Home Blog Page 214

श्री संत सेवालाल महाराज यांचा जिवन परिचय:

0

 

संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी झाला आहे.आणि निधन ०४ डिसेंबर १८०६ मध्ये झाला.हे बंजारा समाजाचे संत म्हणून ओळखले जायचे.

नाईक कुळातील या भीमा नाईक यांचे ते चिरंजीव होते.वडील एवढे श्रीमंत होते कि सात पिढी बसून आरामात जेवण करतील.पण मात्र रूढी आणि परंपरा यांच्याने मागे असलेला बंजारा समाज आपण पुढे न्यावा अशी आस सतगुरु श्री सेवालाल महाराज यांच्या मनात आली.म्हणूनच लहानपणापासूनच संतांचा गोष्टी वीरांच्या कथा तो आपल्या आई धर्मली माता यांच्या कडून ऐकू लागला.

सिंधू संस्कृती ही भारताची सर्वात सुसंस्कृत आणि प्राचीन संस्कृती मानली जाते. गोर-बंजारा ही या संस्कृतीशी संबंधित एक संस्कृती आहे आणि हा गोर बंजारा समाज खरोखरच संपूर्ण जगात पुरी आहे आणि वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.
महाराष्ट्रातीलगोर बंजारा गौरा (भुकीयस) आणि मध्यभारतीचे भगंदरस वडतिया हे मोठे व्यापारी होते.
बंजारा समाज
हे सर्व व्यापारी भारतातील बड्या राजांना आणि सम्राटांना रसद (अन्नधान्य) पुरवत असत. पण सर्वसामान्यांची चिंता ही गौर बंजारा समाजातील संत सेवालाल महाराज(कोर-गोर) संत संत सेवालाल यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते.

भौगोलिक आणि ऐतिहासिक माहितीमुळे गोर बंजारा समाज मुख्यत: राज्याच्या सीमेवर होता,

श्री संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्ग
बंजारा समाजातील व्यक्ती
वालाल महाराज यांचे वडील रामजी नायक यांचा मुलगा भीमा नायक एक त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 3755 गायी आणि बैल आहेत. कोण धान्याच्या वाहतुकीसाठी वापरला जात असे आणि ५२ तांड्यांचा नायक होता. त्यांना नायकडा (एक गावचा नायक आणि खेड्यांचा नायक) असे म्हटले जाते.

एका गावात (तांडे यांचे) लोकसंख्या सुमारे ५०० होते. प्रत्येक तांड्यासाठी, एक माणूस आणि एक स्त्री गोर उपदेशक म्हणून काम करीत असे, त्यांना जवळ ५२ भेरू (माणूस) आणि ६४ जोगानी (स्त्री) असे संबोधत. या ५२ भेरू आणि ६४ जोगानींचे एकत्रिकरण होते. आणि त्यांची स्थापना मुख्य नाईक अंतर्गत झाली. म्हणूनच संत सेवालाल आजोबांना रामशहा नायक म्हटले गेले. (५२ तांड्यांचा संघप्रमुख) भीम नायक हेही ४१ तांड्यांचे संघप्रमुख होते
धर्मणीयाडी(आई)
सेवालालच्या आईचे नाव धरमणी होते, ती जयराम बदाटिया सुवर्णा कप्पा, कर्नाटक यांची मुलगी होती.

भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ १२ वर्षे मूलबाळ नव्हते, पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे
केली मा ज त्यांचा भाऊच आलो ना आता तूच सांग जर जगात माझ्या सर्व बहिणीच आहे तर मी लग्न कुणाशी करू.ह्या उत्तराने आई जगदंबा भारावून गेली.आई जगदंबा म
सेवालाल महाराज
संत सेवालाल महाराज
सेवालाल महाराज यांचे वचन
कोई केनी भजो पूजो मत एका रूपयाला एक वाटी पाणी व आपली
सेवालाल महाराज यांचे
सेवा जाणार्‍या बंजारा जीवनासाठी करा गोर भाषा / गोरबोली बोला
सेवालाल हे अनुकरणीय सत्यता
धैर्य मानवतेच्या शिस्त, चिंतनशील, एक महान संगीतकार, अंधश्रद्धा विरुद्ध लढाई करणारे, एक बुद्धीप्रामाण्यवादी
आणि एक अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून काढणारे आहेत
असे शीतला आणि सती देवी आणि सती देवी आई जगदंबा यांच्या कथेत सुद्धा वाचायला मिळेल

सेवालाल महाराज यांचे मंदिर
जगातील ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाज आढळतो.त्या त्या ठिकाणी सेवालाल महाराज यांचे मंदिर बांधले जाते.सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते.तर सेवालाल महाराज यांनीच बंजारा समाजामध्ये नवीन चाली-रिती रूढी परंपरा तयार केले असेही सांगितले जाते.

मुलाची शेवटची भेट घेण्याची इच्छा राहिली अपुर्णच , विहीरीत उडी घेवून आत्महत्या

0

 

यावल – प्रतिनिधी। विकी वानखेडे

आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छ मित्रांला बोलून दाखवत आदिवासी तरुणाने विहीरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मूत्यूची नोंद करण्यात आली आहे

आवेश गबू तडवी (वय-३०) रा. बिडगाव मोहरद ता. चोपडा ह.मु.यावल असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आवेश तडवी हा आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह वास्तव्य्या होता. बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता यावल सातोद रस्त्यावरील सुनिल भाऊसाहब भोईटे यांच शेतात आत्महत्या करण्यापूर्वी
त्यांनी त्याच्या मित्राला फोन करून माझ्या
लहान मलाला भेटण्याची इच्छा आहे असे सांगितले होते. विहीरीजवळ मयताचे दुचाकी आणि चप्पल आढळून आले त्यानुसार विहिरीत उडी

घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले.गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धावघेतली होती.

आवेश याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ठ होवु शकले नाही. घटनेचे वृत्त कळताच यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी घटनास्थळी आपल्या सहकार्यासह धाव घेत मयताचे प्रेत
विहिरी तुन बाहेर काढण्यासाठी तडवी कुढुबास मदत केली

शालेय जिवणातच यशस्वी होण्याचा मार्ग मिळु शकतो – सचिन तडवी

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

चुंचाळे येथे बारावीच्या विद्यार्थांना मोफत फाईल फोल्डर वाटप
प्रतिनिधी l चुंचाळे ता यावल
बालपणापासुन आपण शैक्षणिक पात्रता वाढवण्यात गुंतलेलो असतो,यातुन थेट नोकरी लागेपर्यंत सुटका होत नसते,यामुळे प्रत्येकाने आपल्या शालेय जिवणातच शैक्षणिक पातळी उंचावण्याचा चांगला प्रयत्न केला पाहीजे,

यातुनच आपणांस यशस्वी होण्याचा मार्ग सापडू शकतो.प्रत्येकाच्या आयुष्याला दहावी व बारावीचे वर्ष हे कलाटणी देणारे ठरत असते,यामुळे आपण प्रत्येकजण जास्त गुण कसे मिळवता येतील याकडे लक्ष देतो.सध्या स्पर्धेच्या युगात आपल्या अंगी फक्त शैक्षणिक पात्रता अंगी असुन चालत नसुन यासोबतच अनेक व्यावसायिकतेची जोड असणे आवश्यक असते.

असे मार्गदर्शन नायगाव येथिल सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्ते सचिन तडवी यांनी यावेळी केले.

यावल तालुक्यातील श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना अमिर प्रतिष्ठान मोहरद कडून मोफत फाईल फोल्डर वाटप करण्यात आले.यावेळी श्री समर्थ वासुदेवबाबा अध्यात्मिक व शैक्षणिक ट्रस्ट चे संचालक आर के पाटील,विद्यालयाचे प्राचार्य व्ही जी तेली,सामाजिक कार्यकर्ते रमजान तडवी,किनगाव येथिल प्रमोद पाटील,ग्रामविकास अधिकारी अशरफ तडवी,अरविंद चौधरी,वसतीगृह अधिक्षक चंद्रकांत चौधरी,सुधीर चौधरी,प्रा शारदा चौधरी,प्रा राकेश अडकमोल,प्रा जमिला तडवी आदी उपस्थित होते.यापूर्वीही अमिर प्रतिष्ठान कडून मोफत अपेक्षित वाटप करण्यात आले होते.

दरम्यान प्राचार्य व्ही जी तेली यांनी विद्यालयातील मागील पार्श्वभूमी सांगुन आपल्या उज्वल यशासाठी आपल्याला फार दुर जावे लागत नसल्याचे सांगितले.सर्वकाही जवळच उपलब्ध होते,याचा आपण सर्वांनी लाभ घेतला पाहीजे असेही सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय गोसावी,आभार प्रशांत सोनवणे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका,कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

यावलला श्री गजानन महाराज प्रकट दिन शेकडो भाविकांच्या उपस्थित उत्साहात साजरा

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शहरात विस्तारित वसाहती मधीलश्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात भाविकांच्या उपस्थित पार पडला. येथील विरार नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात पहाटे पाच वाजता मूर्तीचा अभिषेक व आरती, लघु रुद्र याग पार पडले.

शहरातील श्री रेणुकादेवी मंदिरापासून मुख्य रस्त्याने श्रींच्या पादुकाची पालखी मंदिरापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. प्रा.डॉ. हेमंत येवले यांच्या हस्ते सपत्नीक पुजा करून पालखी पालखी मिरवणूकीस सवाद्य सुरवात झाली. प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून पुजा-अर्चा करण्यात आली.

मिरवणूकीत शहरातील बाल संस्कार विद्या मंदिर, सरदार वल्लभभाई पटेल स्कुल व सरस्वती विद्या मंदिर या तीन शाळेतील विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थिनीच्या झांज पथक, लेझीम पथक व दिंडी पथक आदींचा सहभाग होता . विद्यार्थी विद्यार्थिनींच्या रंगीबेरंगी पोशाख व विविध पथकाने शहरवासी यांचे लक्ष वेधून घेतले होते .

दुपारी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, सौ. छाया अतुल पाटील, तहसिलदार महेश पवार, मंदिर संस्थानचे अध्यक्ष आर. डी.पाटील यांच्या हस्ते श्रींची महाआरती झाली व त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते साडेबारा वाजेपासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात आले.

दुपारी दुर्गामाता भजनी मंडळ व लक्ष्मीनारायण भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम तर सायंकाळी सात वाजता श्री ची आरती नंतर रात्री प्रा. मनोज महाराज पिंप्राळाकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला , दिवसभरात हजारो भाविकांनी स्त्रीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला संस्थानचे विश्वस्थ भाविकांनी परिश्रम घेतले.

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स कौन्सिल भारत. कोल्हापूर संघटना यांचे महाराष्ट्र मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना भेट

0

_______________________________________
युनिव्हर्सल ह्युमन राईट्स कौंन्सिल संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री.तरुण बाकोलिया साहेब व राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ.सुमन मौर्य मॅडम यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.संजय चव्हाण साहेब व महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णाताई कदम.

यांच्या मार्गदर्शनानुसार व कोल्हापूर जिल्हा युनिव्हर्सल ह्युमन राईट्स कौन्सिलच्या वतीने. कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव पाटील सडोलीकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट

घेऊन अनेक सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्या आली. व युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स कौन्सिलच्या वतीने चालू असलेल्या समाज व समाजकार्याची माहिती देण्यात आली.

या वेळी युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स संघटनेला. आपले सहकार्य करण्याचं व असल्याचे आश्वासन महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामदास पवार,करवीर तालुकाध्यक्ष नामदेव कांबळे,संजय भोसले,भरत पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सूर्या मराठी न्यूज
तानाजी कुऱ्हाडे
कोल्हापूर

कोल्हापूर नंदवाळ येथे विठ्ठल रुक्मिणी व सत्यभामा यांचे पाषाणमूर्ती

0

_______________________________________
कोल्हापूर करवीर तालुका नंदवाळ येथे संजय बळवंत निकम राहणार नांदगाव यांच्या घरी गेली तेरा वर्षे विठ्ठल रुक्मिणी व सत्यभामा यांचे पूजन.

प्रत्येक वर्षी वर्धापन दिना दिवशी पहाटे अभिषेक काकड आरती पूजा त्याचबरोबर दुपारी सत्यनारायण पूजा त्यानंतर संध्याकाळी पूजा व पूजा पाठ ह्या मुर्तींचे दर्शनास नंदवाळ येथील भाविक दर्शनाचा लाभसह कोल्हापुरातील पंचक्रोशी वारकरी व भजनी कलाकार व इतर भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घेतात.

संजय निकम हे आपल्या घरी मूर्ती बसवल्यापासून तिथीप्रमाणे प्रत्येक वर्षी प्रसाद म्हणून सर्व गावांबरोबर कोल्हापुरातील पंचक्रोशी भाविक वारकरी, भजन कलाकार,कीर्तनकार व गावकरी असे अनेकांना भोजनाचा लाभ दिला जातो.

संजय निकम हे बांधकाम कामगार आहेत. व सौ.रेखा संजय निकम हे गृहिणी असून दोन मुले शिक्षण घेतात.संजय निकम वर्धापन दिन स्वतःच्या स्वखर्चात करतात.
घरी कुटुंबात संजय बळवंत निकम सौ.रेखा संजय निकम कु.ऋषिकेश संजय निकम कु.ओमकार संजय निकम कुटुंब परिवार आहे.

सूर्या मराठी न्यूज
तानाजी कुऱ्हाडे
कोल्हापूर

५ वर्षाअगोदर झालेला लोणार महोत्सव होईल काय? पर्यटकप्रेमी नागरिकांना लागली ओढ..

0

 

लोणार – प्रणव वराडे

जगप्रसिध्द लोणार सरोवराच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व नगर परीषदेच्या वतीने पर्यटन संकुलनाच्या बाजूला असलेल्या मैदानावर मार्च २०१७ मध्ये तीन दिवसीय लोणार महोत्सवाचे आयोजण करण्यात आले होते. तब्बल ५ वर्षानंतर परत पर्यटन प्रेमी नागरीकाना लोणार महोत्सव व्हावा अशी ओढ लागली आहे.

लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्षात तो झालाही नसता. परंतू मार्च २०१७ मध्ये झालेल्या या लोणार महोत्सवावर शासनाच्या वतीने ५० लक्ष रुपये खर्च करण्यात आले होते. तीन दिवसीय राजकीय-सामाजीक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

होते. या महोत्सवाला नागरीकांनी भरभरून प्रतिसादही दिला हा महोत्सव धूमधडाक्यात साजराही मान्यवरांनी आपल्या भाषणातून हा महोत्सव दरवर्षी साजरा करण्यासाठी शासन दरबारी पाठपूरावा करु असे चालना देण्यासाठी या महोत्सवाचे आश्वासनही दिले होते. परंतु या आश्वासनाचा विसर खुद्द मान्यवरांना पडल्याचे दिसून येते.

एकीकडे सरोवर विकास आराखड्याअंतर्गत तब्बल ३६९ कोटी रुपायाचा निधी मंजूर करण्यात आला असताना सरोवर विकासाला चालना देण्यासाठी लोणार महोत्सवाचे आयोजनही करणे तितकेच महत्वाचे

मान्यवरांनी दरवर्षी लोणार महोत्सव घेण्यायासाठी शासन दरबारी पाठपुरावा झाला. करु असे आश्वासन दिले होते. पण हे आश्वासन महोत्सवा बरोबरच ईतीहास जमा जमा झाले आहे. तरी यावर्षी तरी लोणार महोत्सव व्हावा अशी ओढ पर्यटन प्रेमी नागरिकांना लागली आहे. एवढे मात्र खरे..!

पर्यटन नगरी लोणार सरोवर शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष…

0

 

लोणार – प्रणव वराडे

जगप्रसिद्ध पर्यटन नगरी लोणार शहरातील प्रमुख मार्ग बस स्टॅन्ड चौक, महात्मा बसवेश्वर चौक, मंठा बायपास यासह लोणार शहरातून गेलेला प्रमुख शेगाव पंढरपूर महामार्ग याच महामार्गावर बाजारपेठ व बसस्थानक असल्याने या महामार्गावरून बस स्थानकातून निघालेली.

एसटी बसेस, लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या, जड मालवाहतूक गाड्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून जात असतात एवढा महत्त्वाचा असलेला या रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे बिनधास्त बसलेली आढळत आहे. परंतु याकडे स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

या मोकाट जनावरांमुळे एखादा मोठा अपघात झाल्यास यास जबाबदार कोण राहणार हा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे सदर मोकाट जनावरे रस्त्यावरून हटवण्याचे साठी शासनाची कोणती यंत्रणा नाही का असा प्रश्न सुद्धा नागरिकांना व येणाऱ्या पर्यटकांना पडत असल्याचे चर्चा शहरात सुरू आहे.

मुख्य रस्त्यासह शहरातील गल्लोगल्ली मोकाट जनावरे फिरत आहे. पशुधना बरोबरच मोकाट कुत्र्यांची संख्या ही वाढलेली आहे. रात्री अपरात्री अनेक रस्त्यांवर, गल्लोगल्लीत एकटे जायचे असल्यास पुढे कुत्रे तर नाही ना असे भय नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहे. कारण असंख्य नागरिक, महिला, व लहान मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

गल्लोगल्लीत लहान मुले घरासमोर खेळत असतात यावेळेस तेथे कुत्रे, डुक्कर व इतर मोकाट जनावरे येत असल्याने लहान मुलांना घरासमोर खेळणे सुद्धा धोकादायक झालेले आहे. काही कुत्रे तर अंगाला जखम असलेली, केस गळलेली व पिसाळलेली कुत्रे सुद्धा गलो गल्ली लहान मुले खेळतात त्या ठिकाणी येत आहेत.

एखादा पिसाळलेला किंवा अंगाला जखम असलेला कुत्रा लहान मुलास किंवा नागरिकास डसल्यास काय होऊ शकते याची कल्पना सुद्धा करता येत नाही. आज रोजी संपूर्ण लोणार शहरात जागो जागी मोकाट जनावरांचा सुळसुळाट पाहावयास मिळत आहे. या समस्येने लोणारकर अगदी मेटकुळीस आलेले आहे.

मोकाट जनावरांना पकडण्याची व दंडांची मोहीम राबविणे आवश्यक आहे नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे व कारवाईची भीती नसल्याने शहरातील मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी लोणार शहरातील रामनगर येथील दोन बालकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे लहान बालकांना दुखापत झाली असल्याकारणाने लोणार येथील विनायक मापारी यांनी नगर परिषदेला निवेदन दिले आहे.

की नगर परिषदेने मोकाट जनावरांचा मोकाट कुत्र्यांचा पंधरा दिवसात बंदोबस्त करावा अन्यथा लोणार शहरातील मोकाट व पिसाळलेले कुत्रे नगर परिषदेत जमा करण्यात येतील असा इशारा निवेदनात दिला आहे आता या समस्ये कडे नगर परिषद लक्ष देणार की मोकाट जनावरांमुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट बघणार याकडे शहरवासी यांचे लक्ष लागले आहे एवढे मात्र खरे

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासोबतच देशसेवेसाठी उज्ज्वल वैज्ञानिक निर्माण करणे गरजेचे आहे–गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.देवराव होळी यांचे प्रतिपादन.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-पंचायत समिती चामोर्शीच्या वतीने तालुक्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व व्यवस्थापनातील शाळांसाठी दिनांक ९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचे शुभहस्ते करण्यात आले तर प्रदर्शनीचे अध्यक्ष कारमेल अकादमीचे
प्राचार्य फादर असस्टीन आलेनचेरी हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून दिलीप चलाख तालुका अध्यक्ष भाजपा,साईनाथ बुरांडे महामंत्री,सुरेश शहा जिल्हा अध्यक्ष,प्राचार्य श्याम रामटेके यशोधरा विद्यालय चामोर्शी, प्राचार्य आर.एस. ताराम शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी,अरविंद भांडेकर मुख्याध्यापक कृषक हायस्कूल चामोर्शी,हितेंद्र चांदेकर प्राचार्य जा कृ बोमनवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या चामोर्शी, शिवराम मोगरकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,प्रशांत नैताम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,श्रीमती एस एस गयाली मुख्याध्यापिका नेताजी सुभाष चंद्र बोस हायस्कूल विक्रमपूर, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के पंचायत समिती चामोर्शी,राणा सातपुते ज्येष्ठ भाग शिक्षण अधिकारी चामोर्शी,हिम्मतराव आभारे केंद्रप्रमुख चामोर्शी,अमरदीप चौधरी पर्यवेक्षक कारमेल अकॅडमी चामोर्शी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये चामोर्शी तालुक्यातील शाळांनी साहित्यासह उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवीला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारमेल अकादमीचे शिक्षक शेंडे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार गट साधन केंद्र चामोर्शीचे विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी मानले.
विज्ञान प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी गट साधन केंद्र चामोर्शी येथील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

निंभोरा सरपंच यांनी केलं सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्तीतीत ग्राम सभेचे आयोजन

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला पंचायत समिती अंतर्गत येणारी गट ग्राम पंचायत निंभोरा हे निवडणुकीपासून सतत चर्चेत राहणारं गाव झालं आहे. कारणही तसंच मागील 60 वर्षाची सत्ता परिवर्तन घडवून जनतेने शिवसेनेच्या तालुका प्रमुख प्रा नितीन सुभाषराव ताथोड यांच्या सुशिक्षित आणि दमदार नेतृत्वावर विश्वास ठेवून यांच्या ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी केलं.

तसेच सरपंच पदाच्या उमेदवाराला रेकॉर्ड मतांनी निवडून दिल. हाच लोकांचा विश्वास कायम ठेवून गाव विकास हेच ध्येय समोर ठेवून गावातील मुख्य समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न म्हणून लोकसहभाग महत्वाचा भाग म्हणून सरपंच यांनी पहिल्या ग्राम सभेचं आयोजन केले होते. निंभोरा येथील ही ग्राम सभा जिल्ह्यातील पहिली अशी आगडी वेगडी ग्राम सभा असेल ज्यात लोकांच्या ज्या विभागाच्या समस्या असतील त्यांचे निराकरण त्याच विभागाचे अधिकारी यांनी करवी.

अशी व्यवस्था सरपंच प्रा नितीन सुभाषराव ताथोड यांनी केली होती. एक प्रकरे ही ग्राम सभा म्हणजे जनतेचा ग्राम दरबाराच होता. सदर सभेला सर्व ग्राम पंचायत सदस्य,ग्रामसेवक, ग्राम पंचायत कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, रोजगार सेवक, ग्राम पंचायत ऑपरेट,आरोग्य सेविका, आशा सेविका, स्वस्त धान्य दुकानदार, पशु वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी,तलाठी, पोलीस पाटील, बिट जामदार, महिला बचत गटाच्या प्रमुख,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कृषी सहाय्यक, कृषी मित्र, तंटा मुक्ती अध्यक्ष,अंगणवाडी स्वयंपाकी यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित जनतेच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

लोकांच्या तक्रारी लिहून घेतल्या व त्या सोडवण्याचा प्रयन्त करणार असल्याचे लोकांना सांगण्यात आले. रोजगार हमी,15 वित्त आयोग, दलित वस्ती,स्मशान भूमी विकास, शेतरस्ते, अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम,ग्राम पंचायत इमारतीच बांधकाम, नाला खोलीकरण, बंधारा बांधकाम, शाळा दुरुस्ती,इत्यादी महत्वाची कामे पंचायत समिती,जिल्हा परिषदच्या विभागांकडून मंजूर करून घेण्यासंदर्भात ग्राम सभेत चर्चा करून मंजुरात देण्यात आली. ग्रामसेवक अनंत वावगे यांनी गाव विकासासाठी घरकर आणि पाणिकर वेळेवर आणि नियमित भरण्याच्या सूचना लोकांना दिल्या.

आरोग्य सेविका संगीता टेलगोटे आणि कल्पना अवारे यांनी नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड विषयी महत्वाची माहिती सांगितली. स्वस्थ धान्य दुकानदार भास्कर ताथोड यांनी शासनाच्या नवीन आदेशाची माहिती देऊन रेशन स्वतः बंद करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कृषीच्या विविध योजना ची माहिती कृषी सहाय्यक प्रणित बंड आणि दिनेश डोंगरे यांनी दिली तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या समितीची (पोक्रा)शासन निर्णय नुसार ग्राम सभेत निवड केली. सोबतच बिट जामदार शमलाल शाहू यांच्या उपस्तीतीत तंटा मुक्त समितीची स्थापना करण्यात आली. शाळा मुख्याध्यापक चौधरी सर यांनी शाळेतील महत्वाच्या दुरुस्ती आणि आवश्यकता सांगितल्या.

सरपंच यांनी सर्व अधिकारी आणि जनतेचे ग्राम सभा यशस्वी होण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल आभार मानले आणि गाव विकासात अशीच साथ मिळत राहो ही अपेक्षा व्यक्त केली. सभेला जनतेचा भरघोस प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ग्राम सभेची प्रस्तावना ऑपरेट अमित देवर यांनी केली.

ग्राम सभेची सर्व व्यवस्था कर्मचारी नितीन देशमुख आणि पाणीपुरवठा कर्मचारी राजेश बोर्डे यांनी पहिली.