Home Blog Page 230

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी(दि.१४) रोजगार मेळावा

0

Akola प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला,दि.८(जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मे. सुझुकी मोटर्स, गुजरात प्रा.जि. यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,

अकोला येथे बुधवार दि. १४ रोजी विविध पदाकरीता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, डीझेल मॅकेनिक, पेन्टर जनरल, मशिनिस्ट, मोटार मेकॅनिक, टुल ॲन्ड डायमेकर, पी.पी.ओ., ट्रॅक्टर मेकॅनिक,

सि.ओ.ई.ऑटोमोबाईल या व्यवसायातील आयटीआय उत्तिर्ण प्रशिक्षाणार्थ्यांना कंपनीमार्फत रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

तसेच अधिक माहितीकरीता मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे अंशकालीन प्राचार्य यांनी केले आहे.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम

0

 

२८ बालकांना हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता;
पहिल्या टप्प्यात ११ बालकांना घेऊन पथक मुंबईकडे

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला,दि. ८ (जिमाका)-राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत बालकांच्या आरोग्याची तपासणी व तपासणी निदानानंतर आवश्यकतेनुसार उपचार केले जातात.

या अंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक निदानानंतर ७६ बालकांची तपासणी हृदय संबंधिता आजारांसाठी करण्यात आली. त्यात २८ बालकांना हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आता शस्त्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात ११ बालकांना घेऊन आज जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे पथक मुंबई येथे रवाना झाले.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातून विशेष बसने हे पथक बालकांना घेऊन रवाना झाले. बालकांसमवेत त्यांचे पालकही असणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना हाढोळे तसेच अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात शाळा तपासणीत हृदयरोगाशी संबंधित जटीलतेची लक्षणे दिसून आलेल्या ७६ बालकांची दि.१६ ऑक्टोबर रोजी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात टु डी इको चाचणी करण्यात आली. या चा

कॉंग्रेस कार्यकर्त्यानी साजरा केला श्रीमती सोनिया गांधी यांचा वाढदिवस

0

 

गुड्डू कुरेशी सिंदी रेल्वे

सिंदी रेल्वे दि. 9/12/22 रोज शुक्रवार रोजी गांधी चौक येथे समस्त काँग्रेस पदअधिकारी व करकर्ते तसेच गावातील सन्मानीय गावकरी यांनी श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी चौकत मिठाई वाटून गोड तोंड करून वाढदिवस साजरा केला

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगदिश बोरकुटे यांनी सोनिया गांधी यांच्या कार्यकिर्तीत केलेल्या कमा बद्दल कौतुक केले व यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दिल्या तसेच मनोगत श्री गजानन खंडाळे यांनी व्यक्त केल्या.

आणी सिंदी शहरातील कॉंग्रेस पक्ष कसा मजबूत होईल याबद्दल आपले विचार व्यक्त केले तसेच आभार प्रदर्शन अजय कलोडे यांनी केले.

कार्यक्रमला श्री रवी वाघमारे अजय क्लोडे सचिन लांबट संजय तडस अतुल ठाकरे रवी राणा दिलीप बदवाईक दीपक अग्रवाल वैभव कुकुटकर प्रवीण वाघमारे भगत बाबरे सुधीर झीलपे आदी उपस्थित होते

हिंगणघाट पुरग्रस्त आरक्षित जागेवर भुमीपुजन शिवसेनेकडून कार्यक्रमावर आक्षेप ?

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखा हिंगणघाट जिल्हा वर्धा या पक्षाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब वर्धा , मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना निवेदनातून आक्षेप घेण्यात आला.

की, सन 1983 साली वणा नदीला महाभयंकर पुर आला असल्यामुळे नदीपात्रा जवळची लोकवस्ती ही पुराच्या पाण्याखाली गेली. त्यामध्ये नागरीकांची घरे बुडाली असल्यामुळे खुप मोठे आर्थिक नुकसान झाले. तत्कालीन सरकार मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आदेश देवून त्या सर्व पुरग्रस्त (पिडीतांना) खुल्या शासकीय जागेवर सदनिका बांधून दिल्या तर काही नागरीकांना पट्टे देवून प्रस्थापित केले.

सदर ठिकाणी विकासाच्या दृष्टीकोणातून रस्ते, नाली, गडर लाईन, मैदाने तथा बगीचा करीता जागा आरक्षीत करण्यात आली.
शहरातील संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्र. 6 येथील नागरीकांनी आम्हाला निवेदन देवून अवगत केले.

पुरपिडीत कॉलनी करीता भुखंड क्र. 70 हा बगीचा व मैदाना करीता आरक्षित केलेली जागेवर त्यांची मुले खेळण्या व फिरण्या करीता वापरात होती. परंतू काही वर्षापुर्वी सदर जागेवर अतिक्रमण करून काही विशिष्ट समुहातील लोकवस्ती तयार झाली.

त्याकरीता तेथील नागरीकांनी अतिक्रमण काढण्याकरीता मा. खासदार साहेब, मा. आमदार साहेब, मा. उपविभागीय अधिकारी, मा. तहसिलदार, मा. मुख्याधिकारी, नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले. परंतू आमदाराचे पाठबळ असल्यामुळे अजुनपर्यंत सदर ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले नाही किंवा कुठलीही कार्यवाही झाली नाही.

दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी मात्र ना. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा मा. खासदार, मा. आमदार यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढले तर नाहीच.

परंतू उर्वरीत त्या आरक्षित जागेवर महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत जिल्हा वार्षिक योजने मधून त्या ठिकाणी नगर परिषद, उपविभागीय अधिकारी महसुल यांची कुठलीही ना हरकत प्रमाणपत्र न घेता त्या ठिकाणी वर्धिनी केंद्राचे भुमीपुजन करून राजकीय दबाव टाकुण सदर आरक्षित जागा बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा विषय निंदनिय व निषेधार्थ आहे.

तरी आपण त्या जागेसंबंधी माहिती घेवून त्या ठिकाणी पुरपिडीत नागरीकांना त्यांच्या मुलाबाळांना खेळण्या व फिरण्याकरीता आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढून योग्य न्याय द्यावा. असे आपणांस या निवेदनात विनंती करतो.

जर या विषयावर कुठलीही कार्यवाही झाली नाही तर शिवसेना तेथील नागरीकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरेल तसेच उग्र आंदोलन सुध्दा करण्यात येईल.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा हिंगणघाट च्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा च्या वतीने वसंत सभागृहामध्ये जगनाडे महाराजांची 398 जयंती साजरी व भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कडून करण्यात आले .संतांना कुठली जात नसते धर्म नसते मानव कल्याणासाठी संत कार्य करीत असतात त्यांचे विचार अंगीकृत करणे हाच खरा माणूस धर्म आहे महाराष्ट्र संतांची भूमी आहे संताचे विचार साहित्य प्रेरणादायी आहे संतांनी कोणत्याही एका समाजापुरते आपले कार्य केले नसून संताचे कार्य हे संपूर्ण मानवजाती साठी आहे

संत तुकारामाचे सानिध्यात राहून संताजी महाराजांनी सुद्धा आपले अभंग रचले समाजाच्या दांभिकतेवर अंधश्रध्देवर टिका करून समाजाच्या अंधश्रद्धा दूर केल्या भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता जगनाडे महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा लेखणी बंद करून समाजापर्यंत पोहोचवली हे त्याचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले.

त्यात निमित्याने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाज यांनी संताजी जयंती साजरी करत भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले ह्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ माधुरी विहीरकर यांनी केले याप्रसंगी गिरीधर काचोळे यांनी स्वरचित संताजीचरित अभंगाचे.

गायन केले. कार्यक्रमाचे आभार जगदीश वांदीले यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ.माया चाफले ,महेश घुमड़े, प्रा. डॉ.राजू निखाडे प्रा डॉ. शरद विहीरकर राजेंद्र इखार ,सचिन येवले, अनिता गुंडे सुरेश गुंडे आदींनी सहकार्य केले.

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट:- समाजाला कीर्तन- अभंगाच्या माध्यमातून शिकवनी देणारे व तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची 398 ‌‌‌वी जयंती दि. 8 जानेवारी 2022 रोज गुरुवाराला स्थानिक नवयुवक शिवाजी दुर्गा मंदिर , तेलीपुरा चौक हिंगणघाट येथे उत्साहात साजरीत करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्री बालाजी गहलोद व येरंडेल तेली समाज विदर्भ महिला उपाध्यक्ष हेमा ताई दुरबुडे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंदिर समितीचे अध्यक्ष श्री गजेंद्र नागोसे हे उपस्थित होते.

सर्वप्रथम प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते मंदिर समितीच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .

त्यानंतर प्रमुख पाहुणे हेमा ताई दुरबुडे यांनी संताजीच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी संकलन करून लिहिलेला तुकाराम महाराजांचे साहित्य व गाथे विषयी माहिती दिली अध्यक्ष भाषणातून श्री गजेंद्र नागोसे यांनी श्री जगनाडे महाराज हे समाजासाठी दीपस्तंभ असल्याचे म्हटले त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याचे आवाहन उपस्थित नवयुवक व समाज बांधवाना केले.

कार्यक्रमाचे संचालन तथा आभार श्री राजेश मुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजना करिता संजय कावळे,गजु वरघने,अतुल वैरागडे, राजेश खानकुरे,विक्कि सहारे,विक्की नागोसे,गौरव सहारे,गौरव मुळे,नरेश कुंभारे, कैलाश सहारे,पवन गाले,शुभम साठोने,कपिल भजभुजे, रविंद्र सहारे,नागेश कैकाडे,धनराज कोलते,सचिन सहारे,ऋषभ खानकुरे, गणेश सहारे, यांनी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमाला मंदिर समितीचे सदस्य तसेच परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शासनाच्या योजना भाजप पक्षाच्या आहे का ? . शिवसेना आक्रमक

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

दि. 8 डिसेंबर
हिंगणघाट :- शिवसेना च्या वतिने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून तक्रार करण्यात आली , शहरात पाच ते सहा महिण्यापुर्वी पासून कुठल्याही शासकीय योजना ज्या गरजू व गोरगरीबांकरीता अंमलात आणल्या जातात,

जसे दिवाळीपूर्वी कामगार कल्याण, वर्धा या विभागाद्वारे गवंडी कामगार तथा इमारत बांधकाम मजूर यांना साहित्य व पेटी वाटप कार्यक्रम निखाडे सभागृह येथे घेण्यात आला.

तसेच शहरातील रेशन दुकानातून दिवाळी साजरी करण्याकरीता आनंदाचा शिक्षा ही किट 100/- कमी दरामध्ये वाटप करण्यात आली व आता काही दिवसापुर्वी शिवसुमन मंगल कार्यालय, हिंगणघाट येथे महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) द्वारे आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या वतिने शिक्षणाकरीता टॅब देण्यात आले आहे.

अशा शासनाच्या योजना आहे. त्या सर्व योजनेचे लाभार्थ्यांना साहित्य वाटप झाले त्यावेळी शिवसेना पक्षाच्या असे निदर्शनास आले की सदर योजना हया शासनाच्या नसुन एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या (भाजपा) आहे. कारण जेव्हा कामगार कल्याण कार्यालय, वर्धा यांनी निखाडे सभागृह मध्ये कार्यक्रम आयोजीत
केला त्या ठिकाणी लोक प्रतिनीधी म्हणून आमदार प्रमुख पाहूणे असणे गैर नाही.

परंतू त्या ठिकाणी बॅनर व
पक्षाचे झेन्डे व पक्षाचे इतर पुर्ण प्रतिनीधी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडतो. परंतू सदर कार्यक्रमात
शासकीय अधिकारी व कर्मचारी कुठेही दिसुन येत नाही. तसेच शिवसुमन मंगल कार्यालय, हिंगणघाट महाज्योतीच्या
वतिन विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण केले तेव्हाही पक्षाचे बॅनर व झेन्डे लावण्यात आले होते. व त्याचे पक्षाचे सर्व प्रमुख
पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावरून असे निदर्शनास येते की, सदर कार्यक्रम हा शासकीय नसुन एका
विशिष्ट राजकीय पक्ष भा.ज.पा. चा आहे असे लक्षात येते.
तरी सदर शासनाचा निधी असला तरी तो निधी सर्वसामान्य जनतेचा आहे. हया ठिकाणी भा.ज.पा. आपली राजकीय पोळी शेकत आहे. त्यांच्या या सर्व कृतीमुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे.

व हा प्रयोग कुठेतरी थांबला पाहिजे अन्यथा शिवसेनेद्वारा उग्र आंदोलन करण्यात येईल. यापुढे सदर कार्यक्रम पुनःश्च झाला तर याला आपली मुकसंमती समजण्यात येईल, व सदर कार्यक्रम उधळून लावण्यात येईल.

त्याची जबाबदारी आपली स्वतःची राहील. शिवसेनेचे शिष्टमंडळ जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांच्या नेतृत्वात तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहरप्रमुख सतीश ढोमणे, उप तालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे,नगरसेवक मनीष देवडे,त बंटी वाघमारे इत्यादी शिवसैनिकासह निवेदन देण्यात आले व योग्य तो न्याय मिळावा

नीम हकीमांनो,गोद्री कुंभमुळे पोहरादेवीचे पावित्र्य आणि महत्व कसे काय कमी होणार आहे? – फुलसिंग जाधव,औरंगाबाद

0

 

 

प्रतिनिधी:(जालना)-जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री या गावी जानेवारी २०२३ मध्ये पार पडणाऱ्या हिंदू गोर बंजारा व लभाना नायकडा समाजाच्या ऐतिहासिक कुंभची जोरदार तयारी चालू आहे.केवळ देशातीलच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या गोर बंजारा बांधवांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

हजारो कार्यकर्ते विविध प्रकारे स्वतःहुन या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करीत आहेत.कार्यक्रमाला समाजातून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा पाहून अनेकांच्या पोटात पोटसुळ उठलेले आहे.लभाना समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता गोर बंजारा समाजातील सर्व अंतर्गत जातींना एकत्र जोडून समाजाला एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न स्वतःला विद्वान समजणाऱ्या लोकांना सहन न होणे अनाकलनीय आहे.दुःख एक लभाना कार्यकर्ता नेतृत्व करतो म्हणून आहे की,समाज एकत्र येतो आहे याचे आहे ?

आपल्या समाजातील नीम हकीम पुरोगामी डुकरांचा समाजात होणाऱ्या अशा विविध धार्मिक कार्याला नेहमीच विरोध राहत आलेला आहे.विशेष म्हणजे त्यांच्या अपप्रचाराला समाज कधीही बळी पडलेला नाही.

कारण समाजाला माहित आहे की,डुकरांचा स्वभावच असतो की, कुठेही घाण करणे.आजवर या डुकरांनी समाजात घाण करण्यापलिकडे काय केले आहे ?

संत श्री रामरावजी बापू यांच्या लक्षचंडी यज्ञाला याच डुकारांनी जातीबाहेरील लोकांना सोबत घेऊन संत श्री.रामरावजी बापूजींची आणि पोहरादेवीची नको ती बदनामी केली होती.

तरीही लक्षचंडी यज्ञ व्यवस्थित पार पडले.भक्तिधामला विरोध करणारेही हेच बेंदाड निवासी होते. इतर समाजामध्ये आपल्या समाजाची अप्रतिष्ठा करणे हा एकमेव कार्यक्रम हे नासके कांदे सतत राबवित असतात. जे की समाजासाठी खुप घातक आहे.

ही डुकरं समाजातील साधुसंताना तांड्याची औलाद नाही म्हणतात, ऐतखाऊ म्हणतात. पण हे ज्यांच्या पायावर डोके टेकतात ते भंते कुठे नांगरणी करुन पोट भरतात हे मात्र सांगत नाहीत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या विचारांना दुषित करुन जाती धर्मात तेढ निर्माण करणे आणि स्वतःला फार मोठे विद्वान असल्याचे साबित करण्यापलिकडे या बेंदाड निवास्यांचे दुसरा कोणताही उद्देश राहिलेला नाही. यांचा आजवरचा इतिहास तपासून पहा. समाज नासवणे यापलिकडे दुसरे कांहीही दिसणार नाही.समाजात कांही चुकीचे घडत असेल तर एकत्र बसून चर्चेतून मार्ग निघू शकतो.पण हे नीम हकीम पुरोगामी कधीच चर्चा करण्याची भाषा करीत नाहीत

लक्षचंडीच्यावेळी आणि आता गोद्री कुंभच्यावेळी आयोजकांशी आपण चर्चा करु असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेऊन सुद्धा त्यांनी चर्चेची तयारी दाखविली नाही.यावरुन त्यांची नियत किती दुषित आहे हे स्पष्ट होते.आता तर वेळ निघुन गेलेली आहे.आता कोणीही कितीही भुंकले तरीही त्यांना भीक घातली जाणार नाही.

या नीम हकीम पुरोगामीचे पाहुन काँग्रेसचे नालीतील कांही जीवजंतूसुद्धा बाहेर येऊन वळवळू लागलेले आहेत. कधी नव्हे एवढ्या प्रचंड संख्येने एकत्र येणाऱ्या समाजाला वेगवेगळी घाणेरडी कारणं पुढे करुन एकत्र न येऊ देण्याचा त्यांचा हा समाजद्रोही उद्देश स्पष्ट दिसतो आहे.या सर्व गांडुळानी एक लक्षात घ्यावे की, तुम्हाला विचारुन समाज जेवत नाही किंवा झोपत नाही.

याचेही त्यांनी भान ठेवावे.या गांडुळाना खुले आव्हान आहे की,तुमच्यात दम असेल तर जास्त नाही देशातील हजार दोन हजार लोकांना गोळा करुन तर दाखवा !

आरएसएसच्या मदतीने समाजाचे चार दोन प्रश्न सुटले तर तुमच्यावर आभाळ कोसळणार आहे काय ? आणि किती दिवस हे नको , ते नको करीत बसायचे. समाजाच्या भल्यासाठी कुठे ना कुठे तडजोड करण्यात चुक काय आहे ?

नेहमीच ताठर आणि टोकाची भूमिका घेत राहिल्याने समाजाचे प्रश्न कसे सुटतील ? याचा विचार नको का करायला,नीम हकीम पुरोगामी आणि काँग्रेसचे जीवजंतूची खरी पोटदुखी दुसरी तीसरी कांहीही नसून एक सामान्य आमचा लभाना बांधव देशभरातील सर्व गोर बंजारा समाजाला एकत्र करतो आहे.

हेच त्यांना सहन होत नाही.समाजाचे कांही प्रश्न या कुंभद्वारे सुटले तर उद्या त्यांना समाज विचारणार नाही याची भिती त्यांना सतावते आहे. म्हणून पोहरादेवी आडून ते त्यांच्या दुखऱ्या भागावर मलमपट्टी करुन घेण्याचा त्यांचा हा सर्व खटाटोप चाललेला आहे. यांना समाजाची , पोहरादेवीची एवढी काळजी असती तर धर्मांतरसंदर्भात यांची दातखिळी बसली नसती !

तोंड बंद करुन बसण्यासाठी त्यांना कोणाकडून पैसे मिळतात ? जर मिळत नसतील तर ते धर्मांतर प्रकारणाबाबत तोंड का उघडत नाहीत?संत श्री रामरावजी बापू यांचे उत्तराधिकारी श्री बाबुसिंग महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या ऐतिहासिक गोद्री कुंभमुळे पोहरादेवीचे पावित्र्य आणि महत्व कसे काय कमी होणार आहे ? संत रामराव बापूजींच्या निधनानंतर त्यांच्या गादीवर श्री बाबुसिंग महाराज यांची निवड सर्वसंमतीने झालेली आहे.

गोद्री येथे होणारे ऐतिहासिक कुंभ हे संत श्री रामरावजी बापू यांचे उत्तराधिकारी पीठाधीश्वर श्री बाबुसिंग महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.त्यामुळे हा पोहरादेवीचा आणि सर्व महाराज मंडळीचा सन्मान नाही का ? पोहरादेवीचा सन्मान संपूर्ण समाजाचा सन्मान होत नाही का ? पीठाधीश्वर श्री बाबुसिंग महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारे गोद्री कुंभमुळे पोहरादेवीचे पावित्र्य आणि महत्व कसे काय नष्ट होणार आहे ?

हा प्रश्न समाज नासवणाऱ्या प्रवृतीला समाजाने विचारला पाहिजे.समाजाला बदनाम करणाऱ्या या मनोरुग्णानी देश विदेशातून भाडोत्री आणून गोद्री कुंभची बदनामी जरी केली तरीही हा देशभर विखुरलेला समाज एकत्र येऊन आपल्या ऐतिहासिक संस्कृतीचे दर्शन आणि आनंद सोहळा जबरदस्त उत्साहात पार पाडणार आहे, यात कोणतीही शंका नाही. समाज सुज्ञ आहे .

दुष्प्रचार करणाऱ्या विकृत प्रवृतीला तो कोणत्याही परिस्थितीत बळी पडणार नाही हे तेवढेच सत्य आहे.पोहरादेवीचे कांही महाराज या कुंभ आयोजनाच्या प्रचार प्रक्रियेत दिसत नसतील तर त्याचे कारण आयोजक नसून त्यांच्या अंतर्गत असलेला पराकोटीचा वाद आहे. याप्रसंगी येथे त्याची चर्चा करणे उचित नाही.

गोद्री कुंभ कुठल्याही धार्मिक स्थळाचे महत्व कमी करणारे किंवा पावित्र्य नष्ट करणारे अथवा प्रती काशी उभारण्यासाठी नसून समाजाच्या सांस्कृतिक वारशाची जगाला ओळख करुन देण्यासाठी आणि बळजबरीने आणि लालुच दाखवून होणाऱ्या धर्मांतराबाबत समाजाला जागृत करण्यासाठी आहे.म्हणून समाजाने गोद्री कुंभ विरोधात भुंकणाऱ्यांकडे लक्ष न देता प्रचंड संख्येने एकत्र येऊन आपली ताकद दाखवणारच आहे.

हे तेवढेच सत्य आहे.आध्यत्म आणि व्यवहार यांची नेहमीच सांगड घालता येत नाही.म्हणून प्रसंगानुसार ज्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत लिहावे,बोलावे लागते.म्हणून याठिकाणी कांही अभद्र शब्द प्रयोग झालेले आहेत.त्याबद्दल क्षमस्व.

शेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटी व किसान काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांनी काढलेला पिक विमा पूर्णतः मोबदला न मिळाल्यामुळे पिकविमा मिळून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज घेतले भरून…

0

शेगाव तालुका प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव – शेतीचे नुकसान झाल्यानंतरसुध्दा ज्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून पूर्णतः मोबदला मिळाला नसेल अशा शेतकरी बांधवांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लढा उभारण्यात आला आहे.

अन्याय झालेल्या शेतकरी बांधवांना पिक विम्याचा पूर्ण मोबदला मियाळला पाहिजे यासाठी शर्यतीचे प्रयत्न पक्ष करील त्याकरिता अन्याय झालेल्या शेतकरी बांधवांनी पिक विम्याच्या हप्त्याचा भरणा पावतीची झेरॉक्स या ठिकाणी आपल्या कागदोपत्री सोबत माहिती भरून जमा करावी असे आवाहन.

काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. सदर नोंदनी ही छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे राबवण्यात आली.

आपल्या शेतीचे नुकसान झालेले आहे त्याची दक्षता घेऊन शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. शेतकरी बांधवांना पूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वस्त बसणार नाही. असा इशारा पक्षाच्यावतीने देण्यात आला. प्रचंड बहुमताने लढा काँग्रेस पक्षाच्या वतीने उभा करण्यात आलेला आहे.

शेतकरी बांधवांनी या ठिकाणी येऊन आपला अर्ज भरवयाचा आहे.असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष माननीय राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी काढलेल्या पिक विमा पूर्णता मोबदला न मिळाल्याने पिक विमा मिळवून देण्यासाठी शेगाव शहर व तालुका कमिटी व किसान काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पिक विमा अर्ज भरणा नोंदणी करण्यात आली.

यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतिने, प्रांताध्यक्ष मा.आ नानाभाउ पटोले यांच्या सुचनेनुसार तसेच बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष मा.आ राहुलभाउ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात, शेगाव शहर व तालुका काँग्रेस तसेच किसान काँग्रेस च्या वतिने आज पीक विमा संदर्भात शेगाव येथे स्टाॅल लावून ज्या शेतक-यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.

त्यांची माहिती अर्जाच्या माध्यमातून संकलित करताना प्रदेश सचिव रामविजय बुरूंगले, शहराध्यक्ष किरण देशमुख, जिल्हा सरचिटणीस दिपक सलामपुरीया, किसान सेल शहराध्यक्ष प्रकाश शेगोकार, सेवादल तालुकाध्यक्ष अनिल सावळे, बसंत शर्मा, ज्ञानेश्वर शेजोळे, पवन पचेरवाल, दिलीप पटोकार आदी उपस्थित असून सदर स्टाॅल ला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी तर दुसरीकडे तळीरामाची दिवाळी

0

 

शेगाव  प्रतिनिधी इस्माईल

शेगाव तालुक्यामध्ये दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका येणाऱ्या 18 डिसेंबरला जाहीर झाल्या आहेत, त्यामध्ये काल झालेल्या अर्ज छाननी मध्ये मिळालेल्या माहितीनुसार सरपंच पदासाठी तालुक्यातून 47 अर्ज मंजूर झाले आहेत तर सदस्य पदासाठी 128 अर्ज प्राप्त झाले आहेत परंतु आज सात डिसेंबरला काही उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात.

परंतु यामध्ये कोण कोणते उमेदवार बाजी मारतील हे अठरा तारीख लाच समजेल.

निवडून कोणीही येईल परंतु ओल्या पार्ट्याचा उत नक्कीच येईल. आणि त्यामुळेच तळीरामाची दिवाळी नक्की साजरी होईल या चर्चेला उदान आले आहे.