Home Blog Page 205

किनगाव चुंचाळे रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तिचा र्निघुण खून परिसरात एकच खळबळ पोलीस घटनास्थळी दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथील एका वयोवृद्ध व्यक्तिचा अज्ञात व्यक्तिने धारधार हत्याराने र्निघुणखुन केल्याची घटनासमोर आली आहे .

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की ,भिमराव शंकर सोनवणे वय ६० वर्ष वाहनचालक राहणार किनगाव बु॥ तालुका यावल यांचा रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने गळा चिरडुन नंतर दगडाने ठेचुन खुन केल्याची घटनासमोर आली आहे .

चुंचाळे रस्त्यावरील किनगाव शिवारातील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली धारधार हत्याराने गळा कापुन दगडाने ठेचुन अत्यंत र्निघुण खुन झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली असुन या घटनेमुळे किनगाव व चुंचाळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ,

घटनेचे वृत्त कळताच फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर , पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलीस पयक घटनास्थळी पहोचले असुन, घटनास्थळी स्वानपथकास बोलविण्यावा आले आहे .

मागील चार ते पाच महीन्याच्या कालावधीत अशा प्रकारे खून झाल्याची तालुक्यातील ही चौथी घटना आहे.

या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात खुन झालेल्या व्यक्तिचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा करण्यात येत आहे. हा खून कुणी व कशासाठी झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नवनियुक्त ठानेदार सोनुने यांनी स्विकारला पदभार

0

 

सिंदी रेल्वे ता.२४ : नवनियुक्त पोलीस निरीक्षक वदंना सोनुने यांनी मावळते पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या कडुन गुरुवारी (ता.२३) सायंकाळी सिंदी रेल्वे ठाण्याचा पदभार स्वीकारला.

या प्रसंगी सिंदी रेल्वे येथुन सेवाग्राम पोलीस ठाणेदारपदी बदली झालेले चंद्रशेखर चकाटे यांनी नवनियुक्त ठानेदार वंदना सोनुने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आणि सोनुने यांना त्यांच्या पहिल्या ठानेदारपदाच्या पुढील कार्यास मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उप पोलीस निरीक्षक राजु सोनपितळे, माजी नगरसेवक सुनील बोंबले, पत्रकार मोहन सुरकार तसेच सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे शिस्तप्रीय सोनुने मॅडम या अगोदर सुध्दा सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात कोरोना काळात उप पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्यामुळे येथील सर्व बाबीशी त्या परिचित असुन शहरातील नागरीक सुध्दा त्यांच्याशी व त्यांच्या कार्याशी परिचीत आहे

तानाजी कुऱ्हाडे यांची भारतीय लोकशक्ती पक्ष महाराष्ट्रराज्य अध्यक्षपदी निवड

0

 

 

कोल्हापूर वार्ताहर : २० मार्च भारतीय लोकशक्ती पक्ष पक्षप्रमुख कोळप्पा ह.धोत्रे यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर पक्ष वाढीसाठी दौरे चालू आहेत. भारतीय लोकशक्ती पक्ष पक्षप्रमुखांनी कोल्हापूर येथे १९ मार्च रोजी शासकीय विश्रामगृह येथे.

विविध कार्यक्रम कोल्हापूर दौरासाठी आले असताना. २० मार्च रोजी कोल्हापूर सर्किट हाऊस मध्ये. कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय लोकशक्ती पक्ष पदाधिकारी यांना एकत्र बोलावण्यात आले. पक्षाच्या पदाधिकारी बैठकीमध्ये. कोळप्पा धोत्रे यांनी २०२४ विधानसभा व लोकसभा निवडणूक साठी व पक्ष बळकट वाढीसाठी माहिती व चर्चा करण्यात आली. ह्या पक्षाच्या चर्चा व बैठकीमध्ये.

पक्षप्रमुख कोळप्पा ह.धोत्रे यांनी भारतीय लोकशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तानाजी कुऱ्हाडे यांना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावरून भारतीय लोकशक्ती पक्ष महाराष्ट्रराज्य अध्यक्षपदी मा.श्री.तानाजी रामचंद्र कुऱ्हाडे यांची निवड करण्यात आली.

तर सौ.अनिता अनिल निकम यांची महिला महाराष्ट्र अध्यक्षा म्हणून निवड झाली. व भगवान धोंडीराम कुंभार (वाशी)यांची कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.व सुरेश कृष्णात कुंभार यांची भारतीय लोकशक्ती पक्ष चालक-मालक युनियन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली.

ह्यावेळी परशुराम मातीवडर(पन्हाळा तालुका उपाध्यक्ष), बजरंग पवार (तालुका कराड), सौ.सविता निकम(ग्रामपंचायत सदस्य नंदवाळ),सौ.शितल कोंडेकर,सौ.कमल उलपे, संगीता उलपे,सौ.विमल उलपे,सौ.सारिका कोंडेकर, एकनाथ पाटील, दिनकर भोईटे, अशोक लोखंडे, तानाजी पाटील व इतर उपस्थित होते.

सूर्या मराठी न्यूज
तानाजी कुऱ्हाडे(कोल्हापूर)

कोल्हापूर करवीर,वाशी येथे लोक कलाकारांचा मेळावा.

0

_____________________________________
कोल्हापूर तानाजी कुऱ्हाडे : वाशी ता.करवीर येथे १९ मार्च रोजी कोल्हापूर जिल्हा लोक कलाकारांचा श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर लोक कलाकार सांस्कृतिक शिक्षण संगीत संस्था सरवडे यांचे कडून मेळावा घेण्यात आला.

श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी कुऱ्हाडे यांनी महाराष्ट्र लोक कलाकार वयोवृद्ध पेन्शन यांच्यासाठी शासनाच्या असणाऱ्या जाचक अटी व नियम हे वय वृद्ध कलावंतांना खर्चीक व दमवण्यासाठी असून आपण सर्वांनी एकत्र यावे. आपल्या सर्वांची एकी हे महत्त्वाचे आहे. तसेच वयोवृद्ध पेन्शन साठी 48 हजाराचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला कायमस्वरूपी रद्द व्हावा.

यासाठीही आपण सर्वांनी मिळून शासन व सरकारकडे मागणी करण्याची गरज आहे असे म्हणाले. कोल्हापूर जिल्हा परिषद कलाकार कमिटी स्थापन लवकर व्हावी कारण अनेक वर्षे लोक कलाकार वयवृद्ध अनेकांचे मानधन प्रस्ताव तसेच पडून आहेत. असेही त्यांच्या भाषणातून सांगण्यात व माहिती देण्यात आले. यावेळी तानाजी कुऱ्हाडे यांनी आपण लिहलेली कविता.
आज कलाकारांचा घेतला मेळा,
कुणाचा तरी आहे तिरका डोळा |
प्रत्येक वर्षाला करतो कागद गोळा, कलाकारांच्या कमिटीचा नाही मेळा ||
लोक कलाकारांचा मेळा,
कोणाच्यातरी पोटात गोळा |
त्याचं त्याला माहीत कळा,
का नाही कमिटी गोळा ||
कलाकारांच्यात पण राजकारण,
प्रत्येक वर्षाला आहे काही ना काही कारण |
आपण सर्व आहोत जबाबदार,
लोक कलाकार विश्वासात कारणी,
कलाकारांच्यात पण राजकारणी ||
मी पाहिलेत पत्रिका फेटे व खुर्चीवर रुसणारे,
म्हणून ते आहेत आमच्यावर हसणारे | आमच्यात ही कधीपर्यंत राहणार रूसणारे,
कधी होणार आमच्या लोक कलाकारांचे चेहरे असणारे ||
ही कविता वाचून सर्व लोक कलाकार व मान्यवरांचे मनं जिंकले.
शाहीर शामराव खडके यांनी शासकीय योजना याची माहिती दिले.

सौ.अरुणा कुंभार यांनी लोक कलावंतांच्या व्यथा मांडल्या. सौ.अनिता निकम यांनी लोक कलाकार महिलांनी शासकीय योजना मिळवण्यासाठी जास्तीत जास्त महिला एकत्र येणे महत्त्वाचे आहे असे म्हणाल्या. शाहीर महादेव बुडके यांनी. आपल्या भाषणात स्वतःची शाहीर कला ओळख व स्वतःचे शासन दरबारी होणारी फरफड सांगितले. कोळप्पा धोत्रे सिने अभिनेता व मराठी चित्रपट निर्माते यांनी कोल्हापूर येथील लोक कलाकारांच्या अडीअडचणी व न्यायासाठी आपण स्वतः सर्वांच्या सोबत आहोत असे म्हणाले. राष्ट्रीय शाहीर बाबुराव कांबळे (गटविकास अधिकारी)यांनी कलाकार हा कलाकारच असतो. कलाकारांची ओळख ही कलेतूनच होते हे त्यांच्या असणाऱ्या हलगीच्या वादन तालावर त्यांनी सिद्ध करून दाखवून दिले.

अमर कुंभार(लोकनियुक्त सरपंच नंदवाळ) यांनी लोक कलाकार यांच्यासाठी ग्रामपंचायत व आपल्याकडून जे काय मदत लागेल ते मी व माझ्या सहकार्याकडून मदत करण्याचा प्रयत्न करेन असे म्हणाले.
या लोक कलाकारांच्या मेळाव्यात भगवान कुंभार(शाहीर सुरती व डाक वादक),श्रीकांत राणे येवतीकर, बाळू चौगले(हलगी वादक),बाळू पाटील येवतीकर,शा.यशवंत कांबळे,सुरेश चौगुले,रघुनाथ खालकर,शा.एकनाथ पाटील(बुवा), दिनकर भोईटे,शा.आनंदा पाटील (धामोड),शा.विठ्ठल कांबळे, सखाराम खोत(बंधू सखा), अनिल निकम,ह.भ.प.एस.के.नाळे,ह.भ.प.नानामदेव पाटील,ह.भ.प.आनंदराव वायदंडे, सुनिल शिंदे (बुधवार पेठ कोल्हापूर), विनायक उलपे(पो.पाटील),शा.भिमराव गायकर, पांडुरंग गायकर(ढोलकी वादक),सजाबाई जाधव मंदूर(देवदासी), रामचंद्र जाधव (मर्दानी खेळ), व इतर कलाकार उपस्थित होते.सुत्रसंचालन शा.बाबुराव शंकर कांबळे आभार शा.महादेव बुडके यांनी मानले.

सूर्या मराठी न्यूज
तानाजी कुऱ्हाडे
कोल्हापूर

बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावर यावल ते साकळी व किनगाव रस्त्याची खड्डयांमुळे दयनिय अवस्था

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शहराच्या प्रमुख मार्गावरून जाणाऱ्या बुऱ्हाणपुर अंकलेश्वर या राज्य मार्गावरील यावल ते साकळी व साकळी ते किनगाव या दरम्यानच्या रस्त्याची ठीकठीकाणी पडलेल्या खड्डयामुळे अत्यंत बिकट अवस्था झाली असून ,

तात्काळ संबधीत विभागाने याकडे लक्ष वेधून रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी केली आहे . यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना प्रा . मुकेश येवले यांनी म्हटले आहे की ,

यावल शहराशी जोडला गेलेला बु्ऱ्हाणपुर ते अंकलेश्वर हा दोन प्रमुख राज्यांना जोडणारा मार्ग असुन , या मार्गावर मोठया प्रमाणावर वाहनांची वर्दळ दिसुन येते, अशा परिस्थितीत यावल ते साकळी व साकळी पासुन किनगाव पर्यंतच्या सुमारे १४ किलोमिटर रस्त्याची ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने या

मार्गावर झालेल्या भिषण अपघात होवुन अनेक निरपराध नागरीकांना आपले प्राण गमावले आहे . अशा गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष न देणे हे नागरीकांचे दुदैव म्हणावे लागेल अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली , मागील अनेक दिवसापासुन या रस्त्याच्या दुरूस्ती करीता वाहनधारका पासुन तर विविध सामाजीक संस्था आणी सर्वसामान्य नागरीकांकडुन वारंवार मागणी करण्यात आलेली असतांना

, स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन या नागरीकांच्या जिवन मरणाशी संबंधीत विषयाकडे गांभीयाने लक्ष देत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत असून , प्रशासना तात्काळ या मार्गावरील रस्त्याची दुरूस्ती न केल्यास आपण राज्याचे विरोधी पक्षनेते ना.अजीत पवार यांना पत्राद्वारे सविस्तर माहिती देवुन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी सांगीतले .

महिन्याभरापूर्वी गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गौलखेड येथील आरोपी विरुद्ध

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये,पोस्को, ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल..

शेगाव : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी महिन्याभरानंतर ग्रामीण पोलिसांनी पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोस्को ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हादाखल केला आहे, याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडीतीने आज शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की 14 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी साडे बारा वाजे दरम्यान मी औषधी च्या गोळ्या आणण्याकरिता जात असताना गौलखेड येथील गणेश प्रल्हाद शेजोळे यांने मलाआवाज दिल्याने काय म्हणता असे विचारले असता.

आरोपीने माझे तोंड दाबून घरामध्ये नेले व दरवाजाला आतून कळी लावून जबरदस्तीने दोन गोळ्या मला दिल्याने मला गुंगी आली आणि गुंगी मध्ये आरोपीने अत्याचार केला यावेळी आरोपीने म्हटले की कोणाला काही सांगू नको सांगितले तर मी तुझ्या बहिणीचे व मावशीचे लग्न होऊ देणार नाही व तुझे जीवन खराब करीन असे म्हणून जीवाने मारण्याची धमकी दिली यामुळे पीडिता घाबरून गेल्याने झालेली घटना कोणालाही सांगितली नाही.

तर आज याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी गणेश प्रल्हाद शेजोळे विरुद्ध कलम 376 (१), 354 328 342 506 भादवी सह कलम 4,12 पोस्को सह कलम 3(1),w(I)(ii)3(2) (VA)(3)(2)(5) अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर साहेब करीत आहेत.

या घटनेमुळे गौलखेड गावात एकच खळबळ निर्माण झालेली दिसत आहे

आझाद नगर परिसरात घरात घुसून काठीने मारहाण केल्याप्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: येथील आजाद नगर परिसरात जळगाव जामोद येथील चौघांनी घरासमोर येऊन शिवीगाळ आणि घरात घुसून काठीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख नसीर शेख तालीम वय 47 वर्षे राहणार आझाद नगर यांनी शहर पोलीस स्टेशनला आज तक्रार दिली की ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत असून त्यांच्या मुलीचा घरगुती वाद असल्याने त्यांना फोन करून सांगितले की तुम्ही येऊन मुलीला घेऊन जा असे सांगितले यावरून जळगाव जामोद येथील अमीर खान मज्जिद खान, मुकखार खान आमिर खान, बबन आमिर खान व इक्बाल खान आमिर खान यांनी घरासमोर येऊन शिवीगाळ केली

व घरामध्ये येऊन चौघांनी काठीने मारहाण करून जखमी केले व जीवाने मारण्याची धमकी दिली अशा तक्रारी व मेडिकल सर्टिफिकेट वरून कलम 452 324 504 506 34 भादवी नुसार पुन्हा दाखल करण्यात आला आहे

निमित्त अभिष्टचिंतन आणि ओळख कर्तृत्ववान युवकाची विठ्ठल शेषराव अवताडे

0

 

आजचे सामाजिक राजकीय वातावरण बघता व्यवसाय घर सांभाळून काम करण्याची गरज आहे असा विचार रुजवून आदर्श ठेवणारे वेक्तीमहत्व

सर्वसामान्य कुटुंबातील जीवनमान जागून काहीतरी सर्वांपेक्षा वेगळं करावं आपल स्वतःच अस्तित्व असावं आपण इतरांपेक्षा वेगळं काही तरी करावं आणि आपण नेतृत्व करून कर्तुत्व सिद्ध करावं हा विचार ज्याच्या मनात लहानपणी येतो आणि मग जेव्हा शाळेत आपण शिक्षणाचे धडे घेतो.

त्या सोबतच सामाजिक आणि सर्वांगीण विकासाची संकल्पना मनात ठेऊन हे कर्तुत्व शिद्द करण्यासाठी तो काम करण्यासाठी पाऊल टाकतो तेव्हा आज तो कर्तुत्वाच्या जोरावर आज चालत चालत यशाच्या मार्गाने प्रस्थान करत असतो ,

वयाच्या पंधराव्या वर्षी ज्याने समाजकारण काय असते ह्याचे धडे घेत श्री गुरुदेव सेवा आश्रमाच्या माध्यमातून सर्वांगीण सुसंस्कार वर्गात जाऊन प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करत असताना शिक्षणासोबतच आपले ध्येय आणि मतील विचार हे डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयीन शिक्षण आणि सोबत व्यवसाय करत आज एका विशिष्ट वळणावर जेव्हा हा युवक येऊन पोहचतो तेव्हा मात्र त्याच्या बद्दल लिहावं लागत बोलाव लागत हे नक्की, राजकीय वारसा नाही ,

पण वडिलांचे सामाजिक कार्य करण्याचे मिळालेले धडे मनात घेऊन आज अवघ्या 15 वर्षा आधी नवीन गावात वास्तव्याला आल्या नंतर आज संपूर्ण गावात आपल्या कार्याने ज्याची ओळख निर्माण होते , त्या युवका बद्दल लिहावं लागत ,

विठ्ठल शेषराव अवताडे , हे मूळचे दहिगाव अवताडे चे ,त्यानंतर जन्मा आधीपासून त्यांचा परिवार कोद्रि येथे राहत होता पण पंधरा वर्षा आधी शेगाव येथे ते स्थाईक झाले आणि आज आपल्या कर्तुत्वाने आणि स्वभावाने सर्वांच्या मनात बसले ,

विठ्ठल अवताडे यांचं सुरुवाती पासून शिव शाहू फुले आंबेडकर विचारावर काम करण्याचं माणसं आणि ह्याच माध्यमातून त्यानी २०१३ मध्ये संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ,आपले विचार मांडणे , वेळोवेळी आंदोलन करणे , न्याय, हक्क , शेतकरी , विद्यार्थी ,सर्वसामान्य जनतेचा मुद्दा घेऊन काम करायला सुरुवात केली. आज पर्यंत त्यांनी आज शेकडो आंदोलन केले शेकडो असतील त्याच सोबत आज मराठा पाटील युवक समिती चे माध्यमातून समाज एकत्रीकरण करण्याच्या दृष्टीने समाजातील विविध विषयांवर काम ते करत आहेत ,

त्या सोबतच सर्वसामान्यांचा आवाज बुलंद व्हावा म्हणून पत्रकारिता त्यांनी स्वीकारून आज आपल्या पत्रकारितेचे माध्यमातून ते काम करत आहेत ,
विठ्ठल अवताडे हे चांगले वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत याची नोंद घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी चे माध्यमातून त्यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जन नायक पुरस्कार २०२० प्राप्त झालेला आहे, त्याच बरोबर विविध सामाजिक संघटनात्मक बांधणी मध्ये ते सक्रिय असतात ,ह्या सगळ्याच्या सोबतच स्वतः त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षणं घेत असताना इतर डिप्लोमा आणि व्यवसाय सुद्धा सांभाळा आहे ,आज त्यांचा स्वतःच्या मालकीचा केबल आणि इंटरनेट व्यवसाय आहे ,

टॅक्सी सर्व्हिस आहे , सोबतच त्यांचे सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांसोबत असणारे समंध आणि त्यांचे कार्य बघता कर्तुवाबद्दल नक्कीच आदर्श आहे , आज गेल्या पंधरा वर्षांच्या ह्याच सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन आज ते प्रत्यक्ष राजकीय वाटचाल करत आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून भविष्यात भाऊ आपल्या हातून असेच कार्य घडत राहो आणि आपण यशाच्या उंच शिकरावर जावं आणि नक्कीच आपल कर्तुत्व सिद्ध होऊन यश संपादित करावं हीच प्रार्थना , आज आपण जी प्रत्यक्ष राजकीय वाटचाल करत आहात त्यात

तुम्हाला यश मिळो आणि गेल्या पंधरा वर्षांत आपण निस्वार्थ केलेल्या समाज कार्याच्या अनुभवातून आज आपण विचार करत असलेल्या आपल्या मनातील राजकीय इछा पूर्ण होऊन आपण नक्कीच एकदा राजकीय कर्तुत्व सिद्ध करावं आणि आपल्या हातून आजन्म समाज कार्य घडत राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना
राह में खतरे बहुत है मगर ठहरता कोण है
मौत कल नाही तो आज आयेगी डरता कोण है
तेरे लष्कर के मुताबिक अकेला हू मै
लेकीन फैसला मैदान मे होगा बाजी मारता कोण है
नक्कीच आपण ही बाजी मारावी आणि यशस्वी व्हावं ह्या आमच्या मनापासून वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा आहेत

श्याम अढाव पाटील
मराठा पाटील युवक समिती तालुका अध्यक्ष शेगाव

यावल तालुक्यात घातक रसायन व्दारे बनविलेल्या पन्नीच्या दारूची खुलेआम विक्री अनेक तरुणाच्याआयुष्याची राखरांगोळी

0

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यात मानवी जिवनास अपायकारक अशा अत्यंत विषारी पदार्थाने बनविलेल्या पन्नीच्या दारूचा सर्वत्र महापुर आल्याचे दिसत आहेत या पन्नीच्या दारूमुळे अनेकांचे कुटुंब व आयुष्य उद्धवस्त झाले असुन अनेकानी यमलोग गाठले असुन राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस प्रशासनाने तात्काळ या पन्नीच्या दारू विक्रीवर ठोस अशी कारवाई करीत कायमचे प्रतिबंध घालावे.

अशी मागणी मोठया प्रमाणावर महिला वर्गाकडुन करण्यात येत आहे . यावल तालुका हा जळगाव जिल्ह्यात आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जातो , ८५ गावे असलेल्या या तालुक्यात मोठया प्रमाणावर राहणारे गोरगरीब नागरीक मोलमजुरी करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात , मात्र मागील गेल्या दोन ते तिन वर्षापासुन तालुक्यात विषारी घातक रसायन मिश्रण करून पन्नीची दारू तयार करण्यात येवुन शहरी भागातील काही ठरावीक ठीकाणी तर ग्रामीण भागात सार्वजनिक ठीकाणी खुलेआम या पन्नीच्या मानवी जिवनास धोकादायक दारूची विक्री करण्यात येत आहे

, अगदी सहजपणे मिळणाऱ्या या पन्नीच्या दारूमुळे मोठया प्रमाणावर लहान मुलांपासुन तर विद्यालयीन तरुण वर्ग आकर्षक होवुन या दारूच्या आहारी जात व्यसनाधिन होत असल्याने त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होवुन अनेकांचे कुटुंब उघडयावर आले आहे , याविषारी घातक रसायनाच्या पन्नी दारूमुळे अनेक तरूणांचा दुदैवीरित्या मृत्यु झाला असुन, अनेक मृत्युच्या वाटेवर आहे .

राज्य उत्पादन शुल्क व पोलीसांच्या कार्यवाहीत सातत्य असावे , या पन्नी दारू विक्रीच्या प्रसारमाध्यमा मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले की , प्रशासनाकडून थातुरमातुर देखाव्याची कारवाई करण्यात येते तसे न होता पन्नीची दारूही कायमची हद्दपार झाली पाहिजे अशी मागणी महिला वर्गाकडून होत आहे.

जागतिक महिला दिनी सिंदीच्या रत्ना वरुडकर सन्मानित. सुषमा स्वराज पुरस्कार ने सन्मानित

0

 

भाजपा जिल्हा महिला आघाडी च्या वतीने आयोजित कार्यक्रम.
स्व.सुषमा स्वराज पुरस्कार मिळाला.

सिंदी रेल्वे ता. १५ येथील उच्चशिक्षित महिला रत्ना वरुडकर हिने नोकरी न करता, एखादा व्यवसाय करावा या उद्देशाने काही महिन्यां आधी दुग्ध संकलन करण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरु केलेल्या छोटा व्यवसायाला शेतकरयांनी सहकार्य करुन भरुन पाठिंबा दिला.

यातच त्यांना हल्दिराम समुहाने आमच्या कंपनीत आपण संकलीत केलेले दुग्ध द्या, आणि दुग्ध संकलन केंद्र परवाणा दिला.सुरु केलेल्या छोट्या व्यवसायाला बळ मिळाले आणि आजघडीला ते पाचशे ते सहाशे लिटर दूध शेतकऱ्यां जवळुन संकलीत करुन हल्दिराम कंपनीत पाठवतात.

त्यांच्या या शेती पुरक दुग्ध व्यवसायाची वर्धा जिल्हा महिला आघाडी ने दखल घेऊन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देवळी येथील चंद्रकौशल सभागृहात वर्धा जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते माजी केंद्रीय मंत्री स्व.सुषमा पुरस्कार रत्ना वरुडकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली येरावार,सरीता गाखरे, शोभा तडस, सिंदी शहर भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा पुष्पा सोनटक्के यांची उपस्थिती होती.त्यांच्या या पुरस्कार सन्माना बद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले असुन अनेक स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.