Home Blog Page 232

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजावंडीचे उपक्रमशील शिक्षक एम.सी.बेडके “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित…!

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

एटापल्ली:- गडचिरोली जिल्ह्यात नुकतेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली च्या वतीने जिल्ह्यातील 14 उपक्रमशील आदर्श शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 ला जिल्हा परिषद हायस्कुल गडचिरोली च्या भव्य सभागृहात आयोजित करण्यात आला.

जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्राथमिक विभागातील 12 व माध्यमिक विभागातील 2 असे एकूण 14 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

या पुरस्कार प्राप्त शिक्षकांपैकी श्री.एम,सी,बेडके हे एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजावंडी या शाळेत कार्यरत आहेत.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून शाळा डिजिटल केले व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले.शाळेची पटसंख्या 8 वरून 123 पर्यंत वाढवण्यात त्यांचा सिंहाची वाटा आहे.

एकेकाळी या शाळेत फक्त 8 विद्यार्थी शिक्षण घेत होते,ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती.पण बेडके यांनी अतिशय मेहनत करून या शाळेला पुनरुज्जीवन केले त्यामुळे आता या शाळेत 123 विद्यार्थी या शिक्षणाच्या आनंदवनात शिक्षण घेत आहेत.

अतिशय दुर्गम व नक्षलग्रत भागात पण मूलभूत सोयी सुविधा नसताना सुद्धा या शाळेला शिक्षणाचे आनंदवन तयार केले. या शाळेचे गुणवत्ता व इतर उपक्रमांचे या परिसरात चर्चा आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात 10 पेक्षा जास्त विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून या शाळेत प्रवेश घेतला.

ही पुरस्कार त्यांना मिळाल्याने त्यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली चे आभार मानले.बेडके यांनी पुरस्काराची श्रेय दीपक देवतळे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली,पुरकलवार शिक्षण विस्तार अधिकारी,शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य,शाळेतील शिक्षक,विद्यार्थी व मित्रमंडळी याना दिले आहे.

अकोला जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान दिव्यांगांच्या सर्वेक्षण कार्याची दखल राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान

0

 

Akola प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला,दि. ३ जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करून दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत देशात सर्वोत्तम जिल्ह्याचा मान पटकविणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०२१’ने गौरविण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
दिल्लीतील विज्ञान भवनात आज ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना’निमित्त सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्यावतीने वर्ष २०२१ आणि वर्ष २०२२ च्या ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ.

विरेंद्र सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि श्रीमती प्रतिमा भौमिक उपस्थित होते.
अपंगत्वावर मात करत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देशातील दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य आणि जिल्हा आदींना यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दिव्यांगांच्या सशक्तीकरणाकरिता शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजवाणीसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या श्रेणीत अकोला जिल्हा परिषदेला गौरविण्यात आले.

अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील दिव्यांगव्यक्तींचे सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना सुकर झाले आहे.

सांघिक भावनेने केलेल्या कार्यातूनच अकोला जिल्हा परिषदेने दिव्यांगांचे सर्वेक्षण कार्य पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगिता अधाऊ, मुख्य कार्यकारी सौरभ कटीयार यांच्या नेतृत्वात हे सर्वेक्षण कार्य पार पडले. या कार्यात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सातत्यपूर्व मार्गदर्शन आणि सहकार्य केले. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता व त्यांची टीम, समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आदिंचा यात सहभाग लाभला.

या कार्यक्रमात एकूण १४ श्रेणीत विविध व्यक्ती तसेच शासकीय व अशासकीय संस्थांना
वर्ष २०२१ च्या ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कारा’ने गौरिविण्यात आले. यामध्ये अकोला जिल्हा परिषदेसह महाराष्ट्रातील दोन व्यक्तींचा समावेश आहे…

समाजसेवक श्रीधर रमेश गोपणारायन हे खेकडी, नवथळ आणि परीतवाडा (जिल्हा-अकोला) गावात सरपंच पदाचे उमेदवार

0

 

शेगाव  प्रतिनिधी इस्माईल

सामाजिक कार्यात घेतात सक्रीय सहभाग

अकोला दि.०१ रोजी खेकडी गावचे सुजाण नागरिक म्ह्णून नावलौकिक असलेले श्रीधर रमेश गोपणारायन यांनी थेट जनतेतून सरपंच पदाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज भरून उभे आहेत, त्यांनी गेली १० वर्षे स्वतः आणि त्या अगोदर २५ वर्षे त्यांचे वडील बोधाचार्य रमेश पायरुजी गोपणारायन यांनी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सोबत आई सौ.साधना रमेश गोपणारायन ह्यांनी उपसरपंच पद यशस्वीपणे सांभाळले आहे असा तीनही गावातील लोकांचा विश्वास आहे, आणि यावेळेस जनतेतून सरपंच निवडून द्यायचा असल्याने खेकडी, नवथळ आणि परीतवाडा या गावातील सर्व तरुण, वृद्ध, जाणकार मंडळी तसेच संपूर्ण महिलांना असे प्रामाणिक पाने वाटते आहे की श्रीधर गोपणारायन हेच सरपंच पदासाठी योग्य माणूस आहे.

श्रीधर गोपणारायन हे गावातच नव्हे तर तालुका व अकोला शहरात सामजिक कार्यात सक्रिय असतात, पंचायत समितीच्या माध्यमातून गावातील महिलांना शिलाई मशीन मिळवून देने, शेतकऱ्यांना फवारणी पंप, ताडपत्री मिळवून देणे, शेतकऱ्यांना पीक विमा, बियाणे वाटप या संदर्भात मदत करणे, लहान मुलामुलींच्या आरोग्यासाठी काम करणे, आबालवृद्ध लोकांना योग्य ती मदत मिळवून सेने त्यामध्ये श्रावण बाळ योजना मिळवून देणे, विधवा महिलांना शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देणे अशी कार्य श्रीधर गोपणारायन सातत्याने करीत असतात.

नालंदा बुद्ध विहार समितीला मार्गदर्शन करणे, सर्वधर्म समभाव राखणे, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणे, तंटामुक्ती समितीला सल्ला देणे, गावातला वाद- विवाद गावातच मिटवणे, शेतीचे, जागेचे, रस्त्याचे, पाण्याचे भांडण-तंटा मिटवणे अशी कामे तसेच शासकीय योजना गावात कश्या राबता येतील याकडे श्रीधर गोपणारायन यांकगे संपूर्ण लक्ष केंद्रित असते.

निवडणूकिती विरोधाला विरोध म्हणून जरी उमेदवार उभे असले तरी सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून श्रीधर गोपणारायन हेच खरे तीनही गावाचे प्रतिनिधित्व करु शकतात, व गावाचा योग्य तो विकास करू शकतात अशी संपूर्ण गावकरी मंडळींची पक्की धारण आहे.

खेकडी, नवथळ आणि परीतवाडा या तीनही गावाच्या हक्काचा माणूस म्हणून श्रीधर गोपणारायन यांची घ्याती आहे, आगामी काळात पंचायत समिती तथा जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये श्रीधर गोपणारायन यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त केली जात आहे.

वखारी येथे दिव्यांग दिन साजरा व साहित्याचे वाटप:

0

 

(तुकाराम राठोड,जालना)

जालना तालुक्यातील वखारी ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग दिनानिमित्त १८ लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

सदर महाराष्ट्र शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा म्हणून दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे.

त्यामुळे प्रहार पक्षाचे नेते तथा आमदार बच्चु कडु यांनी यासाठी खूप मेहनत व परिश्रम तसेच लक्षवेधी आंदोलन ही केली आहे.

त्यामुळे अपंग,विधवा,दिनदुबळ्या, गोरगरीब दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे.त्यामुळे आमदार बच्चु कडु यांनी शासनाला वेळोवेळी लक्ष केंद्रित करून दिले आहे.

त्यामुळे या योजनेचे जनक म्हणून बच्चु कडु यांना दिव्यांग बांधवांनी श्रेय दिले आहे.आज वखारी ग्रामपंचायत येथे दिव्यांगदिन साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच काका पाटील घुले,ग्रामसेवक वझरकर साहेब,भारतीय जनता पार्टी अपंग सेल तालुका अध्यक्ष लक्ष्मण राठोड,बाळु वाटोळे,छगन खैरे,भुजंगराव घुले,नामदेव घुले,रघुनाथ घुले,संजय पवार व अन्या गावकरी मंडळी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्या चिमुकल्यांना हवी आहे माणुसकीची सात,समाजातील दानशूर व्यक्तीने पुढे येण्याची गरज असे आवाहन सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

0

 

Jalna (तुकाराम राठोड)

जालना-वाटुर-अधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था जालना या संस्थेमार्फत प्रत्येक वर्षी 05 टिकाणी वीटभट्टी व साखर कारखाना ३ ते ६ वयोगटातील बालकांच्या करीता ( डे – केअर सेंटर) चालविल्या जातात.या वर्षी देखील संस्थेने जालना जिल्हयातील 2 साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊसतोड कामगारांच्या बालकांच्या करीता डे केअर सेंटर सुरु आहेत.

तसेच परतुर मंठा जालना घनसावंगी येथील वीटभट्टी कार्यस्थळावर 08 या टिकाणी डे केअर सेंटर सुरु केले आहेत.यामध्ये ३ ते ६ या वयोगटातील 167 तसेच ६ ते १४ वयोगटातील 584 बालकांना शाळेच्या प्रक्रियेत आणण्याचे काम करीत आहोत.757 बालकांना उबदार कपड्यांची गरज आहे.

सधा खूप थंडी असल्यामुळे थंडीत कुडकुडणाऱ्या वीटभट्टी व उसतोड कामगारांच्या चिमुक्यांना संरक्षण मिळावे.या करीता अधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था जालना संस्थेमार्फत जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था,शैक्षणिक संस्था,पदाधिकारी इत्यादी.वीटभट्टी व ऊसतोड कामगारांच्या मुलांकरीता थंडीत कुडकुडणाऱ्या जीवांना कपड्याच्या माध्यमातून माणुसकीची उब देण्यासाठी अधार संस्था आपल्याला आवाहन करीत आहेत.

या उपक्रमात सहभागी होवून उबदार कपडे,स्वेटर,ब्लॅकेट,शैक्षणिक सहित्य स्वरुपात अधार संस्था वाटुर मो.9421327814/8888853624 या वर संपर्क करूण अपन मदत करू शकतात.तसेच संकलीत झालेले स्वेटर,ब्लॅकेटस शैक्षणिक सहित्य जालना,जिल्ह्यातील वीटभट्टी व ऊसतोड कामगारांच्या 757 बालकांना वाटप करण्यात येणार आहे.

वीटभट्टी ऊसतोड कामगारांच्या कुंटूंबाना ब्लॅकेटस वाटप करण्यात येणार आहे.या सामाजिक कार्यात आपला देखील सहभाग हवा आहे.या कार्यक्रमाचे संयोजक पोग्राम ऑफिसर राजेश राउत,सुरेश बच्छीरे,एकनाथ किटाळे,विठ्ठल सुभेदार,सचिन चव्हाण,राजेश वाघमारे,चंदु कवळे व सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊन बालकाना उब देऊ शैक्षणिक सहित्य व समुपदेशन करूण शैक्षणिक प्रवाहात आण्यासाठी प्रयत्न केली जाणार आहे.

श्रीमती अनिता राऊत अध्यक्ष अधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था जालना.चला तर आपण देखील सहभाग व्हा…..🙏🏻

बाळापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ दुकानाचे शटर तोडून चोरी करणारे चोरट्यांना केले जेरबंद

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

निंबा फाटा येथे व्यापारी फिर्यादी प्रशांत गुलाबराव ठाकरे रा. मालवाडा यांनी दिनांक 22 11 2022 रोजी पोस्टला येऊन तक्रार दिली की त्यांचे निंबा फाटा येथील कृषी केंद्र दुकान अज्ञात चोरट्यांनी रात्री दरम्यान शटर वाकून दुकानातील नगदी 10,000/- रुपये चोरून नेले व तसेच माझे दुकान समोरील व्यापारी देवानंद अशोकराव पाथरिकर राहणार निंबा फाटा यांचे दुकानातील शटर वाकून वरील अज्ञात चोरट्यांनी नगदी 8000/- रुपये अशी दोन्ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 461,380 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला.ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांचे मार्गदर्शन तपास पथक तयार करून तात्काळ निंबा फाटा व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून व तांत्रिक साधनाचा वापर करून सदर आरोपींना काही दिवसातच छडा लावून संशयित आरोपींना नागपूर येथून ताब्यात घेतले आरोपी 1) धनंजय उर्फ चींना रामकृष्ण अप्पा रेड्डी वय 46 राहणार मगाल क्वाटर विकलांग क्वाटर इंदापूर रोड कादरी जिल्हा पटूपर्थी राज्य आंध्र प्रदेश,2) फरहान अहमद अब्दुल गफार वय 27 रा. इंदिरानगर कापूसतळणी तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती ह.मू. हैदराबाद यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यामध्ये अजून एक साथीदार शेख अन्सार शेख कयूम रा. अमरावती हा असल्याचे सांगितले आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून मुद्देमाल जप्त करून आरोपी पोलीस स्टेशन उरळ पोलीस कस्टडी मध्ये असून पुढील तपास कार्यवाही सुरू आहे. कार्यवाही करणारे तपास पथक, ठाणेदार अनंतराव वडतकर, पोलीस अंमलदार संतोष भोजने, अनिल येनेवार, रवी हिंगणे, हरिहर इंगळे, शैलेश घुगे, कांताराम तांबडे यांनी कार्यवाही केली.

जागतिक “दिव्यांग दिनानिमित्त” गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने शहरात रॅली आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन.

0
  •                                                                             अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-समग्र शिक्षा जिल्हा परिषद गडचिरोली,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली आणि गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा चामोर्शी येथील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वृंद,शाळेतील सर्व विद्यार्थी-पालक,युवक, शहरातील नागरिक,गट समन्वयक तथा केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे,समावेशीत शिक्षण विशेषतज्ञ सुशील गजघाटे,संसाधन शिक्षक दशरथ गहाणे,जीवन शेट्टे,हिमदेव पिपरे,उमेश पोहाणे,रवी खेवले,कु मेघा कोहपरे,कु रिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चामोर्शी शहरातून वाजत-गाजत “जागतिक दिव्यांग दिवस” मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
तसेच ३ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत गट साधन केंद्राच्या वतीने चामोर्शी तालुक्यात “दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी” विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आणि उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

Gram Panchayat यावल तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी 41 तर सदस्य पदासाठी 223 अर्ज दाखल

0

 

Yaval वीकी वानखेडे

यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह २९ प्रभागातील ७८ सदस्य निवडीसाठी १८ डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी गुरुवारपर्यंत सरपंच पदासाठी ४१ तर सदस्य पदासाठी २२३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

आज शुक्रवार दि. २ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी आज अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

यावल तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या न्हावी प्र यावल, चुंचाळे, पिळोदे बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द, चिखली बुद्रुक, कासारखेडे, चितोडा या आठ गावांसाठी आठ सरपंच पदासह २९ प्रभागातील ७८ सदस्य निवडीसाठी १८ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम दोन दिवस असताना गुरुवारी येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी उसळली होती.

सरपंच पदासाठी आज दि. २ डिसेंबर हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी एकुण ४१ अर्ज तर ग्राम पंचायत सदस्य पदासाठी २२३ अर्ज दाखल झाले आहेत. आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने यावलच्या तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची व त्यांच्या गावातील कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळली होती.

यावल तालुक्यातील या आठ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका भुसंपादन विभागाच्या अधिकारी शुभांगी भारदे , फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आठ निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन कार्यभार सांभाळत आहे.

मानधनिया दालमीलच्या डाळीच्या हौदात बालकामगाराचा अपघाती मृत्यू

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट, दि. 3 डिसेंबर
कडाजना शिवारातील मानधनीया दालमिल मध्ये काम सुरू असताना डाळीच्या हौदात एका बालकामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मृत्यूनंतर दालमिल मालकाने घटनेची पोलिसांना सूचना न देताच बाल कामगार प्रभास कुमार यादव वय 16 वर्ष याचा मृतदेह त्याच दाल मिल मध्ये कामकरणाऱ्या भावाचे मदतीने हिंगणघाट येथिल स्मशानभूमीत जाळण्यात आला.

सदर घटना 30 नोव्हेंबर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. त्याचे दिल्ली येथिल आते भावाने पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केल्यावर या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून कंपनीचा संचालक सौरभ मानधनीया फरार झाला आहे.

कंपनी ही मानधनिया परिवारातील एका महिलेच्या नावावर असून मुलगा सौरभ हा कंपनीचे कामकाज सांभाळतो. मृतक प्रभासकुमार यादव हा बिहार राज्यातील अमृतनगर (दरभंगा) येथील १६ वर्षीय अल्पवयीन बाल कामगार आहे. हिंगणघाट येथे मानधनीया दाल मिल मध्ये कार्यरत होता.

गेल्या काही महिन्यांपासून कामकरणाऱ्या या कामगाराने नेहमीप्रमाणे आपले काम बुधवारी सुरू केले. रात्री ९ वाजताच्या सुमारास मानधनीया दालमील मधील डाळीच्या हौदात उतरला. याच हौदातील डाळ बाहेर निघणाऱ्या आऊटलेटमध्ये तो अडकला. तर याच हौदात वरून पडणारी डाळ त्याच्या अंगावर पडत राहिली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेने हादरलेल्या दालमिल मालकाने मात्र त्याच्या परगावी असणाऱ्या नातेवाईकाला पूर्व सूचना दिली नाही, पोलिसांना देखील
याबाबत माहिती दिली गेली नाही.कंत्राटदार व कामगारांच्या मदतीने त्याचे कामगार असलेल्या भावावरती दबाव आणून मृतक प्रभासचा मृतदेह जाळण्यात आला.

सर्वकाही संपल्यानंतर त्याच्या भावाने घटनेची माहिती परप्रांतातील कुटुंबियांना दिली. नंतर दिल्ली येथील नातेवाईकाने पोलिसात तक्रार करताच घडलेले सर्वप्रकरण समोर आले आहे.

या प्रकरणाने सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून बालकामगार हा विषय हाताळणाऱ्या कामगार अधिकारी कार्यालयावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हिंगणघाट पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे नोंद केले असून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यामध्ये कंत्राटदार अजितकुमार यादव, कामगार अशोक ऊरिया, सुपरवायझर दिलीप असलकर यांचा समावेश आहे. तर या कंपनीचा मालक तसेच कंपनी मॅनेजर मात्र फरार झाला आहे.

Wardha News

वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुका व शहरच्या वतीने जगदीश गायकवाडचा जाहीर निषेध ‌

0

 

प्रतिनिधी शेगाव  इस्माईल

शेगाव येथील वंचित बहुजन आघाडी व महिला आघाडीच्या वतीने पनवेल येथील जगदीश गायकवाड लागतात करा असे निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेब यांना शेगाव तहसीलदार साहेब यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दादारावजी अंभोरे शेगाव शहर अध्यक्ष प्रवीण जी ब्रो बोदडे शेगाव शहर सचिव आशिष खंडेराव खंडेराव महिला आघाडी संगीता ससाने तसेच आकाश चोपडे दीपक इंगळे रामदास सुरळकर प्रवीण विरघट उदय सुरवाडे दीपक इंगळे मोहन कराळे राहुल सुरवाडे आशिष शेगोकार कैलास दाभाडे रामेश्वर शिरसाट मोदराची समदूर शैलेश गवळी दिलीप वाकोडे जोगेंद्र पहुरकर अभी मान्यवर कार्यकर्ते हजर होते