Home Blog Page 203

ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा कोळशी येथे संपन्न

0

 

पंधरा वर्षात 60 विवाह पार पडले

कोरपना तालुका प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपणा तालुक्यातील कोळशी या गावांमध्ये ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातात यावर्षीही या मेळाव्यामध्ये तीन विवाह पार पडले सतत पंधरा वर्षांपासून ही परंपरा अविरत कोळसी ग्रामवाशी राबवीत आहे

यामध्ये कमी खर्चामध्ये कसल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता विवाह लावल्या जातात लाखो रुपयांची उधळण आजच्या कलियुगीन परिस्थिती होत आहे हे लक्षात घेता गावागावात सुख शांती प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने सर्व थोर महापुरुष व संतांच्या जयंतीचे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अंतिम इच्छा नुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ सक्रिय कार्य घडविण्यासाठी तसेच नव्या पिढीला मानवधर्मांचा विश्वशांतीचा व बंधुत्वाचा दिव्य संदेश देणाऱ्या साधुसंत व महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाची जाणीव व्हावी व प्रेरणा मिळावी

या निमित्ताने ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेत त्यानिमित्त या कार्यक्रमात विवाह सोहळा ठेवण्यात आले यामध्ये कोळशी गावातील युवक तरुण पुढे येऊन असे विविध कार्यक्रम गावात राबविले जात आहेत

आज या विवाह सोहळ्यामध्ये परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिथी दर्शवून हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे संचालन मारुती सातपुते यांनी केले

अट्रावल येथे पुतळा विटंबणा दंगल प्रकरणी २o५ संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल १५ जणांना पोलीसांनी केली अटक

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी सकाळी दहा ते साडेदहा वाजेचे सुमारास दोन गटात झालेल्या हाणामारीत घटाकडील सुमारे १०ते १२ जण जखमी झाले होते या प्रकरणी दोन्ही गटासह शासनाचे वतीने पोलीस उपनिरिक्षक सुनीता मारूती कोळपकर व पोलीस कॉन्स्टेबल अशोक रमेश बाविस्कर अशा चार फिर्यादी दाखल झाल्या असून चारही फिर्यादीनुसार २o५ आरोपीं विरुद्ध विविध कलमासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्री पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक करत लाठ्या- काठ्या चा वापर करून, तुंबळ हाणामारी झाली होती यात दहा जण जखमी झाले होते

या संदर्भात शनिवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गटाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एका गटाकडून ५७ तर दुसऱ्या गटाकडून ५१ यासह पोलीस प्रशासनाच्या वतीने फौजदार सुनीता कोळपकर यांनी दिलेल्या फिर्यादीत ९३ व पोलीस कॉन्स्टेबल अशोक बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ०४ अशा चार फिर्यादीनुसार २०५ आरोपींवर विविध कलमान्वये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

यात प्रशासन व दोन्ही गटाकडून दिलेल्या फिर्यादीतील काही संशयित आरोपींची नावे समान आहेत . रविवारी सकाळपर्यंत पंधरा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांची धरपकड अद्यापही सुरूच आहे.

अट्रावल गावात तणावपूर्ण शांतता

शनिवारी सायंकाळपर्यंत पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी फैसपुर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे गुन्हा अन्वेषण चे कोणी किसन नजन पाटील हे तळ ठोकून होते. रविवारी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांचे सह फैजपुर सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर अविनाश दहिफळे यांचे सह दंगल विरोधी पथक व पोलीस ताफा मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. या ठिकाणी काल प्रशासनाच्या वतीने पोलिस अधिक्षक एम राजकुमार यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणुन बसविला. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन पत्रकारांशी बोलतांना फैजपुर चे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ . कुणाल सोनवणे यांनी केले आहे .

महाराष्ट्र मराठा सोयरीक समाज बांधवांसाठी नवक्रांती देणारी ठरली..

0

 

वधु वर परिचय मेळाव्यातून उपजातींना बगल देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला…

हजारो वधू-वरांनी परिचय मेळाव्यात उपस्थिती दर्शविली..

बुलढाणा
महाराष्ट्र मराठा सोयरीक अंतर्गत मराठा वधु वर परिचय मेळाव्यात एक हजार च्या पुढे वधू-वरांनी घेतला सहभाग. मराठा समाजातील सर्व उपजाती बाजूला सारून महाराष्ट्र मराठा सोयरीकची नवक्रांती व परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे मत संस्थापक सुनील जवंजाळ व ऍड सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले.

आज दोन एप्रिल रोजी स्थानिक बुलढाणा शहरातील गर्दे हॉलमध्ये मराठा वधु वर परिचय सोयरीक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र मराठा सोयरीक च्या वतीने मराठा समाजातील सर्व उपजातींच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन सकाळी दहा ते पाच दरम्यान करण्यात आले होते. यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाज बांधव आपल्या उपजाती बाजूला सारून बहुसंख्येने प्रथमच एकत्र आले होते.

बुलढाणा शहरातील जिल्हास्तरीय वधू वर परिचय मेळाव्याच्या यशस्वी आयोजनानंतर यापुढे तालुकास्तरावर वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रामुख्याने वधु वर परिचय मेळाव्याला भेट देत शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक सुनील जवंजाळ,अँड सतीशचंद्र रोठे, डॉ. मनोहर तुपकर सुरेखाताई सावळे, संजीवनीताई शेळके, यांच्यासह सर्वच आयोजन समितीचे सदस्य तथा बहुसंख्य मराठा समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
———————————–

महापुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनेने गावात तणावाचे वातावरण परिस्थिती नियंत्रणात

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्मित झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील मोठे व महत्वाचे गाव मानल्या जाणार्‍या अट्रावल या गावात आज पहाटे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सुमारे दहा-बारा जणांच्या जमावाने पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास हा प्रकार केला. त्यांनी पहिल्यांदा येथील पथदिवा फोडून नंतर पुतळ्याची तोडफोड केली.

हा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या जमावाने या ग्रामस्थांना मारहाण करत पलायन केले.

काही मिनिटांमध्येच ही वार्ता परिसरात पसरताच दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुफान हाणामारी झाली.

याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तथापि, अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याने लवकरच वातावरण नियंत्रणात आले.

वातावरण नियंत्रणात दिसून आले. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर आणि त्यांचे सहकारी अट्रावलमध्ये ठाण मांडून बसले असून दोन्ही गटांशी सुसंवाद साधत आहेत.

कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून रॅपीड ऍक्शन फोर्ससह अतिरिक्त कुमक मागविण्यात आली असून गावात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

पोलीस प्रशासनाने या संदर्भात येथे वातावरण नियंत्रणात असल्याचे सांगून कुणीही या प्रकरणाच्या बाबत अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे.

आज अट्रावलमध्ये जो प्रकार घडला, त्यातील दोषींवर कारवाई करण्यात येत असून याबाबत कुणी सोशल मीडियात दिशाभूल करणारी माहिती प्रसारीत करू नये असेही पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

सरपंच पती देवचंद पवार,अमोल बहाळे यांचेवर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करा; तालुक्यातील पत्रकारांची मागणी

0

 

जळगाव जा : २९ मार्च रोजी पत्रकार सागर झनके यांना शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरपंच पती देवचंद पवार आणि अमोल बहाळे यांचेवर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा या मागणीसाठी जळगाव जामोद तालुक्यातील पत्रकार बांधवांनी 31मार्च रोजी ठाणेदारा मारफत पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन सादर केले आहे.

२९ मार्च रोजी गावातील सरपंच पती देवचंद पवार आणि उपसरपंचाचा मुलगा अमोल बहाळे यांनी दारू पिऊन पत्रकार सागर झनके यांचेघरी येवून हेतूपुरस्पर द्वेशापोटी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.त्यामुळे सागर झनके यांनी त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन जळगाव जामोद ला तक्रार दाखल केली

असून त्यांचेवर २९४,३२३,५०६,३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा सुद्धा दखल करण्यात आला आहे. स्वतः ला सरपंच उपसरपंच म्हणून घेणाऱ्या देवचंद पवार आणि अमोल बहाळे यांचेवर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दखल करून कठोर करण्यात यावी यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत सरपंच पती देवचंद पवार व अमोल बहाळे यांचेवर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी यासाठीचे निवेदन ठाणेदार आणि उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांचे मारफत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना देण्यात आले आहे.

सदर निवेदनावर जेष्ट पत्रकार गुलाबराव इंगळे,सागर झनके,विनोद वानखडे,अश्विन राजपूत,गोपाल अवचार,अनिल भगत,राहूल निर्मळ, दंत्तू दांडगे, गजानन सोनटक्के, मो.फारूख,अनिल भगत,अमर तायडे,योगेश म्हसाळ,अमोल भगत इत्यादी पत्रकारांच्या सह्या आहेत.
पत्रकार सागर झनके आधुनिक केसरी वृत्त पत्राचे बुलढाणा जिल्हा प्रतीनीधी असून संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा नाव लौकिक आहे.एक अभ्यास व्यक्तीमत्व असलेले पत्रकार सागर झनके चागले कवी,साहित्यीक असून नुकताच त्यांना पत्रमहर्षी स्व.मोहणलालजी बियांनी राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाला आहे.आपल्या लिखाणातून ते सातत्याने गोरगरीब जणतेचे प्रश्न मांडत असतात.

सागर झनके हे व्हाईस आँफ मिडियाचे तालुका सहसचिव असून टी.व्ही जर्णीलीस्ट संघटणेचे बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमूख आहेत.लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने हल्ले होत असून,लोकशाहीसाठी ती घातक आहे. त्यामुळे अशा गावगुडांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी,तरच लोकशाहीचा चवथा आधारस्थंभ टिकेल अन्यथा, पुन्हा एकदा पत्रकांरांना जीवाने मुकावे लागेल येवढं मात्र खरं…

पतंजली परिवाराच्या सर्व संघटन मिळून बुलढाणा जिल्ह्याचा रामनवमी उत्सव नित्य योगवर्ग भटृड जीन येथे

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक 30 /3 /2023 रोजी सकाळी मोठया उत्स्फूर्तपणे पार पडला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नित्य योग वर्गाचे आधारस्तंभ रमेशजी भट्टड हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला होम-हवन विधी आदरणीय कैलासचंद्रजी चौधरी यांच्या सहकार्याने पार पडला.कार्यक्रमात महाराष्ट्र पूर्व प्रांत सह-कोषाध्यक्ष आदरणीय प्रल्हादजी सुलताने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी रामनवमी हा दिवस परमपूज्य योग गुरू स्वामी रामदेव बाबा यांचा संन्यास दिवस असून योगपरीवारासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी चतुर्भुजजी मिटकरी भारत स्वाभिमान जिल्हा बुलडाणा, जिल्हा कोषाध्यक्ष निळकंठजी साबळे, किसान सेवा समिती चे जिल्हा प्रभारी पुरुषोत्तमजी पाटील, बुलढाणा जिल्हा योग समितीचे दशरथजी लोणकर ,जिल्हा युवा प्रभारी हरिदासजी सोळंके, महामंत्री बाबुरावजी रोकडे,महिला पतंजली च्या तालुकाअध्यक्षा वर्षाताई सरप ,भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस कल्पनाताई मसने ,व्यासपीठावर उपस्थितहोते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी दीपक जी सरप,रवींद्रजी हेलोडे, हरीश जी चिंचोळकर, सविता ताई इंदोरे, धुमाळे काकू,इत्यादी मथुरा लॉन व भट्टडजीन योगवर्गाचेसर्व योग साधक व योग साधिका उपस्थित होते.
शेवटी कार्यक्रमाचे समापन शांती पाठाने झाले*

 

संगीतराव भोंगळ यांचे कार्य कष्टकऱ्यांना न्याय देणारे प्रसेंजीतदादा पाटील

0

 

यांचे आज दिनांक 30 मार्च 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते मा. डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा लोकप्रिय आमदार सिंदखेडराजा मतदारसंघ यांच्या वाढदिवसानिमित्त

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व गोदावरी फाउंडेशन पाथरुडा बु प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 30 मार्च 2023 रोजी मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर चे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ राजू पाटील यांनी आयोजित केले

आहे या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ भाऊ झाडोकार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसेंजित दादा पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रकाश भाऊ ढोकणे विधानसभा अध्यक्ष जळगाव जामोद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रंगराव बापू देशमुख जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संदीप भाऊ उगले,डॉक्टर चौधरी साहेब आरोग्य अधिकारी पातुर्डा, नारायण भाऊ ढगे, रंजीत गंगतीरे सरपंच ग्रामपंचायत पातुर्डा,डॉक्टर हंसिना मॅडम आरोग्य अधिकारी गोदावरी फाउंडेशन रुग्णालय जळगाव खान्देश प्रमुख उपस्थिती संजय मारोडे,तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अरुण भाऊ निंबोडकर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मीर मुजफ्फर अली साहेब पत्रकार, एमडी साबीर भाई अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष, विलास भाऊ मोरखडे, उल्हास महोदे,अनुप महाले, डॉक्टर राजेश वानखेडे सर सोनाळा,दुर्गासिंग भाऊ सोळंके जिल्हा अध्यक्ष ग्रंथालय संघ, तुकाराम भाऊ घाटे माजी नगराध्यक्ष संग्रामपूर, गणेशभाऊ धर्माळ,शरद भाऊ तायडे ग्रामसेवक सोसायटी अध्यक्ष पातुर्डा, अमोल व्यवहारे तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राजेश आमटे, राजेश गिरी, अंबादास उगले, रामेश्वर भड, गजानन मानकर, डॉ.उल्हास पाटील साहेब वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर व कर्मचारी मंडळी, डॉक्टर विलास चौधरी व सर्व सहकारी,डॉ राजेश वानखेडे साहेब सोनाळा पी एस सी

व त्यांचे सर्व सहकारी, डॉ विश्वजीत त्रिकाळ डॉ पवन चव्हाण पंजाबराव वानखडे ,दादा भाऊ तायडे, हरिभाऊ पुंडे , मीर कुर्बान अली,प्रकाश भाऊ देशमुख ,दिनकर इंगळे, मुन्ना बोराखडे, साबीर पठाण साहेब,ज्ञानेश्वर बोदडे,

दिनेश वानखेडे, अमीर कुरेशी, मोहन सोनोने,अमित वरगे ,सुरेश वानखडे पेंटर ,पप्पू पठाण माजी उपसरपंच, मनोज वानखेडे, विष्णू पाटील, सागर यादगिरे, श्याम भाऊ दुबे पत्रकार, धनराज भाऊ ससाने पत्रकार, बिस्मिल्ला भाई, हातेकर साहेब, विनोद भाऊ गवई, गजानन पुंडे, अमित पाटील, विवेक मांडवगडे, शेख रेहान, सुरेश सोनोणे, मुन्ना आढाव,पातुर्डा गावातील व पंचक्रोशीतील सर्व गरजूंनी या शिबिरात सहभाग घेऊन आपली तपासणी करून घेतले.

दिव्यांग याचे पाच वर्षांपासून ग्रामपंचायत कडून निधी वाटप न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वतीने मोताळा तहसीलदार यांनां निवेदन 

0

 

बुलडाणा जिल्ह्य़ातील येत असलेल्या मोताळा तहसीलदार यांना अविनाश वाकोडे यांनी दिले निवेदन. मोताळा तहसील हद्दीत येत असलेल्या गावांमध्ये दिव्यांग यांचे ग्रामपंचायत मध्ये जे निधी येते ते मागील पाच वर्षापासून वाटप करण्यात आली.

नसुन दिव्यांग ची ती निधी लवकरात लवकर देण्यात यावी. तसेच चार ते पाच महिन्यांपासूनअर्थसाहाय्य योजनेच्या केसेस प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर मागी काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. श्रावण बाळ, विधवा महिलेचे जे केसेस प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे.

अशा मागणीचे निवेदन मोताळा तहसीलदार साहेब यांना देण्यात आले. सदर निवेदन देताना उपस्थित म्हणून बुलढाणा जिल्हाचे सरचिटणीस अपंग दिव्यांग सेल अविनाश वाकोडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच दिव्यांग मोठ्या संख्येन्ये उपस्थित होते

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

अंकलेश्र्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्याचे काम करा अन्यथा आंदोलन आरपीआय (आठवले)गटाचे एन. एच ला निवेदन

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

 

अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्यासाठी आरपीआय आठवले गटाचे युवा जळगांव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी आज दिनांक :-२८/०२/२०२३ रोजी,भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण ऑफिस चे उपअभियंता दिग्विजय पाटील(साईट इंजिनिअर)यांना निवेदन देऊन काम तात्काळ मार्गी लावा नाही तर आंदोलन करु असे लेखी निवेदन दिले

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता असे समजेनासे झाले आहे,त्याच बरोबर सदर (NH) हायवे मधील यावल ते चोपडा रस्त्याची अतिशय चिंता जनक अवस्था झाली

आहे,तरी अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर नुतनीकरण (नवीन) करण्यात यावा तसेच,यावल ते चोपडा रस्ता सध्या शेवटची घटका मोजत असून त्या रस्त्यास जीवनदान म्हणून तात्पुरती डागडुजी करण्यात यावी,जेणे करून जे अपघात घडत आहेत ते थांबतील त्यामुळे नाहक प्रवाशी बांधवांना आपला बळी द्यावा लागत आहे,

तसेच सदर रस्त्याच्या संदर्भात आपले शाखा अभियंता जाणून बुजून दुर्लक्ष करतात का तसेच आपल्या कार्यात निष्काळजी पणा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे,तरी अश्या काम चुकार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी,जेणे करून त्यांचा मनमानी कारभार बंद होईल.

सदर अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्याचे नुतनीकरण एका महिन्यात सुरु करावे तसेच यावल ते चोपडा रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी अन्यथा आर.पी.आय आठवले गटाचे जळगांव जिल्हा अध्यक्ष राजु सुर्यवंशी आणि युवा जळगांव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांच्या नेतृत्वात बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच संदानशिव यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले की,अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता मात्र तो आता नॅशनल हायवे (एन.एच) यांच्या कडे वर्ग करण्यात आलेला आहे,सदर रस्त्याबद्दल अनेक दिवसांपासून अनेक राजकीय पक्ष रस्तादुरुस्तीची मागणी करत आहेत,मात्र त्यांना माहितीच नाही की सदर रस्ता हा कोणाच्या मार्फत करण्यात येईल किंवा होईल हि मोठी शोकांतिका आहे.

तसेच जनतेने नेमून दिलेले लोकप्रतिनिधी जाणून बुजून सदर रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा घणा घाती आरोप त्यांनी केला आहे,तर सदर निवेदन देते वेळी युवा जळगांव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव व आर.पी.आय आठवले गटाचे यावल तालुका सदस्य किरण तायडे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

वार्षीक आमसभा व सरपंच मेळाव्याचे आयोजन

0

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

पंचायत राज समितीचे शिफारसीप्रमाणे पंचायत समिती, खामगाव ची सन २०२२-२३ ची वार्षीक आमसभा व सरपंच मेळावा मा. आमदार अॅड. श्री आकाशभाऊ फुंडकर, खामगाव विधानसभा मतदार संघ, खामगाव यांचे अध्यक्षतेखाली दि.३१ मार्च २०२३ रोजी ११ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह, तहसिल कार्यालय खामगाव येथे आयोजीत करण्यात आली आहे.

तरी तालुक्यातील सर्व सरपंच, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, सर्व खाते प्रमुख, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी आमसभेकरीता उपस्थित राहावे,

असे आवाहन प्रशासक तथा गट विकास अधिकारी श्री चंदनसिंग एस राजपुत व सहाय्यक गट विकास अधिकारी श्री आर सी शेख पंचायत समिती, खामगाव यांनी केले आहे.