Home Blog Page 233

मा.श्री.अशोक(आण्णा)पांगारकर विनम्र,अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

0

 

Jalna (तुकाराम राठोड,जालना)

जालना-सर्वांचे लाडके अशोक(आण्णा)पांगारकर भारतीय जनता पक्षाचे ओ.बी.सी.सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,जालना नगर परिषदेतील गटनेते,भाग्य नगर वॉर्डाचे नगरसेवक! भारतीय जनता पार्टीचे उदयोन्मुख लोकाभिमुख नेतृत्व.विविध सामाजिक व राजकीय पदावर काम करणारे अशोक आण्णा आज सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.भारदस्त उंची देहयष्टी,सदा हसतमुख चेहरा,बोलण्यातील गोडवा व वागण्यातील साधेपणा यामुळे पहिल्याच भेटीत प्रत्येकाला आण्णा आपलंसं करून घेतात.

कमी वयात एवढ्या उंचीवर जाऊनही त्यांच्यातील विनम्रता कुठेही कमी झालेली नाही.वॉर्डाच्या,शहराच्या समस्यांची बारकाईने माहिती घेणे व ते प्रश्न सोडविण्यासाठी लगेच प्रतिसाद देणं हि आण्णांची खासियत आहे.विकासाची ब्लू प्रिंट तयार ठेऊन त्यावर अमल करणारा हा तरुण नेता आज प्रगतीचे एक एक शिखर काबीज करत आहे।राजकारणातील अनेक चढउतार पाहिलेल्या दिग्गज लोकांसोबत काम करणं;त्यांच्या पसंतीस उतरणं आणि त्यातून लोकांची विधायक कामे करणे ही सोपी गोष्ट नाही.यासोबतच सर्व राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांसोबत असलेले त्यांचे मैत्रीचे संबंध हि आण्णांची खासियत आहे.एका वैभवशाली आणि समृद्ध परिवाराचा वारसा पुढे नेटाने आणि डौलाने चालविणारे आण्णा आपल्या कुटुंबाचं भूषण आहे.उद्योग व्यवसायात असलेली त्यांची दूरदृष्टी आज त्यांनी जे उद्योग उभे केले आहेत,त्यावरून दिसून येते.

अनेक तरुण आणि सुशिक्षित बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलद्ध करून दिले आहेत.वृक्षारोपण,रोपवाटप,फळवाटप,गरजूना अन्नवाटप,रक्तदान शिबिराचे आयोजन,समाज मेळावा असे अनेक लक्षवेधी काम आण्णांच्या हातून झाले आहे.सध्या ते करत असलेले सर्वात मोठे काम म्हणजे मुक्तेश्वर तलाव व मंदिर परिसर सुशोभीकरण ! आज जालना शहराच्या वैभवात भर टाकणारा हा प्रकल्प पहिला की मन खूप प्रसन्न होते.संपूर्ण जालना शहराचे हा प्रकल्प आज वैभव ठरत आहे.

या बरोबरच ईतर सर्वच आघाड्यावर यशस्वीपणे काम करणं सोपं नाही.पण हे सर्व आण्णा तुम्ही तुमच्यातील अंगभूत गुणांनी साध्य केले आहे.आज वाढदिवसानिमित्त आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो व एक दिवस आपण जालना शहराचं नेतृत्व करताना आम्हाला पाहावयास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

पुनश्च आपणास लाख लाख शुभेच्छा!
शुभेच्छुक-तुकाराम राठोड,शिवाजी राठोड,राजू राठोड,लक्ष्मण राठोड,विष्णू राठोड,छबुराव राठोड,नितीन पवार,रमेश पवार,गोरख जाधव,संजय रंधवे,सचिन चव्हाण,भिमराव चव्हाण,सुभाष चव्हाण,शामराव पवार व भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा.

मुक्काम आंदोलनाची सुरुवात करतातच महावितरणने दिले ट्रान्सफॉर्म ….!

0

 

जळगाव जा.:- महावितरण कार्यालय जळगाव जामोद येथे जळालेले ट्रान्सफॉर्म तात्काळ २ दिवसांमध्ये दुरुस्ती करून द्या ही मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील व वडशिंगी,पाटण,तरोडा या गावातील शेतकऱ्यांनी केली होती.

त्याचे कारण असे की यावर्षी शेतकऱ्यांनी हरभरा,गहू,कांदा व इतर काही पिकाची लागवड चालू केलेली आहे. ज्या शेतकऱ्याकडे बोर,वीर आहे अशा शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यायला चालू केलेले होते.

परंतु अचानकपणे तरोडा शिवारातील डीपी व पाटण शिवारातील (बेंद्रे) डीपी ही पंधरा दिवसाच्या अगोदर जळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी द्यायची अडचन निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेले पिके सुकू लागले होते.

महावितरण कडे जळालेल्या डीपीची तक्रार करून व बिलाचे पैसे भरून सुद्धा पंधरा दिवसांपासून अधिकारी केवळ आणि केवळ वेळ मारुण द्यायचे.

तरोडा येथील शेतकरी व वडशिंगी येथील शेतकऱ्यांनी अक्षय पाटील यांना सांगितले असता आज दिनांक २ डिसेंबरला महावितरण कार्यालय जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांच्या वतीने ट्रान्सफॉर्म तात्काळ मिळावे याकरता मुक्काम आंदोलन ठेवले होते.

शेतकऱ्यांनी मुक्काम आंदोलनाची सुरुवात करतातच दोन्ही गावातील शेतकऱ्यांना तात्काळ ट्रान्सफॉर्म उपलब्ध करून दिले.

बाळापूर तालुक्यातील जानोरी मेळ येथील कोळी समाजातील बांधव ओबीसी समाजातील बांधव यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जी लेंडवे साहेब व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व बाळापूर पंचायत समिती सभापती सोनटक्के साहेब मंगेश गवळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जानोरीमेड येथील नागरिकांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पंचायत समिती बाळापुर मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला या कार्यक्रमाला युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप भाऊ वानखडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील साहेब पंचायत समिती सदस्य गजानन उगले साहेब माजी सभापती पती मंगेश गवई सादिक भाई गुलाबरावजी उमाळे नागेश शिरसाठ उमेश कवर उमेश इंगळे श्यामला लोध नाजुकराव इंगळे प्राध्यापक भोजने सर रामकृष्ण सोनटक्के बाबाराव जी बागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते या ओबीसी समाज बांधव व कोळी बांधव जगन्नाथ पाटील काळे शिवहरी मस्के प्रतिभा मनोज मस्के संदीप मस्के निलेश मस्के सोनू मस्के इत्यादींनी जाहीर प्रवेश केला तसेच या कार्यक्रमाला चांदोरी मिळेल येथील नागरिक पत्रकार देवराव पर घर मोर सरपंच प्रवीण परघर मोर देविदास हिवराडे सुरेश पर घर मोर ओम प्रकाश परघर मोर बाळूभाऊ पगार मोर राजकुमार परघर मोर अमरदीप परघर मोर मेघराज पर्भर मोर गौतम हिवराळे गौतम वानखडे गौतम पगार मोर दीपक पडघमोर नाशिकराव पर्घ मोर रवींद्र शेगोकार रमेश शेगोकार इत्यादी मंडळी उपस्थित

मौजपुरी,सेवली,रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गोरगरिबांना मिळत नाही न्याय,पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे,पोलीस निरीक्षकांना आवर कधी घालणार?

0

 

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील निरखेडा येथील ज्ञानेश्वर हरिश्चंद्र राठोड यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,दि.२७/११/२०२२ रोजी रात्री ९:३० वाजता गावातून घरी जात असताना,तांड्यातील चार ते पाच जणांनी मिळून मला मारहाण केली आहे.हि घटना दि.१५/११/२०२२ रोजी दुपारी चार ते पाच वाजे दरम्यान निरखेडा तांडा येथे घडली आहे.मिळालेली माहिती अशी की,ज्ञानेश्वर राठोड हे नेहमीप्रमाणे गावातून तांड्याकडे नेहमीप्रमाणे जात असताना,रस्त्यावर तांड्यातील दोन व्यक्ती ची भेट झाली.व ते म्हणाले की,मला तुम्ही माझ्या मागच्या भांडणात का मदत केली नाही.असे म्हणून मला दोघांनी शिवगाळ करून चापटबुक्यांनी मारण केली.यावेळी मी सदर घटनेची तक्रार मौजपुरी पोलीस स्टेशन ला दि.१५/११/२०२२ रोजी दिली आहे.तसेच सदर घटने संदर्भात मौजपुरी पोलीस स्टेशन येथे एनसी क्रमांक ५०२/२०२२ तक्रारीची नोंद केली आहे.तसेच आतापर्यंत कुठल्याच प्रकारची दखल पोलीस प्रशासनाने घेतलेली नाही.वारंवार ज्ञानेश्वर राठोड हे मौजपुरी पोलिसांना जाऊन गाडीची नुकसान झाल्या संदर्भात विचारणा करत आहे.पण कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यामार्फत मिळत नाही.मग गोरगरिबांना न्याय कधी मिळणार हा आमचा सवाल आहे.मग पोलीस प्रशासन करत आहे काय?,त्यांची गरज कशासाठी हा मोठा एक्स प्रश्न आहे.या सदर गोष्टीचा राग मनात धरून त्यांनी दि.२७/११/२०२२ रोजी ज्ञानेश्वर राठोड यांच्या मालकीची घरासमोर असलेली मोटर सायकल एचएफ डीलक्स घरासमोरून घेऊन गेले व मोटारसायकलची तोडफोड व नुकसान केली आहे.तसेच सदर गाडीची नुकसान करण्या अगोदर मी त्यांना माझी गाडी परत करा म्हणन सांगितली होते.त्यांनी मला सांगितले की तुला काय करायचे ते करून घे व आमचे कुणीही वाकडे करू शकत नाही.व पोलीस प्रशासन आमच्या खिशात आहे.अशा प्रकारच्या दम दिला.अशा प्रकारच्या धमक्या देऊन ते तेथुन निघुन गेले.या बाबत मी मौजपुरी पोलीस स्टेशन येथील पोलिसांना माहिती दिली.तरी पण अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालावा व अशा मंजुर लोकांना कायद्याचा धाक राहिलेले नाही.त्यामुळे मौजपुरी,रामनगर आणि सेवली परिसरात नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सर्व निर्माण होत आहे.तरी,पण आपले पोलीस अधिकारी,कर्मचारी कुठलीही प्रकारची चौकशी करत नाही व गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे.याला न्याय म्हणता येईल का? तसेच पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल सुद्धा कुणी घेत नाही.व गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत आणी मुग गिळून गप्प आहेत.याकडे सुद्धा आपण गांभीर्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे.तसेच सदर परिसरातील ठिकाणी गोरगरीब,वंचित,मागासवर्गीय घटकावर वारंवार अन्याय-अत्याचाराच्या घटनेमुळे परिसर हादरला आहे.तसेच पण गुन्हेगारीच्या घटना मौजपुरी,रामनगर व सेवली सर्कलमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यामुळे आपण याला आळा घालावा.तसेच ज्ञानेश्वर राठोड यांनी दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन न्याय द्यावा.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही ज्ञानेश्वर राठोड यांनी पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

यावल पंचायत समितीतील ग्रामीण पाणीटंचाई विभागाचे रविन्द्र देशमुख यांची तिन दशकांतर जामनेर येथे बदली

0

 

Yaval यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पंचायत समितीच्या पाणी टंचाई विभागात गेली तिन दशकापासुन सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी रविन्द्र प्रल्हाद देशमुख यांची जामनेर पंचायत समिती येथे बदली झाली आहे . रविन्द्र प्रल्हाद देशमुख हे मुळ हिवरखेडा तालुका जामनेर येथील रहीवाशी असुन, आपले शिक्षण पुर्ण झाल्यावर देशमुख यांनी यावल येथे ७ / ३ / १९९१या वर्षी पंचायत समितीत आपल्या प्रशासकीय सेवाकार्यास सुरुवात केली होती .

यावल पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामीण पाणीटंचाई विभागात त्यांनी सतत ३२ वर्ष तिन दशकापेक्षा अधिक काळ त्यांनी उत्कृष्ठरित्या एक उमदा व सर्व प्रिय असे कर्मचारी म्हणुन आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली . ३० नॉव्हेबर २०२२रोजी त्यांची प्रशासकीय मार्गाने जामनेर येथील पंचायत समितीत बदली झाली असुन , यावल पंचायत समितीत मागील ३२ वर्ष सेवा करीत असतांना त्यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा एक मोठा कुटुंब निर्माण केले , यावल पंचायत समितीचा पदभार सोडतांना रविन्द्र देशमुख हे अत्यंत भावुक झाले होते .

पण नौकरी आली म्हणजे बदली असते असे सांगुन त्यांनी आपल्या जन्मभुमि असलेल्या जामनेर तालुक्याची आपल्यास सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद ही त्यांनी व्यक्त केला . यावेळी त्यांना यावल पंचायत समिती कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी , तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रूबाब तडवी, सचिव पी . व्हि तळेले,हितेन्द्र महाजन , ग्रामसेवक मजीद तडवी , संगणक विभागाचे मिलींद कुरकुरे , जावेद तडवी , अक्षय शिरसाठ , चेतन चौधरी यांच्या आदीनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात .

चोरीला गेलेले 94,736 /- रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात,उरळ पोलीस स्टेशनला यश.

0

 

Akola प्रतिनिधी
अशोक भाकरे

अकोला -:चोरीला गेलेले 94,736 /- रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात,उरळ येथील पोलीस स्टेशनला यश.
अधिक माहिती अशी कि,अकोला जिल्ह्यातील बाळपुर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ येथे आज रोजी दिनांक -: 30 नोव्हेंबर रोजी पोस्ट परिसरातील मागील चार ते पाच महिन्यापासून फिर्यादी यांनी आपले मोबाईल मिसिंग झाल्या बाबत उरण पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या होत्या.

त्याबाबत पोलीस स्टेशनं चे ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शना खाली एक पथक तयार करण्यात आले. मोबाईलचा सायबर सेलची मदत घेऊन सदर मोबाईल तात्काळ शोध लावण्यात उरळ पोलीस स्टेशनला यश आले. व आज 30 नोव्हेंबर रोजी सदर फिर्यादी नामे कुणाल भीमराव तायडे राहणार. निंबा ,
संजय महादेव वानखडे राहणार.

गायगाव,विशाल श्रीपत परघरमोर रा. स्वरूपखेड,
विष्णू रामेश्वर बोर्डे राहणार शिंगोली,
अशपाक अहमद देशमुख राहणार. लोहारा, रोहित भास्कर चवरे राहणार.

अंत्री मलकापूर,नागेश राजू पाटील रा. खंडाळा. अधिक दोन इसम असे एकूण, 09 लोकांचे मिसिंग झालेले एकूण 09 मोबाईल.
सदर मोबाईल यांची अंदाजे किंमत 94,736/- रुपये व तसेच फिर्यादी माणिकराव रामभाऊ टाले रा.बादलापूर यांचे गुन्ह्यातील 21000/- रुपये रोख हे त्यांना परत करण्यात आले आहेत.
अशा प्रकारे उरळ पोलीस स्टेशन ने फिर्यादी यांचा मुद्देमाल हा त्यांना परत करण्यात आला आहे.


सदर कामगिरी करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकार, पोलीस अंमलदार राजाराम राऊत,अशोक पटोकार,शैलेश घुगे, सुनील सपकाळ आदी.

भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जालना जिल्हा शहर व ग्रामीण प्रभारी श्रीरामजी मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन:

0

 

Jalna प्रतिनिधी:(जालना)भाजपा भटके विमुक्त आघाडी चे राज्यव्यापी अधिवेशन २२ डिसेबंर रोजी नागपूर येथे घेण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाची पूर्व तयारी म्हणून संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी चे सचिव तथा जालना जिल्हा शहर व ग्रामीण चे प्रभारी श्रीरामजी मुंढे हे आज दिनांक ३० नोव्हेबंर रोजी जालना जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालय संभाजीनगर जालना दौऱ्यावर आले होते.त्यांनी सांगितले की,नागपूर येथील भटके विमुक्त आघाडीचे अधिवेशनासाठी जास्तीत-जास्त पदाधिकाऱ्यांनी यावेत व राहिलेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करावी व अहवाल लवकरात-लवकर पाठवावेत अशा प्रकारची मागणी त्यांनी भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश तारगे यांना सांगितले आहे.तसेच जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी,युवा जिल्हा पदाधिकारी,तालुकाध्यक्ष,महिला आघाडीच्या पदाधिकार्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन मुंढे यांनी केले आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ.रमेश तारगे,उद्धव जायभाये,दिलीप जाधवर,सुहास मुंढे,वसंत शिंदे,तुकाराम राठोड,रामनाथ राठोड,शिवाजी राठोड,राजू राठोड,लक्ष्मण राठोड तसेच शहरातील दिलीप जाधव आणि वडार समाज बांधव व त्यांचे सहकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jalna

आमदार,नगराध्यक्ष, कंत्राटदार मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करा शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मागणी

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

दि.२८नोव्हेंबर
हिंगणघाट :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने नगरपरिषद हिंगणघाटच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या जी. बी. एम .एम कनिष्ठ महाविद्यालय मध्ये स्लॅब व छताचे पाणी मुरल्यामुळे लावण्यात आलेल्या सिलिंग सीट पडले हे माहीत झाल्यावर शिव सेनेच्या वतीने पाहणी केल्यावर आमच्या पाहणीत आले कि या ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे दरवाजे, सिलिंग च्या शीट,शौचालय चे बोगस काम करण्यात आले आहे हे आमच्या निर्देशनात आले म्हणून
त्या करिता वर्धा जिल्हाप्रमुख अनिल भाऊ देवतारे तथा बाळाभाऊ शहागडकर ,यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सोनोले मॅडम यांना निवेदन देण्यात आले . निवेदन देतांना वर्धा जिल्हा संघटक भारत चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमणे, उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगरसेवक श्रीधर कोटकर, मनीष देवडे ,भास्कर ठवरे ,बंटी वाघमारे ,शंकर मोहम्मारे ,शहर संघटक मनोज मिसाळ,यांचे उपस्थितीत होते. निवेदन देण्यापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली असता शाळेचे काय आर्थिक नुकसान झालेले आहे . तेथील सर्व फोटोग्राफ घेण्यात आले व पडलेल्या भागाची पाहणी करण्यात येऊन , तिथे विद्यार्थ्यांची विचारपूस करून चौकशी केली असता कुठलीही जीवित हानी झाली नाही याची खात्री करून घेतली. पंरतू नगर परिषदेने तब्बल चार वर्षांपूर्वी आराखडा मंजूर करून, नगरपरिषदची शाळा नव्याने बांधकाम हाती घेण्यात आले होते. त्या बांधकामा करिता शासनाकडून 8 कोटी 80 लाख रुपये खर्च करण्यात आले व ती शाळा नव्याने बांधण्यात आली व तिचे लोकार्पण घाईघाईने केंद्रीय मंत्री श्री .नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले .स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी स्थानिक लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष व येथील लोकप्रतिनिधी(आमदार) तसेच नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची चाचपणी न करता इमारत लोकार्पण कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून दिली .परंतु सदर इमारतीत एवढा दोष असतांना सुद्धा येथील विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याची या लोकप्रतिनिधीना व प्रशासनाला कोणी अधिकार दिला आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने नगरपरिषद चे मुख्यधिकारी यांनी आपल्या विभागा कडून जाहीर स्पष्टीकरण दिले की, कंत्राटदाराचे सुरक्षा राशी जमा ठेवलेली आहे .परंतु आमचे म्हणणे असे आहे की, कॉन्ट्रॅक्टदाराच्या सुरक्षा राशी असून सुध्दा एकाद्या विद्यार्थी चा जीवितहानी झाली तर ती भरून निघेल का ? याबद्दल मुख्याधिकारी साहेबांनी, खुलासा करावा यानंतर देखील अशा परिस्थितीत असे लक्षात येते की, या घटना पुनश्य: होऊ शकते.याला नाकारता येत नाही, याचे कारण आम्ही जरी टेक्निकली नसलो तरी वरतून छताचे जे पाणी टीप टीप गळत आहे त्यावरून असे आम्हाला जाणवले. यावेळी जीवित हानी झाली नाही परंतु असे काही घडल्यास याला जबाबदार कोण राहील याचे स्पष्टीकरण मुख्याधिकारी कंत्राटदार व लोकप्रतिनिधी आमदार यांनी द्यावी! अन्यथा लोकार्पण घेणाऱ्या आमदार,नगराध्यक्ष, कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.असे केले नाही तर आम्ही शिव सैनिक मुख्याधिकारी साहेबांचा घेराव करू हे मात्र नक्की.निवेदन देण्याकरिता शिवसेनेचे उपशहर प्रमुख- संजय पिंपळकर, शंकर झाडे, जयंत रोहनकर, लक्ष्मण बकाने, नरेंद्र गूळकरी,विभाग प्रमुख – रुपेश काटकर, सचिन मुळे, मोहन तुमराम,नितीन वैद्य, दिनेश धोबे,अनंता गलांडे, सुनील आष्टीकर,दिलीप चौधरी, आशिष जैस्वाल,देवा शेंडे, भास्कर मानकर,हिरामण आवारी,बलराज डेकाटे,चंदू भुते, गोवर्धन शाहू मोठया संख्येने उपस्थित होते

शेतकऱ्यांचे जळालेले ट्रांसफार्म २ दिवसांमध्ये दुरुस्ती करून द्या. अन्यथा आंदोलन :- अक्षय पाटील

0

 

जळगाव जा. :- यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या पेरणीला सुरुवात केली त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी हरभरा,गहू, कांदा व इतर भाजीपाला पिके पेरलेली आहे.

ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची साधन म्हणून बोर,वीर आहे. ते शेतकरी आपल्या पेरलेल्या पिकाला पाणी द्यायच्या तयारीत आहेत. परंतु महावितरणच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील काही गावातील शेतकरी मात्र हैराण होतांनी दिसतात त्याचे कारण असे की काही ठिकाणी शेतातील ट्रान्सफॉर्म हे बंदअवस्थे मध्ये पडलेले आहे. तर काही ठिकाणी डिपीमध्ये ऑइल कमी व इतर तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत नाही.

जे ट्रान्सफॉर्म जळालेले आहेत असे ट्रान्सफॉर्म दुरुस्त करा याकरता महावितरण कडे अनेक गावातील शेतकरी मागणी करीत आहेत. यामध्ये पाटण शिवारातील बेद्रे डिपी व तरोडा खु. शिवारामधील गावातील शेतकऱ्यांनी बिलाचा पैसा गोळा करून महावितरण कडे पैसे जमा सुद्धा केले.

परंतु पैसा भरून सुद्धा दाहा-पंधरा दिवस उलटून शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्म भेटत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.

खरंतर उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहील जाते त्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास जर महावितरण तर काढण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कदापिही सहन केल्या जाणार नाही ही मागणी घेऊन आज महावितरण कार्यालय गाठत जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी धडक दिली. जर २ दिवसांमध्ये शेतकऱ्यानां ट्रान्सफॉर्म दिले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपकार्यकारी अभियंता यांना दिला.

यावेळी तालुक्यातल व वडशिंगी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

नगर परिषद हिंगनघाट द्वारा राबविण्यात येत आहे शाळाबाह्य विद्यार्थी मुहिम

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिला परिषद वर्धा , यांचे पत्र क्रमांक शिक्षण/सशिअ/307/202. दिनांक: 14 /11/2022 अनव्ये नगर परिषद, हिंगनघाट Hingnghat द्वारे शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलाना शालेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी नगर परिषदे तर्फे कलोडे भवन जवल ,वडर वस्ती कारखाने व बांधकामाचे क्षेत्र ,स्टेशन फैल ,वस्ती कारखाने व बांधकाम क्षेत्र, वीट-भट्टी क्षेत्र ,बस स्टॉप जवडील क्षेत्र , कारखाने व बांधकामाचे क्षेत्र व नंदोरी रोड व नागपुर Nagpur रोड वरील कारखाने व बांधकाम क्षेत्र ,विट-भट्टी क्षेत्रामध्ये जावुन ,दिनांक 20 नोव्हेबर 2022 ते दिनांक. 5 दिसेंबर 2022 या कालावधी मध्ये सर्वेक्षण करण्या साठी श्री हर्षल गायकवाड मुख्य अधिकारी नगर परिषद हिंगनघाट यांची आदेशानुसार श्री प्रवीण काळे प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग नगर परिषद हिंगनघाट

यांचा नियंत्रणामध्ये श्री निलेश शिंदे प्रशासकीय अधिकारी नगर परिषद हिंगनघाट यांच्या देखरेखे खाली, शहर मध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू असुन नगर परिषदेतर्फ या कामासाठी मधुकर बावने पर्यवेक्षक तथा मुख्याध्यापक नगर परिषद प्राथमिक शाला नगर परिषद हिंगनघाट ,यांच्या वति ने सहायक शिक्षक व शिक्षिका कल्पना कारामोरे, अरविंद निमजे, छाया राईकवार ,पिंकी बघेल, आरती माहुरे, एस के मस्के, सुनीता भूमर नीलिमा तेलतुंबरे, विजय बोरकर, कविता चौहान, प्रेमकुमार पालीवाल , मीना आडकीने यांच्या मार्फत मोहिम राबविण्यात येत असून. दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ,रोजी कचरा वेचणायांचे पाल्य ,संत ज्ञानेश्वर वार्ड, रिठे काँलोनी परीसरमध्ये एकुण 9 शाळाबाह्य विद्यार्थी आढलुन आले,त्या विद्यार्थियांना जवळील शहालंगड़ी प्राथमिक शाळा हिंगनघाट.

येथिल शाळेत दाखल करण्यासाठी तेथिल मुख्याध्यापक श्री सिंगोटे, कविता घोड़े (विषय तज्ञ) ,सुनीता गजभिए (बालक संरक्षक) पंचायत समिति हिंगनघाट व नगर परिषदे तर्फे प्रवीण काळे, प्रशासन अधिकारी (शिक्षा विभाग) नगर परिषद हिंगनघाट. प्रेमकुमार पालीवाल सहायक शिक्षक, श्रद्धानंद हिंदी प्राथमिक शाला ,कविता चौहान व मीना आडकिने सहायक शिक्षिका लोकमान्य तिलक नगर परिषद प्राथमिक शाळा हिंगनघाट

यांचा उपस्थिति विद्यार्थियांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी दाखल करण्यात आले.तसेण ईतर शहरामधे कुठे शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आल्यास श्री मधुकर बावने पर्यवेक्षक तथा मुख्याध्यापक यांच्या दूरध्वनी क्रमांक: 9970566880 या वर माहिती देण्याचे आव्हान करण्यात येत आहे.