Home Blog Page 206

शेतकरी व सर्व सामान्य जनतेसाठी संजीवनी ठरलेला अर्थसंकल्प…. :- डॉ अजित गोपछडे

0

 

भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीने अर्थसंकल्पीय विश्लेषण या विषयावर महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अजित गोपछडे यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी सोलापूर शहरातील विविध आघाड्यातील मान्यवर चेंबर ऑफ कॉमर्स व्यापारी आघाडी बांधकाम आघाडी वैद्यकीय आघाडी ,भुसार अडत आघाडी,यंत्रमाग आघाडी,या क्षेत्रातील मान्यवर तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते शक्ति केंद्रप्रमुख इतक्यांचे प्रमुख उपस्थिती होती

डॉक्टर्स ,डेंटिस्ट, पँरामेडीकल, फार्मसिस्ट आरोग्य सेवक केमिस्ट बांधव इत्यादी मान्यवर यावेळेस उपस्थित होते

*याप्रसंगी या डॉक्टर अजित गोपछडे यांनी अर्थसंकल्पीय 2023 च्या विविध विषयांमध्ये अत्यंत सखोल असं मार्गदर्शन करून सदर अर्थसंकल्प हा महिला, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्ग, युवक, आदिवासी, दलित, ओबीसी, वंचित या सर्वांसाठी कसा सर्व समावेशक आहेत

तसेच शेतकरी कर्ज माफी, पीकविमा, जलयुक्त शिवार, हर घर जल जनजीवन मिशन, लेक लाडकी, शाश्वत शेती , युवा रोजगार निर्मिती, मागेल त्याला शेततळे, गोसेवा गो संवर्धन , श्री अन्न अभियान, नैसर्गिक व सेंद्रीय शेती, पर्यावरण पुरक विकास, मराठवाड्यातील वाॅटर ग्रीड, महात्मा फुले जन आरोग्य योजना, नदी जोड प्रकल्प, सोर उर्जा , आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका मानधन वाढ, महिलांसाठी शक्ती सदन,14 जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये, विद्यार्थी शिष्यवृत्ती वाढ, सिंचन प्रकल्प, रस्ते विकास , मेट्रो प्रकल्प, सर्व समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे, दिव्यांग विकास, नागरिक सुरक्षा व पर्यटन विकास इत्यादी विषयांवर अत्यंत सखोल असे मार्गदर्शन याप्रसंगी डॉ.अजित गोपछडे.संयोजक भाजप वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांनी केले

यावेळी शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी बोरामणी सरचिटणीस शशी भाऊ थोरात,कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण कांबळे, माजी महापौर श्रीकांचन्ना यन्नम, नगरसेविका वड्डेपल्ली, भूपती कमटम, दीनानाथ धुळम अंबादास बिंगी, चिटणीस अनिल कंदलगी, नागेश सरगम, बाबूराव संगेपांग, राम वाकसे, दत्ता पाटील, रवि भवानी, नागेश पासकंटी, मनोज कलशेट्टी, संदीप कुलकर्णी, श्रीनिवास पुरुड, श्रीनिवास करली, वैभव बिराजदार, यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटाप्पा गड्डम, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स जिल्हा समन्वय केतनशहा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर राजेश फडकुले, गणेश पेनगोंडा, अशोक गडहिरे, सुधाकर नराल. सुनिल गौडगांव, अविनाश बेंजरपे, संतोष कदम, शिवशरण बब्बे, डॉक्टर सचिन डोंगरगे तसेच सर्व मंडल पदाधिकारी सर्व आघाडीचे प्रमुख पदाधिकारी इत्यादींची उपस्थिती होती.सूत्रसंचालन सुजित चौघुले यांनी केले प्रास्ताविक रुद्रेश बोरामनी यांनी केले व आभार प्रदर्शन नागेश सरगम यांनी केले.

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून सईबाई मोटे रुग्णालयातील कर्मचारी संपावर

0

 

विठ्ठल अवताडे शेगाव

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील कर्मचारी राज्यव्यापी संपात सहभागी झाले , यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या सहिनिशी मा. वैद्यकीय अधीक्षक , स. मो. सा.रू.शेगाव यांना निवेदन देऊन आज सकाळी रुग्णालयाच्या परिसरात सर्व कर्मचारी यांनी एकत्र येऊन संप पुकारला

, या वेळी घोषणा देऊन आम्ही सर्व या संपात सहभागी असून जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आम्ही हा संप पाळणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले , या मध्ये जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन या वेळी देण्यात यामधे असे म्हटले आहे की 1 नोहेंबर २००५ नंतर नियुक्त राज्य सरकारी निम सरकारी इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करून जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्ववत लागू करण्यात यावी.

या प्रमुख मागणी व इतर नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागणी करता दि १४-३-२०२३ पासून पुकारण्यात आलेल्या राज्य सरकारी ,राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, निम सरकारी संघटना,तसेच विविध समन्वय समिती, विविध संवर्ग निहाय संघटना यांच्या बेमुदत संपात आम्ही सहभागी होत आहे ,

१४-३-२०२३चे संपाची रीतसर नोटीस राज्य शासनाला यापूर्वीच देण्यात आलेली आहे ,तरी खालील सही करणारे कर्मचारी संपात सहभागी होत असून याची माहिती या निवेदन द्वारे आपणास देण्यात येत आहे या निवेदनावर नरेश झुंगारे , मिलिंदकुमार कस्तुरे , संदीप कोकनी ,शिवशंकर घोडघासे ,विनय बनारसे,श्रीधर जाधव ,महेश घोरड ,श्रीमती योगिता दाभाडे ,नावेद खान ,पठाण खान, गणेश गणेश वायाळ मंगेश जोशी,श्रीमती. रंजना मुंडे, बकुळा मेसरे, सोनाली ढगे, मीनाक्षी शास्त्रकार, सुनंदा फुसे, भाग्यश्री पानपट्टे, बाळासाहेब नागरगोजे, सुनीता तायडे, रश्मी मोरे, सणात वराळे,साधना अंध्याल, वैशाली जगताप, अश्विनी गायकवाड, आशिष शिंगणे, व ईतर सर्व डी सी पी स व एन पी एस कर्मचारी..

. यांच्या सह जवळपास पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत

दिव्यांग तपासणी व कृञिम अवयव प्रत्यारोपण शिबीर, आयुषी बगडिया:गरजवंतांनी लाभ घ्यावा:

0

 

(प्रतिनिधी-तुकाराम राठोड)

जालना येथील अग्रशक्ती बहु मंडळ आणि नारायण सेवा संस्थान उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ( ता. 14) मार्च सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 या वेळेत छञपती संभाजी महाराज नगर परिसरातील हॉटेल बगडिया इंटरनॅशनल येथे दिव्यांग व पोलीओ ग्रस्तांसाठी मोफत तपासणी तसेच कृञिम अवयव प्रत्यारोपण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

आतापर्यंत 30 लाभार्थ्यांची नोंद झाली असून शिबीर स्थळी नोंदणीची सुविधा उपलब्ध असल्याने गरजवंतांनी शिबीरात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन अग्रशक्ती बहु मंडळाच्या अध्यक्षा आयुषी आदित्य बगडिया यांनी केले आहे.

शिबिराच्या आयोजना बाबत प्रसिद्धीस दिलेल्या पञकात आयुषी बगडिया यांनी सांगितले की,मंगळवारी सकाळी 10.00 वा. पन्नालाल बगडिया यांच्या हस्ते शिबीराचे उद्दघाटन होईल, अध्यक्षस्थानी डॉ. राजेश सेठीया हे राहतील,या वेळी नीता बगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

असे नमूद करत आयुषी बगडिया यांनी सांगितले, मंडळातर्फे गतवर्षी घेतलेल्या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता .यंदा उदयपूर येथील नारायण सेवा संस्थांनच्या मदतीने आयोजित सदर शिबीरात दिव्यांगांच्या तपासणी सह नैसर्गिक आपत्ती, अपघातात हात- पाय गमावलेल्या व्यक्तींना कृञिम हात- पाय प्राप्त व्हावे यासाठी 02 तज्ञ डॉक्टर व कर्मचारी तपासणी करतील. त्यानंतर पुढील शस्त्रक्रिया केली जाईल. असे आयुषी बगडिया यांनी स्पष्ट केले.

दरम्यान कृञिम हात- पायाचे प्रत्यारोपण केल्यानंतर गाडी चालविण्यासह सर्व कामे सहजपणे करता येतील.असे सांगून गरजवंतांनी मोठ्या संख्येने शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा आयुषी बगडिया,सचिव शितल अग्रवाल,कोषाध्यक्षा स्नेहा भारुका,उपाध्यक्षा रिता अग्रवाल,सहसचिव मेघा बगडिया,मार्गदर्शक सारिका तालुका,नम्रता पित्ती,सपना अग्रवाल,पूजा तवरावाला,प्रकल्प प्रमुख संध्या अग्रवाल,ममता गुप्ता,प्रित्ती मल्लावत,यांच्या सह अग्रशक्ती बहु मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अज्ञात व्यक्तीने हरबरा पिकाच्या गंजीला लावली आग..आगीत शेतकऱ्यांचे दीड लाखाचे नुकतास

0

 

प्रतिनिधी:(जालना) तालुक्यातील सावरगाव हडप गावातील शेतकऱ्याच्या सोंगणी करून गंजी घालून ठेवलेल्या हरबरा पिकाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचे घटना घडलीय.

विष्णू रंगनाथ शिंदे यांनी अवकाळी पाऊसाचा भीतीने दुप्पट मजूर लाऊन हरबरा सोगंणी केली त्यांची गंजी ही शेतात घालून ठेवली आतांना आज सकाळी शेतात कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात व्यक्तीने गंजीला आग लावून पेटून दिल्याने.

यात संपूर्ण गंजी जळून खाक झाल्याने त्यांचं यात दीड लाखाचे नुकसान झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झालीय.या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ या अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागमी शेतकऱ्यांनी केलीय.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

#shetakri

व्हॉइस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अनिल म्हस्के  बारामती येथील कार्यशाळेत झाली नियुक्ती

0

 

विठ्ठल  अवताडे

बुलढाणा, दि. ११ (प्रतिनिधी)
…………………………………….
संपूर्ण देशभरातील पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळखली जाणाऱ्या आणि पत्रकारीता व पत्रकारांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी अनिल म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामती येथे संघटनेच्या कार्यशाळेत त्यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करत त्यांचा सन्मान करण्यात आला.

व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांची राष्ट्रीय स्तरावरील संघटना आहे. सध्या २३ राज्यांत ही संघटना कार्यरत असून २२ हजारांहून अधिक सदस्य या संघटनेचे आहेत. या संघटनेच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे ११ मार्च रोजी बारामती येथे उद्घाटन करण्यात आले. बारामती क्लब येथे होत असलेल्या या कार्यशाळेच्या पहिल्याच सत्रात काही पदाधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या.

यामध्ये राज्य उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले अनिल म्हस्के हे यापुढे व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष (ग्रामीण) म्हणून काम सांभाळतील अशी घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केली. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेला समर्थन दिले.

त्यानंतर संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष धमेंद्र जोरे, राजा माने, राष्ट्रीय महिला संघटक सारिका महोत्रा आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अनिल म्हस्के यांना सत्कार करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. १० ऑगस्ट २०२२ रोजी अनिल म्हस्के यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

त्यानंतर अल्पावधीतच त्यांनी संघटनेचे जाळे संपूर्ण विदर्भात पसरविले. तीनच महिन्यात म्हस्के यांनी आपल्या संघटन कौशल्याची छाप पाडल्याने २ नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडे राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

त्यांच्या नेतृत्वात डिसेंबर महिन्यात बुलढाण्यात व्हॉइस ऑफ मीडियाची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत पत्रकारांच्या संरक्षणाच्या दृष्टीन प्रत्यक्ष कृतीतून पहिले पाऊल उचलण्यात आले. यावेळी अडीचशे पत्रकारांना दहा लाखाचे विमा सुरक्षा कवच देण्यात आले.

अनिल म्हस्के यांच्या संकल्पनेतील आणि नियोजनातील ही योजना राज्यभर राबवण्यात येऊन चार हजारांवर पत्रकारांना वीमा सुरक्षा कवच देण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी अनिल म्हस्के यांची कार्यपद्धत आणि त्यांचातील एकंदरीत कामाचा ही बीब अलगत ओळखली आणि बारामती येथे दोन दिवसीय कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच सत्रात अनिल म्हस्के यांची संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी (ग्रामीण) नियुक्तीची घोषणा त्यांनी केली.

अनिल म्हस्के यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असून मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात जिल्ह्यातील कोणत्याही पत्रकाराला राज्याचा अध्यक्ष होण्याची संधी आजवर मिळाली नाही. अनिल म्हस्के यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे त्यामुळे जिल्ह्याच्या पत्रकारीतेत सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली जावी, अशी ही घटना असून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अनिल म्हस्के यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणे ही जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी अभिमानाची बाब आहे

गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल गवळी यांच्या नेतृत्वात महिलांनी दिली नगरपरिषद वर धडक…

0

 

सिंदी रेल्वे….मागील काही महिन्यांपासून शहरातील नदीपलीकडील वार्ड क्रमांक ३ मधील घरगुती नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. वारंवार तक्रार करूनही ही समस्या दूर न झाल्याने भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अमोल गवळी यांच्या नेतृत्वात असंख्य महिलांनी नगर पालीके धडक देऊन, शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा असे निवेदन मुख्याधिकारी कळंबे यांना देण्यात आले.

मागील काही दिवसांपासून शहरातील नदीपलीकडील वार्ड क्रमांक तीन च्या अनेक घरगुती नळाला येणारे पाणी गढूळ व दुर्गंधी युक्त येत असल्याने पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या परंतु तक्रारीचा निपटारा होत नसल्यामुळे वार्डातील संतापलेल्या महिलांनी अमोल गवळी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद येथे धडक देऊन स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा हि मागणी रेटून धरली, यासंदर्भात लेखी निवेदन मुख्याधिकारी कळंबे मॅडम यांना दिले.

शहराला दहा किलोमीटर अंतरावरून वाकसुर येथून पाणीपुरवठा केल्या जातो,दर दोन दिवसांनी भाग बदलत वार्डातील भागाला पाणीपुरवठा केला जातो, सिंदी कांढळी रोड चे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या खोदकामात महिन्यातून किमान दोनदा तरी जलपुरवठा करणारी पाईपलाईन फुटत असून पाईप लाईन दुरुस्ती चे काम पुर्ण होत पर्यंत व्यवस्थित व सुरळीत शहराला पाणीपुरवठा होत नाही.

निवेदनाला घेऊन जाणाऱ्यांना मुख्याधिकारी कळंबे मॅडम यांनी तुमचा प्रश्न येत्या चार ते पाच दिवसात सोडवण्यात येईल अशी हमी दिली. या वेळी अमोल गवळी गणेश काळबांडे, सुरेश कातोरे, पुष्पा भोंदे, भाग्यश्री कातोरे, सविता सोनटक्के, वनिता काळबांडे, स्वाती दिवे, शशीकला बोरकर, संगिता काटोले, छबु घंगारे, दिक्षा काळबांडे, सुलोचना मेटांगळे, ऐश्वर्या गवळी, चंद्रकला कातोरे आदींची उपस्थिती होती….

मराठा पाटील युवक समितीची गौलखेड येथे 82 वी शाखा स्थापन थाटात उद्घाटन सोहळा संपन्न

0

 

विठ्ठल  अवताडे  शेगाव

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहूर्तावर गौलखेड येथे मराठा पाटील युवक समितीची शाखा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता या वेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन दादा ढगे ,यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हभप श्री शिवदास महाराज भारब्दे , ह्यांच्या हातून पूजन करून उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप श्री शिवदास महाराज भारब्दे होते तर यावेळी प्रस्तावना विठ्ठल अवताडे यांनी केली.

त्या नंतर युवकसमितीचे कार्य आणि युवकांना मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन समितीच्या कार्याचे कौतुक केले तर आभार अविनाश शेजोळे यांनी मानले.

यावेळी हभप सोपान महाराज शेजोळे यांच्या सह खामगांव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या सह समितीचे विशेष आमंत्रित भूषण दाभाडे ज्ञानेश्वर तकोते जिल्हा अध्यक्ष छोटू पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष सतिश लांजुळकार , जिल्हा सचिव मोहन घुईकर ,जिल्हा संघटक अविनाश कुटे, शंकर कोळस्कार , जिल्हा प्रवक्ते विठ्ठल अवताडे , नांदुरा शहर कार्याध्यक्ष वैभव पाटील, खामगाव तालुका उपाध्यक्ष राम पारसकर शेगाव तालुका अध्यक्ष श्याम अढाव ,तालुका उपाध्यक्ष अविनाश शेजोळे तालुका सचिव दत्ता खोंड तालुका संघटक अमोल हिंगने मुख्य संघटक योगेश पिसे भोटा शाखा अध्यक्ष वैभव पारस्कार यांच्या सह समस्त गावकरी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

या वेळी गौलखेड शाखा अध्यक्ष अतुल शेजोले ,विठ्ठल शेजोळे शाखा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोळे शाखा सचिव तर राम प्रभू शेजोळे,ऋषभ शेजोळे ,गणेश शेजोळे, युवराज शेजोळे राम शेजोळे धनंजय शेजोळे संतोष गावंडे ,सचिन शेजोळे यांची शाखा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली

जगातील पहिली ‘आयआयएफएल जितो अहिंसा रन’ 65 भारतीय शहरांमध्ये आणि यूएस व यूकेसह 20 आंतरराष्ट्रीय ठिकाणी होणार

0

 

जितोने आयोजित केलेल्या या महासोहळ्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळणे अपेक्षित

मुंबई, मार्च 09, 2023: जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने (जितो) शांती व अहिंसेचा पुरस्कार करण्याच्या उद्देशाने ‘आयआयएफएल जितो अहिंसा रन’चे आयोजन केले आहे. जागतिक स्तरावरील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. ‘अहिंसा रन’ अनेक विक्रम मोडेल आणि गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्स, वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले अशी अपेक्षा आहे.

जितो ही जागतिक स्तरावरील सामाजिक-आर्थिक संघटना सेवा, ज्ञान व समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाप्रती समर्पितपणे काम करते. या संघटनेने भारतातील 65 शहरांमध्ये तसेच 20 आंतरराष्ट्रीय ठिकाणी ‘अहिंसा रन’चे आयोजन केले आहे. रविवार, 2 एप्रिल 2023 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 5.30 वाजता ‘अहिंसा रन’ सुरू होईल. भारतातील तसेच जगभरातील सर्व क्षेत्रांतील व समुदायांतील लोक यात सहभागी होऊन अहिंसेच्या उद्दिष्टासाठी धावू शकतात.

जैन धर्मातील 24वे तीर्थंकर श्रमण भगवान महावीर (सर्वश्रेष्ठ उपदेशक) यांची जयंती साजरी करण्यासाठी जितोने ‘अहिंसा रन’ या अनन्यसाधारण उपक्रमाचे आयोजन केले आहे. श्रमण भगवान महावीर यांच्या सर्वांत मोठ्या प्रतिज्ञांपैकी एक असलेल्या अहिंसेचे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्व व संबंध यांबद्दल हा उपक्रम जागरूकतेचा प्रसार करणार आहे.

जितो लेडीज विंगच्या चेअरपर्सन श्रीमती संगीता लालवानी या उपक्रमाचा विषय स्पष्ट करताना म्हणाल्या, “देशातील व जगभरातील लोकांना शांती व अहिंसेच्या मुद्दयांवरून जोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘अहिंसा रन’ हा पहिला उपक्रम आहे. शांतताप्रिय समुदायांच्या जडणघडणीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. या रनमध्ये अहिंसेच्या प्रतिज्ञेचे पालन केले जाईल आणि प्रत्येक सजीवाच्या पावित्र्याचा व प्रतिष्ठेचा आदर कृती, वचन व विचारांद्वारे राखला गेला पाहिजे या श्रमण भगवान महावीरांच्या अमूल्य शिकवणीचा पुनरुच्चार केला जाईल. लोकांना प्रेम, क्षमाशीलता आणि त्यागाचे महत्त्व अहिंसेच्या स्वरूपातून समजावून घेण्यात मदत करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. आयुष्य अधिक चांगल्या रितीने जगण्यासाठी तसेच सौहार्दपूर्ण समाजांच्या उभारणीसाठी हे आवश्यक आहे.”

“शांती व अहिंसेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण आम्ही भारतातील व जगभरातील प्रत्येक कुटुंबाला देत आहोत,” असे आवाहन श्रीमती लालवानी यांनी केले. तसेच या उपक्रमात लाखो लोक सहभाग घेऊन तो एक जागतिक विक्रम ठरेल अशी अपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

केंद्रीय महिला व बालविकास तसेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्री श्रीमती स्मृती इरानी यांनी आयोजकांना या सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अहिंसा रनच्या उद्दिष्टाची प्रशंसा केली. प्रख्यात संगीतकार श्री. ए. आर. रहमान, माजी क्रिकेटपटू व खासदार श्री. गौतम गंभीर आणि भारताच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार तसेच प्रख्यात महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे आणि हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून जास्तीतजास्त लोकांनी शांती व अहिंसेच्या प्रसारासाठी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

आयआयएफएल या सोहळ्याचे राष्ट्रीय प्रायोजक असून, जीएम व मायक्रो लॅब्ज सहप्रायोजक आहेत.

‘लक्ष्य’ कार्यक्रमाच्या वेळीच जितोमधील मान्यवरांनी या ऐतिहासिक जागतिक उपक्रमाची घोषणा केली होती. आयआयएफएलचे अध्यक्ष श्री. निर्मल जैन, जीएमचे अध्यक्ष श्री. रमेश जैन, मायक्रो लॅब्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप सुराणा यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली होती. जितोचे चेअरमन श्री. सुखराज नाहर, व्हाइस चेअरमन श्री. राजेंद्र जैन, अध्यक्ष श्री. अभय श्रीश्रीमल, उपाध्यक्ष श्री. कांतिलाल ओसवाल व श्री कुशल भन्साली, महासचिव श्री. मनोज मेहता, सचिव श्री. संजय लोढा व श्री. संजय जैन, जितो लेडीज विंगच्या संचालकपदाचा सूत्रे हाती असलेल्या श्रीमती सुनिता बोहोरा आणि जितो लेडीज विंगच्या चेअरपर्सन श्रीमती संगीता लालवानी आदीही त्यावेळी उपस्थित होते.

 

‘अहिंसा रन’चे तपशील:

– रविवार, 2 एप्रिल 2023 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 5.30 वाजता भारतातील 65 शहरांमध्ये आणि 20 आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर सुरू होणार

– जगभरातील सर्व क्षेत्रांतील, कोणत्याही समुदाय, जात किंवा पंथाचे लोक ह्यात सहभागी होऊ शकतात

– नोंदणी शुल्क भरून सहभागी झालेल्या प्रत्येकाला टी-शर्ट, पदक आणि न्याहरी दिली जाईल.

– 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा तीन प्रवर्गांमध्ये हा रन आयोजित करण्यात आला आहे.

– अधिक माहितीसाठी तसेच नोंदणी करण्यासाठी भेट द्या: www.Ahimsarun.com

 

जितोविषयी : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) हा द्रष्ट्या जैन उद्योजक आणि व्यावसायिकांची एक अनन्यसाधारण, बहुभागधारक समुदाय आहे. भविष्यकाळातील समुदायाला व व्यापक समाजाला आकार देण्याप्रती एक सामाईक बांधिलकी हा समुदाय मानतो. अहिंसक, दारिद्र्यमुक्त व विकारमुक्त जगाच्या निर्मितीच्या दृष्टीने अधिक आर्थिक समृद्धी प्राप्त करण्यासाठी, वंचितांची काळजी घेण्यासाठी तसेच मानवतेला समृद्ध करण्यासाठी एक जागतिक दर्जाची संस्था होण्याचे उद्दिष्ट या समुदायापुढे आहे. कंपनी कायदा, 1956 खाली (आताच्या कंपनी कायदा, 2013मधील कलम 8) जितोची कंपनी म्हणून नोंदणी झाली आहे. कंपनीच्या व्यापक घटनेनुसार, भारतातील व परदेशांतील, सर्व उद्योजक, व्यावसायिक, ज्ञानाधारित काम करणारे सहभागी होऊ शकतात. भारतभर व जगभरात शाखा असलेली ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे.

Ends
Regards,
Deepika Parkar 9768073785

अर्थसंकल्पीय अधिवेशन-2023

0

 

वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मदतीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक:

प्रतिनिधी:(मुंबई)अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे झालेच पाहिजेत.अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे.नुकसान झालेल्या पिकाचे मदत जाहीर करा,जाहीर करा.शेतकऱ्यांना मदत भरपाई जाहीर करा.मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी. नुकसान भरपाई जाहीर करा,नाहीतर खुर्च्या खाली करा.अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

प्रतिनिधी-तुकाराम राठोड

फागुन मास निमित्त श्री सांवरे के बावरे भजन परिवार शेगावच्या वतीने भव्य निशान यात्रा संपन्न.

0

 

इस्माईलशेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव ते खामगाव मार्गावर निशाण यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
निशान यात्रेत 18 किलोमीटर चालत शामिल झालेल्या स्वानाने सर्वांचे लक्ष वेधले..

 

शेगाव: स्थानिक प्राचीन हनुमान मंदिर परिसरातून श्री सांवरे के बावरे भजन परिवार शेगावच्या वतीने आज पाच मार्च रोजी पहाटे पाच वाजता शेगाव ते खामगाव पर्यंत निशाण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते ,खाटू वाले श्याम बाबा भक्तांसाठी धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या भारतीय तिथी फागुन मास मध्ये हारे का सहारा श्याम बाबा हमारा श्याम बाबा की जय असा जयघोष करीत शेकडो च्या संख्येने भक्त परिवार आज पहाटे खामगाव साठी रवाना झाला प्राचीन हनुमान मंदिर येथून प्रारंभ.

झालेली निशान यात्रा गांधी चौक मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराजा अग्रेशन चौक रेल्वे स्टेशन समोरून सार्वजनिक बांधकाम विभाग च्या विश्राम भवन, एम एस ई बी चौक, जगदंबा चौक श्री गजानन वाटिका चौक या मार्गाने श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय समोरून ही निशाण यात्रा खामगाव रोडने जवाहर नवोदय विद्यालय सवर्णा फाटा, चिंचोली कनारखेड टाकळी विरो या मार्गाने चालत श्याम बाबा चा जयघोष करीत ही निशाण यात्रा लासुरा फाट्यावर पोहोचताच.

त्या.ठीकाणी गोविंद व्यास व मित्र परिवारातर्फे या निशान यात्रेतील सर्व भाविकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या स्वागताचा स्वीकार करून ही निशाण यात्रा जयपुर लांडे सिद्धिविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरून वरखेड या मार्गाने खामगाव शहरात पोहोचली रजत नगरी असलेल्या खामगाव शहरातील फरशी भागांमध्ये डिडवानिया सुपर बाजार संचालका तर्फे या निशाण यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी संपूर्ण परिसर हा खाटू श्याम वाले की जय, हारे का सहारा श्याम बाबा हमारा. अशा गगनभेदी घोषणांनी दणाणून गेलेला दिसत होता फरशी भागातून ही निशाण यात्रा खामगावात असलेल्या खाटू श्याम मंदिरात पोहोचली व त्या ठिकाणी निशान यात्रा मधील सर्व भाविकांनी मंदिरात निशान ध्वज अर्पण केले या निशाण यात्रेमध्ये युवक युवती महिला पुरुष व बालक वर्ग उत्साहात सहभागी झालेले होते. संत नगरी शेगाव येथून सुरू झालेल्या या निशान यात्रेमध्ये एक स्वान सहभागी झालेला होता निशान यात्रा प्रारंभ होऊन 18 किलोमीटर पैदल चालून समारोप होईपर्यंत हा स्वान सुद्धा सहभागी झालेला होता त्यामुळे तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता..