याची शपथ घेतली या कार्यक्रमाला रेल्वे विभागातील भिका भाऊ बनकर यांच्यासह रेल्वे विभागाचे कर्मचारी तसेच रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या

शेगाव पोलीस स्टेशन येथे ज्वेलर्स व बँक अधिकाऱ्या ची संयुक्त बैठक

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव :आज दिनांक 14/07/2023 शेगांव शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील यांनी शेगाव शहर पो. स्टे. हद्दीतील बँक, पतसंस्था, A.T.M. व्यवस्थापक, सराफा व्यावसायिक, पत्रकार बांधव याची संयुक्त सभा आयोजित केली होती. यावेळी पो.नि. विलास पाटील यांनी उपस्थित

सर्वांना बँक, A.T.M. मध्ये प्रवेशच्या ठिकाणी, दर्शनी भागात व जेथे रोख व मौल्यवान मालमत्ता ठेवलेली आहे अशा ठिकाणी C.c.t.v. कॅमेरे लावून C.c.t.v. कॅमेराची नियमित काळजी घेणेबाबत सूचना दिल्या. रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक व आवश्यकतेप्रमाणे सशस्त्र गार्ड नेमने बाबत सूचना दिल्या. रात्रीच्या वेळी मालमत्तेच्या ठिकाणी,

बँकेच्या प्रवेशाच्या ठिकाणी दरवाजा, गेट, खिडकी येथे सायरन लावणेबाबत सूचना दिल्या. तसेच बँक , A.T.M. मध्ये चोरी होणार नाही या करिता आवश्यक ती दक्षता घेणेबाबत सूचना केली ,

A.T.M., सराफा व्यावसायिक परिसरामध्ये कुठलाही संशयित आढळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन ला माहिती देणेबाबत सूचना देऊन पो. स्टे. शेगांव येथील अधिकारी व अंमलदार यांचे फोन नंबर देण्यात आले.

शिवसेना (ऊबाठा) द्वारे उपमुख्यमंत्री फडनवीस, बावनकुळे आणि नितेश राणे चा निषेध

0

 

प्रमोद जुमडे.हिंगणघाट/वर्धा

दिनांक १३ जुलै २०२३ ला कारंजा चौक येथे शिवसेना, महिला आघाडी, युवासेना हिंगणघाट च्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप चे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे तसेच नितेश राणे यांना जोडे मारून निषेध करण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव साहेब यांनी नागपूर येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेतला. त्या मेळावा मध्ये कार्यकर्त्यांना संबोधन करताना त्यांनी आताच्या सरकारमध्ये असलेले राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे शिंदे गट सरकार मधून बाहेर पडला असा आरोप केला होता.

आता हेच अजित पवार या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटले होते की, राष्ट्रवादी सोबत सरकारमध्ये कधीही सोबत करणार नाही.

त्यांच्यासोबत युती होणे शक्य नाही. अशी ही ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप साहेबांनी या कार्यकर्ते मेळाव्यात ऐकवली . आणि विदर्भाला लागलेला कलंक या शब्दात देवेंद्र फडणवीस ची निंदा केली. याच भाजप ने काही दिवसांपूर्वी ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच लोकांना सरकार मध्ये सामील करून घेतले.

प्रदेश भाजप चे अध्यक्ष बावनकुळे यांनी महाराष्ट्रात आणि विदर्भात रस्त्यावर फिरू देणार नाही असे व्यक्तव्य केले होते. आणि उपमुख्यमंत्री आणी नितेश राणे यांनी अपशब्द वापरले म्हणून हिंगणघाट येथे त्यांचा निषेध करण्यात आला.

या निषेध कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, जिल्हा संघटक भारत चौधरी, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुका प्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमने, उपतालुका प्रमुख प्रकाश अनासने, महिला जिल्हा संघटिका सौ.संगीता कडू, नगर सेवक मनीष देवडे, श्रीधर कोटकर, मनोज वरघणे, तालुका संघटिका सौ.माधुरी खडसे, शहर संघटिका सौ. सिमा गलांडे, सौ. निता धोबे, भास्कर ठवरे, बंटी वाघमारे, युवा सेना शहर प्रमुख भूषण कापकर, शहर समन्वयक प्रकाश घोडे, शहर संघटक मनोज मिसाळ, गजानन काटवले, शंकर मोहमारे, उप शहर प्रमुख संजय पिंपळकर, लक्षमन बकाने, शंकर झाडे, आशिष जैस्वाल, दिनेश धोबे, अनंता गलांडे,

विभागीय प्रमुख मोहन तुमराम, रुपेश काटकर, अनिल लालटेनवार, नितीन वैध, पवन तिवारी, सचिन मुडे, हिरामण आवारी, प्रशांत आवारी, सुनील आष्टीकर, गोवर्धन शाहू, लक्ष्मीकांत भगत, कमलेश वजेकर, योगेश कामडी, अशोक तपासे, बलराज डेकाटे, गौरव गाडेकर, प्रकाश भुसारी, उमेश धोबे, अनिल कुंभारे, संजय भेदूरकर, राजू मंडलवार, विक्की देवगिरकर, आशिष भांडे, भोला ठाकूर, विजय कंगाले मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख, शुभम निमजे, पिंटू चव्हाण, भास्कर कोल्हे, विक्रम देवगिरकर, सौ. प्राची पाचखेडे, सौ. सारिका अनासाने, विनोद मोहळ, सौ. माधुरी खडसे, ज्योती पोहनकर, शंकर भोमले, भारत नागपुरे, रवी उईके, अनुराग काशीनिवास, गौरव गडेकर, योगेश कामडी, रंजीत रहाटे, भूषण सातघरे, मयूर ठाकरे, मोहन जाधव, रवी शेट्टी, संतोष चौधरी, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात भाजपला खिंडार गट नेते नानक सिंग बावरी यांचा शेकडो कार्यकर्त्या सोबत उद्धव ठाकरे गटात प्रवेश

0

 

बाळासाहेब ठाकरे हीच निष्ठा समजून उद्धव ठाकरे गटाला महाराष्ट्रात प्रचंड पसंती,नानक सिंग यांच्या सहकाऱ्यांसह शेकडो लोकांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा

शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब दौऱ्यावर असताना नियोजित स्थानिक तळेगाव शापंत येथील प्रतिष्ठित तथा भाजपा गट नेते तथा तालुका उपाध्यक्ष भाजपा नानक सिंग बावरी यांच्या सह भाजपा शहर अध्यक्ष. डॉ चंद्रशेखर मोलकर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला

साद घालून उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेतला या

वेळी प्रतिष्ठित नानक सिंग बावरी (गट नेते माजी तालुका उपाध्यक्ष) ,डॉ चंद्रशेखर मोकलाकर ( माजी भाजपा शहर अध्यक्ष ),सुभाष भाऊ कदम , सुभाष भाऊ भुजाडे,राहुल राने,गजानन जाचक ,राजू भाऊ बलापुरे,तीलकचंद जहाकर ,विलास शेंडे गुरुदेव सिंग बावरी यांच्या सह शेकडो लोकांनी पक्ष प्रवेश झाला . सूर्या मराठी न्यूज साठी अनिलसिंग चव्हाण वर्धा

घर टॅक्स वाढीच्या निषेधार्थ सिंधी रेल्वेत नगर पालिका कार्यालयास राष्ट्रवादीचा नागरिकांसह घेराव.

0

 

राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांसह मुख्याधिकाऱ्यास घेरले.

जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करून तोडगा काढण्याची मागणी केली असुन , तोडगा न निघाल्यास करणारं तीव्र आंदोलन…. अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रमोद जुमडे सिंधी रेल्वे/वर्धा

हिंगणघाट – वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे घर टॅक्स दरात 35 ते 40 टक्के वाढ केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व संतप्त नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालीत वाढ केलेला घर टॅक्स तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली आहे…

यावेळी शेकडोच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अतुल वांदिले यांच्यासह मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित होते यादरम्यान सिंधी रेल्वे येथील संतप्त नागरिकांनी देखील नगरपालिका प्रशासनाच्या गोंधळ धोरणाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता.

सिंधी रेल्वे येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी तीस तीस दिवस गैरहजर असतात, यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित राहत असल्याची ओरड सुरू होती. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल बांधले यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सिंधी रेल्वे येथे जात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व सर्व नागरिकांना सोबत घेऊन अचानक नगरपालिकेत मुख्याधिकारी कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला

अचानक घातलेल्या घेरावाने मुख्याधिकारी कार्यालयातील सर्वांच्या मोठ्या गोंधळ वळला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलून तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल गांधी यांनी दिलेला आहे एकंदरीतच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अनेक प्रश्नाबाबत सिंधी रेल्वे मध्ये लढणारा योद्धा मिळाला असल्याने सिंधी रेल्वेतील नागरिकांमध्ये मोठा उत्साह होता…

, न.पा. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे सामान्य जनतेची आर्थिक लूट होत आहे. घरगुती कर आकारणी मध्ये दरवर्षी ४ ते ५ % ने वा होत असल्यास सामान्य नागरीक कर सहजरित्या भरु शकतो. परंतु प्रशासनाने त्या करात (टॅक्स) एकदम कुठे तीन पट्टीने तर कुठे चार पट वाढ केली आहे. अशी भरमसाठ वाढ सामान्य नागरिकांना न परवडणारी आहे.

आधीच जनता महागाइने त्रस्त झाली आहे वरून घरघुटी टॅक्स अव्याच्या ढव्या स्वरूपात नगर पालिका वसूल करत आहे यामधे सामान्य नागरिकांना वर काय बितत असेल.

यातून असे लक्षात येते की, सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे. *तसेच नगर पालिकेला या आधी देण्यात आलेल्या निवेदनात तात्काळ सुधारणा करा याबाबत १० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता तरीही याकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच न.पालिकेचे मुख्याधिकारी हे महिना – महिनाभर न.पा. कार्यालयात उपस्थित राहत नाही व या कार्यालयात कर्मचाऱ्याची सुद्धा कमतरता आहे.

नगर पालिकेचा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा परिणाम सामान्य जनतेला सोसावा लागत आहे. शासन व प्रशासनाने याकडे गांर्भियाने लक्ष देण्याची गरज आहे. असे खडे बोल प्रदेश सरचिटणीस अतुल वंदिले यांनी मुख्याधिकर्याला सुनावले.

करिता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले संपूर्ण पदाधिकारी व येथील जनतेसह नगर पालिकेला घेराव घालून आंदोलन करीत आहे. याची सर्वस्वी जबाबदारी ही न.पा. प्रशासनाची राहील.

यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष तथा माजी सभापती कृ.उ.बा.स.बबनरावजी हिंगनेकर, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी उपाध्यक्ष न.प.सुधाकरराव खेडकर, प्राचार्य तथा माजी उपाध्यक्ष अशोकजी कलोडे, जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, अशोकबाबू कलोडे, अमोल बोरकर, वसंताजी सिर्से, गजाननराव डबारे, प्रकाश सोनटक्के, युवा शहर अध्यक्ष तुषार हिंगणेकर,माजी नगरसेवक सुमनबाई पाटील,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बबलू खान,अशोकबाबू कलोडे, पंकज बावणे, धमेद्र बडविक, प्रशांत कलोडे, जगदीश बोरकुटे, गुड्डू कुरेशी, गजानन खंडाळे, सुनील शेंडे, अशोक सातपुते, रवी राणा, युगल अवचट, मनोहर चंदनखडे, सुनील भुते, पप्पू आष्टीकर, विरेंद्र उर्फ बब्बा देशमुख, संदीप ठमके यांचासह सिंदी(रेल्वे) येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अत्यंत खराब झालेला तेलीपुरा चौक ते चेपे चौक रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा प्रभाग क्र.१० वासीयांची मुख्याधिकारी न.प. हिंगणघाट यांचेकडे मागणी

0

 

प्रमोद जुमडे. हिंगणघाट/ वर्धा

हिंगणघाट, येथील प्रभाग क्रमांक १०मधील जुनी वस्ती टिळक वार्ड, विठ्ठल मंदिर ,तेलीपुरा,वार्ड येथील प्रमुख रस्ता असलेल्या तेलीपुरा चौक ते चेपे चौक पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेमध्ये असल्याने त्या भागातील नागरिकांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्यामध्ये तर या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत असते. या भागातील लोकप्रतिनिधीना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार सुचना व विनंती करुनही आतापर्यंत आश्वासनापलिकडे काहीही मिळालेले नाही.

नगर परीषदेची अमृत योजना व नळ योजनेमुळे मागील पाच वर्षांपासून या रस्त्याची नुसती चाळण झालेली आहे.जागोजागी रस्ता फोडून ठेवलेला आहे.जागोजागी पाण्याचे डबके साचलेले आहे.परंतु अजुनही त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. या रस्त्यावर कितीतरी अपघात झालेले आहे.

शाळेकरी मुले, महिला मंडळी, बुजुर्ग मंडळी या रस्त्याने जाणेच शक्यच नाही.पायदळ तसेच दुचाकी वाहनाने सुध्दा या रस्त्याने जाता येत नाही आहे.

जुन्या वस्तीतील सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव, गौरीपुजन , नवरात्रोत्सव असो किंवा कुणाच्या घरीचे लग्न, वाढदिवस,बारसे, मय्यत ,तेरवी असो सर्वांना अडचणीचा सामना करीत, तारेवरची कसरत करीत हा रस्ता पार करावा लागतो.या रस्त्यावर कितीतरी अपघात होवून ब-याच जणांच्या हाता- पायांना इजा तर काहीजण कायमचे अपंग झालेले आहे.

म्हणून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात प्रभाग क्रमांक १० मध्ये राहणा-या रहिवाशांच्या वतीने मुख्याधिकारी नगरपालिका हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले व उपरोक्त रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी साहेबांच्या वतीने शिंदे साहेबांनी निवेदन स्वीकारले व संबंधित विभागाशी बोलुन लवकरात लवकर उपयोजना करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी निवेदन देतांना धनराज कुंभारे, नामदेव खानखुरे , उमेश डेकाटे, अशोक पवनीकर, संजय कावळे, राहुल बाकडे, अतुल चिंतलवार,अमित निमजे, गणेश कुंभारे, सुधीर मोहतेवार,साई रंभाडे,अक्षय कावळे, विशाल पराते, रोशन पाजनकर इत्यादी रहिवासी हजर होते.

शरद पवारांना मानणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी हिंगणघाट विधानसभेत भरले प्रतिज्ञापत्र.प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी घेतला पुढाकार….

0

 

प्रमोद जुमडे हिंगणघाट/वर्धा

हिंगणघाट:- अजित पवारांच्या बंडा नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष कोणाच्या यासाठी म्हणून प्रतिज्ञापत्रे भरणे सुरू आहे या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या पुढाकाराने शरदचंद्र पवार यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून हजारो कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र भरले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकनेते मा शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारधारेला मानणारे सर्व पदाधिकारी व प्रमुख सदस्यांनी प्रतिज्ञापत्र भरत आम्ही शरद पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.

‌ यावेळी प्रतिद्यापत्र ऑफीडेविट करून नोटरी‌ करण्यात आली.खासदार शरद पवार यांच्या विचारांना मानणारे मोठ्या संख्येने पदाधिकार्यानी प्रतिज्ञापत्र भरण्यास गर्दी केली होती.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग,नागपूर विभागीय अध्यक्षा डॉ सुरेखा देशमुख, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,अमोल बोरकर, अल्पसख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, माजी नगसेवक बालाजी गहलोत,माजी नगसेवक अनिल भोंगाडे, सुनील भूते, महिला जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभूळकर,महिला विधानसभा अध्यक्ष निता गजबे, उपाध्यक्ष सिमा तिवारी, शहराध्यक्ष मृणाल रिठे, तालुका अध्यक्ष शगुप्ता शेख, तालुका उपाध्यक्ष मिनाक्षी धाकणे, तालुका सचिव सुचिता सातपुते, शहर सचिव अर्चना नांदुरकर, भारती घुंगरूड, दिपाली रंगारी, युवती शहराध्यक्ष माधवी देशमुख, उपाध्यक्ष आचाल पाटील,गोमाजी मोरे, किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष किशोर चांभारे, विधानसभा अध्यक्ष सुधाकर वाढई, अल्पसंख्यांक जिल्हा महासचिव नदीम शेख,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष बबलू शेख,अजय पर्बत,अमोल मुडे, नितीन भूते, पप्पु आष्टीकर,मारोती महाकाळकर, जगदीश वांदिले, प्रवीण श्रीवास्तव, राजू मेसेकर,प्रल्हाद तुराले, संजय गाभुळे, प्रवीण रघाटाटे, गंजु महाकाळकर, आशिष मंडलवार, पुरुषोत्तम कांबळे, उमेश नेवारे, सुशील घोडे, शेखर ठाकरे, वैभव साठोने, पंकज भट्ट, नितेश नवरखेडे, सुनील ठाकरे, निखिल भांनखेडे, दीपक चांगल, प्रवीण जनबंधू सह हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…

हजारो सेवेकरांनी घेतला पारायणाचा लाभ कारंजा लाड येथे श्री. परमहंस परशराम महाराज पारायन सोहळा संपन्न

0

 

अर्जुन कराळे शेगाव

अमरावती- श्री शेत्र कारंजा (लाड) येथे श्री नृसिंह स्वामी महाराज मंदिर (गुरु महाराज मंदिर) येथे श्री परमहंस परशराम महाराज पारायण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी श्री शेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे मुख्य पुजारी श्री सुनील महाराज पोपट हे आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी झाले होते.

सदर पारायण सोहळ्याला कारंजा (लाड) येथील आमदार राजेंद्र पाटणी व बुलढाणा येथील समाजभूषण विजयराज शिंदे त्यांनी सुद्धा पारायण सोहळ्याला भेट दिली असता त्यांचे हस्तैे श्री परमंहस परशराम महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आहे. तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक देविदासजी वाघमार यांनी सुध्दा उपस्थिती लावली.

या पारायण सोहळया पूवी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मुख्य मंदिरात एप्रिल महिन्यामध्ये रोजी मोठ्या भक्ती भावाने आपण श्री परशराम महाराजांच्या महिमा ग्रंथाचा पारायण सोहळा आयोजित केला होता. तो यशस्वी झाल्यानंतर श्री परशराम महाराज हे कारंजा (लाड) येथून जवळ असलेल्या इंझा (वनश्री) येथे २१ मार्च १९५१ ब्रह्मलिन झाले त्या अनुषंगाने तिथे कुठलेही आज पावतो पारायण झाले नव्हते

संदर्भात संकल्पना आल्यावर सर्व मुख्य सेवाधारी यांच्याशी संवाद करून मी जयंत सुरेशराव वानखडे यांच्यासह विलास जामठीकर, गोकुल शेगोकार, भालचंद्र कथलकर, राजू कथलकर, विलास दलाल, अशोक भारसाकळे, पुरुषोत्तमराव खंडार, महिमा ग्रंथ रचयते श्री. ढोले गुरुजी, श्री. डोरस गुरुजी, शंकरराव खवले, अमृतराव शेगोकार, महेंद्र कथलकर, चिन्मय जयंत वानखडे, हर्षवर्धन जामठीकर यांचे सह श्री क्षेत्र कारंजा (लाड) येथे श्री गुरू महाराज मंदिराचे विश्वस्त यांच्याशी बैठक घेतली व बैठक यशस्वी सुद्धा झाली त्यावेळी सर्व विश्वस्तांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करण्या करिता आश्वस्त केले.

त्यानंतर श्री शेत्र पिंपळोद येथे सेवाधारी अशोकराव भारसाकळे यांच्याकडे सर्व मुख्य सेवाधारी यांची बैठक बोलावून सर्वांना विस्तृत माहिती देण्यात आली व प्रत्येक सेवाधारी यांना सूचना विचारण्यात आल्या त्यांच्या सूचनांचे सुद्धा स्वागत करण्यात आले. यावेळी लाखोंडा, अकोला, अंर्तगांव (शिवाजी), पाटसूल (रेल्वे), अमरावती, खामगाव येथील सेवाधारी यांनी उपस्थिती दर्शविली. या पारायण सोहळयामध्ये वर्धा, अमरावती, शिरपूर (गुरव), सुकळी (गुरव), धानोरा (गुरव), जळतापूर त्याच प्रमाणे दर्याबाद, अंर्तरगाव (शिवाजी), अकोला जिल्हयातील पाटसूल (रेल्वे, खामगाव, बुलढाणा, मुंदेफळ, मेहकर, चिखली, अकोला, बार्शीटाकळी, खंडाळा, इंझा (वनश्री), लाखोंडा, पिंपळोद, आकोट, कारंजा (लाड), खंडाळा, वाशिम, मंगरूळपीर सर्व समाज बांधव भक्तगण या सर्वांची उपस्थिती लाभली.

यावेळेस विविध संस्थांचे समाज संघटनेचे अध्यक्ष यांची सुद्धा कार्यकारणी सह उपस्थिती होते. यामध्ये श्री शैव गुरव समाज हितकारणी मंडळ, अमरावती, अखिल गुरव समाज संघटना, बुलढाणा. गुरव समाज मंडळ, कारंजा (लाड).गुरव समाज हितकारणी मंडळ, खामगाव. श्री निळकंठेश्वर संस्थान, अमरावती. श्री हैनाही महाराज संस्थान, मुंदेफळ. श्री परमहंस परशराम महाराज संस्थान, जळतापूर. श्री परशराम महाराज संस्थान, शिरपूर (गुरव). श्री परशराम महाराज संस्थान सुकळी (गुरव) श्री परशराम महाराज संस्थान लाखोंना. श्री परशराम महाराज संस्थान, पिंपळोद. श्री परशराम महाराज संस्थान अंर्तगाव (शिवाजी) श्री परशराम महाराज संस्थान, जलकुंड पिंपळोद. श्री परशराम महाराज संस्थान, इंझा (वनश्री). व इतर स्मरणात असलेले व नसलेले यांची सुद्धा उपस्थिती होती.

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (गुरु महाराज) संस्थांचे सर्व विश्वस्त तसेच कारंजा (लाड) येथील समाज बांधवांनी कार्यक्रमाच्या दिवशी जो सेवाभाव दिला जयंत वानखडे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.

सिंदीकरांनी दाखविली मद्दतीची आपुलकी रेल्वे स्थांनकावर थांबलेल्या प्रवाश्यांना भरविले मायेचे जेवन

0

 

सिंदी रेल्वे ता.११ : मुसळधार पाऊसामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक सोमवारी (ता.१०) आकस्मिक थांबविल्याने अटकुन पडलेल्या शालिमार एक्स्प्रेस मधील प्रवाशांना जेवनाची व्यवस्था करुन सिंदीकरांनी दाखविली मायेच्या मद्दतीची आपुलकी……!

सविस्तर वृत्त असे की, हावडा-मुंबई मार्गावर माना स्थानकाजवळ मुसळधार पाऊसाने रेल्वे रुळा खालचा भराव वाहुन गेल्यांने सुरक्षिततेच्या कारणाने सोमवारी (ता. १०) रात्री ७ वाजता पासुन रेल्वे वाहतुु थांबविण्यात आली होती.

या दरम्यान दुपारची शालिमार एक्स्प्रेस ७ वाजता पासून रात्री उशीरापर्यंत अनिश्चित काळासाठी थांबुन होती. विशेष म्हणजे दैनदिन गरज लक्षात घेता संपुर्ण गाडीतील प्रवाशांचे पुरेल ऐवढी खाण्यापिण्याची व्यवस्था सिंदी रेल्वे स्थानकावर नाही अशा परिस्थितीत गाडीतील महीला, लहान मुल, वयोवृद्ध स्त्री पुरुष आदी प्रवाशांचे भुकेने हाल होत होते.

अशा परिस्थितीत मात्र ८०%कृषी प्रधान असलेले पोला सिटी सिंदी रेल्वे म्हणुन दूरवर ख्याती असलेले सिंदी कर आले मद्दतीसाठी धावुन सर्व प्रवाशांना रात्री साडेअकरा वाजता भरविला मायेचा घास दिले भरपेठ जेवन….!

योगायोग असा झाला कि दरवर्षी प्रमाने फार पुरातन काळापासून चालत आलेल्या शहरातील सार्वजनिक हनुमान मंदीरात आज एक्का म्हणजे अखंड टाळ सप्ताहाची समाप्ती होती त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील सर्वाना महाप्रसादाचे हनुमान मंदिर सप्ताह कमेटी आणि शहरवासीयांच्या वतीने आयोजन असते. दुपारी तीन वाजतापासुन महाप्रसादाच्या पंक्ती सुरू होतात. या रात्री उशीरापर्यंत चालतात. लगतच्या पंचविस खेड्यातील आणि शहरातील भावीकभक्त महाप्रसादाचा लाभ घेतात.

मात्र रात्री जेवन सुरु असतांनाच सदर घटनेची माहिती मिळाली आणि लागलीच नेहमी मद्दतीसाठी धावुन जाण्याची ख्याती असलेले सिंदीकर क्षणाचाही विलंब न करता या प्रवाशांच्या मद्दतीसाठी धावुन गेले.

गरजेच्या वेळी मिळालेली मदत पाहुन प्रवाशी भारावून गेले त्यांचे हुद् य गदगद झाले त्यांच्या तोंडुन आभार आणि कौतुकाची भेट सिंदी करांना मिळाली

मोहराळा येथे अज्ञात व्याक्ती कडून पुतळ्याची विटंबणा पोलीसात गुन्हा दाखल गावात तणाव पुर्ण शांतता

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील मोहराळा येथे महापुरूष यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गावातील बसस्टॅन्ड चौकात पोलीस बंदोबस्त तावण्यात आला आहे .

या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील मोहराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला असून याच्या बाजूला दोन सीसीटिव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आलेले आहेत. काल रात्री कुणी तरी डबे फेकल्याने शॉर्ट सर्कीट होऊन लाईट गेलेली होती. आज सायंकाळी लाईट आली. आज दिवसभर पाऊस असल्याने कुणाचे पुतळ्याकडे लक्ष गेले नाही.

दरम्यान, सायंकाळी अनिल केशव अडकमोल हे पुतळ्याजवळचे सीसीटिव्ही कॅमेरे सुरू आहे की नाही ? हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना कुणी तरी अज्ञात समाजकंटकाने पुतळ्याच्या दिशेने दोन दगड भिरकावल्याचे दिसून आले.

यामुळे पुतळ्याला दोन ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच समाजबांधवांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी मोहराळा येथे दाखल झाले. तर, समाजबांधवांनी यावल पोलीस स्थानकात धडक देऊन या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली.

या संदर्भात यावल पोलीस स्थानकात अनिल केशव अडकमोल ( वय ५२) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरू इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गावातील वातावरण नियंत्रणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डीवायएसपी कुणाल सोनवणे व पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर यांनी मोहराळा येथे भेट देऊन शांततेचे आवाहन केले आहे.

आज सकाळी निळे निशान या सामाजीक संघटनेचे आनंद बाविस्कर यांनी मोहराळा गावाला भेट दिली व सर्व समाज बांधवांना कोणताही कायद्या हातात न घेता शांततेच्या मार्गाने न्याय मिळवण्याबद्दल मार्गदर्शन व सुचना दिल्यात , यावेळी मोहराळा ग्रामपंचायतच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मोठया संख्येत समाजबांधव उपस्थित होते . दरम्यान आनंद बाविस्कर यांच्या सोबत निळे निशान संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास तायडे , युवकचे सतिष अडकमोल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.