Home Blog Page 233

गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई जिल्यातील चोरीच्या मोटरसायकल व मोबाईल हस्तगत

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- दि.05 डिसेंबर रात्री 8 वा. सुमारास फिर्यादी हा झाशी राणी चौक, हिंगणघाट येथुन पायदळ फोनवर बोलत जात असतांना दोन अज्ञात मोटरसायकल वरील इसम फिर्यादीचे मागुन येवुन त्याचे हातातील मोबाईल जबरीने हिसकावुन घेवुन गेल्याचे फिर्यादीचे पो स्टे ला दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून अपराध क्र. 1280/2022 कलम 392, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला .

हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे। पथक प्रमुख पो.हवा, शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन आरोपी व मोबाईलबाबत शोध घेतला असता सदर गुन्हयातील जबरीने हिसकावुन नेलेला मोबाईल हा निशानपुरा वार्ड, हिंगणघाट येथे राहणारे गौरव श्रीधर वाघमारे व विधि संघर्षीत बालक दोन्ही रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट यांनी हिसकावुन नेल्याची माहिती वरून त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली.

असता त्यांनी सदरची जबरी चोरी केल्याचे कबुली दिली असुन त्यांचे कडुन एक विवो कंपनीचा अन्ड्राईड मोबाईल व गुन्हा करण्या करीता वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो. सा. क्र. एमएच-34/ क्यु- 4358 असा आरोपी व वि.सं.बा. यांचे ताब्यातून जप्त करून आरोपी गौरव वाघमारे यास अटक केली.

सदर गुन्हयातील आरोपी गौरव वाघमारे याची पोलीस कोठडी घेतली असता, त्यास जबरी चोरी करीता वापरलेल्या वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने ते वाहन पो.स्टे. गिरड हद्दीतील कोरा गावातून चोरल्याची कबुली दिली तसेच त्याने त्याचे दोन विधी संघर्षीत बालकासह जिल्यातील व बाहेर जिल्यातील विविध प्रकारच्या 7 मोटसायकल व 2 मोबाईल चोरल्याचे कबुली दिली. आरोपी गौरव वाघमारे याचेकडुन 7 मोटरसायकल, सदर गुन्यात जबरीने चोरलेला एक मोबाईल व इतर दोन चोरलेले मोबाईल असा एकूण किमंत 1,93,000 / रु. चा माल जप्त करण्यात आला.

सदरची कामगीरी मा. श्री. नूरूल हसन, पोलीस अधीक्षक, मा. श्री. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलाश पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पोउपनि सोमनाथ टापरे डि. बी. पथकाचे पो. हवा. शेखर डोंगरे, नापोशि निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर व पो.शि. संतोष गिते व सायबर पोस्टे चे नापोशि दिनेश बोथकर यानी केली आहे.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा !!

0

 

Jalna(तुकाराम राठोड)

जालना-भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवेsantosh Danve यांच्या वाढदिवसानिमित्त जालना हॉस्पिटल येथे मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोफत शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जालना हॉस्पिटल येथे करण्यात येत आहे.तरी आपणास विनंती की आपण या उद्घाटनास आवर्जून उपस्थित रहावे.

भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील बंधू आणि माता-भगिनींसाठी दिनांक १० ते १५ डिसेंबर या पंधरवड्यात मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या मोफत शिबिराचा गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा.

आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी,असे आपणास आवाहन!आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जालना नगरपालिकेवर धडक मोर्चा:

0

 

Latur (तुकाराम राठोड)

जालना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जालना नगरपालिकेवर आज विविध प्रश्न संदर्भात मोर्चा काढण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष रवी भैया राऊत,शहराध्यक्ष राजू जगताप,शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे,महिला शहराध्यक्ष वंदनाताई खांडेभराड,माजी नगरसेवक रोहित बनवसकर,कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन कणसे,मनसे जिल्हा सचिव विलास तिकडे,कामगार सेनेचे सचिव राम पाटोळे,विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष महेश नागवे,बाळू काळे,सोमनाथ कदम,विनायक जाधव,पवन फते,लष्करी अमर लहाने,अधिक पदाधिकारी उपस्थिती होते.

शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३मध्ये होईल १५ डिसेंबर पर्यंत सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांना सहभागी करावे यावल तालुका पंचायत समितीचे आव्हाहन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

शिष्यवृत्ती परीक्षा या येत्या वर्षातील फेब्रुवारी २०२३ मध्ये होणार असून, विद्यार्थ्यांना परीक्षेचे आवेदन पत्र भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२२हे असून सर्व मुख्याध्यापक यांनी आपले.

शाळेतील पाचवी व आठवीचे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाण मध्ये परीक्षेत सहभागी व्हावे असे आवाहन यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातीत जिल्हा परिषद शाळेमधील पाचवी आणि आठवीचे वर्गाची संपुर्ण विद्यार्थ्यांची फी जिल्हा परिषद शेष फंडातून भरणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांकडुन मिळाली.

आहे. यावल तालुक्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये पालकांशी संपर्क साधून शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेत समाविष्ठ करावे,

राज्यात मागील दोन वर्षांमध्ये या परिक्षेत कोरोना संसर्गाचे गोंधळलेले काळ असल्यामुळे जास्त प्रमाणात विद्यार्थी बसू शकलेले नाही मात्र

यावर्षी शिक्षण विभागाच्या माध्यमातुन यंदा जून पासून अभ्यासक्रम आपण सातत्याने राबत असून निपुण चाचणीचे नियमित आपण मूल्यमापन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढलेली आहे.

या वेळी शैक्षणीक गुणवत्ता साध्य होण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त परीक्षेत आपण बसवावे जेणेकरून यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा पुर्वची तयारी विद्यार्थ्यांची होईल या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये न्यू दंड निर्माण होण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.

यासाठी आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा या परीक्षेत सहभाग घ्यावे यासाठी गटशिक्षण अधिकारी या साठी मोठे परिश्रम घेत आहे . विद्यार्थ्यांनी मोठया संख्येत परिक्षेत बसावे असे आवाहान यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईमुद्दीन शेख यांनी केली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे हजारो नागरिकांनी घेतले दर्शन

0

 

अमरावती:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिन रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे मित्र परिवारातर्फे अमरावती शहरातील जनतेच्या दर्शनासाठी वटफळी येथून भंतेजी सुमित बोधी महाथेरो व भन्तेजी प्रज्ञा बोधि महाथेरो आणि भिकू संघाच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश सर्वप्रथम बुद्ध टेकडी 500 क्वार्टर या ठिकाणी आले.

व त्या ठिकाणी हजारो नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले तेथून ही असती कलश वडाळी येथील जनतेच्या दर्शनासाठी प्रत्येक विहारात घेण्यात आले व दुपारी एक वाजता ही असती कलश बडनेर येथील समता चौक या ठिकाणी देण्यात आले या ठिकाणी सुद्धा हजारो नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन पुण्यानुमोदन केले.

बडनेर येथे मनोज भाऊ गजबे उमेश भाऊ मेश्राम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सायंकाळी सहा वाजता अस्थि कलश भीम टेकडी या ठिकाणी आले व या ठिकाणी सुद्धा हजारो नागरिकांनी दर्शन घेतले व सायंकाळी साडेसात वाजता हे अस्थि कलश वटफळी या ठिकाणी रवाना झाले.

या अभिवादन कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बुद्ध टेकडी मित्र मंडळ वडाळी येथील संपूर्ण नागरिक बडनेरा येथील संपूर्ण नागरिक व प्रभाग क्रमांक 27 संजय गांधी नगर उत्तम नगर पंचशील नगर कैलास नगर बेनोडा महादेव खोरी शांतीनगर जेवण नगर येथील हजारो नागरिकांनी रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी कलश अमरावती शहरातील जनतेच्या दर्शनासाठी आणण्यासाठी मदत केली.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी(दि.१४) रोजगार मेळावा

0

Akola प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला,दि.८(जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मे. सुझुकी मोटर्स, गुजरात प्रा.जि. यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,

अकोला येथे बुधवार दि. १४ रोजी विविध पदाकरीता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, डीझेल मॅकेनिक, पेन्टर जनरल, मशिनिस्ट, मोटार मेकॅनिक, टुल ॲन्ड डायमेकर, पी.पी.ओ., ट्रॅक्टर मेकॅनिक,

सि.ओ.ई.ऑटोमोबाईल या व्यवसायातील आयटीआय उत्तिर्ण प्रशिक्षाणार्थ्यांना कंपनीमार्फत रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

तसेच अधिक माहितीकरीता मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे अंशकालीन प्राचार्य यांनी केले आहे.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम

0

 

२८ बालकांना हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता;
पहिल्या टप्प्यात ११ बालकांना घेऊन पथक मुंबईकडे

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला,दि. ८ (जिमाका)-राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत बालकांच्या आरोग्याची तपासणी व तपासणी निदानानंतर आवश्यकतेनुसार उपचार केले जातात.

या अंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक निदानानंतर ७६ बालकांची तपासणी हृदय संबंधिता आजारांसाठी करण्यात आली. त्यात २८ बालकांना हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आता शस्त्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात ११ बालकांना घेऊन आज जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे पथक मुंबई येथे रवाना झाले.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातून विशेष बसने हे पथक बालकांना घेऊन रवाना झाले. बालकांसमवेत त्यांचे पालकही असणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना हाढोळे तसेच अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात शाळा तपासणीत हृदयरोगाशी संबंधित जटीलतेची लक्षणे दिसून आलेल्या ७६ बालकांची दि.१६ ऑक्टोबर रोजी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात टु डी इको चाचणी करण्यात आली. या चा

कॉंग्रेस कार्यकर्त्यानी साजरा केला श्रीमती सोनिया गांधी यांचा वाढदिवस

0

 

गुड्डू कुरेशी सिंदी रेल्वे

सिंदी रेल्वे दि. 9/12/22 रोज शुक्रवार रोजी गांधी चौक येथे समस्त काँग्रेस पदअधिकारी व करकर्ते तसेच गावातील सन्मानीय गावकरी यांनी श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी चौकत मिठाई वाटून गोड तोंड करून वाढदिवस साजरा केला

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगदिश बोरकुटे यांनी सोनिया गांधी यांच्या कार्यकिर्तीत केलेल्या कमा बद्दल कौतुक केले व यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दिल्या तसेच मनोगत श्री गजानन खंडाळे यांनी व्यक्त केल्या.

आणी सिंदी शहरातील कॉंग्रेस पक्ष कसा मजबूत होईल याबद्दल आपले विचार व्यक्त केले तसेच आभार प्रदर्शन अजय कलोडे यांनी केले.

कार्यक्रमला श्री रवी वाघमारे अजय क्लोडे सचिन लांबट संजय तडस अतुल ठाकरे रवी राणा दिलीप बदवाईक दीपक अग्रवाल वैभव कुकुटकर प्रवीण वाघमारे भगत बाबरे सुधीर झीलपे आदी उपस्थित होते

हिंगणघाट पुरग्रस्त आरक्षित जागेवर भुमीपुजन शिवसेनेकडून कार्यक्रमावर आक्षेप ?

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखा हिंगणघाट जिल्हा वर्धा या पक्षाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब वर्धा , मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना निवेदनातून आक्षेप घेण्यात आला.

की, सन 1983 साली वणा नदीला महाभयंकर पुर आला असल्यामुळे नदीपात्रा जवळची लोकवस्ती ही पुराच्या पाण्याखाली गेली. त्यामध्ये नागरीकांची घरे बुडाली असल्यामुळे खुप मोठे आर्थिक नुकसान झाले. तत्कालीन सरकार मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आदेश देवून त्या सर्व पुरग्रस्त (पिडीतांना) खुल्या शासकीय जागेवर सदनिका बांधून दिल्या तर काही नागरीकांना पट्टे देवून प्रस्थापित केले.

सदर ठिकाणी विकासाच्या दृष्टीकोणातून रस्ते, नाली, गडर लाईन, मैदाने तथा बगीचा करीता जागा आरक्षीत करण्यात आली.
शहरातील संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्र. 6 येथील नागरीकांनी आम्हाला निवेदन देवून अवगत केले.

पुरपिडीत कॉलनी करीता भुखंड क्र. 70 हा बगीचा व मैदाना करीता आरक्षित केलेली जागेवर त्यांची मुले खेळण्या व फिरण्या करीता वापरात होती. परंतू काही वर्षापुर्वी सदर जागेवर अतिक्रमण करून काही विशिष्ट समुहातील लोकवस्ती तयार झाली.

त्याकरीता तेथील नागरीकांनी अतिक्रमण काढण्याकरीता मा. खासदार साहेब, मा. आमदार साहेब, मा. उपविभागीय अधिकारी, मा. तहसिलदार, मा. मुख्याधिकारी, नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले. परंतू आमदाराचे पाठबळ असल्यामुळे अजुनपर्यंत सदर ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले नाही किंवा कुठलीही कार्यवाही झाली नाही.

दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी मात्र ना. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा मा. खासदार, मा. आमदार यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढले तर नाहीच.

परंतू उर्वरीत त्या आरक्षित जागेवर महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत जिल्हा वार्षिक योजने मधून त्या ठिकाणी नगर परिषद, उपविभागीय अधिकारी महसुल यांची कुठलीही ना हरकत प्रमाणपत्र न घेता त्या ठिकाणी वर्धिनी केंद्राचे भुमीपुजन करून राजकीय दबाव टाकुण सदर आरक्षित जागा बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा विषय निंदनिय व निषेधार्थ आहे.

तरी आपण त्या जागेसंबंधी माहिती घेवून त्या ठिकाणी पुरपिडीत नागरीकांना त्यांच्या मुलाबाळांना खेळण्या व फिरण्याकरीता आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढून योग्य न्याय द्यावा. असे आपणांस या निवेदनात विनंती करतो.

जर या विषयावर कुठलीही कार्यवाही झाली नाही तर शिवसेना तेथील नागरीकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरेल तसेच उग्र आंदोलन सुध्दा करण्यात येईल.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा हिंगणघाट च्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा च्या वतीने वसंत सभागृहामध्ये जगनाडे महाराजांची 398 जयंती साजरी व भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कडून करण्यात आले .संतांना कुठली जात नसते धर्म नसते मानव कल्याणासाठी संत कार्य करीत असतात त्यांचे विचार अंगीकृत करणे हाच खरा माणूस धर्म आहे महाराष्ट्र संतांची भूमी आहे संताचे विचार साहित्य प्रेरणादायी आहे संतांनी कोणत्याही एका समाजापुरते आपले कार्य केले नसून संताचे कार्य हे संपूर्ण मानवजाती साठी आहे

संत तुकारामाचे सानिध्यात राहून संताजी महाराजांनी सुद्धा आपले अभंग रचले समाजाच्या दांभिकतेवर अंधश्रध्देवर टिका करून समाजाच्या अंधश्रद्धा दूर केल्या भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता जगनाडे महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा लेखणी बंद करून समाजापर्यंत पोहोचवली हे त्याचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले.

त्यात निमित्याने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाज यांनी संताजी जयंती साजरी करत भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले ह्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ माधुरी विहीरकर यांनी केले याप्रसंगी गिरीधर काचोळे यांनी स्वरचित संताजीचरित अभंगाचे.

गायन केले. कार्यक्रमाचे आभार जगदीश वांदीले यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ.माया चाफले ,महेश घुमड़े, प्रा. डॉ.राजू निखाडे प्रा डॉ. शरद विहीरकर राजेंद्र इखार ,सचिन येवले, अनिता गुंडे सुरेश गुंडे आदींनी सहकार्य केले.