Home Blog Page 216

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हाअध्यक्षपदी अनुप गवळी नियुक्त

0

 

खामगाव- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जळगांव जामोद तालुका तथा जिल्हा बैठक असलगांव येथे तालुका अध्यक्ष दत्तु दांडगे ह्यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.

वरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी अभिमन्यू भगत प्रदेश संघटक हे होते तर अध्यक्ष कैलासबापू देशमुख ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये घेण्यात आली.

वरील बैठकीत घाटाखालील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून अनुप गवळी खामगांव यांची तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून रामेश्वर गायकी संग्रामपूर व श्रीकृष्ण तायडे मलकापूर यांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा सचिवपदी राजकुमार भड, जिल्हा संघटक आश्विन राजपूत, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल भगत, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख गोपाल अवचार तर जिल्हा सदस्य श्रीधर आव्हेकर, मनिष ताडे वरील प्रमाणे घाटखालील जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली वरील बैठकीच्यावेळी प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, अभिमन्यू भगत, मंगेश राजनकर, अनुप गवळी, रामेश्वर गायकी, राजकुमार भड, आश्विन राजपूत, गोपाल अवचार, दत्तु दांडगे , मनिष ताडे, संतोष कुलथे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

वरील सत्कार कार्यक्रमाचे आयोजक आसीम खान निमगाव, मोहम्मद एजाज मोहम्मद आरीफ जळगाव जामोद यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विन राजपूत तर प्रस्ताविक गणेश भड यांनी तसेच आभार प्रदर्शन संतोष कुलथे यांनी मानले. कार्यक्रम वेळी पत्रकार संतोष मांजरे, विनोद चिपडे , बाळु देशमुख संग्रामपूर ,गजानन सोनटक्के, अमर तायडे , अनिल भगत , विजय वानखडे , मंगल काकडे , अनिल दांडगे यांच्यासह जळगांव जामोद तालुक्यातील पत्रकार हजर होते.

खंडणी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना पाच दिवसाची पोलिस कोठडी.

0

 

विकी वानखेडे  यावल

यावल : शहरातील एका पत्रकार सह विरावली येथील एकास एक लाखाची खंडणी मांगीतली म्हणुन बुधवारी पोलिसांनी अटक केली होती तेव्हा या दोघांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक १६ जानेवारी पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहरातील पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील व विरावली येथील संजीव उत्तम पाटील या दोघां विरूध्द बुधवारी यावल पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विवाहीतेचे दत्तक विधान व तीचे नावे करून दिलेले शेतीची कौटुंबिक वाटणीपत्र खोटे असल्याचे सांगत विवाहितेच्या पती इरफान इस्माईल तडवी रा.पुर्णवाद नगर यावल यांच्याकडे प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी एक लाखाची खंडणी मांगीतली होती.

तेव्हा दोघांना अटक केल्या नंतर गुरूवारी येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायधिश एम. एस. बनचरे यांच्या समोर हजर केले असता दोघांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.-पुर्ण-

जालना जिल्ह्यासह तालुक्यातील नवनियुक्त सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार:

0

 

प्रतिनिधी:(जालना)जिल्हृयासह तालुक्यातील मानेगाव खालसा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच जिजाबाई सखाराम राठोड,उपसरपंच राधिका दत्तात्रय जाधव व ग्रामपंचायत सदस्य नारायण लक्ष्मण जाधव,रोहिणी गोरक्षनाथ गायकवाड,कैलास रामचंद्र चव्हाण,बळीराम भीमा पवार,रेखा गौतम लहाने,अनुुसयाबाई प्रल्हाद राठोड,बाजीराव नागोराव आचलखांब,गयाबाई विलास आचलखांब यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाच्या वतिने करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित सर्वांशी संवाद साधला.मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जींच्या नेतृत्वातील सरकार ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील सर्वात जास्त ग्रामपंचयत मध्ये भाजपला बहुमत मिळवून दिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.यावेळी केंद्रीय रेल्वे राज्य व कोळसा व खनिज मंत्री रावसाहेब पाटील दानवे,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे,आ.नारायण कूचे,माजी आमदार विलास खरात,जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे,समृध्दी कारखाना चेअरमन सतीश घाडगे,माजी सभापती भिमराव डोंगरे यांच्यासह भाजप तालुका अध्यक्ष वसंतरावजी शिंदे आणि भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते सर्व सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

जिजाऊ मासाहेबांनी रयतेचे राज्य निर्माण केले सुमीत सरदार

0

महापुरुषांचे आदर्श घेऊन जागृती करणारे वृध्दाश्रम
डाॅ निलेश गोसावी

चिखली:- ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व गंगाई बहुउद्देशिय सेवाभावी संस्था अमोना च्या संयुक्त विद्यमाने तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमीत्त मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्दघाटक माजी जि.प. सदस्य सुमीत सरदार, अध्यक्ष गजानन फोलाने सरपंच भोकर, प्रमुख मार्गदर्शक डाॅ निलेश गोसावी हृदय रोगतंज्ञ, डाॅ धनंजय परीहार स्त्री रोग तंज्ञ हे होते.

सत्कारमुर्ती गोपाल तुपकर व्हाईस आॅफ इंडीया टीव्ही जनरलीस्ट असोसीयेशन जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष शेख युसुफ, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा तर प्रमुख उपस्थीतीत डाॅ सागर चिंलोले अस्थीरोग तज्ञ, डाॅ निरंजन काळे बालरोगतज्ञ, डाॅ सागर ठेंग दंतरोग तज्ञ, अनंता डोंगरदिवे उपसरपंच भोकर, संघरत्न साळवे, राजरत्न हिवाळे हे होते.

जिजाऊ मासाहेबांनी रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवबांना घडवले म्हणुन आज बहुजन समाज गुणागोवींदाने राहत आहे. तसेच महापुरुषांचा आदर्श जोपासत ऋणानुबंध समाज विकास संस्था तुकाराम आश्रय वृध्दाश्रम चे कार्य करीत आहे. यावेळी हृदय रोग, स्त्रीरोग, अस्थीरोग, नेत्ररोग, दंतरोग व बालरोग ईत्यांदि आजारावर मोफत तपासणी करण्यात आली यावेळी शेकडो नागरीकांनी या शिबीराचा फायदा घेतला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार प्रदर्शन सौ रुपाली डोंगरदिवे यांनी केले.

यावेळी रवीशंकर डोंगरदिवे, विश्वनाथ खंदारे, रमेश डोंगरदिवे, राहुल घेवंदे, लिंबा वानखडे, केशव डोंगरदिवे, जगदेव डोंगरदिवे, संकेत डोंगरदिवे, विलास डोंगरदिवे, फकीरबा डोंगरदिवे,गुनवंत फोलाने, मोहन नेवरे, सखाराम नेवरे, भास्कर डोंगरदिवे, भिमराव नेवरे, अनंता पवार यांच्यासह समस्त गावकरी मंडळी उपस्थीत होते.

नि:शुल्क ज्योतिषशास्त्र व वास्तूशास्त्र कार्यशाळा संपन्न

0

 

 

भंडारा – ज्योतिष विश्व विद्यापीठ, ओंकारेश्वर द्वारा संचलित ज्योतिष विद्यालय भंडारा च्या वतीने नि शुल्क कार्यशाळा नुकतेच जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती.

शिबीराची सुरवात प्राजक्ता संगीतराव यांनी सरस्वती स्तवन व नवग्रह स्तोत्र च्या पठणाने केली . कार्यक्रमाचे प्रमुख अतीथी म्हणून डॉ बबन मेश्राम ,डॉ वनिता शाह, डॉ मनीष खारा, डॉ देविदास बोधनकर, लोकेश मोहबंसी, नासिक त्रंबकेश्वर येथील उपाध्याय प्रमोद देवकुटे गुरूजी, मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक पराग भावसार, कबड्डीपटू आकाश पिकलमुंडे, ज्योतिष विद्यालय भंडारा चे संस्थापक अध्यक्ष डॉ हितेंद्र सोरटे उपस्थित होते. यावेळी मंचावर उपस्थित सर्व उपस्थितांचे स्वागत पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन करण्यात आले.

ज्योतिष विद्यालय भंडारा चे संस्थापक अध्यक्ष डॉ हितेंद्र सोरटे यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या विविध कार्याची माहिती देवून दैनंदिन जीवनात आपण ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र चा उपयोग करून आपले जीवन सुखकर करू शकतो असे मत व्यक्त केले.

जिल्हा परिषद सभागृहात आयोजित नि:शुल्क कार्यशाळेच्या आयोजन ज्योतिष विश्व विद्यापीठ ओंकारेश्वर चे संस्थापक गुरुवर्य डॉ भुपेश गाडगे सर यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनात करण्यात आले होते. तसेच प्रमुख वक्ते नासिक त्रंबकेश्वर येथिल उपाध्याय प्रमोद देवकुटे यांनी विशिष्ट तिथी,वार, नक्षत्रमुळे होणारे शुभाशुभ योग ज्याचा उपयोग रोजच्या जिवनात केल्यास अकस्मात येणारे आपदा कशा सहज दूर होऊ शकतात यावर मार्गदर्शन केले.तर पराग भवसागर यांनी सर्पयोग पुजनाचे धार्मिक आध्यात्म स्वताचे अनुभवावरुन सांगितले.यावेळी उपस्थित वक्तांनी वेगवगळ्या विषयावर मार्गदर्शन केलेत.

विद्यालयाच्या सदस्या सिमा नंदनवार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन अंकुश चुटे यांनी केले तसेच कार्यशाळेची सांगता प्राजक्ता संगीतराव यांनी पसायदानाने केली.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश करंडे, अंकुश चुटे, अजय संगीतराव ,प्रशांत खंडाळे,शैलेश साऊसाखरे, पवन हेडाऊ ,भारती जांबुळकर, मिनाक्षी ठवकर, प्राजक्ता संगीतराव,स्नेहलता बांगरे, अर्चना पंचबुद्धे ,विनोद उके, प्रफुल्ल नागापुरे, महेंद्र गभने, राहुल भानारकर,श्रद्धा डोंगरे, चित्रा झुरमुरे, डॉ माधुरी बोधनकर सह विद्यालयाचे सर्व सदस्यांनी अथक परीश्रम घेतले.

किनगाव माध्यमिक विद्यालयात अमिर प्रतिष्ठानतर्फे २१ अपेक्षीत वाटप

0

 

यावल( प्रतिनीधी) विकी वानखेडे

भारतीय प्रजासत्ताक चे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त आमिर प्रतिष्ठान संचलित अमीर कला व वाणिज्य महाविद्यालय किनगाव यांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष हाजी रमजान अमीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन तडवी यांनी माध्यमिक विद्यालय किनगाव येथील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत २१ अपेक्षित संच वाटप केले कार्येक्रमाच्या सुरूवातीला सरस्वती पुजनासह भारतरत्न लालबाहादुर शास्री यांचे प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्या.जळगाव चे ज्येष्ठ संचालक उमाकांत रामराव पाटील स्कूल कमिटी चेअरमन निळकंठ रामदास पाटील किनगाव बुद्रुक चे सरपंच पती संजय सयाजीराव पाटील किनगाव खुर्द चे सरपंच भूषण नंदन पाटील माजी सरपंच टिकाराम मुरलीधर चौधरी प्रगतशील शेतकरी चंद्रकांत विठ्ठल चौधरी माजी आमदार रमेशदादांचे स्वियसहाय्यक समिर गुलशेर तडवी ग्रा.प.सदस्य विजय अरूण वारे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सूत्रसंचालन एस.बी.सोनवणे सर यांनी केले यावेळी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणी विद्यार्थीनी उपस्थित होते.

मॅा साहेब जिजाऊ माता केवळ मायाळू नसुन छत्रपतीची शक्ती होती-युवा उद्योजक विनोद उबाळे.

0

 

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील नंदापुर येथील श्री सदगुरु सदानंद हॅाटेल यांचे वतीने एकच वारी 12 जानेवारी दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी अनेक जिल्ह्यातील राञी प्रवासात निघून मॅा साहेबांच्या सिंदखेड राजा या ठिकाणी येणार्या शिवप्रेमी साठी काही तरी अगळा वेगळा उपक्रम आणि आपन समाजाचे काही तरी देणे आहोत.

संकल्प घेऊन या उद्देशाने सर्व शिवप्रेमी साठी विनामूल्य गरम पाणी स्नानगृह व चहा पाणी व्यवस्था युवा उद्योजक विनोद उबाळे यानी केली आहे पुढे बोलतानी माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात.

राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली.तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे.

असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला मॅा साहेब जिजाऊ माता केवळ मायाळू नसुन छत्रपतीची शक्ती होत्या.

अखेर आझाद हिंदच्या आंदोलनाला यश… नाबालिक पीडित मुलीचे अपहरण प्रकरणातील आरोपीला अटक..

0

 

जोपर्यंत मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील..
पीडित माता-पिता

बुलढाणा:
पीडित मुलीचे अपहरण प्रकरणात अखेर मुलीसह आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर FIR- 575/22 माधवी कलम 363, 376, (2 )(J)(N) सहकलम 4,8,12 पोक्सो कायदा 2012 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुलीला आई वडिलांपासून लांब ठेवत बाल सुधार गृहात ठेवण्यात आले आहे.

मुलगी आई-वडिलांसोबत बोलू इच्छित नाही.त्यांच्यासोबत राहू इच्छित नाही. अशी बनावट माहीती आई-वडिलांना देत मुलीला भेटू दिले नाही. विशेष म्हणजे मुलगी स्वतःहून पोस्टेला आल्याची माहिती तपास अधिकारी घोडेस्वार यांनी दिली.

परंतु तपास अधिकारी घोडेस्वार यांच्यासह, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने विविध पथक नेमण्यात आले होते. सदर पथकांच्या कार्यालयीन नोंदी आहेत.
तर जळगाव खान्देश, औरंगाबाद व इतर विविध ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. ज्यावेळी तपास पथक जळगाव खान्देशात गेले तेंव्हा त्यांना मुलगी आढळून आली नाही का..? आरोपी आढळून आला नाही का..? मग आरोपीला कुठून अटक केली,की तोही स्वतःहून आला हे ही प्रश्न अद्याप अनूत्तरीतच आहेत.तर खूलेआम कायद्याची पायमल्ली करणारे असे अनेक प्रश्न नाट्यमहिरीत्या समोर येत होते.

सदर प्रकरणात स्थानिक आमदार माजी मंत्री संजय कुटे यांचे नाव समोर आले. मुलीचे अपहरण होण्याअगोदर आमदार संजय कुटे यांनी पीडित मातापित्यांना घरी बोलवून सदर मूलीचे अपहरण होऊ शकते अशी माहिती दिली होती. ज्यावेळी त्यांना आमदारांनी बोलविले त्यावेळेस आमची मुलगी घरी होती. जेव्हा आमदार कूटेंसोबत चर्चा सुरू झाली आणि संपली. त्यानंतरच मुलीचे अपहरण झाले. त्या दरम्यानच मुलगी घरून गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलीस प्रशासनावर सह आरोपी मध्ये आमदार संजय कुटे यांचे नाव घेण्याचे धाडस होणार आहे का…? कमीत कमी त्यांचा जबाब आजपर्यंत पोलीस प्रशासनाने नोंदविला का..? गून्ह्यात राजकीय हस्तक्षेप आणि पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळेच पीडित मुलीच्या अपहरण प्रकरणांमध्ये प्रत्येक क्षणाला नाट्यमय घडामोडी घडत आहे.
परंतु त्यामध्ये कायद्याची पायमल्ली करण्याचे धाडस आजही होत आहे.

तर राजकीय दबावाखाली प्रकरण दाबण्याचा, आरोपीला वाचविण्याचा प्रयास मागील तीन महिन्यापासून आजही सुरूच आहे.
परंतु पीडित माता-पित्यांनी आणि आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य महिला आयोग, सीबीआय सोबत संपर्क साधला. सदर प्रकरणात पीडित मातापित्यांनी १२ डिग्री थंडीत सलग पाच दिवस केलेलं आमरण उपोषण. आझाद हिंदने केलेले विविध आंदोलन.

यामूळे कुंभकर्णी झोपेतील पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले. तीन महिन्यानंतर तपासाला सुरुवात झाली. नियमानुसार मुलीचे बयान घेत रात्री उशिरा गुन्हे दाखल झाले आहेत.
सदर प्रकरणात सह आरोपी म्हणून राजकीय क्षेत्रातील काही मोठी नावे सदर गुन्ह्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
जीव गेला तरी चालेल परंतु जोपर्यंत प्रकरणाचा निःपक्ष तपास होत नाही.तोपर्यंत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहील.
अशी प्रतिक्रिया बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत पीडित मातापित्यांनी दिली.

पत्रकार परिषदेला आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे, बहुजन महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सिंधुताई अहिर, जिजाऊ ब्रिगेडच्या पंचफुलाबाई गवई, घाटाखालील महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई ताथरकर, राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे,विदर्भ संपर्कप्रमुख शेख सईद यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

ग्रामपंचायत पळसगाव बाई येथील अतिक्रमणामुळे सदस्य ठरले अपात्र..

0

 

सिंदी (रेल्वे). ग्रामपंचायत पळसगाव बाई येथील दोन ग्रामपंचायत सदस्य यांचेवर अतिक्रमण कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी यांनी केली अपात्रतेची कार्यवाही, जिल्ह्यात आदर्श ग्राम म्हणुन नावलौकिक असलेल्या पळसगाव बाई येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन धाबडधुस्के व लक्ष्मी ईरपाते यांचे अतिक्रमण असुन त्याबाबात जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

अॅडव्होकेट परीक्षीत पेटकर यांनी अतिक्रमणबाबत ठोस पुरावे सादर करून बाजु मांडली तक्रारींचे अनुषंगाने गटविकास अधिकारी व तहसीलदार सेलू यांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केले असून अहवालात अतिक्रमण असल्याचे जिल्हाधिकारी सुनावणी दरम्यान सिध्द झाले असून जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण कायदा १४ ज अंतर्गत कार्यवाही करीत ग्रामपंचायत सदस्य पदावरुन अपात्र घोषित केले आहे.

गजानन धाबडधुस्के यांनी स्वत: सदस्य पदावर असतांना घराचे बाजूला असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला तसेच सदस्या लक्ष्मी ईरपाते यांचे पतीच्या नावे अतिक्रमण आढळून आले आहे . गावातील जागुत नागरीकांनी आलेल्या निर्णयाचे स्वागत केले असून अश्याप्रकारे स्वत: पदावर असतांना अतिक्रमण करून मिरवणाऱ्या व नाहक तक्रारी करून गावाची प्रतीमा मलीण करणा-या सदस्यांना चांगलाच चाप बसला आहे.

तक्रारकर्ते किशोर गोल्हर यांनी सदर निकालानंतर मत व्यक्त केले की, पळसगाव बाई येथील गावाचे सरपंच धीरज लेंडे यांचे पुढाकाराने ईतीहास नोंद घेईल इतका कायापालट झाला असतांना सदर सदस्य विरोधाचे राजकारण करुन विकास कामात अडथळा व नाहक तक्रारी करून गावाची प्रतीमा मलीण करीत असुन स्वत: पदावर असतांना अतिक्रमण करून असुन ईतर नागरीकांनी सदस्याकडुन काय आदर्श घ्यायचा त्यामुळे त्यांचेवर कार्यवाही मुळे भविष्यात अतिकमणाला आळा बसुन गावात अतिक्रम बाबत जबर निर्माण होईल..

गावात अतिक्रमण निर्मूलन जनजागृती व कार्यवाही बाबत सदस्यांचेच अतिक्रमण असल्यामुळे सरपंच म्हणुन कार्यवाही करतांना अडचण जात असुन नागरीकांचे बोलणे नेहमी ऐकावे लागत होते परंतु आता सदस्यावर अपात्रतेची कार्यवाही झाल्यामुळे भविष्यात अतिकमणाला आळा बसेल व गावातील अतिक्रमण कमी होण्यास मदत होईल..
*धिरज लेंडे, सरपंच*

कै.मनाबाई माधव कुरकुरे रा यावल यांनावृद्धकाळाने रात्री 11 वाजता निधन झाले

0

 

विकी वानखेडे  यावल

कै.मनाबाई माधव कुरकुरे वय ८७ ,रा यावल यांना काल दि 10/01/2023 रोजी वृद्धकाळाने रात्री 11 वाजता निधन झाले त्यांची अंत्य यात्रा आज सकाळी दि.11/01/2023 रोजी 11 वाजता म्हैसोबा महाराज मंदिर महाजन गल्ली जवळून निघणार आहे. शोकाकुल- श्री. कालिदास माधव कुरकुरे, श्री दिनकर माधव कुरकुरे, श्री योगेश कालिदास कुरकुरे, श्री मुकेश कालिदास कुरकुरे, श्री मिलिंद वासुदेव कुरकुरे यावल पंचायत समिती घरकुल प्रोग्रामर यांच्या आजी होत्या