Home Blog Page 214

यावल आगारातुन पठाणकोट बससेवा पुर्वरत सुरू करावी, या मागणीसाठी सरपंच सौ मिना तडवी यांनी घेतली आगार अधिक्षकांची भेट

0

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी बांधवांच्या ग्रामीण भागातुन धावणारी पठाणकोट एक्सप्रेस या नांवाने ओळखली जाणारी एसटी बस सेवा पुनश्च सुरू करावी या मागणीसाठी परसाडेगावाच्या सरपंच मिना तडवी यांनी घेतली आगार अधिक्षकांची भेट .

यावल आगारातुन सुमारे दोन ते अडीच वर्षापुर्वी रावेर यावल व चोपडा परिसरातील आदीवासी बांधवांच्या थेट गावांना व पाडवांवर सोडणारी पठाणकोट एक्सप्रेस ही एसटी बस सेवा सुरू करण्यात आली होती . ही बससेवा बंद पडल्याने अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदीवासी बांधवांना दळणवळणाचे प्रमुख साधन व शैक्षणिक कार्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ही बससेवा कधी सुरू होणार असा प्रश्न ग्रामीण भागातील आदीवासी ग्रामस्थांना पडला आहे,

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी चोपडा ते रावेर ही पठाणकोट मार्गावर धावणारी बायपास एसटी बस काहीं काळानंतर अचानक बंद करण्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या आदिवाशी बांधवांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत असल्याने या समस्यांची माहीती देण्यासाठी परसाडे गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ मिना तडवी यांनी थेट यावल आगाराचे सहाय्यक वाहतुक अधिक्षक जि.पी .जंजाळ यांची भेट घेऊन ही बससेवा पुर्वरत सुरू करावी या विषयाला घेवुन त्यांच्याशी चर्चा केली

. मागील दोन वर्षातील कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील एसटी महामंडळाच्या बसला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते . कोरोनाचा गोंधळ संपुष्टात आले असुन यावल आगाराने पठाणकोट एक्सप्रेस नांवाने ओळखली जाणारी बससेवा पुुनश्च सुरू झाल्यास एसटी महामंडळाच्या उत्पनात भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली,

या संदर्भात परसाडे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ही बस् सुरू करण्याबाबतचा ठराव प्रस्तावित केल्यास त्याचा पाठपुरावा करून आम्हीं ती मागणी जळगावचे डीसी कडे प्रस्ताव पाठून जिल्हा स्तरावरून आदेश प्राप्त झाल्यास ही बस पूर्ववत सुरू करण्यात येईल असे आगार प्रमुख यांच्या कडून सांगण्यात आले,,

याप्रसंगी परसाडे ग्रामपंचायतच्या सरपंच मीना तडवी , यावल एसटी आगारातील कर्मचारी सलिम इस्माईल तडवी , रज्जाक इस्माईल तडवी , बबलू तडवी (वाहक ) , फिरोज सिकंदर तडवी ,अकिल इस्माईल तडवी , शशि सपकाळे , पुनमचंद पाटील यांच्यासह आगारातील कर्मचारी या वेळी उपस्थित होते,

शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा होतांच अकोटमध्ये आनंद उत्सव

0

 

प्रतिनिधि अशोक भाकरे

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची घोषणा मुंबई येथे होताच अकोट येथे ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क अकोट येथे आनंद उत्सव साजराकरण्यात आला.

महाराष्ट्रातील राजकारणात आज नवा अध्याय सुरू झाला आहे.राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा झाली असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी यांची युतीची घोषणा झाली.

याप्रसंगी अकोट वंचित बहुजन आघाडी व शिवसेना ठाकरे गट यांनी शिवाजी चौक अकोट येथे एकत्रित येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आणि मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे मा.आमदार संजय गावंडे,उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,तालुका प्रमुख शाम गावंडे,रमेश पाटील खिरकर,मनीष कराळे,नानेश्वर ढोले,वंचीत बहुजन आघाडीचे प्रदीप वानखडे,कांशीराम साबळे,लखन ईगळे,चरण ईगळे,धीरज सिरसाट,दीपक बोडखे,अमन गवई,निलेश झाडे,सिध्देश्वर बेराळ,यांच्यासह शिवसेना ठाकरे गट व वंचीत बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती पराक्रम दिनी शासन प्रशासनाच्या निषेधार्थ आझाद हिंद महिला संघटनेच्या रणरागिन्यांच्या भव्य आक्रोश निषेध मोर्चाने बुलढाणा शहर दनानले.

0

 

बुलढाणा.राज्यसह जिल्ह्यांतील अवैद्य धंदे बंद करा, शासकीय जागेत अवैध धंद्यांना परवानगी देणारे अधिकारी, महिलांचा आवमान करणारे होम डिवायएसपी ताथोड, जळगाव जामोद पीएसआय घोडेस्वार, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, टाकळी विरो ग्रामसेवक सावकारे यांच्या मालमत्तेची चौकशी करून नियमानुसार कारवाई सह त्वरीत बदली करण्यात यावी.

नाबालिक मुलींचे अपहरण थांबवून दोन वर्षातील आकडेवारी जाहीर करावी,शहरात महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी, शहरात रोडवरील बाहेर आलेले लोखंडी गज व खोदलेले रोड दुरुस्त करावे, रेशन दुकानदारांचा काळाबाजार थांबवा, यापूर्वी आझाद हिंदने दिलेल्या तक्रारी, मागण्यांची पूर्तता करावी यासह ईतर ज्वलंत मागण्यांसाठी आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे यांच्या नेतृत्वात 23 जानेवारीला भव्य आक्रोश निषेध मोर्चा निघाला.

शहरातील जयस्तंभ चौक, मुख्य बाजार लाईन, सराफा चौक, कारंजा चौक, तहसील चौक या प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सदर सभेत आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे, विदर्भ संपर्कप्रमुख शेख सईद, महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे, जिल्हाध्यक्षा नलिनीताई उन्हाळे, मनीषा झांबरे, सिंधुताई अहेर, वर्षाताई ताथरकर, यांनी शासन प्रशासनाच्या गलथान कारभारावर सडेतोड प्रहार केला.

त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील, जिल्ह्यातील पंधरा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये देशगौरव नेताजी जयंती केंद्राच्या अध्यादेशानुसार पराक्रम दिवस म्हणून साजरी न करणाऱ्यांवर करावाई करावी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, सिंचन योजना त्वरित पूर्ण करावी, जिगाव प्रकल्पाच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी.

यासह ईतर मांगन्याचे निवेदन सादर करण्यात आले. आक्रोश निषेध मोर्चामध्ये पिडीत शेकडो महिला मुलींची उपस्थिती, चित्ररथ, बॅनर,पोस्टर, भव्य रथामध्ये नेताजींच्या प्रतिमेसह देशगौरव नेताजी,राणी लक्ष्मीबाई सहगल,सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवराय यांच्या वेशभूषेतील भूमिका विशेष आकर्षण ठरली. शहरातील प्रत्येक चौकात व्यापारी,नागरिक महिलांकडून आझाद हिंदच्या रणरागिण्यांचा पुष्पवर्षाव करून स्वागत सत्कार करण्यात आले.
________________

 

निपुण भारत अभियान अंतर्गत माता-पालक गटाची बैठक आणि बालआनंद मेळावा फराडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

चामोर्शी: आज दिनांक २३ जानेवारी रोजी पंचायत समिती चामोर्शीच्या अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फराळा,केंद्र-भेंडाळा येथे निपुण भारत अभियान अंतर्गत
बाल आनंद मेळावा आणि महिलांसाठी माता पालक गटाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरज मशाखेत्री हे होते तर उद्घाटक म्हणून सौ शालीनी उंदीरवाडे ह्या होत्या.मुख्य मार्गदर्शक गट साधन केंद्र चामोर्शीचे विषय साधनव्यक्ती श्री चांगदेव सोरते हे होते.

तर प्रमुख पाहुणे संगीताताई भोयर,विजयाताई रोहनकर,बेबीबाई चुधरी,सौ शारदाबाई राऊत,रवी पेंदोर,सौ करीश्मा पेंदोर,शाळेचे मुख्याध्यापिका सौ वंदना ठवरे,कोठोरे मॅडम,कोडकिलवार मॅडम,श्री संजय कुमरे,श्री गौतम क्रिष्णा,श्री पदा सर, विषय साधनव्यक्ती श्री विवेक केमेकर,संसाधन शिक्षक श्री रवी खेवले,क्रिष्णा लांबाडे,मॅजीक बस चे समन्वयक योगीता सातपुते, रोशन तिवाडे ,उत्तम देखमुख, श्री बाबुराव देहलकर उपस्थित होते.प्रश्नमंजुषा(ओळखा पाहू).प्रश्न आमचे,उत्तर तुमचे(सामान्य ज्ञान),कोण होणार उत्कृष्ट विद्यार्थी.गणितीय प्रश्न(करू या मैत्री गणिताशी).काळ ओळखा,केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांना ताण-तणावापासून मुक्त ठेवण्यासाठी आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी इतरही कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे.

प्रश्नांमधून ज्ञानाची, आकलनाची,कल्पनांची आणि विचारांची दारे खुली करण्यास मदतगार ठरते.प्रश्नांच्या उकलतेमुळे अडथळे दूर होतात.मुलांच्या चेहऱ्यावरील हसू व तेज दिसतो,त्यातूनच आत्मविश्वासात वाढीस लागते.प्रश्नांचे उकल झाल्याने अडथळ्यांचा मार्ग सुकर होण्यास मदत होते.

विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी गंमत-जंमत मधून प्रश्नमंजुषा उपक्रम घेतले त्यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शाळेच्या वतीने माता पालकांसाठी शैक्षणिक वान(नोटबुक आणि पेन) उपलब्ध करण्यात आले.विद्यार्थी आणि मातांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्थांसाठी गणित विषयांचे ज्ञान कौशल्य विकसित होण्यासाठी खरी कमाई हा उपक्रम राबविण्यात आले.विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले.

भरगच्च कार्यक्रमामध्ये सहभागी गावकऱ्यांनी उत्सुर्त प्रतिसाद घेतला,जवळपास चारशे ते पाचशे लोकांनी कार्यक्रमाचा भरपूर आस्वाद घेतला.

पतंजलि योग परिवार जिला.बुलढाणा यांची प.पु.स्वामी रामदेवजी महाराज यांचे विर्दभात आगमणा निमित्त जय्यत तयारी

0

 

इस्माईल शेख शेगाव प्रतिनिधी

पतंजलि योग परिवार जिला.बुलढाणा ची मासिक सभा आदरणीय चतुर्भूज जी मिटकरी यांच्या अध्यक्षतेखाली दि.२२.०१.२०२३ रोजी भट्टड जीन शेगाव येथे सपन्न झाली सभेला महाराष्ट्र पुर्वचे सहकोष्याध्यक्ष आदरणीय प्रल्हादजी सुलताने सर बुलढाणा यांनी प.पु.स्वामीजी विर्दभातील अमरावती येथे 11 ते 13 मार्च 2023 ला तिन दिवशीय योग शिबिरा साठी पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी पतंजलीच्या सर्व योगशिक्षक व योगसाधकांना मार्गदर्शन केले या सभेला कोअर कमेटी चे सदस्य व विविध तालुक्यामधून आलेले प्रभारी व सहप्रभारी सभेला उपस्थित होते.

सभेमध्ये महा.पुर्वचे राज्यप्रभारी आदरणीय दिनेशजी राठोड यांनी आनलाईन मार्गदर्शन केले.

श्री प्रल्हादजी सुलताने, श्री चतुर्भूजजी मिटकरी, श्री दशरथजी लोणकर,श्री पुरुषोत्तमजी पिसे,श्री हरीदासजी सोळंके, श्री बाबुरावजी रोकडे,श्री निळकंठजी साबळे, श्री गोपालजी तायडे, श्री दिपकजी सरप,श्री हरिषजी चिचोंळकर ,श्री संतोषजी पाटील,सौ.अनिता पाटील, मोताळा,श्री.माधवरावजी झोरे लोणार,श्री दिपकजी गोमाशे पातुर्डा,श्री अमितजी जोशी,श्री भिकाजी रेठेकर,श्री राजेशजी ढवळे खामगाव, श्री महादेवजी धुरडे संग्रामपुर व योगसाधकांची उपस्थिती लाभली

गोरसेनेचा जनआक्रोश महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

0

यापुढे मायभगीनीवरचे अन्याय खपवून घेणार नाही -प्रा.संदेश चव्हाण(गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष)
जोडगव्हाण येथील पिडीत नेहा चव्हाण मृत्युप्रकरण.

प्रतिनिधी:(वाशीम) – पुरोगामी महाराष्ट्रामधील आयाबहीणीवर दिवसेंदिवस अतिप्रसंग,अन्याय, अत्याचार होत असून,यापुढे
कोणत्याही समाजावरील मायभगीनीवरचे अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही असे प्रकार झाल्यास ठोस उत्तर मिळेल.

असे प्रतिपादन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांनी केले.मालेगाव तालुक्यातील जोडगव्हाण येथील युवती कु.नेहा गजानन चव्हाण हीच्यावर बळजबरी अत्याचार करुन विहीरीत ढकलून दिल्याने गतप्राण झालेल्या युवतीला न्याय मिळावा.

यासाठी बंजारा समाजातील अग्रगण्य असलेल्या गोरसेना या सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात 20 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला.

सविस्तर माहितीनुसार,मालेगाव तालुक्यातील जोडगव्हाण येथील तरुणी नेहा गजानन चव्हाण ही तिच्या आजीसोबत वाशीम येथे राहून औद्योगिक प्रशिक्षण घेत होती.दिनांक ३० जानेवारी रोजी संघपाल सुदाम गवई व त्याच्या दोन साथीदारांनी जोडगव्हाण येथील युवती कु.नेहा गजानन चव्हाण हिच्यावर बळजबरीने अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा संशय आहे.

या संदर्भात मुलीच्या आईने शवविच्छेदनापूर्वी पोलीस अधिक्षक यांना निवेदन देऊन हत्याच झाल्याचा आरोप केला होता.

मात्र पोलीस प्रशासनाने कुठेतरी मिलीभगत करून आरोपींना सुरक्षीत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

सदर आरोपीवर भा.दं.वि ३७६(२),३०६,३६३,३४ असे विविध गुन्हे दाखल केले आहेत.मात्र या गुन्ह्यात सरळसरळ हत्या दिसत असताना सुद्धा खुनाचा खटला ३०२ लागू करुन सदर खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून मुख्य आरोपी संघपाल सुदाम गवई यांना फाशीची शिक्षा देणे,व इतर संशयितांना अटक करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करणे,

या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचारी तथा शवविच्छेदन अहवाल तयार करणार्‍या वैद्यकीय अधिकारी यांची कसुन चौकशी करणे,सदर प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडी यांचेकडे चौकशीसाठी सुपुर्द करणे,पिडीतांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी शासनाने ३० लाखाचा निधी देऊन कुटुंबातील एका व्यक्तींला शासकीय सेवेत रुजू करून घेणे या विविध मागण्यासाठी बंजारा समाजातील अग्रगण्य असलेल्या गोरसेनेच्या वतीने दिनांक २० जानेवारी रोजी प्रा.संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चाची सुरुवात क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून झाली ते वसंतराव नाईक चौक,पाटणि चौक,अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निघाला.
वाशीम जिल्हातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील संपूर्ण गोरबंजारा तांड्यामधून गोरसेनेचे किमान साठ हजार कार्यकर्ते तथा सर्व समाज बांधव सहभागि झाले होते.

मागील वर्षी सुद्धा गोरसेनेच्या वतीने पुसद येथे काळी दौलतच्या शाम राठोड हत्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात जनसंख्येत लाखोंचा मोर्चा काढला होता.त्यावेळी पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले होते.आता यावेळी सुद्धा पिडीत मुलीला न्याय मिळण्यासाठी गोरसेनेच्या वतीने वाशीममध्ये जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गोरसेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा संपत चव्हाण,नायकंळ शशिकलाबाई राठोड,सोनू चव्हाण व सर्व जिल्ह्याचे गोरसेना जिल्हाध्यक्ष आमी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आझाद हिंद महिला संघटनेचा विविध मागण्यासह पीडित मुलीचे अपहरण प्रकरणात न्याय मागण्यासाठी आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकनार

0

 

बुलढाणा:

शासन प्रशासनाच्या निषेधार्थ राज्यातील जिल्ह्यातील कायदेशीर वरली,मटका, क्लब यांच्या समस्या सोडविणे, नेताजी जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करणे, वृद्ध कलावंत मानधन, जिगाव प्रकल्पग्रस्त, शेतीमालाला भाव, शहरातील रस्त्यांची दुर्दशा,महिला मुलींचे अपहरण, स्वस्त धान्य दुकानदार यासह ज्वलंत समस्यांसाठी आझाद हिंद महिला संघटनेचा आक्रोश निषेध मोर्चा २३ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

पीडित मुलीचे अपहरण प्रकरण आमरन उपोषणा दरम्यान आठ जानेवारीला 22 जानेवारीपर्यंत मागण्यांची पूर्तता न केल्यास शासन प्रशासनाच्या निषेधार्थ 23 जानेवारीला जिल्ह्यातील पीडित माता पिता यांना सोबत घेऊन महिला संघटनेच्या वतीने आक्रोश निषेध मोर्चा काढण्याचा इशारा आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे यांनी दिला होता.

त्यानुसार 23 जानेवारीला दूपारी.१.०० वा. जयस्तंभ चौक स्थीत भारतीय स्वातंत्रता स्मारक (अक्षय वटवृक्ष) येथे देशगौरव नेताजींना अभिवादन करून शहरात शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

आक्रोश निषेध मोर्चाच्या अनुषंगाने पुढील मागण्यांचे निवेदन शासन प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे त्यामध्ये नाबालिक मुलीचे अपहरण कर्त्या आरोपींना जेलमध्ये मूलभूत सुख सुविधा प्रदान करणे. नाबालिक मुलीचे अपहरण प्रकरणाचा शोध लावणारे होम डिवाइस पी ताथोड आणि घोडेस्वार साहेब यांचा जाहीर सत्कार करण्याची परवानगी देणे.

देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती पराक्रम दिवस साजरा न करणाऱ्यां शासकीय निमशासकीय कार्यालय संस्थांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करणे.

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणे.जिल्ह्यातील वरली, मटका, क्लब अशा सर्व कायदेशीर सुशिक्षित व्यवसायिकांना आणि सुज्ञ ग्राहकांना सुरक्षा प्रदान करणे, पोलीस प्रशासनाची कायदेशीर फी ( हप्ते )कमी करण्यात यावे.

त्यांना अधिकृत जागा मोजणी करून देणे, तसेच अनधिकृत रित्या अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या शेतकरी मजूर यांच्या व्यवसायावर आणि घरावर बुलडोजर चालवणे.

कायदेशीर वरली मटका क्लब चालविणाऱ्या सुशिक्षित व्यवसायिकांसाठी व ग्राहकांसाठी मृत्री घर, संडास,बाथरूम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शहरातील महिलांसाठी बांधण्यात आलेले शौचालय बंद करण्यात यावे.

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, वृद्ध कलावंतांचे अर्ज भरून घेणे त्यांना त्वरीत मानधन वाटप करने, नगरपरिषद बुलढाणा अंतर्गत विविध विकास कामांसाठी खोदण्यात आलेले रस्ते, खड्डे, रोडवरील बाहेर आलेले लोखंडी गज त्वरित दुरुस्त करणे.

विकास कामे करत असतांना वाहतुकीस,व नागरिकांना अडथळा येणार नाही यासाठी बँरीकेट,मॅट लावणे.

यासह जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांचा समावेश राहणार आहे.

जिल्ह्यातील पीडित माता-पिता, वरली मटका, क्लब चालविणाऱ्या सुशिक्षित व्यवसायिकांनी, शेतकरी, शेतमजुरांनी वृद्ध कलावंतांनी, आपल्या न्याय हक्कासाठी सहभागी व्हावे.

असे आवाहन आझाद हिंदच्या वतीने सुरेखाताई निकाळजे, मिराबाई ठाकरे, आशाताई गायकवाड, वर्षाताई ताथरकर, मनीषाताई झांबरे, पंचफुलाबाई गवई,सिंधुताई अहेर, नलिनीताई उन्हाळे, अँड.सतीशचंद्र रोठे, संजय ऐंडोले, शेख सईद, श्रीकृष्ण कोकाटे, यूसूफ शहा, सुशीलराजे देशमुख, मोहम्मद सोफियान, कूरबान शहा,गजानन झांबरे, योगेश कोकाटे यांनी केले आहे.

देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंती निमित्ताने सलग 27 व्या वर्षी मूख्य अभिवादनासह जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

0

 

देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती व आझाद हिंद संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने वतीने करण्यात आले आहे.

23 जानेवारी 2023 ला स्थानिक भारतीय स्वतंत्रता स्मारक (अक्षय वटवृक्ष) येथे सकाळी ११.३० वाजता मुख्य अभिवादन आणि मानवंदना कार्यक्रमाने देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्सवाला प्रारंभ होणार आहे.

तर त्यानंतर देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या आयोजनानुसार देशभक्तीपर व्याख्यान, कवी संमेलन, स्पर्धा, गरजवंतांना जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप, अन्नदान , वैद्यकीय कॅम्प, यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सुभाष बाबूंच्या त्याग आणि समर्पणाला वंदन करण्यासाठी केंद्र सरकार ने पराक्रम दिवस साजरा करण्याचे अध्यादेश तीन वर्षांपूर्वी पारित केले आहे. त्यामुळे काही राज्यातील अपवाद वगळता देशातील प्रत्येक मुख्यमंत्री यांनी त्या अनुषंगाने शासकीय, निमशासकीय कार्यालयांना जयंतीसह पराक्रम दिवस साजरा करण्याचे आदेशही काढलेले आहे.

त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालय, सुरक्षा विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत यासह शाळा, कॉलेज, बँक, संस्था, पतसंस्था, यांना देशगौरव नेताजींना राष्ट्रगीत म्हणत मानवंदना देणे क्रमप्राप्त आहे.

तर नेताजींना मानवंदना न देणारे शासकीय, निम शासकीय कार्यालय, संस्था शासन, प्रशासनासह आझाद हिंदच्याही रडारवर राहतील असा ईशारा देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती.2023 व आझाद हिंद संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

१० दिवस मृत्यू शी झुंज देत, अखेर प्राण ज्योत मालवली,

0

 

गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी चक्क अपघातात मयताचा मृतदेह आणला यावल पोलीस ठाण्यात

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

अपघातात जखमी झालेला युवक मयत झाल्यानंतर त्याच्या आप्तांनी गुन्हा दाखल होण्यासाठी त्याचा मृतदेह थेट यावल पोलीस स्थानकात आणल्याने येथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्मित झाले.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, अरूण किशोर भालेराव आणि त्याचा मित्र विजय संजय इंगळे हे १० जानेवारी रोजी दुचाकीने कोरपावली येथून यावलला येत होते.

विरावली गावाजवळ त्यांना खलील रफीक तडवी ( रा. कोरपावली तालुका यावल) हा चालवत असलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले.

यातील अरूण किशोर भालेराव हा जबर जखमी झाल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्याने आज शेवटचा श्वास घेतला.

दरम्यान, या प्रकरणी ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मयत अरूण भालेराव याच्या आप्तांनी त्यांचे पार्थिव घेऊन थेट यावल पोलीस स्थानक गाठले. यामुळे पोलीस स्थानक परिसरात गोंधळ उडाला.

दरम्यान, पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी मयताच्या आप्तांशी संवाद साधत या प्रकरणात आधीच नशिराबाद पोलीस स्थानकात नोंद झाली असून आता यापुढील गुन्हा हा यावल येथे दाखल करण्यात येईल असे सांगितले.

या अनुषंगाने संबंधीत ट्रॅक्टर चालक खलील रफीक तडवी ( रा. कोरपावली, ता. यावल) याच्या विरोधात भादंवि कलम ३०४ (अ); २७९; ३३७; ४२७, मोटार वाहन कायदा १८४, १३४ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामुुळे अखेर मृताच्या आप्तांनी पार्थिव घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेत.

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी समस्तआरोपींना अटक करा नातेवाईकांची मागणी

0

 

इस्माईल शेख सोबत अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथील रहिवाशी नामदेव नारायण रायपुरे यांची मुलीचा दिनांक 24 /4 /2022 रोजी विवाह रीती रिवाजाप्रमाणे मुलीचे मोठे वडील नामदेव नारायण रायपुरे यांनी अकोला जिल्ह्यातील गणेश सहदेव गावंडे रा हाता ता बाळापूर जि अकोला यांच्याशी लग्न लावून दिले

परंतु मुलगी निकिता सहदेव गावंडे हिला लग्न झाल्यापासून शारीरिक त्रास व मानसिक छेड चालू होता मुलीचे वडील वारलेले असल्यामुळे मुलीचे मोठेबाबा मुलीची व मुलीच्या भावंडाचे जोपासन करतात मुलीच्या मोठे वडिलांनी पतीला शेत घेण्यासाठी सहा लाख दिलेले आहेत.

तरीही मुलीचा छड चालू होता मुलीने स्वतः शारीरिक त्रास सोसला परंतु कोणाला काही सांगितले नाही जास्त त्रास असल्यामुळे मुलगी निकिताने आत्महत्या केली पती गणेश सहदेव गावंडे व इतर राहणार हाता यांच्या विरुद्ध दिनांक 19 /1/ 2023 यांनी उरळ पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला सध्या आरोपी उरळ पोलीस स्टेशन जिल्हा अकोला मध्ये अटक आहेत बाकीचे आरोपी अद्याप पर्यंत अटक झालेले नाहीत निकिताचे मोठे वडिलांचे म्हणणे आहे की सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करावे व आम्हाला न्याय देण्यात यावा.

अशी मागणी पोलीस तक्रारीमध्ये सदर महिलेच्या नातेवाईकांनी केलेली आहे